Leave a message
Showing posts with label खिल्ली. Show all posts
Showing posts with label खिल्ली. Show all posts

Wednesday, December 29, 2021

लोकशाही : एक सखोल चिंतन

..... ’लोकशाही म्हणजे लोकांनी चालवलेले लोकांचे आणि लोकांच्यासाठी असलेले - म्हणजे थोडक्यात आपल्यासाठी नसून लोकांसाठी असलेले सरकार - लिंकन (थोडा फेरफार करून. अधिक माहितीसाठी काही वाचण्याची गरज नाही)

इसापनीतीत एक गोष्ट आहे. बेडकांना एकदा वाटते, आपल्याला राजा हवा. वास्तविक त्यांना राजाची आवश्यकता का भासवी, कोण जाणे. भासली खरी. शेवटी देवाने ओंडका फेकला. बेडकांनी आठ दिवसात त्याच्यावर नाचायला सूरुवात केली - तेंव्हा देवाने अधिक कडक राजा हवा म्हणून बगळा पाठवला. पूर्वीचे चैनी राजे प्रजेच्या खर्चात विहार करीत, ते सोडून ह्या बाहेरुन शूभ्र दिसण्या-या राजाने, प्रजेचा चक्क आहारच करायला सूरुवात केली. बेडकांनी हाही राजा परतवला आणि आपल्यातून राजा निवडायचे ठरविले. तो अजूनपर्यंत निवडला गेला की नाही ते कळत नाही. आरडाओरडा मात्र चालोतो. दर पावसाळ्यात त्यांच्या सभा होतात. गळ्याचे गोळे फूगवून वृद्धदुर्दर भाषणे करतात. वर्षभर पून्हा काही ऎकू येत नाही. बहूधा मंडूकशाही सुरू झाली असावी वर्षातून एकदा निवडणूका देखील होत असाव्यात.
-----------------------------------------------------------

समजा अगदी एखादा नवा वझीर नेमायचा आहे. प्रोसिजर सरळ! गावात दवंडी पिटवायची. बरे, ही दवंडी पिटवताना देखील नुसते, ' नवा वझीर नेमायचा आहे हो ss.. गरजुंनी उदईक माध्यान्ही दिवाणेखासमध्ये हाजीर व्हावे होss..' अशी साधी दोन वाक्ये. दाखले, शिफारसी, वयाची अट, शिक्षण, पदवी वगैरे काही काही नको. उमेदवार-वझीर दरबारात येतात. मग सर्वांना मिळून सुलतान एखादे कोडे घाली. ' चाॅंद आसमानातच का राहतो? ' अशासारखा एखादा प्रश्न विचारला जाई. सारा दरबार आणि उमेदवार-वझीर बुचकळ्यात पडत. सगळीकडे सन्नाटा! मी मी म्हणणारे बुजुर्ग दाढीचे केस मोजू लागत. अशा वेळी एखाद्या उमेदवार-वझीराच्या घोड्याला खरारा करणारा मोतद्दार पुढे सरसावून तीन वेळा कुर्निसात करून विचारी,
' जहाँपन्हाॅं, आपल्या सवालाचा जवाब देण्याची गुस्ताखी मी करू का? '

' जवाब गलत निघाला तर जबान छाटली जाईल. '

' बेशक जहाँपन्हाॅं '

' दे जवाब, चाॅंद आसमानातच का राहतो? '

' हुजुर सलतनत बडी असो वा छोटी, जातीचा सुलतान नेहमी तख्तावरच बसणार. '

' बेशक.. पण मतलब? '

' मतलब हाच हूजुर, चाॅंद आसमान सोडून धरतीवर आला तर त्याला बसायला एकच तख्त आहे पण त्याच्यावर तर हुजुर तश्रीफ ठेवून राहिले आहेत. '

' मतलब? ' सुलतान प्रश्न विचारण्यात हुशार असला तरी उत्तर समजण्यात असेलच असे नाही.

' मालिक, आपण धरतीवर असताना चाॅंदच काय पण सूरज जरी आला तरी त्याला बसायला जागा कुठे आहे? म्हणून तो बिचारा आसमानातच राहतो. '

' शाबास! तुला दहा हजार अश्रफिया इनाम! काय नाव तुझे? '

' माझं नाव म्हमद्या! '

' तू रोजगार कोणता करतोस? '

' मी नवाब हारजंग तलवारजंग बहाद्दरांचा मोतद्दार आहे सरकार. '

' तुझा मालिक कुठे आहे? '

' बंदा हाजीर आहे खुदावंत ' नवाबसाहेब पुढे येऊन म्हणत.

' तू इथे कशासाठी हाजिर आहेस? '

' वझीर होण्यासाठी, हाजिर सो वजीर सरकार '

' खामोष! असला अफलातून दिमाग असलेल्या फनकार जवानाला घोड्याला खरारा करायला ठेवणारा बुद्धु कहीं का. बोल तुझा गुनाह कबुल? '

' कबुल खुदावंत '

' जलदी कबुल झालास म्हणून वाचलास. नवाब हारजंग आजपासून तुझं नाव
म्हमद्या ठेवलं आहे आणि म्हमद्या तुला नवाब हारजंग तलवारजंग बहाद्दरांचा किताब आणि जहागिरी देण्यात येऊन सलतनितीची वझीरी देण्यात आली आहे. दरबार बरखास्त! '

- पु.ल. देशपांडे
लोकशाही : एक सखोल चिंतन
खिल्ली

Saturday, April 30, 2011

गांधी टोपी - खिल्ली

राष्ट्रीय चळवळीत भाग घेतलेल्या एका वृद्ध स्नेह्यांना मी विचारले, “ गेल्या पंचवीस वर्षांत सर्वांत मोठे परिवर्तन कशात झाले असे आपल्याला वाटते ?"

"गांधी टोपीत !" ते म्हणाले.

"ते कसे काय ?"

"पूर्वी गांधी टोपी घालायला इंग्रज सरकारची भीती वाटत होती. हल्ली आपल्याच जनतेची वाटते."

"असं का म्हणता ?"

तूच पाहा गांधी टोपी, पायघोळ धोतर, खादीचा झब्बा आणि जाकीट घालून हातात एक कातडी अटॅची घेतलेल्या माणसाविषयी तुझे प्रथम दर्शनी मत काय होते ?" मी बोललो नाही. मला जुनी हकीगत आठवली.

मिठाच्या सत्याग्रहाचे दिवस होते. लॅमिंग्टन रोडवर पोलिस स्टेशनपाशी सत्याग्रहींचा जथा आला होता. लोक निर्भयपणे पोलिसांच्या गाडीतून घुसून स्वतःला अटक करून घेत होते. त्या गर्दीत एक तरुण स्त्री होती. तिने आपल्या अंगावरचे दागिने उतरवले. शेजारच्या एका माणसाच्या हाती दिले. त्याला आपले नाव सांगितले, पत्ता सांगितला आणि म्हणाली,

"माझ्या घरी हे दागिने नेऊन द्या आणि सांगा ‘म्हणावे, मी सत्याग्रहात गेले."

तो गृहस्थ म्हणाला,"बाई, तुमची माझी ओळखदेख नाही. तुमचे हे दागिने मी तुमच्या घरी पोहोचवीन असा तुम्हाला विश्वास का वाटतो ?” तुमच्या अंगावर खादी आहे. आणि डोक्यावर गांधी टोपी आहे म्हणून."

इतक्या आपुलकीने आणि विश्वासाने भारतीय माणसांना जोडणाऱ्या गांधी टोपीची आज जी स्थिती झाली आहे ती आमच्या गेल्या पंचवीस वर्षांच्या स्वातंत्र्यातल्या वाटचालीची कमाई समजावी का ! आता त्या गांधी टोपीवर पांढऱ्याला अधिक चकचकित पांढरे करणारे टिनोपाल बिनोपालसारखे द्रवण आले आहे. त्या चकचकाटाला आणि कडक इस्त्रीलाच प्रगती मानून आत्म- संतोषात राह्यचे असेल तर ती गोष्ट निराळी ! माझ्या स्वराज्याच्या कल्पनेत होता तो गांधी टोपीचा प्रवास या दिशेने होणारा नव्हता.

- पु.ल. देशपांडे 
एका गांधी टोपीचा प्रवास
खिल्ली

a