Leave a message

Friday, December 3, 2021

पुलंची मजेशीर पत्रे - १

मुंबईचे ना कुलकर्णी यांनी मराठीच्या सांप्रतच्या रहासाबद्दल १२ डिसेंबर १९९० ला पुलंना लिहितात.

"आपल्यासारख्या ग्रेट पर्सनला असे फ्लिपंट पत्र लिहिल्याबद्दल सॉरी. पण इंग्लिश व हिंदी लँग्वेजेसच्या जॉईंट अँटँकमुळे मराठी लँग्वेजची जी बँड कंडिशन झाली आहे त्याबद्दलची माझी स्ट्रॉग फीलिंग्ज एक्सप्रेस करण्यासाठी मला बेटर मेथड स्ट्राइक झाली नाही क्षमस्व.

ही स्ट्रॉग फिलींग्ज कशाबद्दल ? तर,या दिवसा दूरदर्शनीय मराठीय कार्यक्रमांमध्ये तथा मराठीय समाचार पत्रांमध्ये तिलक, सावरकर, आदी फडतूस इसमांनी दिल्या असलेल्या मराठीय संग्यांचा प्रयोग कमी होत जाऊन राहिला आहे. तथा त्यांच्या बदल्यामध्ये हिंदी संग्यांचा प्रयोग बड्या पैमान्यावर सुरू होऊन राहिला आहे. "

या पत्राला लगेचच १८-१२-९० रोजी उत्तर लिहिताना पुलंनी एकच धमाल केली आहे :

"एकवीसमी सदीत मराठीचा माहौल अजिबच राहून राहणार आहे. भाषा ही सोसायटीच्या बिहेवियरवर डिपेंड करते. रहनसहनमध्ये फर्क पडला की, भाषेतही फर्क पडतो. मुंबईसारख्या भेलपुडी संस्कृतीत, तर राष्ट्रभाषा हिंदी (सियावर रामचंद्रकी जय) गुजराती, बिगर मर्हेटी श्रीमंतीपुढे संकोचून कोन्यात उभी राहिलेली मराठी तर सगळ्या भाषा घुलमिलाकर एक नवीच मर्हेटी तयार होणार आहे... पहिले माणूस टू माणूस भाषा कानावर यायची आता पेपरवाल्याचे मराठी, रेडिओवाल्यांचे मराठी, दुर्दर्शनवाल्यांचं मराठी अशी भाषिक घुसखोरी सुरू झाली आहे . त्याला एकच उपाय म्हणजे इतर भाषांचं बिनधास्त मराठीकरण करणं. हमारी आयडिया समझा क्या ? सुज्ञको अधिक सांगणेची गरजच नही."

ह्या पत्राच्या खाली 'भवदीय पु.ल. देशपांडे' अशी सही केलेली आहे आणि सहीखाली कंसात लिहिलं आहे, “आमच्या नावातच मराठी देश आणि हिंदी पांडे आहे हेही ध्यानी यावे.”

- सोनल पवार
संदर्भ- अमृतसिद्धी

0 प्रतिक्रिया:

a