Wednesday, January 24, 2007

आहे मनोहर तरी. (सुनीता देशंपाडे)

आहे मनोहर तरी...
प्रकाशक :- श्री. पु. भागवत, मौज प्रकाशन गृह,पुणे
सर्व कॉपीराईट्स - मौज प्रकाशन गृह
----------------------------------------------------------
पान नं. 1

हे आत्मचरित्र नाही.

आठवणींच्या प्रदेशातली ही स्वैर भटकंती. पाखरांसारखी क्षणात या फांदीवरून त्या फांदीवर ,कुठूही. दिशाहीन. पण स्वतःच्याच जीवनसूत्राशी अदृश्य संबंध ठेवत केलेली.

आयुष्यात प्रत्यक्ष भेटलेली माणसे यात नाहीत. म्हणजे त्यांना मी विसरले असे नव्हे. पण या विशिष्ट भटकंतीत ती भेटली नाहीत इतकेच. आणि जी भेटली, तीही त्या त्यासंदर्भात भिडली तितकीच इथे उमटली. त्यांचेही हे संपूर्ण चित्र नव्हे.

पाण्यात ओढस लागण्याचे प्रसंग आयुष्यात सतत येत असतात. ही स्थळातून जळात आणि जळातून स्थळात जाण्याची ओढ (की खोड?) टागोरांनाही होती असे त्यांनी म्हटलेय. मग माझ्यासारख्या सामान्यांची काय कथा ?

प्रत्येकाने स्वतःच्या शालेय जीवनात आपण पुढे कोण होणार यावर एकतरी निबंध लिहिलेला असणारच. स्वतःचे ते आदर्श चित्र निबंधाच्या वहीतच राहते. पुढे कधीतरी प्रौढवयात आपल्यातले ते नार्सिससचे फूल दरवळायला लागले की कालप्रवाहाच्या सतत हलणाऱ्या पाण्यात दिसणारे स्वतःचे प्रत्यक्ष प्रतिबिंब आणि ते वहीतले चित्र यांचे काहीतरी नातेजाणवते का ?

अशा अनेक प्रश्नांचा हा आलेख.आमच्या संसारातल्या सततच्या धावपळीतून गेल्या चार-पाच वर्षात अधून मधून वेळ मिळेल तसे, थोडेथोडे तुकडया तुकडयांनी केलेले हे लिखाण. कोणतीही योजना न आखता केलेले. त्यामुळे सुरूवातीचा मूडही अधूनमधून बदलणे स्वाभाविकच आहे.

एकटी असले की आताशा कोण कधी समोर येऊन ठाकेल सांगता येत नाही.

कधी बोरकरांनी पाठवलेले गडद निळे जलद भरभरून येतात आणि आकाश धुऊन स्वच्छ करतात. दिवस सोनेरी होतो आणि रात्र रूपेरी. सर्वदूर नक्षत्रांची रांगोळी च रांगोळी. धामापूरच्या आजीच्या बागेतल्या फुलांचा दरवळ घेऊन आलेली हसरी ओलसर नक्षत्र.
------------------------------------------------------------------------------------------------

पान नं. 2

पळसखेडच्या दिशेने पक्ष्यांचे लक्ष थवे येतात आणि त्यांतलं एखादं वेल्हाळ पाखरू गात माझ्या झाडावर उतरतं.

चोहूकडून नातवंडं येऊन बिलगतात आणि `गोष्ट सांग' म्हणून चिवचिवाट करतात....हे सगळं किती लोभसवाणं आहे ! मग माझ्याच पापण्यांत पुन्हा पुन्हा हे असं धुकं कांजमा होतंय ? `आहे मनोहर तरी गमते उदास ' अशी ही मनाची अवस्था असताना या

पाखरांना मी गोष्ट तरी कोणती सांगू ?
एक होता राजा आणि एक होती..
(एक कोण होती ?)
... आणि एक होती परी की एक होती म्हातारी ?की...
(दुसरं कुणी नव्हतंच ?) फक्त...
एक होती परी आणि ती झाली म्हातारी ?........

सफळ संपूर्ण व्हायला ही साठा उत्तरांची कहाणी नाहीच. ही साठा प्रश्नांची कहाणी.सफळही नव्हे आणि निष्फळही नव्हे. अपूर्ण मात्र नक्कीच.

सध्या असा एक मूड आहे की ज्याला `आताशा मी नसतेंच इथे' मूड म्हणता येईल.म्हणजे कुणाला भेटू नये, कुणी येऊन डिस्टर्ब करू नये, एकटेच बसावे, स्वतःतच राहावे,असा. पडून किंवा बसून राहावे.- डोळे उघडे किंवा मिटलेले, कसेही. पण सभोवारचे काहीच न पाहता, त्यात अगर या इथे न राहता. सारा कल्पनेचा किंवा विचारांचा खेळखेळत, त्याच जगाशी एकरूप होत, तिथली सुखदुःखे भोगत.अशा वेळी डोळ्यांना दुसरचं जग दिसत राहतं. कानांची स्थिती Sir Thomas Browneच्या शब्दांतल्या नाईल नदीसारखी होते.`and Nilus heareth strange voices' अशी. धूसर स्वप्नं पडत राहतात, विरत राहतात. `मी झालेंय निळं गाणं- निळ्या नदीत वाहणारं- निर्मात्याबरोबरच' ती हीच अवस्था का ? पद््माबाईना विचारायला हवं.

आयुष्याच्या सुरूवातीला, जिथून आयुष्य फुलायला लागते अशा वळणावर एक, आणि शेवटी शेवटी, म्हणजे जिथून आयुष्य उतरणीला लागले अशा वळणावर एक, असे दोन जबरदस्त मित्र मला लाभले. दोघेही अगदी भिन्न प्रकृतीचे,प्रवृत्तीचे. मीही तीच राहिले नव्हते. पार बदलून गेले होते. मधल्या काळात तिसऱ्याच एकाच्या सहवासात स्वतःला पूर्ण विसरून, चक्रावून - अगदी पायाला चाके लावून- त्याचा संसार केला. तोही जबरदस्त होता म्हणून मी या बंधनात अडकले की... तो अगदीच मूल होता म्हणून त्याचेच खेळणे
------------------------------------------------------------------------------------------------
पान नं. 3

करून मनसोक्त खेळत राहिले ? की दोन्ही ?

आजा पाहावे तिथे सगळी स्वच्छ निराशाच दिसतेय. आकाशदेखील कुठे निळे नाही.सगळीकडे एकच राखी रंग, अगदी निर्मळ किंवा विशुध्द कारूण्याची राखी रंगच्छाटा.Grayof the purest melanchol. झाडे देखील स्तब्ध, विचारमग्न उभी आहेत. आईच्या डोळ्यांत गलबल दिसली तर कडेवरचं मूल कसं बावरून तिला नुसतं बिलगून राहतं तशी पानांची सळसळही पूर्णपणे विराम पावली आहे. माझ्या मनात कसले विचार येताहेत त्याच्याशी याबाहेरच्या जगाचे इतके जवळचे नाते असेल? कोण जाणे. पण कदाचित साऱ्यासजीव-निर्जीव सृष्टीशी माझे अज्ञात नातेही शेवटी त्याच मूलतत्त्वांतून-पंचमहाभूतांतून - सारी सृष्टी निर्माण झाली ना ? मग सारे काही अदृष्ट धाग्यांनी जोडलेलेनसेलच कशावरून ? समोरच्या खिडकीच्या लोखंडी गजांचे माझ्या रक्तातल्या लोहाशी नाते असेलही. समोर कोण राहतो ? त्याची-माझी ओळख नाही, त्याचे नाव मला माहीत नाही.अरे वेडया, आम्हा बाहेरच्या लोकांपासून संरक्षण मिळावे म्हणून खिडकीच्या झरोक्यात तू उभे केलेल हे लोखंडी पहारेकरी आमच्याही नात्यातलेच आहेत हे कसे विसरलास ? हा विचार आला आणि सगळे काही मूर्खपणाचेच वाटायला लागले. मूर्खपणाचे की भीतिदायक ?की आशादायक ?

मूड्स तरी किती अस्थिर असतात ! येतात, जातात. पण मुक्कामाला आले की कधीतरी हेपाहुणे जाणार आहेत हे भानच नाहीसे होते, आणि आपण त्यांच्यात अगदी बुडून जातो.

प्रचंड वेगाने स्वतःभोवती आणि आपल्या जन्मदात्या भोवती फिरणारी ही पृथ्वी अशीच,या मूड्ससारखीच, पाय रोवायला आधारभूत आणि स्थिर वाटते. या वेगाचे आणि तिच्याही हतबलतेचे ज्ञान झाले की भीतीने आपले पाय डळमळू लागतात. अज्ञानात खरेच सुख आहेहे आपला अनुभव हरक्षणी सांगत असतो, तरीही आपण ज्ञानाच्या मागे धावतो आणि आपल्या मुलाबाळांनाही ज्ञानी करण्यासाठी धडपडतो. हा शहाणपणा म्हणायचा की वेडेपणा ?

माझ्या लहानपणी आमच्या घरात बालदत्तोत्रेयाच्या चित्राची एक फ्रेम होती. रंगीत पाटावर मांडी घालून बसलेल्या वर्ष-दीड वर्षांच्या बालकासारख्या गोड चेहऱ्याच्या हसतमुखदत्तात्रेयाचं ते चित्र मला खूप आवडायचं. आईने मग ती फ्रेम मलाच दिली. तिच्या देवांजवळच भिंतीवर, माझा हात पोचेल इतक्या उंचीवर खिळा मारून घेऊन त्यावर मी ती टांगली. रोज बागेतून निवडून निवडून फुले आणायची आणि त्यांचा हार करायचा. आंघोळ झाल्याबरोबर त्या फ्रेमची काच पुसून त्या देवाला पुन्हा गंध लावायचं आणि तो फुलांचा हार घालायचा. मग हात जोडून डोळे मिटून मी प्रार्थनाकरीत असे. ही प्रार्थना निश्चित
------------------------------------------------------------------------------------------------

पान नं. 4

कोणती होती, त्यातून मी त्या देवाशी कोणता संवाद साधत होते, यांतले काहीच आता आठवत नाही. पुढे कधीतरी मी नास्तिक होत गेले आणि पक्की नास्तिक झाल्यावर त्याचा अभिमानही बाळगू लागले. आजही मी नास्तिकच आहे, अगदी पक्कीच. पण आज वाटते,नास्तिक्य ही अभिमान वाटण्यासारखी गोषट असली तरी त्यात मनःस्थिती मात्र नसते आस्तिक्य हे बिनबुडाचे असते खरे, पण त्या अज्ञानात सुख नक्कीच असते. इथे सुखाचा अर्थस्थेर्य,आधार, शांती, असाही असेल. त्यामुळे मला माझ्या नास्तिक्याचा अभिमान असलातरी आस्तिकांचा हेवा वाटतो. आणि दुर्देवाची गोष्ट अशी की आस्तिक माणूस हा विचारान्ती पुढे नास्तिक होऊ शकतो,, पण खरा नास्तिक हा आस्तिक कधीच होऊ शकत नाही.
------------------------------------------------------------------------------------------------

पान नं. 5

आप्पांना जाऊन आता सात वर्षे होऊन गेली. त्यांच्या मृत्यूनंतर दोन वर्षाच्या आतच आईही गेली. जन्माला आलेलं प्रत्येकजण असं जातच असतं. शिवाय त्यांची वयेही झाली होती. हे सगळे खरे असले तरी अशा व्यवहारी दृष्टिकोनातून मला आप्पा-आईकडे पाहता येत नाही. मी स्वतः नको तितकी व्यवहारी आहे तरीही. त्यांनी मला जन्म दिला, माझे पालनपोषण केले. वयाच्या पंधरा-सोळाव्या वर्षापर्यंत मी त्यांच्याच छत्राखाली वाढले. त्यानंतर मी स्वंतत्र जीवनक्रम स्वीकारला, तरी शेवटपर्यंत आमचे संबंध कुठेही दुरावले नव्हते. उलट माझे वय वाढत गेले तशी प्रेमाची किंमत मला अधिकाधिक जाणवू लागली आणि त्यांच्या मृत्यूमुळे पोरकेपण आले.

पण यात नवल ते काय ? आई-वडील गेले की मुले मोठी असली तरी पोरकी होतातच.मग हळूहळू दुःख कमी कमी होत जाते आणि पुढे सोईस्कर विसरही पडायला लागतो. अधून मधून आठवणी तेवढया शिल्लक राहतात. बऱ्या,वाईट, दोन्हीही माझ्या बाबतीत ही नेसर्गिक वाटचाल आहेच. पण आणखीही काही घडतेय. ते निश्चित काय ते निरखण्याचा का हा प्रयत्न आहे ?

आप्पांना मृत्यू मोठा छान आला. वयोमानाप्रमाणे ते थकत चालले होते, शरीरदुबळे होत होते, स्मृतीही अंधूक होत चाललीय का अशी अधून मधून शंका येई. पण समाधानी वृत्ती आणि प्रेमळपणा जराही कमी झाला नव्हता. निवृत्तीतला आनंद मनसोक्त घेत आणि परावर्तित करीत त्यांचे वय वाढत होते. त्यामुळे त्यांनी आपल्यातून कधी जाऊच नये असेच त्यांच्या सहवासात आलेल्या सर्वांना वाटे. त्यांचा शेवटचा आजारही आला तसाच झटकन त्यांना घेऊन गेला. अवघ्या बारा तासांत सकाळी एकरा-साडेअकराला त्यांना हार्ट-अँटॅक आला. लगेच उपचार सुरू झाले,आणि पुण्या-मुंबईला मुलांना फोन गेले. रात्री आठनंतर एकेक गाडी येऊन पोचली आणि सगळी मुले त्यांना भेटली. आम्ही दोघे सर्वात शेवटी दहा वाजता येऊन पोचलो. सलाइन,ऑक्सिजन वगेरे लावलेल्या अवस्थेत ते डोळे मिटून पलंगावर पडले होते. भोवतीला सगळे आप्तस्वकीय. मी त्यांच्या कानाशी जाऊन म्हणाले,""आप्पा मी आलेय. कसं वाटतंय तुम्हाला ?""

त्यांनी मोकळा असलेला हात माझ्या पाठीवरून फिरवत क्षीण आवाजात म्हटलं,"
"किती ग माझ्यासाठी माझ्या बाळांना त्रास झाला !"
------------------------------------------------------------------------------------------------

"पान नं. 6"

"आप्पा, मला ओळखलंत ?"""
"माझे भाई नाही आले ?"
"म्हणजे त्यांनी बरोबर ओळखले होते. मग त्यांनी माझ्याकडे थोडे पाणी मागितले. डॉक्टर सकाळी आप्पांना अँटॅक आला म्हणता क्षणी आले होते ते आता घरी जायला निघाले. मी दारापर्यंत त्यांच्याबरोबर जात त्यांना म्हटले,"
"आप्पांचं सर्व काही फार छान झालंय. त्यांना सुखानं जाऊ दे. आता उगाच त्यांना नाकातोंडात नळ्या घालून जगवत ठेवू नका."

"डॉक्टर मला म्हणाले,""त्यांना आलेले अँटॅक इतका जबरदस्त आहे की आम्ही कितीही प्रयत्न केला तरी आता ते त्यातून वाचणार नाहीत. सकाळपासून इतका वेळ राहिले ते केवळ त्यांच्या विलपॉवरवर. सगळ्या मुलांना भेटायची त्यांची इच्छा होती.असावी. ती आता पूर्ण झाली आहे. मला नाही वाटत आता ते फार वेळ राहतीलसे" "आणि तसंच झालं. दहा-पंधरा मिनिटांत आप्पांनी प्राण सोडला.

बिचाऱ्या आईचा आजार मात्र साडेतीन-चार महिने रेंगाळला. तिला स्ट्रोक आला आणि अर्धांग लुळं पडलं. हळूहळू स्मृती,वाचा,भान सगळे जात चालले; आणि नेमके तिला नको असलेले परावलंबित्व आले. पेसा,मनुष्यबळ,काही कमी नव्हते.पण अपंग होऊन तिला जगायचे नव्हते, आणि तेच नशिबी आले. ती आजारी पडताच आम्ही मुंबईला आणले. तिथे सगळी मुले,नातवंडे,लेकी,सुना-सगळीसगळी होती. त्या तीन-चार महिन्यांत आळीपाळीने तिच्या जवळ बसत होतो.कामे वाटून घेऊन करत होतो. तिऱ्हाइताला पाहताना वाटावे, आई किती भाग्यवान !कुणी कमी पडू देत नाहीत. पण प्रत्यक्षात मात्र हे सगळे कर्तव्यबुध्दीने,नाइलाजास्तव चालले आहे याची जाणीव मला अस्वस्थ करीत होती, अद्याप करतेय.

समजा, तिच्या ऐवजी मी अशी आजारी असते, तर ती सारखी काहीतरी औषधोपचार,सेवाशुश्रूषा,नवससायास करत राहिली असती.

तिचा हा शेवटचा आणि खराखुरा एकमेव आजार. यापूर्वी, गेल्या इतक्या वर्षांच्या काळात ती कधी आजारी पडलीच नाही असे नाही. पण डॉक्टरपेक्षाही स्वतःचे औषधपाणी स्वतःच करत ती त्या अवस्थेतही घरकाम जमेल तसे करतच राही. ती अंथरूणात आराम करतेय आणि दुसरं कुणी तिची सेवाशुश्रूषा करतंय असं दृश्यप्रयत्न करूनही माझ्या डोळ्यांपुढे येऊ शकत नाही. परावलंबित्व ही गोष्टच तिला नमानवणारी. आणि दुर्देवाने नेमकी ही अवस्था मला पुरेपूर जाणवत होती, तरीही तिच्या सेवेला सगळे सोडून मी द्यावा तितका वेळ दिला नाही.

आई गेली. मुलेबाळे,नातवंडे लेकीसुना,अगदी भरले घर होते, तरी तिच्या शेवटच्या क्षणाला ती एकटीच होती. ती तर गेली, चांगली म्हातारी होऊन गेली. मग आता यानंतर त्याबद्दल लिहून मी दुःख उकरून काढतेय का ? हे दुःख नव्हे; हा
----------------------------------------------------------------------------------------------

पान नं. 7

वरचेवर होणारा मनाचा गोंधळ आहे. उलटसुलट विचारांचा, भावनांचा गुंता आहे.तो सोडवता आला तर पाहावा, त्यातून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करावायासाठी हा सलारा खटाटोप.

या तिच्या आजाराच्या तीन-चार महिन्यांत,दोन-तीन दिवस,

दोन-तीन दिवस असे सर्व मिळून फार तर पंधरा-वीस दिवस मी तिच्याजवळ असेन. उरलेल्या वेळात माझ्या स्वतःच्या व्यापातच गुंतले होते, घर-संसार,प्रुफे,नव्या कविता वाचनाच्या कार्यक्रमाची तयारी, आमच्या ट्रस्टच्या एका मोठाय व्यवहाराची कामे आणि त्यानिमित्त आवश्यक ती धावपळ, घरातले इतर किरकोळ आजार, अडचणी, वगेरेवगेरे. पण हे सर्व चालू असताना आपण आईसाठी काही करू शकत नाही ही खंतहीसतत होतीच. पण फक्त खंत नव्हती. या काळात पूर्वनियोजित कामांसाठी एक-दोनछोटे प्रवास झाले. बोरकरांच्या कविता वाचनाचे मुंबई-पुण्याचे पहिले दोन आमंत्रितांसाठीचे वगेरे मोठे कार्यक्रम झाले. अशा वेळी, या कार्यक्रमांत काही अडथळा तर येणार नाही ? ऐनवेळी, अगदी नेमक्या त्याच दिवशी तिचा आजार ही आमची अडचणही होऊन बसली होती, आणि नेमक्या याच घटनेच्या मनाला अधिक यातना होत. आपण स्वतः किती स्वार्थी,कृतघ्न,ढोंगी आहोत असे वाटे. स्वतःचीच जेव्हा जाऊन राहत असे तेव्हा ?

हॉस्पिटलमधे मी आईच्या उशाशी बसले होते. माझी थोरली वहिनी आपल्या छोटया नातींना घेऊन आली होती. तासभर त्या छोटया मुलींनी खूप करमणूक केली.मोठया गोड पोरी. सगळ्यांना कौतुक. आईच्या शेजारी त्यांना पाहताना एकदममन कुठल्या कुठे गेले. वाटले, ही पलीकडे झोपलेली म्हातारी, माझी आई,हीहीएकेकाळी अशीच छोटी,चुणचुणीत,गोड होती असेल. तिचेही तिच्या आईवडिलांनी असेच कौतुक केले होते असेल...

फार बेचेन झाले. करूणेनं मन भरून आलं, डोळ्यांवाटे वाहू लागलं. जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या या फेऱ्यात सुरूवातीच्या टोकाला कुठेतरी त्या छोटया पोरी आहेत,मध्याच्याही पुष्कळ पुढे कुठेतरी मी आह आणि अगदी शेवटच्या टोकाला आई आहे.आईची जागा काही काळाने मी घेणार, त्या वेळी ? त्या वेळी माझ्या वाटयाला आलेल्या फेऱ्याच्या सुरूवातीला कुणी,मधे कुणी,कुठेच कुणी आपले असे दिसेना.किंबहुना, तो फेराच नाहीसा झाला होता, फक्त शेवटच्या टोकाला मी लोंबकळत होते.खरे तर आपली ही अवस्था इतर कुणालाही क्लेश देत नाही, असा क्लेश होऊ शकेल असे लागेबांधे गुंतलेले आपल्याला कुणीही नाही; चला- खऱ्या अर्थाने आपण मुक्तआहो. आपल्यामुळे इतर कुणालाही दुःख नाही, ही केवढी आनंदाची घटना आहे !मग मला आनंद न होता हे असं तिसरचं काही कां होतंय ?

रात्र झाली आहे. नुकतेच डॉक्टर तपासून गेले. शरीराबरोबरच आईचं मनही
-----------------------------------------------------------------------------------------------

पान नं. 8

अस्थिर होऊ लागलं आहे. स्मृती फार अंधूक होत चालली आहे आणि असंबध्दता वाढते आहे. वाचाही अस्पष्ट आणि असमर्थ होऊ लागली आहे. असे आणखी किती दिवस जाणार ? हे म्हणजे संपूर्ण परावलंबित्व. नेमकी तिला नको असलेली अवस्था. तिने आयुष्यभर अनेकांसाठी अनेक कष्ट उपसले. पण कुणाही पुढे मदतीसाठी याचना केली नाही. आपल्याला मरण कसे नको ? तर नेमके असे, असेच ती म्हणाली असती निश्चित. मी म्हणे लहानपणी फार अशक्त होते, वरचेवर काही ना काही होऊन आजारी पडे. सारखी किरकीर आणि रडणे चालू असे. माझ्या लहानपणी आईची स्वतःची,चुलत दिराची,मामेसासूची,बरीच मुले माणसे घरात होती. सेपाकपाणी,आले गेले,सर्वांचा अभ्यास करून घेणे,सणवार,एवढया मोठया घरसंसारात त्याकाळाच्या गरजेनुसार पडणाऱ्या सर्व जबाबदाऱ्या उचलून, पुन्हा आमचे आजार,जाग्रणे, म्हणजे तिला किती कष्ट पडले असतील ! माझ्यापुरते तरी कृतज्ञतेच्या भावनेनेमी तिच्यासाठी काही करायला नको का ? आता इतक्या उशिरा दुसरे काय करणार ?आता तिच्यासाठी करण्यासाठी एकच गोष्ट आहे. ती म्हणजे या परावलंबित्वातून तिची सुटका. पण हे कोण कसे करणार ?मर्सी किलिंगबद्दल अद्याप तरी नुसती चर्चाच चालूआहे. चर्चेत मला रस नाही;तिला तर कधीच नव्हता. याक्षणी मी तिच्यासाठी काहीकरणे, अगदी पुढला मागला कसलाही विचार न करता काही करणे म्हणजे...

सगळीकडे सामसूम आहे. प्रत्यक्ष मुलगीच खोलीत तिच्याजवळ असल्यामुळे हॉस्पिटलच्या नर्सिससुध्दा निर्धास्त आहेत. आम्ही, म्हणजे मी, बेल वाजवल्या शिवाय कुणीही खोलीत येणार नाही. आई शांत पडली आह. डोळा लागला आहे. हीच वेळ आहे. मोठया निश्चयाने मी जवळ गेले. म्हातारपणाने आणि आजाराने आवळचिवळ झालेली तिची एवढीशी मान. माझ्या हातांत पुरेशी शक्ती निश्चित आहे. आईसाठी काही करण्याची ही अखेरची संधी आहे. बंडखोर,क्रांतिकारी वगेरेमाझी एकेकाळची विशेषणे कालप्रवाहात कधीच वाहून गेली. आताच्या कुणालाही त्यातले काहीही माहीत नसेल. पण ती बंडखोरी अद्याप मेलेली नाही हे मी स्वतः जाणते ना ? माझ्या सामर्थ्याचा पुरेपूर अंदाज मला स्वतःला आहे ना ? मग ? मग अडतेय कुठे ? भीती ? ती तर कधीच नव्हती, नाही. कुठे जीव गुंतलाय का, की ज्यासाठी जगायला पाहिजे, अविचारी बनून चालणार नाही ? एकेकाळी असे खूपकाही होते. अगदी परवा परवा पर्यंतही असे थोडे शिल्लक असल्याचे अधूनमधून जाणवे. पण आता- या क्षणी तरी असा कुठलाही पाश नाही. माझे हात मुळीच थरथरत नाहीत. गादीचा कोपरा खूप जोरात दाबून पाहिला, आणि पलंगाचा कठडाही. हातांतपुरेसा जोर आहे. मग अडतेय कुठे ? मध्यमवर्गीय दुबळेपणा ? मी असे कृत्रिम वर्ग मानत नाही. मी त्या अर्थाने मध्यमवर्गीय वगेरे मुळीच नाही. भरपूर कष्ट मी आवडीने करते. कोणतेही आवश्यक काम करण्यात मला कमीपणा कधीच वाटलेला नाही. नाइलाजास्तव कष्ट करणाऱ्या माझ्या परिचयातल्या `कष्टकरी' वर्गातल्या अनेकव्यक्तींपेक्षा माझ्या वेयक्तिक गरजा फार कमी आहे. ते असो, पण माझ्यात असला
-----------------------------------------------------------------------------------------------

पान नं. 9

कसला दुबळेपणा नक्की नाही. या क्षणी तरी नाही. माझ्या डोळ्यांदेखत अन्याय होत असेल तर तो समूळ निपटायला मी मागलापुढला विचार करणार नाही. मी पूर्वीचीच आहे; पिंड तोच आहे.

संतापाच्या भरात कुणालाही मारणं ही गोष्ट मुळीच कठीण नाही. कोणताही प्राणी हे करू शकतो. शांत डोक्याने, विचारपूर्वक शत्रूला मारणे हे चारचौघांचे काम नसेल,पण तेही फार कठीण काम आहे असे मला वाटत नाही. आपण ज्यांना क्रांतिकारी म्हणतो, त्यांतल्या अनेकांनी तेच केलेय. वेळी प्रसंगी मीही ते करू शकले असते. पणजिथे आपला जीव जडला आहे अशा, निरपराध, विश्वासाने झोपलेल्या व्यक्तीचा प्रेमापोटी गळा दाबण्याची अलौकिक शक्ती माझ्या हातांत नाही. या क्षणी मला ती शक्ती हवी होती, पण त्या बाबतीतला माझा दुबळेपणा फक्त जाणवला. आवंढा गिळता येईनासा झाला. खूप गरम अश्रू वाहू लागले. इतके असहाय दुःख यापूर्वीकधी झाल्याचं स्मरणात नाही. आईची ती मान आणि माझे ते हात यांच्यात दुबळेपणाची एकच चढाओढ लागून राहिली आहे. आई गेल्याला आता इतके दिवस लोटले तरी ही जीवघेणी चढाओढ डोक्यातून मिटतच नाही.

याच आईने आम्हा मुला-नातवंडांची आणि आप्तेष्टांची अनेक आजारपणं काढली. जाग्रणं केली, काळजी वाहिली, मर मर मरून आम्हांला तऱ्हतऱ्हा करून खाऊपिऊ घातलं. अभ्यास करून घेतला. मुलं मोठी झाली तशी पांगत गेली. मग आई आम्हां सगळ्यांना या ना त्या कारणाने कोकणात आपल्याकडे बोलवत राहिली,आमच्या वाटेकडे डोळे लावून बसू लागली. आंबे,नारळ,बोरे,शेवग्याच्या शेंगा,तऱ्हेतऱ्हेची फुलझाडे- जे जे तिच्या मेहनतीतून ती फळाला आणी ते ते आम्हांसर्वांना ती कुणा ना कुणाबरोबर पाठवत राही. मग नारळ पाठवताना ती पोचवण्यासाठी त्याला किती त्रास होत असेल याची ती विचार करत नसे. तिची असली कामे करणाऱ्या मंडळीनाही कधी तक्रार केली नाही. कारण या नाही त्या तऱ्हेने ती त्यांच्या उपकाराची परतफेड करत असावी. पण असल्या भेटी स्वीकारताना आमची,निदान माझी तरी, फार पंचाईत होई. मी नेहमीप्रमाणे काहीतरी कामात असे. कधीकामासाठी बाहेर जाण्याच्या तयारीत असे. कधी घरात तिसरेच कुणी काही महत्त्वाच्या कामासाठी आलेले असे. अशा वेळी आईने पाठवलेले आंबे,पोहे,किंवा असलेच काही घेऊन कुणीतरी येई. आईचे काम केल्याची आणि विशेषतः पु.ल.देशपांडेयांच्या घरी जाऊन आल्याची धन्यता त्याच्या चेहऱ्यावर दिसे. माझा मात्र चेहरा ओशाळा होई. आईचा राग येई. या वस्तू इथे मिळत नाहीत का ?मग उगाचइतक्या दुरून त्या कुणाबरोबर तरी पाठवायच्या कशाला ?आणून पोचवायचा त्यांनाही त्रास आणि आता त्यांचे आदरातिथ्य करत बसायचा मलाही त्रास. मग त्यांच्याशी काहीतरी बोलावे लागे. चहापाणी विचारावे लागे. एरवी मी दिवसभर
-----------------------------------------------------------------------------------------------

पान नं. 10

बडबडत असते. रोजचा कित्येकदा आणि कित्येक कप चहा करते. पण हा कपभरचहा आणि ही इकडली तिकडली चौकशीची चार-सहा वाक्ये मला जड वाटत.

या वस्तू इथे मिळत नाहीत का? आम्ही कामात असतो हे हिला कळत नाही का ?पुण्या-मुंबईसारख्या शहरात, अगदी एखादा पु.ल.देशपांडे किंवा डॉ. ठाकूर असला तरी, त्याचं घर शोधून काढून या भेटी पोचवायच्या म्हणजे काय ताप असतोहे कितीदा सांगूनही हिला कळत कसं नाही ? आणि वर त्या भेटीबरोबर पत्रही असे.यांतली ही पिशवी या नातवाला पोचव, ती त्या नात जावयाला पोचव-म्हणजे आम्हांला काय दुसरे धंदेच नाहीत का ? असल्या आईची मग मला लाज वाटे. आणि
ओशाळ्या सुरातच तिचं हे मला न पटणारं वागणं कसं चूक आहे हे न राहवून मीत्या पाहुण्यांना बोलूनही दाखवीत असे. मला कळू लागल्यापासून जवळजवळ तीस एक वर्ष आईचं हे वागणं माझ्या काटेकोर व्यवहारी दृष्टिकोनात कधी बसलं नाही आणि त्यामुळे ते मला कधी मनापासून रूचलंही नाही. पण आई आईच राहिली आणि त्यानंतर मात्र पुढे पुढे आपलेच काहीतरी चुकतेय असे मला वाटू लागले. आता आई नाही. माझ्यावर तसे ओशाळे होण्याचा प्रसंग तर आता कधीच येणार नाही. ती पाठवी त्या वस्तू, मला हव्या तेव्हा मी आणू शकेन. ते सगळे काही इथेही मिळते.मात्र तिने लावलेल्या आणि वाढवलेल्या झाडांचे आंबे, नारळ, शेवग्याच्या शेंगा, बोरे,रामफळे,फणसाच्या कुयऱ्या- इथल्या बाजारात विकायला येत नाहीत. इथे मिळणाऱ्या या व्सतू कदाचित अधिक चांगल्या प्रतीच्याही असतील. जिभेला त्याअधिक चांगल्या लागतील. पण आत कुठेतरी पिंडाला तृप्त करण्याचं सामार्थ्य त्यांनानक्कीच नाही. कारण त्यांना आईच्या हाताचा स्पर्श नसेल.

हा पिंड म्हणजे काय ? आई-आप्पांनी मला जन्म दिला. माझं अस्तित्व हे त्यांच्यामुळे. पण जन्म दिला म्हणजे काही उपकार केले असे मी मानत नाही. तोत्यांच्याही आनंदाचा भाग होता. त्यांनी,विशेषतः आईने, आम्हां मुलांचे पालपोषण केले. पण हाही तिच्या आनंदाचाच भाग म्हणायचा. स्वतःच्याच मुलांचे केले ना ?मी तिच्याच पोटची. पण तिच्या पोटची म्हणूनच तिच्यातले अनेक गुण दोषही अपरिहार्य माझ्यातही आले आहेत. गुणांपेक्षा दोषच अधिक. तिच्याच सारखी मीफार मोठयाने बोलते. तिच्या मोठयाने बोलण्याचा आम्हांला कधी त्रास झाला नाही,कारण लहान पणापासूनच आम्हांला त्याची सवयच झाली होती. मला वाटते. शहराबाहेरराहणारी माणसे जरा मोठयानेच बोलतात का ? कोण जाणे. पण तसे म्हणावे तरमाझी इतर भावंडे माझ्याइतकी मोठयाने बोलत नाहीत. मी मात्र फार मोठयाने बोलते. याची जाणीवही मला सतत होत असते. कारण भाईला त्याचा फार त्रास होतोहे मला कळते. पण तरीही, अनेकदा ठरवूनही मी माझी ही सवय बदलू शकले नाही.हा पिडांचाच धर्म ना ?
------------------------------------------------------------------------------------------------

पान नं. 11

तिच्यातला माझ्यात उतरलेला दुसरा दोष म्हणजे ती तोंडावर कुणाचे कौतुक करू शकत नसे. ही बाई एके काळी शिक्षिका होती. लग्न झाल्यावर पहिली तीन मुले होईपर्यंत तिने हे काम करून जी काही आर्थिक कमाई केली त्याचाही हातभार तिच्या संसाराच्या पायाला लागला. वक्तृत्वात तिला बक्षिसे मिळाली होती. घोडयावर बसावं उत्तम घोडेस्वार व्हावं, ही तिची अपुरी राहिलेली इच्छा मी पुरी करावी असे तिलाफार वाटे. त्या दृष्टीने तिने प्रयत्नही केले. मला अनेकदा सांगून पाहिले. मला घोडाहा प्राणी फार म्हणजे फार आवडतो. घोडयावर बसायलाही माझी ना नव्हती. पण त्याबद्दल आईला होती तितकी ओढ मला नव्हती. तिचे स्वप्न होते, तसे माझेत्याबद्दल नव्हते. मलाही तशी हौस असती तर तिने रत्नागिरीसारख्या ठिकाणी एखादा घोडापाळलाही असता कदाचित, कुणी सांगावे ! पण हीच बाई पुढे वाढत्या संसारात अशीकाही बुडून गेली, की वेळीप्रसंगी एखादी पोथी आणि तिला येणारी पत्रे यापलीकडेतिचे वाचन राहिले नाही. अधूनमधून आप्तेष्टांना पत्रे लिहिणे आमि संसारातलेहिशेब-ठिशेब यापलीकडे लेखन गेले नाही. नाही म्हणायला तिच्या मृत्यूनंतर, परवा परवा तिच्या कपाटात दोन-चार वह्या सापडल्या. त्यांत तिने डायरीवजा थोडे लिहिलेले आहे. मी ते वाचल्यावर हसावे का रडावे कळेना. सगळ्या लिहिण्यात सूरएकच. आप्पांबद्दलची तक्रार. आणि खरे सांगायचे तर तिने लिहिलेल्यात काहीही अतिशयोक्ती नाही. म्हणजे आमचे आप्पा वाईट होते का? मुळीच नाही. त्यांच्यासारखा सज्जन गृहस्थ शोधून सापडणे कठीण. पण सज्जनपणा,चांगुलपणा,दातृत्व,आदरातिथ्य वगेरे गुण प्रसंगी उपद्रवीच असतात. मला वाटते, दुर्गुणांप्रमाणेचसद्् गुणांचेही माणसाला व्यसन लागते. आणि व्यसनाधीन माणसाच्या बायकोची परवड व्हायची ती होतेच. दुर्गुणी माणसाच्या बायकोबद्दल इतरांना सहानुभूती तरी वाटत असते. पण सद््गुणी नवऱ्याच्या बायकोला सक्तीने आनंदी मुखवटा वापरावा लागतो. आणि सदेव हसतमुख राहण्याच्या सक्तीसारखी दुसरी महाभंयकर शिक्षा नसेल. हे झाले जनरल. प्रत्यक्ष आमच्या घरातलं सांगायाचं झालं तर दुसऱ्याला त्रासहोईल असं जाणूनबुजून आप्पांनी कधीही काही केलं नाही. अगदी स्वप्नात देखील नसावं. आप्पा संतच होते. पण जुन्या काळच्या संतांच्या बायका निरक्षर होत्या,आत्मचरित्रे लिहित नव्हत्या हे आपल्या संस्कृतीचे सौंदर्य टिकवायला किती उपकार कठरले ! आईने ह्या वह्या कधी लिहिल्या कोण जाणे. पण त्यात तिने आप्पांना दोष मुळीच दिलेला नाही. नवरा हा असाच असतो असं ती गृहीतच धरत होती. आप्पांचा मोठेपणा तिला कळत होता आणि तो टिकावा म्हणून आपल्या परीने ती आनंदाने कष्ट उपसत होती. पण शेवटी तीही माणूसच. कधी थकू शकते, स्वतः आजारी पडू शकते. याचं भान ठेवून, तिच्या अडचणी लक्षात घेऊन, मग आप्पांनी त्यावर आपली गृहस्थी बेतली असती तर आपलं मन मोकळं करायला तिला ह्या वह्यांचा आधार घ्यावा लागला नसता. तशी आप्पांची जीवनमूल्ये बावनकशी होती. त्यामुळेच ते संत म्हणा किंवा फार थोर म्हणा असे होते, निर्भेळ माणूस नव्हते. ह्या माणसांच्या जगात खरी स्वच्छ
------------------------------------------------------------------------------------------------

पान नं. 12

माणसेच सापडत नाहीत. आणि संत म्हटले किंवा फार थोर लोक म्हटले, की मग`लोकापवादो बलवान मतो मे' आले आणि पत्नीच्या नशिबी वनवासही आलाच.

आम्हांला आई दिसली ती दिवसरात्र काही ना काही कामातच असलेली. तिने आम्हांला तरतऱ्हा खाऊपिऊ करून घातले, शिकवले, आमची आजारपणे काढली;पण कधीही प्रेमाने जवळ घेऊन मुका घेतल्याचे आठवत नाही, की तोंडभर कौतुक केल्याचेही आठवत नाही. या गोष्टींना तिला वेळ नव्हता म्हणणे सर्वस्वी खरे नव्हे.मनात असते तर त्यात अशक्य काहीच नव्हते. तिचा तो स्वभावच नव्हता असेच म्हणावे लागेल. तिला आमचे दोषच दिसायचे आणि ते घालवण्यासाठी जिवाचे रान करण्यात ती धन्यता मानायची. इतरांनी आम्हांला नावे ठेवू नयेत या साठीही हीधडपड असेल. पण कौतुक करून घेण्याची भूक इतकी मोठी असते, की आईच्या रोजच्या आमच्यासाठी होणाऱ्या काबाडकष्टांपेक्षा वर्ष-सहा महिन्यांनी पाठीवरूनप्रेमाने फिरणारा आप्पांचा हात आम्हांला अधिक मोलाचा वाटे.

समिधाच सख्या या, त्यांत कसा ओलावा,
कोठून फुलांपरि वा मकरंद मिळावा ?
जात्याच रूक्ष या, एकच त्यां आकांक्षा
तव आंतरअग्नी क्षणभर तरि फुलवावा !

या कुसुमाग्रजांच्या ओळी कविता म्हणून माझ्याप्रमाणे इतरांनाही आवडतच असणार. कितीतरी संसारी बायकांना त्यांत ओळखीचा चेहरा दिसल्याचने त्यांचा आधारही वाटत असणार. कवितेच्या बाबतीत हे सर्व ठीक असते. पण प्रत्यक्षात,`जात्याच रूक्ष' असे काहीही कुणालाही आवडणार नाही. अगदी त्या समिधांनाही स्वतःतल्या या गुणाचा तापच होत असेल.

आई मधला हा दोष माझ्यात सहीसही उतरला आहे. तिला स्वतःतल्या त्या दोषाची जाणीव नव्हती. ते तिला कर्तव्यच वाटे. त्यामुळे त्या बाबतीत ती सुखी होती. मला हादोष सतत जाणवत असतो. पण त्यातून सुटका नाही. एखादे पुस्तक वाचले,नाटकपाहिले, गाणे किंवा व्याख्यान ऐकले, आणि ते खूप आवडले, तरी त्यात एवढेसे काहीन्यून राहिले असेल तर ते नजरेतून सहसा सुटत नाही, विसरता येत नाही; त्या गोष्टीला चांगले म्हणून गुणगान करताना ती अधिक चांगली व्हावी या हेतूने का होईना. पण ते न्यून ही सांगितल्यावाचून राहवत नाही. हाही पिंडाचाच भाग.

आईमधला स्पष्टवक्तेपणाही असाच माझ्यात आलेला आहे. हा गुण म्हणायचा की दोष ? स्पष्टवक्तेपणा हा तसा पाहिला तर गुणांच्या यादीतच सापडतो. पण प्रत्यक्षात मात्र तो ज्याच्या अंगी असतो तो माणूस फारसा कुणाला आवडत नाही हाच अनुभव येतो. कुणीतरी दुसऱ्या कुणाच्यातरी बाबतीत स्पष्टवक्ता असणे सर्वांना मानवते. व्यासपीठावरून भाषण करताना तर हा गुण प्रकर्षाने जाणवतो. सर्व श्रोत्यांकडून
------------------------------------------------------------------------------------------------

पान नं. 13

पसंतीच्या टाळ्या मिळतात. पण प्रत्यक्षात दोन व्यक्तींत एक स्पष्टवक्ती असणे म्हणजेदुसरीचा दोष न घाबरता सांगणे असाच प्रकार होतो. मग तो फटकळपणा ठरतो.कुणालाही सहसा न आवडणारा. एकाच नाण्याच्या या दोन बाजू. छाप आणि काटा.स्पष्टवक्तेपणा हा त्या सामान्य व्यक्तीच्या नशिबी काटाच होऊन येतो. सार्वजनिकपुढाऱ्याच्या नशिबी मात्र तो छाप होतो. आम्ही सामान्य माणसे. तेव्हा पिंडातूनआलेल्या

या स्पष्टवक्तेपणाच्या दोषामुळे आम्हांला मात्र मिळणे किंवा कुणाचे प्रेममिळणे फार फार कठीण. इतर लोक आम्हांला सदेव टाळतच असतात. फारच खरेबोलताता ते `तुमची भीती वाटते ' असे स्पष्ट सांगतात, इतकेच.

या स्पष्टवक्तेपणाप्रमाणेच कामसू वृत्तीही गुण आणि दोष यांच्या सरहद्दीवरचवास्तव्याला असते. सतत काही ना काही काम करत राहण्यातच धन्यता वाटणारीमाणसे चांगली की वाईट ? एके काळी मी `चांगली' असेच उत्तर दिले असते. त्यालाथोर थोर आदर्श व्यक्चींच्या वचनांचा आणि वर्तनाचा आधारही दिला असता. पणआता मात्र `निश्चितच वाईट' असेच म्हणेन. आता पाय जमिनीला लागले आहेत.आता थोरामोठयांचा ऐकीव आदर्श जीवनाचा आधार वाटत नाही. स्वतःचे अनुभववेगळेच सत्य सांगून जातात.

आमचे आप्पा आणि आई दोघेही सतत काही ना काही काम करत असायचे.त्यामुळे या बाबतीत त्यांचा एकमेकांना त्रास झाला नाही. त्यांचा हा गुण आम्हांबहुतेक भावंडात उतरलाय. लहानपणी हे ठीक असते. पण पुढे बायको जर आळशीमिळाली तर तिला अशा कामसू नवऱ्याचा जाचच होईल. हे झाले माझ्या भावांच्याबाबतीत. पण मुलींचा फक्त नवऱ्याशीच नव्हे, तर सासरच्या सगळ्याच घराशी संबंधयेतो. अशी वेळी तिथली माणसे जर आळशी किंवा जरूर तरच हातपाय हलवणारीअसतील तर तिच्यावर कामाचा खूपच भार पडतो. म्हणजे या कामसू व्यक्तीला श्रमअधिक होतात. त्यातून, आपण आहोत म्हणून हे सगळं निभवलं जातंय असाअंहकारीही स्पर्श करायला लागतो. शिवाय, या दोन परस्परविरोधी प्रवृत्ती एकाचघरात एकत्र नांदायच्या म्हटले की संघर्ष अटळच होऊन बसतो. पांढरपेशा समाजातअसले संघर्ष चारचौघांना कळणे ही लाजिरवाणी गोष्ट वाटते आणि मग मनाचा फारकोंडमारा होतो. घरात काय आणि समाजात काय, कामसू माणसांचे प्रमाण एकूणकमीच असते. त्यामुळे जी अशी सतत काम करणारी माणसे असतात त्यांना इतरलोक आळशी आणि ऐतखाऊ वाटतात आणि वेताग येत असतो. इतरांना तर याकामसू लोकांचा सदेव तापच होत असतो. शेवटी सारखे काम तरी कशाला करतराहायचे ? शाळेत असताना वाचलेली `लोटसईटर्स 'ही कविता मला या संदर्भातनेहमी आठवत राहते. ते तत्त्वज्ञान कुठेतरी आत अंतरात्म्याला आवडलेल असते.आणि आपण न थकता सतत काम करू शकतो हा आपला मोठेपणा न वाटता,आळशी नाही ही उणीव वाटत राहते. असो.
------------------------------------------------------------------------------------------------

पान नं. 14

आईचा हात फार सढळ होता. तिथे हिशेबी वृत्ती नव्हती.मनाचे मूलभूत औदार्यआणि परंपरागत रीतिरिवाजांच्या बंधनातून पत्करलेली विशिष्ट जीवनपध्दती यांतूनकधीकधी मजेदार प्रसंग निर्माण होत. सहज गंमत म्हणून आठवतो तो एक सांगते.आमच्या लहानपणी कोकणात आम्हांला घरात सुपे, रोवळ्या,हारे वगेरे गोष्टीलागायच्या. त्या काळी बालद्या हा प्रकार फारसा वापरात नव्हता. मोरीत बसूनधुवायला दगडी डोणी असत आणि धुतलेल्या कपडयांचे पिळे ठेवायला हारे असत.धान्य पाखडायला सुपं लागत आणि सांदूळ धुवायला रोवळ्या. त्या काळी या वस्तूविणून विकायला महारणी यायच्या. आणची एक ठरलेली महारीण होती आणिवर्षांतून दोन-तीनदा ती आमच्याकडे या वस्तू विकायला आणी.माझ्या आठवणीततरी वर्षानुवर्षे हीच बाई या वस्तू घेऊन येई. ती आली की तिचा माल ती उलट-सुलटकरून दाखवी. आईला पसंत पडला की तो एका बाजूला ठेवी. मग काय काय घ्यायचेते ठरले, की भावात घासाघीस चाले, आणि शेवटी सौदा पटला की मग त्या वस्तूंवरपाणी टाकून तो माल आई घरात घेई. महारणीला शिवणे ही गोष्ट अब्रह्मण्यम् होती.तिने केलेल्या वस्तूंनादेखील त्यांवर पाणी टाकल्याखेरीज आम्ही हात लावायचा नसे.तिच्या आणि आमच्या सामाजिक स्थानातला हा फरक आई कसोशीने पाळत असे.त्यात काही चूक अगर अन्याय आहे असे तिला कधीही वाटले नाही. उलट, हे असेचअसायला हवे यावर तिची इतकी श्रध्दा होती, आणि आम्हांलाही या बाबतीत तिचाअसा काही धाक होता, की वेगळा काही आचार-विचार तिथे त्या काळी संभवतचनव्हता. केक मेलांवरून पायपीट करून भर उन्हाची आमच्या दारी येणारी हीमहारीण मग तिथे चांगली तास-दोन तास रेंगाळत असे. आई मग तिला जेवण देई.चहापाणी देई. चहाबरोबर काहीही खायला दिले की ती ते लगेच मुलांसाठी न्यायलाम्हणून मोटलीत बांधू लागे आणि मग आई तिला रागवे."
"दिलंय ते निमूटपणे खा.उन्हातान्हातून आलीस ते पाय काय मुलांचे नाय भाजले. आणि मुलांची आठवणमलाही आहे. आण्हांलाही देवाच्या दयेनी भरपूर मुलंबाळं आहेत. हे घे मुलांसाठी. पणतुला दिलंय ते तू खा."
" असा संवाद दर वेळी चाले. तिच्या मुलांची आणि घरच्यासर्वांची नावे आईला माहीत होती. आणि आमची सर्वांची तिला. मग हा कुठे असतोआणि तो हल्ली काय करतो वगेरे एकमेकींच्या चौकश्या चालत. सुखदुःखाच्या गोष्टीचालत. जाताना ती तांदूळ,पोहे,लोणचे,कसली कसली औषधे, जुने कपडे, कायकाय घेऊन जाई. या वस्तू देताना आईच्या मनात कोणताही हिशेब नसे. पण तिचामाल विकत घेताना मात्र घासाघीस ही व्हायचीच.

एकदा अशीच ती महारीण मागल्या दारी येऊन बसली आणि तिने नेहमीप्रमाणेआईला हाक मारली. मग अगदी नेहमीच्याच पध्दतीने खरेदी वगेरे झाली. पाणीटाकून माल उचलत असताना आईचे लक्ष तिच्या सुजलेल्या पायाकडे गेले.आईनेचौकशी केली तेव्हा कळले, की रानात कसलातरी मोठठा काटा लागून तिची पोटरी
------------------------------------------------------------------------------------------------

पान नं. 15

थोडी फाटली होती आणि आता त्यात पू पण झाला होता. पाय सुजला तर होताच,पण ठणकल्याने दोन-तीन दिवस झोपही आली नव्हती. आईने `पाहू' म्हणून तिचापाय पकडला. मग गरम पाणी, पोटॅशियम परमॅगनेट,कापूस,बँडेज म्हणून जुन्याधोतराच्या पटटया वगेरे वस्तू आणि जखमेवरचा हमखास इलाज असे ते `शेटटीचंमलम' आणायला आण्हांला सांगून आईने सगळा पू पिळून काढला आणि यथासांगऔषधपाणी करून तिचा पाय बांधून दिला. हे करत असताना ती बाई मोठमोठयानेओरडत,रडत होती आणि त्याच्याही वर आवाज काढून,या वयाला आणिबाईमाणसाला असं ओरडणं शोभत नाही, सहन करता येत नाही तर बायकांच्याजन्माला आलीस कशाला, वगेरे व्याख्यान आई तिला देत होती,. शेवटी एकदाचे तेड्रेसिंग संपले. पुवाने भरलेले कापसाचे बोळे वगेरे एका कागदात गुंडाळून,`रानातटाकून दे' म्हणून आईने तिच्याकडे दिले. मग आई तिच्या टोपल्यांवर पाणी टाकी तसे.आम्ही आईच्या डोक्यावर कळशी ओतली आणि आंघोळ करून आई घरात आली.एका छोटया डबीत आणखी थोडे मलम घालून आईने तिला ते पुन्हा एकदोनदालावायला म्हणून दिले. झाल्या प्रकारात काही अंतर्गत विसंगती आहे असे त्या काळीतिला, आईला अगर आम्हालांही कुणाला वाटले नाही.

पुढे वय थोडे वाढल्यावर आणि शिक्षणाने थोडे ज्ञान आल्यावर आईच्या यासोवळ्या-ओवळ्याचा मला फार राग येऊ लागला. आज मात्र हा प्रसंग आटवला, कीआईचा कर्मठपणा आणि सह्दयता दोन्ही एकाच वेळी हातात हात घालून उभीअसल्यासारखी दिसतात. या नेहमीच्या, ओळखीच्या, सर्व संबंधित गोरगरिबांबद्दलतिच्या पोटात अमाप माया होती. या बाबतीतले तिचे रागलोभ सगळे वेयक्तिक होते.आमचे सार्वजनिक असतात. वाटते, मी आईच्या जागी असते तर त्या महारणीकडचामाल घेताना तिला अस्पृश्य मानून त्यावर पाणी नक्कीच टाकलं नसतं. पणत्याचबरोबर बहुधा तिच्या पायाकडे सोयीस्कर दुर्लक्षही केले असते कदाचित. फार तर"
"एखाद्या डॉक्टरला दाखव. वेळेवर औषधपाणी केलं नाहीस तर पाय तोडावालागेल"
" असा कोरडा सल्ला दिला असता. कुणी सांगावे !

गेल्या पंधरा-वीस वर्षात मी जेव्हा जेव्हा रत्नागिरीला गेले, तेव्हा तेव्हा सुंदराबाई म्हणून एक बाई न चुकता भेटायला यायची. मलाच नव्हे, आम्हां मुलांपेकी कुणीही रत्नागिरीला गेले तरी ती भेटायला येऊन जायचीच. आम्ही दोन-तीन दिवसांसाठीगेलो तरी तिला कसा सुगावा लागे कळत नसे. एखादी वेडी भिकारीण अशी ती दिसे. केस पिंजारलेले, काहीशी गलिच्छ. एकटी असली तरी ती सारखी बडबडत असायची. तिच्यात असं काहीतरी होतं की मला ती कधीच आवडली नाही. आईच्या पोटात मात्र तिच्याबद्दल अपरंपार दया असे. आमच्याकडून पेसे किंवा एखादी वस्तू हातावर पडेल या आशेने ती येई. पण येताना कधी रिकाम्या हाताने येत नसे. कुठल्यातरी दुकानातून विकत घेतलेली गलिच्छ कागदात बांधलेली एखादी खाण्याची वस्तू  ती
------------------------------------------------------------------------------------------------

पान नं. 16

घेऊन येई. चिवडा, लाडू फुटाणे, किंवा असलेच काहीतरी. ते ती आम्हांलादेई आणि खाण्याचा आग्रह करी. आम्हीही तिला भरघोस काही द्यावे अशी आईची अपेक्षा असे. तिला उचलून काही द्यायला आमची ना नसे, पण तिने फार वेळरेंगाळून आम्हांला त्रास देणे, तिने आणलेले आम्हांला खायला लावणे, याला आमचा विरोध असे. एके काळी आपण कसे खूप श्रीमंत होतो, मग नवरा मेल्यावर आपल्याला इतरांनी कसे लुटले, मग आपल्या डोक्यावर त्याचा परिणाम कसा झाला, त्यानंतर शेजाऱ्यापाजाऱ्यांनीही आपले घरदार धुऊन नेऊन आपल्याला भिकेलाकसे लावले वगेरे आपली कहाणी तिने आईला सांगितली होती; आणि त्यावर आईचा पूर्ण विश्वास होता. आता ही कहाणी खरी असू शकेल, तशी खोटीही असू शकेल.आणि काहीही असले तरी त्याचा आम्हांला कां त्रास? पण आईला वाटे प्रसंग, कुणावर कसा येईल सांगता येत नाही, तेव्हा आम्ही त्या सुंदराबाईशी फार सहानुभूतीने वागावे."

"ती तर अर्धवट वेडीच आहे. तिला काय कळतं ? पण आम्ही शहाणी आहोत ना ? मग थोडं सहन केलं तर काय बिघडतं ? इतक्या लांबून पायपीट करत तुम्हांला डोळे भरून पाहायला येते. एके काळची घरंदाज बाई. आता भिकारी झाली, वेडीझाली, तरी रीतिरिवाज रक्तात आहेत. कुणाला भेटायला जायचं तर रिकाम्या हाताने नाही जाणार. तिच्याकडे पेसे कुठले ? पण कसंतरी करून काहीतरी प्रेमाने आणले, तर तुम्हांला तिच्या समाधानासाठी थोडं तोंडात टाकायला काय होतं ? स्वच्छतेची थोतांड मला नका सांगू !हॉटेलात खाता-जेवता , तिथे सेपाकघरात काय चालतं ते पाहता काकधी ? पण तिकडे ठणकावून पेसे घेतात तेव्हा तुम्ही निमूटपणे नोटा काढून द्याला. इथेही प्रेमानं काही आणते तर तिची किंमत नाही. आईला आई म्हणता हे तरी माझं नशीब !"
" - इथपर्यंत आईची मजल जायची. त्या सुंदराबाईबद्दल आईला इतका उमाळा कां ते मला कधीच कळले नाही. मला तर ढोंगी वाटायची. पण आईचा दृष्टिकोन काही बाबतीत हा असा फार उदार होता. कदाचित नेमित्तिक भेटीला येणाऱ्या आम्हां मुलांपेक्षा, नित्याच्या या गोतावळ्याचा आईला अधिक आधार तरवाटू लागला नसेल ? कोण जाणे !

अशीच एकदा आप्पांना बरं नाही म्हणून मी रत्नीगिरीला त्यांना भेटायला गेलेहोते. आप्पा, आई दोघेही थकलेले, तेव्हा सेपाकाला एक पोरगी आणि वरकामालाचोवीस तास घरी राहणारी एक बाई अशी दोन बायका कामाला आहेत हे मलाठाऊक होते. मी तीन-चार दिवसांसाठी येणार हे कळवले होते. मी संध्याकाळी जाऊनपोचले आणि दुसरे दिवशी सकाळीच वरकामाला असलेल्या बाईने आपली पाळी सुरूझाल्याचे सांगितले. म्हणजे आता पुरे तीन दिवस ही नुसती बसून राहणार. आईचे याबाबतीत कडक सोवळे असे. त्याचा फायदा घेऊन महिन्यातून दोनदादेखील `पाळी'चेनिमित्त सांगून कुणी बसून खाल्ले तरी तिला चाले. अशा वेळी त्या दूर बसतात याचेचतिला कौतुक. आम्ही कुणीही आपापल्या घरी विटाळ पाळत नाही ही गोष्ट तिलामुळीच आवडत नसे. त्यामुळे आमच्या घरी कधी राहायला येणेही तिला मनापासूनपसंत नसे. तिच्या या वागण्याचा फायदा कामवाल्या बाया चांगलाच घेत. मी घरीआल्यावर आप्पा-आईना आवडेल असं काहीतरी करून खाऊपिऊ घालणार, तरहाताखाली मदतीला कुणी नाहीच, आणि त्यात सेपाकाला येणाऱ्या पोरीनेही "
"पोटदुखते आहे,"
" असा निरोप पाठवला. मी वेतागून म्हटले,"
" आजच नेमकं हिचं पोटकसं दुखायला लागलं ?"
" तर आई म्हणाली,"
"तिचे दिवस भरत आले आहेत, तीलवकर बाळंत होणार असेल."
" मला त्या दोघीचा, आईच्या सोवळ्या-ओवळ्याच्याकल्पनेचा आणि माझ्या नशिबाचाही भयंकर राग आला. मी कधी नव्हे ती माहेरीआले तरी तिथेही मला क्षणाची विश्रान्ती नाही, याचे आईला वाईट वाटले. पण तिनेत्याबद्दल त्या दोघीनांही दोष न देता, स्वतःचे वय झाल्यने आणि ढोपरे फार दुखतअसल्याने आपल्याच्याने आता होत नाही, नाहीतर आपणच कसे वेगळे केले असतेहेच ऐकवले.

तिसरे दिवशी माझा सगळा सेपाक करून झाल्यावर सेपाकीणी आली. मीम्हटले.""यायचंच तर लौकर का नाही आलीस? आता सगळा सेपाक झालाय; तूजा."" तर आईने तिला जेवूनच जायला सांगितले. कारणे दोन. एक तर ती रोजसेपाक केल्यावर जेवूनच घरी जायची.,मग आज उपाशी पोटी कसे पाठवायचे ? आणिदुसरे, त्याहून महत्त्वाचे कारण म्हणजे ती गरोदर आहे आणि पहिलटकरीण आहे.तिला काही खावेप्यावे वाटत असले तरी तिला कोण करून घालणार ? मी इतकाचांगला सेपाक केलाय, तर दोन घास खाऊन तिचा आत्मा तृप्त झाला तर परमेश्वरमला आशीर्वादच देईल. मला स्वतःला मात्र राब राब राबून मिळणाऱ्या परमेश्वराच्यात्या आशीर्वादापेक्षा दोन घटका विश्रान्ती आणि आप्पांच्या प्रकृतीकडे अधिक लक्षदेता आलं आसतं तर ते अधिक मोलाचं होतं. पण आईचे सगळे तर्कशास्त्रच उलटेहोते. त्यामुळे तिचे मझे कधई पटलेच नाही

आज आई नाही. आता मागे वळून पाहताना असे अनेक प्रसंग आठवले, कीत्यामागच्या तिच्या मनाचा मोठेपणा दिसतो आणि स्वत:ची लाज वाटते. आईचंऔदार्य माझ्या बहिणीत आलंय. माझ्यात आप्पांची निवृत्ती थोडीबहुत आली असावी,पण आईचं हे औदार्य मात्र जरासुध्दा आलं नाही

मला वाटते, औदार्यामागे विचार, सद््सद््विवेकबुध्दी नसते. कुणालाही पटकनकाही देण्यातला निर्भेळ आनंद तेवढा असतो. या आनंदाचा छंद लागला, की औदार्यहा त्या व्यक्तीचा अविभाज्य घटक बनतो. हा फार मोठा गुणच मानला पाहिजे.कारण त्यातून स्वतःला सुख लाभतेच, पण दुसऱ्यालाही लाभच होतो, आनंद मिळतो.शिवाय, त्यात समाजविघातक असे काहीही नाही. औदार्यामुळे स्वभावाचे काही कोपरेघासून जाऊन जीवनाचा पोत छान तलम बनत असावा.

माझी आई किंवा तिच्यातला हा गुण मोठया प्रमाणावर लाभलेली माझी बहीण याकुणालाही, काहीही पटकन उचलून देताना मी अनेकदा अनुभवलंय. माझ्या हातून
------------------------------------------------------------------------------------------------

पान नं. 18

मात्र असं सहसा घडत नाही. एखादी वस्तू किंवा पेसे मागायला दारी आलेल्याला मीसहज `नाही' म्हणून घालवून देऊ शकते. मग ती मागणी कितीही शुल्लक असो किंवामागणारी व्यक्ती कितीही थोर असो. भिकाऱ्याला द्यायलातर पाच-दहा पेशांचेनाणेदेखील माझ्या हातून कधी सुटत नाही. त्यामुळे मी फार चिक्कू आहे असाकुणाचाही समज होणे स्वाभाविक आहे. पण अगदी खरं सांगायचं तर मला त्याचेसोयरसुतक जरासुध्दा नाही. मी तशी रेशमाच्या किडयाच्या जातीची, स्वतःभोवतीछोटासा कोष विणून त्यात राहणारी व्यक्ती आहे. माझ्या या बंदिस्त जगात ज्यांनास्थान आहे असी मोजकीच माणसं आहेत. तिथे त्यांच्या मनाचे आणि मतांचे फारमोल आहे. त्या बाहेरील जगाला माझ्याहिशेबी काही महत्व नसावे. मला सर्वार्थाने नओळखणाऱ्या अनेकांना हे विधान चुकीचे किंवा अतिशयोक्त वाटेल. पण तसे नाही.मला योग्य वाटेल तिथे कितीही आणि काहीही देताना आणि पुढल्या क्षणी तेविसरूनही जाताना मला मी पाहिले आहे. पण त्या क्षणी तिथे `इदं न मम' हीनिःसंगतेची भावनाच प्रबळ असावी. औदार्याचा लवलेशही नसावा. म्हणून मलावाटते, या बाबतीत मी कदाचित आप्पाची मुलगी शोभेन.

आमचे आप्पा हे निष्णात फौजदार वकील होते. तर्कशुध्द विचार करत निर्णयालायेण्याची, उलटसुलट विचार करून शंका काढण्याची त्यांना चांगलीच सवय होती.बुध्दिबळ आणि ब्रिज हे त्यांचे आवडते खेळ होते. या दोन खेळांचा आणि तर्कशुध्दविचारसरणीचा परस्परसंबंध असेल का ?

या तिन्ही गोष्टी मलाही खूप आवडायच्या. त्यांतल्या बुध्दिबळ आणि ब्रिज याखेळांशी पुढे माझा काहीच संबंध राहिला नाही. पण विचारांचा खेळ मला अजूनहीआवडतो. तो कुठेही,केव्हाही, स्वतःशीच खेळता येतो.

आप्पांना वाटे, मी वकील व्हावे, बॅरिस्टर व्हावे. बॅ.सीता आजगावकर ही त्यांचीबहीण.(सख्खी नव्हे,त्यांना सख्खे भावंड वगेरे नव्हतेच. ही दूरची, बहुधामावसबहीण असावी. ) ही माझ्या समजुतीप्रमाणे महाराष्ट्रातील पहिली स्त्री बॅरिस्टर. तीशंकरशेट स्कॉलरही होती. आप्पांना साहजिकच तिचा फार अभिमान होता. मीही असंकाही व्हावं असं त्यांना फार वाटे. पण या बाबतीतही मी त्यांची निराशाच केली.नाही म्हणायला माझा थोरला भाऊ वकील आमि पुढे जज्ज झाला. पण त्यालावकिलीत फारसा रस नव्हता. थोरल्या मुलाने वडिलांचा व्यवसाय घ्यावा या त्याकाळच्या धोरणामुळे त्याला वकील करण्याच आले होते इतकेच. पण मी कदाचितबऱ्यापेकी वकील होऊ शकले असते असे आता वाटते.

आमचे आप्पा गेले त्यापूर्वी दहाच दिवस आधी आम्ही कोल्हापूरला काहीकामानिमित्त गेलो होतो. तिथून जवळच रत्नागिरीला आप्पा-आईना भेटायला म्हणूनएका दिवसासाठी जाऊन आलो. आम्ही घरी जाऊन पोचल्यावर तासाभराने आप्पांनी
------------------------------------------------------------------------------------------------

पान नं. 19

माझ्या हाती एक पत्र दिले. ते एक प्रकारचे इच्छापत्रच होते. त्यांच्या पेशाअडक्याचेआणि जमीजुमल्याचे पुढे काय करायचे याबद्दलचे इच्छापत्र त्यांनी रीतसर करूनठेवलेच होते. या पत्रात त्यापेकी काही नव्हते. स्वतःच्या मृत्यूनंतर आपले डोळेनेत्रपेढीला आणि शरीर मेडिकल कॉलेजला द्यावे अशी इच्छा त्यात सविस्तर लिहिलेलीहोती. इतके मुलगे,सुना,जावई,दुसरी मुलगी वगेरे इतरही असताना, कुटुंबात इतकेडॉक्टर्स असताना, हे पत्र मलाच कां लिहिले, असे मी विचारले तेव्हा ""यावरून याबाबतीत तुझ्यावर माझा सर्वात अधिक विश्वास आहे असंच नाही का सिध्द होत ?""असा त्यांनी प्रतिप्रश्न केला. मग मी त्यांना दोनतीन गोष्टी समजावून सांगितल्या :एक तर डोळे हे माणसाच्या मृत्यूनंतर तासाभरात काढले तरच त्यांचा उपयोग करतायेतो, असे मला वाटते. आणि रत्नागिरीत नेत्रपेढी नसल्याने ते शक्य होणार नाही.बाकीच्या शरीराचा उपयोग हा केवळ हा केवळ डिसेक्शनसाठी मेडिकल कॉलेजला तेवढाहोणार. तिथे मग गरीब-श्रीमंत, मूर्ख-विचारवंत, सर्वांच्या शरीराचे अवयवअभ्यासाच्या दृष्टीने सारखेच. पुण्या-मुंबईसारख्या मोठया शहरांत. जिथे मेडिकलकॉलेजे आहेत तिथे, रोज अनेक बेवारशी मृत देह फुकट मिळू शकतात. असेअसताना उगाच खर्च करून आपला देह तिथे नेऊन देणे हा वेडेपणाच नाही का ?तेव्हा हा हटट त्यांनी सोडावा. पण त्यांच्या इच्छेला मान देण्यासाठी मी माझे डोळेआणि शरीर मृत्यूनंतर असे देऊन टाकण्याची व्यवस्था नक्की करीन. आम्ही शहरातराहतो. आम्हांला मृत्यूही शहरातच येईल असे धरून चालू, तेव्हा हे सहज शक्यहोईल. मी तुम्हांला असं वचन दिलंय हे सर्वांच्या कानावर घालून ठेवते म्हणजे झालं.

त्यांना माझे म्हणणे तितकेसे रूचलेले दिसले नाही. पण त्यावर ते काही बोललेनाहीत. हा मृत्यूचा विचार मात्र त्यांना तरीही सोडत नव्हता. कारण त्यानंतर थोडयावेळाने पुन्हा तोच विषय काढून ते म्हणाले.

""विनोबांनी, सावरकरांनी प्रायोपवेशन केल्याचं वाचलं. मला वाटतं. आपणहीआता तेच करावं. आणखी किती जगायचं आणि कशासाठी ? आता या बाबतीत तरकाही अडचण नाही ना ? पण तुझ्या आईला ते पटत नाही. तुम्ही माझ्यासाठीइतकं करा. तिची समजूत घाला आणि मला सहकार्य द्या.""

आई तिथेच बसली होती. ती भडकून म्हणाली,""मी असलं काही ऐकून घेणारनाही. त्यांना आता या वयात दुसरा काही धंदा नाही. उगाच काहीतरी विचार करतबसतात आणि म्हातारचळ लागल्यासारखे वेडंवाकडं सांगत बसतात. पण तुला तरीकाही अक्कल हवी की नको ? तू ऐकून कसं घेतेस असलं अभद्र ?""

खरे तर हा अप्रिय विषय आम्हांला कुणालाच नको होता. पण आप्पांच्या डोक्याततो ठाण मांडून बसला होता, तेव्हा त्यांच्या डोक्यातून तो काढून टाकणे भाग होते.मग मी त्यांना म्हटले,""आप्पा, मला तुमचं म्हणणं पटत. मीही तुमच्याच विचाराचीआहे. पण प्रायोपवेशन वाटतं तितकं सोपं नाही. त्याला इतरांचा विरोध चालू शकतनाही. समजा, तुम्ही प्रायोपवेशन सुरू केलं आणि काही काळानं तुमची शुध्द गेली
------------------------------------------------------------------------------------------------

पान नं. 20

आणि त्यानंतर तुम्हांला जगवण्याचे प्रयत्न इतरांनी केले तर सगळंच फुकट नाही काजाणार ? आणि आईच खुद्द तसं करील याची मला खात्री वाटते. तुम्ही विचार करूशकता. तुमची समजूत घालणं सोपं आहे. आईला असलं काही पटवणं कुणाला तरीशक्य आहे का ? तेव्हा तुम्ही असा विचार करा- गेली साठ-पासष्ट वर्ष आईनंवाढलेल्या अन्नावरच पोरालेलं हे तुमचं शरीर त्यावर अधिक हक्क कुणाचा ? तुमचाकी तिचा ? मग त्या शरीराची विल्हेवाट होईना का तिच्या मनाजोगी ? आपण याहाडामांसाला फार महत्व देऊयाच नको. मला तर वाटतं, जिवंतपणीच स्वतःच्याशरीराकडे निर्मम भावनेनं पाहता आलं तर किती सुखाचं होईल ! तुम्ही मृत्यूचाविचारच डोक्यातून काढून टाका बरं. त्याला यायचं तेव्हा येऊ द्या. इतकी घाईकशाला ? तुम्ही आम्हांला सगळ्यांना आणखी खूप हवे आहात. आमच्या एकत्रितइच्छाशक्तीपुढे तुमचा एकटयाचा काय निभाव लागणार ?"

मी तो विषय एकदाचा संपवून टाकायचा वेडयावाकडया भाषेत प्रयत्न करत होतेलहानपणी अधूनमधून कोर्टात एखादा फार महत्त्वाचा दावा चालू असला, की आप्पातो ऐकायला आम्हांला यायला सांगायचे. जिल्हा-न्यायलय आमच्या घरासमोरचचपराश्यापर्यंत सगळी माणसे आम्हांला ओळखत. आमचे घर, कोर्ट, पोस्ट, ऑफिस,युरोपियन क्लब (आता तिथे गोगटे कॉलेज झालंय.) या इमारती एकाच परिसरात,थोडया गावाबाहेर होत्या. नवीन न्यायाधीश आले की प्रथम त्यांचा आमच्या गराशीपरिचय होई. पी.एम.लाड, गुंडील,वॉटरफील्ड, डी. आरा. प्रधान- तिथेबदलून आलेल्या बहुतेक न्यायाधीशांचे आमच्या घरी खूप जाणेयेणे असे. त्यांचे-आमचे त्या वेळी जोडले गेलेले कौटुंबिक संबंध पुढेही वर्षानुवर्षे-अद्यापही-तुटलेलेनाहीत. या पार्श्वभूमीवर,लहानपणी त्या कोर्टात आप्पा चालवीत असलेले काहीखटले बाकावर बसून मी ऐकलेले आहेत, तो काळ या क्षणी मला(आणि बहुधाआप्पांनाही) आठवला. शेवटी आप्पा मला हसून म्हणाले,""तू वकील फार चांगलीझाली असतीस !""

त्यानंतर दहाच दिवसांनी आप्पा गेले, `आपण आता जावं' या प्रबळ इच्छेच्यापोटीच हे शक्य झालं असेल का ? अगदी शांत,निरामय असा हा मृत्यू. मी बरेचमृत्यू खूप जवळून पाहिले आहेत. मृत्यूनंतर काही वेळाने अनेक मृतदेहांच्या नाकातूनवगेरे एक प्रकारचा द्रव बाहेर पडतो. आप्पांच्या बाबतीत असले काहीही झाले नाही.मृत्यूनंतरही दहा-बारा तास ते त्याच अवस्थेत, अगदी स्वच्छ, शांत झोपल्यासारखेपलंगावरच होते.

मृत्यूचं दुःख हे असतंच. आणि दुःखात मला वाटतं माणसांची मनं थोडी विशाला,क्षमाशील किंवा अधिक उदार होत असावीत. आपण भेदभाव विसरू पाहतो,एकमेकांच्या मदतीला धावतो, मृतदेहाला तर पवित्र मानून नमस्कारदेखील करतो. मगहा मृतदेह स्वच्छ असला काय किंवा दुर्देवाने गलिच्छ झालेला असला काय. हे खरं
------------------------------------------------------------------------------------------------

पान नं. 21

असलं तरी आप्पांचा मृतदेह शेवटपर्यंत स्वच्छ राहिला या गोष्टीचेही कुठेतरी मलासमाधान होते. आपला मृत्यूही असाच असावा ही इच्छा तर असेलच; पण त्यांचीचमुलगी असल्यामुळे तो असाच असण्याची शक्यता असल्याचे तर हे समाधान नसेल ?

थोडे बहुत कळायला लागेपर्यंतची माझ्या वयाची पहिली आठदहा वर्षे वजा केलीतर त्यानंतर आईच्या मृत्यूपर्यंत साधारणतः पंचेचाळीस-पन्नास वर्षे आई मलालाभली. माझ्या सासूबाईशी माझी ओळख झाल्यालाही आता जवळपास तेवढाच काळलोटला आहे. साधारणतः एकाच वयाच्या,सारख्याच मध्यमवर्गीय सुशिक्षित आणिसुसंस्कृत घरांत वाढलेल्या,आपापले संसार निष्ठेने केलेल्या या दोन बायका. भाईचेवडील फार लौकर गेले. त्यामुळे मी त्यांना पाहिलेले नाही. पण भाईकडून त्यांच्याबद्दलजे काही ऐकले, त्यावरून तेही आमच्या आप्पांसारखेच एक देवमाणूस होते. म्हणजेया दोघींनी ज्यांच्या बरोबर संसार केले तेही वृत्तीने सारखेच होते म्हणायला हरकतनाही. पण मुळातच या दोघींचे पिंडधर्म अनेक बाबतींत वेगळे होते. त्यामुळे त्यांच्याशीसंबंधित असलेली माझी सुखदुःखंदेखील अगदी वेगवेगळ्या जातीची आहेत.

माझीही त्या दोघींशी वागण्याची तऱ्हा एकच नसे. आईशी हक्काने फटकूनवागणारी मी, सासूशी संबंध आला की चार वेळा विचार करत असे. देण्याघेण्याच्याबाबतीत `अं:! आपलीच आहे !' अशी आईला गृहीत धरणारी मी, सासूच्या बाबतीतशक्य ते उपचार पाळत असे. थोडक्यात, आईच्या बाबतीत आतडयाचा धागागुंतल्यामुळे तिला मी माझ्यातच पाहत असे आणि अनेकदा हक्काने दुर्लक्षीत असे, तरसासूच्या बाबतीत कर्तव्य, सुसंस्कृतता, भाईला बरे वाटावे ही इच्छा, आणि वळणलावले नाही असा आईला कुणी दोष देऊ नये हा कटाक्ष, वगेरे गोष्टींची फळी पक्कीठेवून झुकते माप घालण्याकडे माझा कल असे.

माझ्या सासूबाईंचा जन्म गणेशचतुर्थीला झाला आणि माझ्या आईचा शिवरात्रीला.हे दोन्ही सणांचे दिवस; त्यामुळे सहज लक्षात राहण्यासारखे. पण माझ्या आईचाजन्मदिवस शिवरात्रीचा, ही गोष्ट मी लग्न होऊन सासरी आले तरी मला माहीतनव्हती. आमच्या लहानपणी वाढदिवस वगेरे प्रकार नव्हतेच. आमच्या घरीच नव्हेतर त्या काळातल्या माझ्या माहितीतल्या इतर घरांतही कधी कुणाचा वाढदिवससाजरा झाल्याचे आठवत नाही. पण माझ्या सासूबाईंचा जन्म गणेशचतुर्थीच्या दिवशीझाला हे मला आमच्या लग्नाच्या आधीच कळले. त्यांच्याकडूनच. सहज बोलताबोलता. मग मी ते लक्षात ठेवले आणि त्यानंतर त्यांचा प्रत्येक वाढदिवस आठवणीने
------------------------------------------------------------------------------------------------

पान नं. 22

माझ्या परीने मी साजरा करीत आले. सतत पस्तीस-छत्तीस वर्षे, नेमाने. आता हळूहळूमीच ती प्रथा मोडून टाकली. म्हणजे आठवण येत नाही म्हणून नव्हे. आठवण येते,मी फोनवर त्यांच्याशी त्याबद्दल मुद्दाम बोलतेही; पण पहिल्यासारखा वाढदिवस साजराकरणे सोडून दिले. त्यांना बेसनाचे लाडू खूप आवडत. घरी केलेल्या साजूक तुपातबेसन खमंग भाजून आणि बेदाणा,बदाम वगेरे घालून मी खास त्यांच्यासाठी लाडूकरत असे. त्या दिवशी त्यांना जितकी वर्षे पुरी होत तितके लाडू आणि शिवाय साडीवगेरे. एकदा कधीतरी आईशी बोलताना मी याचा उल्लेख केला, तेव्हा ती म्हणाली,""वा, त्यांचा जन्म गणपतीच्या दिवशी का ? माझा शिवरात्रीला."" तेव्हा मलाआईचाही वाढदिवस असू शकतो हे इतक्या वर्षांनी प्रथमच जाणवले., आणि ही गोष्टइतक्या उशिरा कळली याचे हसूच आले. पण त्यानंतरही कधी मी आईचा वाढदिवसखास लक्षात ठेवला नाही आणि सासूबाईंचा वाढदिवस विसरू दिला नाही.भाईलाही स्वतःच्या वाढदिवसाबद्दल उत्साह असे आणि मीही त्या दिवशी त्याच्याआवडीचा खास असा सेपाक करत असे.

असे या मायलेकांचे पंचवीस-तीस वाढदिवस झाले, पण माझी जन्मतारीख कोणतीहे विचारण्याचं माझ्या सासूबाईंना कधी सुचलं नाही आणि भाईला ती तारीख मुद्दामलक्षात ठेवावी असं कधी वाटलं नाही. मला मात्र इतरांच्या जन्मतारखा लक्षातठेवायच्या आणि त्या त्या दिवशी प्रत्यक्ष, फोनवर किंवा पत्राने सदिच्छा द्यायच्या असाछंदच लागला आणि हळूहळू तो वाढतच गेला. मग त्यांतल्या काहींनी माझीजन्मतारीख काढण्याचा आणि उलट मलाही सदिच्छा पाठवण्याचा उद्योग सुरू केलाआणि त्यामुळे मग मला भंयकर संकोचल्यासारखं व्हायला लागलं. मनुष्यस्वभाव तरीकसा मजेदार असतो ! माझा वाढदिवस भाईच्या लक्षात नसतो याचे मला मनापासूनवाईट वाटे. आताशा आताशा तो मुद्दाम ती तारीख लक्षात ठेवतो, आणि आपल्यालक्षात आहे हे मला त्या दिवशी सकाळी किंवा आधल्या दिवशीही सांगून टाकतो.मला वाईट वाटू नये म्हणून; स्वतःच्या आनंदासाठी नव्हे. कारण त्या शुभेच्छा देऊनहोताच त्याने `हुश्श' केल्याचे मला जाणवते. मग माझाच मला खूप राग येतो.आपणच कुठेतरी कधीतरी बोललो असणार, याला माझा वाढदिवस कधीच आठवतनसल्याचे. या विचाराने मला स्वतःशीच फार लाज वाटते. माझा वाढदिवस कुणाच्याध्यानामनी नव्हता ते किती चांगले होते ! त्यात कसला तरी गूढ आनंद मला त्यादिवशी लाभायचा. माझ्या हाताने आता तो मी गमावून बसले. आणि कमावले काय ?वर्षांतून एक-दोन कसेसेच दिवस, की ज्या दिवशी फोन वाजला की धडाधडायलालागतं. आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तर नसतील ? यांच्याशी आता काय आणिकसं बोलू ? मला औपचारिक बोलणं आवडत नाही हे ठीक आहे. पण करं सांगायचं तर वेळप्रसंगी तसं बोलावं लागतं हे कळत असूनही मला औपचारिक बोलताच येतनाही. म्हणजे नक्की काय होतं ? मला रंगभूमीवर अशी एखादी भूमिका वढवायलामिळाली असती की असं औपचारिक बोलण्याचा जिचा स्वभावच आहे, तर मी काय
------------------------------------------------------------------------------------------------

पान नं. 23

केलं असतं ? ती भूमिका नाकारली असती ? सांगता येत नाही. ती भूमिका तशीमहत्त्वाची असती तर मी ती स्वीकारलीही असती आणि बहुधा चांगली वठवलीहीअसती. मग हा रंगभूमीवरचा अभिनय प्रत्यक्ष जीवनात क्वचित्प्रंसगी आवश्यकअसला तर कां करू नये ? आवश्यक असतानादेखील तो करू नये असे मला मुळीचवाटत नाही. पण मला मात्र तो तसा करता येत नाही हेच तर दुर्देव आहे. पराभवआहे. अशा हजारो रंगीबेरंगी पराभवांची मालिका म्हणजेच आपले आयुष्य का ? ""

माझ्या माहेरचे आणि सासरचे वळण अनेक बाबतींत वेगळे होते. आमच्याआप्पांना चहा फार आवडे. काम करताना त्यांना मधूनमधून थोडाथोडा चहा लागतअसे. अशा वेळी साहजिकच त्यांच्याबरोबर त्या वेळी जी कुणी माणसे असत त्यासर्वांसाठी आई चहा करीत असे. आप्पांच्या वकील मित्रमंडळीत, त्यांच्याकडेशिकायला येणाऱ्या तरूण वकील मंडळीत आणि आप्पांच्या पक्षकारांतही बरेचलोक धर्माने मुसलमान होते. आमच्या पलीकडे बरीच मुसलमान कुटुंबे राहतहोती. अद्याप आहेत. या सर्व मंडळीचे आणि आईचे संबंध खूप जिव्हाळ्याचे होते. पणचहा देताना मात्र, तोच चहा पण मुसलमानांसाठी आई वेगळ्या कपबश्या वापरतअसे. खरे तर सहज ओळखू याव्यात म्हणून, पण प्रत्यक्षात त्यांनाखास सन्मानितवाटावे म्हणून, आईने या कपबश्या जरा अधिक किंमतीच्या आणि फुलांची नक्षीअसलेल्या अशा घेतल्या होत्या. चहा देताना मोठया चतुराईने ती त्या त्या माणसापुढेतो तो कप ठेवी. पण आप्पांचे एकदोन मुसलमान वकील मित्र तिच्याहूनही चतुर होते.ह्या पाहुणचाराचे वेशिष्टय लौकरच त्यांच्या ध्यनात आले आणि मग आईने टेबलावरचहा आणून ठेवला की त्यांतला कधी हा तर कधी तो वकील नेमका आप्पांच्या पुढचाकप आपण घेई आणि आपल्या पुढयातला कप आप्पांच्या पुढे ठेवी. आई मगघाईघाईने त्यांना सांगे ""त्यांचा (म्हणजे आप्पांचा) चहा नका तुम्ही घेऊ. ते सारखाचहा पितात. मग पित्ताचा त्रास होतो. म्हणून मी त्यांना अर्धाच कप चहा दिलाय.त्यांना तोच घेऊ दे. तितकाच पुरे. तुम्ही तुमचा घ्याकपभर."" त्यावर तेही हसूनसांगत की त्यांनाही सारखा सारखा चहा घेऊन त्रास होतो, तेव्हा अर्धा कप चहाहवा होता. आणि हे सांगत असतानाच आप्पांच्या कपातून ते तो चहा पिऊही लागत.आप्पाही मग समोर आलेल्या त्या फुलांच्या कपातला अर्धा चहा पीत आणि उरलेलाअर्धा आईकडे देत तिला सांगत,""हा तू घे. फक्कड झालाय. पण मी अर्धा कपचघेतला. बाकीचा तुला ठेवलाय. घे."" मग आम्ही रिकाम्या कपबश्या धुवायला आतआणल्या की."" हा पण कप मेल्यांनी बाटवला.!"" म्हणत आई तो आप्पांचा कपही`मुसलमानांच्याकपा'त ठेवी. लौकरच घरात असे `मुसलमानांचे कप'च फार झाले,तेव्हा आईने तिचे हे सोवळे मनातल्या मनात गंगेला वाहिले आणि मग सगळे कपनिधर्मी झाले. आमच्या घरातली ही कपबश्यांची, भांडयाकुंडयांची,पंक्तींची वगेरेवर्णव्यवस्था अशी हळूहळू कोलमडून पडली आणि `ह्या नव्या पिढीला विधिनिषेधच
------------------------------------------------------------------------------------------------

पान नं. 24

राहिला नाही, तिथे मी तरी एकटी किती पुरी पडणार ?' अशा विषादाने आई खिन्नझाली. आप्पाही अर्थातच त्या नव्या पिढीतच होते.

माझ्या सासरी सोवळ्या-ओवळ्याचा प्रकार किंवा असला भेदभाव नव्हता. पाळीच्यावेळी तीन दिवस दूर बसणे हा प्रकारही माहेरच्यासारखा सासरी नव्हता. त्यामुळे खूपमोकळे वाटे. मात्र गुरूवारी माझ्या सासूबाईंना कांदा-लसूणच वर्ज्य होती असे नव्हे,तर त्या दिवशी त्यांचेही सोवळे-ओवळे असे. सकाळची पहिली चहा-कॉफीही गुरूवारीप्रथम आंघोळ करून, मग भरलेल्या पाण्याचीच करावी लागे. पाळी चालू असले तरत्या सुनेच्या हातचे अन्न त्यांना गुरूवारी चालत नसे. ""गुरूवारमध्येच असं काय खासअसतं ? तुमचा जर असल्या गोष्टींच्यावर विश्वास नाही तर गुरूवारी तरी तुम्ही त्याकां करता ?"" असे मी सासूबाईंना विचारत असे; पण त्यांच्याकडे त्यावर काहीच उत्तरनसे. त्या गप्प बसत. किंवा ""एक वार तरी करावंसकेलं तर काय बिघडलं? तुझीआई पण सोवळं-ओवळ मानतेच."" असले काहीतरी उत्तर देत. माझ्या आईची मात्रया बाबतीतली विचारसरणी पक्की होती.तिला वाटे, पिढयानपिढया आपले पूर्वजजीवनाची जी मळलेली वाट तुडवट आले तोच ही भवनदी पार करायचा निश्चितआणि खात्रीचा मार्ग आहे. त्या वाटेवरून प्रवास करण्यातच आपलं भलं आहे. त्यापूर्वजांच्या पुण्याईने आणि आशीर्वादानेच आपल्याला शरीरा-मनाची ही शक्ती-बुध्दीलाभली, त्यांचा अवमान करणे हे पाप आहे. या निष्ठा मूर्खासारख्या, बिनबुडाच्याहोत्या; पण त्यांना चिकटून राहण्यात कष्ट अधिक होते तरीही ते उपसण्याची ताकदआईमध्ये खूप होती. कुटुंबातल्या आणि भोवतालच्या इतरांचाच विचार आई प्रथमकरीत असे, पण तो पक्कया आखीव अशी तिच्या दृष्टिकोनातून. भाई किंवा त्याच्याआई यांना इतरांचा विचार कधी सुचतच नाही. हे एकेकाचे प्रकृतिधर्म किवां पिंडधर्मअसतात. त्याला त्या त्या व्यक्तीचा इलाजच नसावा.

सर्वसाधारण घरामध्ये बायकांचे राज्य असते. त्यामुळे स्वतःचे घर असावे,तेघर, त्यातल्या सोयी, तिथले सामानसुमान,भांडीकुंडी, मांडणी वगेरे वगेरे कशीअसावी, याबद्दलही विशेषतः बायकांना स्वतःची मते, हौशी असतात. दुर्देवाने याबाबतीत मी बायको म्हणून नालायकच निपजले. असली कोणतीच शहरी हौस मलानाही. निवडच करायची झाली तर शहराबाहेर,छोटंसं, खूप मोठठाली झाडंआजूबाजूला असलेलं, एक गाय आणि एक कुत्रा यांची सोबत असलेलं, नदीकाठचंघर मी निवडलं असंत. पण भाई हा पक्का शहरी माणूस असल्याने तसे घर आपल्यानशिबात नाही हे मी चटकन मान्य करून मोकळी झाले. मग शहरातच राहायचे तरबेताचे असे आणि स्वच्छ घर असले की झाले. ते असेल तसे मी भागवून घेत असे.एक स्वच्छता सोडली तर माझ्या इतर गरजा फारच कमी होत्या. अमकीच भांडीकुंडीवगेरे मला लागत नसत. त्यामुळे अशा वस्तू निवडून मी कधी जमा केल्या नाहीत.पण घरातल्या प्रत्येक चीजवस्तूशी माझी वेयक्तिक ओळख आहे. सुरूवातीच्या काळात
------------------------------------------------------------------------------------------------

पान नं. 25

जुन्या कपडयांवर वगेरे घेतलेली आणि पुढे वेळीप्रसंगी कुणीकुणी दिलेली जी काहीभांडीकुंडी माझ्या घरात जमली आहेत त्यांच्यावर माझा माणसांसारखा जीव जडलाआहे. त्यांतल्या एखाद्या भांडयाला पोचा आला तर चारपाच दिवस माझी झोप उडतेआणि त्यानंतर वर्षाननुवर्षे ते भांडे वापरताना त्या पोच्यावरून माझा हात न चुकताफिरतो, ते भांडे कुरवाळल्यासारखा.

भाईला मात्र गाडीसारखी घराचीही हौस होती.मग आम्ही सांताक्रूझला मोठठं घरघेतलं. तिथल्या त्या मोठाल्या हॉलमध्ये अनेकांची गाणी झाली.या कार्यक्रमांनामित्रमंडळींप्रमाणेच घरचे लोकही साहजिकच असत. माझ्या सासूबाईंनाही गाण्याचीखूपआवड. त्या बाबतीत माझी आई म्हणजे दुसरं टोकं होतं. मुलांना झोपवण्यासाठीयापेक्षा अधिक गाण्यांची मानवजातीला गरजच नाही, असे तिचे मत होते असावे.आम्ही गाणं शिकावं असं तिला वाटे. आपला जावई गाणारा आहे याचाही तिलाअभिमान होता; पण याचा अर्थ तिला संगीताच्या क्षेत्रात काही रस होता असा मात्रमुळीच नव्हे. याउलट, माझ्या सासूबाईना दिवसभर रेडिओ लावून बसा म्हटले तरीती शिक्षा वाटत नाही. त्यांना गाण्यातले डावेउजवे काही कळते अशातला भाग नाही,पण गाणे ऐकायला मनापासून आवडते हे मात्र खरे. तर सांताक्रूझच्या घरी त्या पाचवर्शांत झालेल्या प्रत्येक गाण्याला त्या हजर असतच. मग मध्यंतरात कॉफी होई. तीतयार करून कप भरणे वगेरे सर्व मी केलेल असे. पण ट्रे भरभरून पाहुण्यांना कॉफीनेऊन देणे, रिकामे कप गोळा करून सेपाकघरात आणून ठेवणे वगेरे कामांनामित्रमंडळीपेकी काही स्वयंसेवक पुढे येत. असल्या कामात भाई स्वतः, त्याचे भाऊअगर त्याच्या आई कधीही स्वतःहून भाग घ्यायला येत नसत. पण माझ्या सासूबाईंनाकुणीतरी कॉफी नेऊन दिली, की त्या मलाही चारचारदा ""तूही घे ना ग"" असाआग्रह करत. आपण घरातली माणसे, पाहुण्यांना आधी द्यावे, मग आपण घ्यावे,असा विचार भाईप्रणाणेच त्यांनाही चुकूनही सुचत नसे .""आधी तू घे बघू. मग संपेल."" असेमनापासून सांगत. कारण मीही त्यांची होते, इतर पाहुणे मंडळीसारखी परकी नव्हते.

हे `आपलं' आणि `परकं' ह्याच्या व्याख्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असू शकतात.माझी आई आणि सासूबाई या दोघींच्या तर अगदी दोन टोकांच्या होत्या. रक्ताचेनाते हे माझी आई अपरिहार्यपणे मानतच आली. पण अगदी मनाच्या गाभ्यात तिलालेकीसुना काय आणि शोजारपाजारच्या बायकांपासून कामवाल्यांपर्यंत इतर जणी काय,एका विशिष्ट पातळीवर सगळ्या सारख्याच होत्या. देवधर्म,सोवळेओवळे,रीतिरिवाज, नीति-अनीतीच्या कल्पना वगेरे बाबतींतल्या आईच्या निष्ठा पाळणाऱ्यात्या तिला स्वकीय वाटत आणि धुडकावणाऱ्या त्या परक्या वाटत. अशा अनेकबाबतीतं माझ्यासारख्या मुलीला तिने जन्माला घातले यात पूर्वजन्मीचे तिचे
------------------------------------------------------------------------------------------------

पान नं. 26

कोणतेतरी पाप गुंतले असावे अशी तिची भावना असावी. तसे तिने कधी बोलूनदाखवले नाही. पण माझ्या अशा एखाद्या कृतीनंतर तिला जे दुःख आणि वेदना होतत्यावरून मला हे जाणवे. पण या बाबतीत मीही तिच्याइतकी हट्टी होते. तिला दुःखहोते म्हणून आपण पडते घ्यावे, असे तिच्या हयातील मला कधीही वाटले नाही.

आम्ही परदेशप्रवासाला निघालो तर आमचा प्रवास सुखरूप पार पडो म्हणून तीसत्यनारायण बोलून गेली. आम्ही परत आल्यावर जोडप्याने बसून तो पुजावा अशीतिची इच्छा. कारण तो नवस बोलताना म्हणे तिची धारणा तशीच होती. भाईचाहीअसल्या गोष्टीवर विश्वास नाही. पण तिची चेष्टा करत का होईना, भाई पूजेलाबसला आणि कथा सांगणाऱ्या भटजींचीही अधूनमधून खिल्ली उडवत त्याने ती पूजायथासांग पार पाडली. मी मात्र त्याच्याबरोबर बसले नाही. माझा असल्या गोष्टींवरविश्वास नाही हे माहीत असताना आईने या नवसात मुळात मला गोवावेच कां ?आणि विश्वास नसताना केलेली असली खोटी पूजा तिच्या त्या देवाला तरी मानवेलकी ? तरीही आईला सत्यनारायण करायचाच असेल आणि भाई त्याला तयारअसेल तर त्याने माझ्याऐवजी सुपारी लावून पूजेला बसावे असे मी सांगितले; आणिशेवटी ती पूजा तशीच पार पडली. मग सेपाक करण्यात, इतर कामांत,,वगेरे मी तिलासर्व मदत केली; पण ही मदत आईला होती. त्या देवाशी या गोष्टींचा काहीही संबंधनव्हता. खरे तर आईच्या दृष्टीने घरातला तो एक आनंदाचा प्रसंग. मंगल कार्य. पणत्या दिवशी तिच्या डोळ्याला मधूनमधून पाणी येत होते. माझ्यावर मात्र त्याचाकाडीचाही परिणाम होत नव्हता. ती वाकली होती; मी ताठ होते.

पुढे एकदा बऱ्याच वर्षानंतर त्या प्रसंगाची कशावरून तरी आठवण निघाली आणिमाझ्या त्या हटटी स्वभावाचा निषेध करताना ""कुठे फेडणार आहात ही पापं कोणजाणे !"" असे ती पटकन बोलून गेली आणि तिच्या डोळ्यांना पुन्हा पाणी आले.त्यावर मी म्हटले.

""मी केवळ पूजेला बसले नाही म्हणून जर मी तुला पापी वाटत होते, तर मगप्रसादाच्या शिऱ्यापासून कितीतरी सेपाकात वगेरे मी त्या दिवशी तुला मदत केली तीमाझ्या हातची कशी चालली ग ?""

तीही माझीच आई. म्हणाली,""कुठे चालली ?मी तर तुला कशालाही हात लावू दिलानसता. इतके सत्यनारायण मी करते तेव्हा तू थोडीच असतेच मदतीला ? पण विचार केला,त्या देवाला डोळे आहेत. नेवेद्याचा सेपाक.तेवढं तरी पुण्य तुझ्या हातून घडू दे.""

मी कपाळावर हात मारून घेतला. त्या दिवशी अशा रितीने माझ्या पदरी पडलेलेपुण्य पुरेसे नव्हते म्हणून तिने मला सद्बुध्दी लाभावी एवढयासाठी म्हणे आणखी एकसत्यनारायण माहू पूजला होता.

आम्ही- विशेषतः मी- जाणूनबुजून स्वतःचं असं अकल्यमआम करते आणि त्याचीभरपाई करण्यासाठी तिला असे आता या वयात न पेलणारे कष्ट पडतात. माझ्या
------------------------------------------------------------------------------------------------

पान नं. 27

पोटी तिच्याबद्दल दयामायाच नाही असे पुढेपुढे तिचे ठाम मत बनत गेले होतेअसणार. पण हा गेरसमज दूर करायचा उपाय तरी कोमता ? तिच्या समाधानासाठीमी देवपूजा करणे ? म्हणजे माझा स्वासच मती मागत होती. आई आणि मुलगी हेआतडयाचे नाते आम्हां दोघींत निश्चितच होते. पण देवाने आम्हां दोघींची स्थाने हीअशी दोन ध्रुवांवर रोवून ते आतडे तुटेपर्यंत ताणले होते खरे.

माझ्या सासूबाई अश्रध्द मुळीच नव्हत्या. पण त्यांच्या श्रध्दा,देव, धर्म त्यांच्यापुरतेसगळे काही होते. ते त्यांनी कुणावरही कधी असे लादले नाही. खावे,प्यावे,द्यावे,घ्यावे, चार घटका आयुष्य लाभलेय तर ते आनदात घालवावे, अशा वृत्तीचा हा भागहोता. अस्तित्ववादी विचारसरणी वगेरेतून निर्माण झालेली ही तात्त्विक भूमिकानव्हती; तो रक्तदोष( रक्तगुण म्हणू या हवे तर) होता. त्यामुळे लेकी-सुनांशी आणिमुलांनातवंडांशी त्यांचे खटके उडत ते ऐहिक पातळीवरच्या त्यांच्या अपेक्षाभंगातूनकिंवा त्यांच्या मागण्या आणि आमच्याकडून होणारा पुरवठा यांतल्या तफावतीतूनउद्भवत. सुनाकाय, जावई काय, त्यांच्या नातयात आलेली सगळी माणसे ही त्यांनीत्यांची मानली. मग ती कशीही वागली तरी त्यांना चालत. मी ऋण काढून सण केलाअसता तरीही त्यांना विषाद वाटला नसता. फक्त त्या सणात त्यांनाही प्रेमानेसहभागी करून घ्यावे, इतकेच, आपल्या इतरांपासूनच्या अपेक्षा या अशा छोटयाअसोत की मोठया असोत, तपशिलावर बेतलेल्या असोत की त्त्वावर, त्या पुऱ्याहोण्यात नाना तऱ्हेच्या अडचणी असू शकतात आणि हे लक्षात न आल्यानेच आपणदुःखी होतो. माझ्या सासऱ्यांच्या अकाली निधनामुळे बराच काळ त्यांना आर्थिकओढाताण सहन करावी लागली हे खरे. पण परिस्थिती सुधारली तरीही त्यांनामनाजोगे सुख कधीच लाभले नाही. शत्रूच्याही वाटयाला येऊ नयेत इतके आप्त-स्वकीयांचे मृत्यू त्यांच्या वाटयाला आले. पण निवृत्ती मात्र त्यांच्यापासून सदेवदूरच राहिली. त्यामुळे बाकी सर्व काही असूनही दुर्देवाने त्या असुखीच राहिल्या. कुणीकितीही दिले, त्यांना बरे वाटावे, खूष करावे म्हणून कितीही धडपडले, तरी त्यातूनत्यांना मिळणारे समाधान हे फक्त क्षणिक असे. वृत्तीतच कुठेतरी अतृप्तीचा आणितक्रारीचा सूर घुमताना ऐकू येत असे. अजूनही येतो.

म्हणजे मग मृत्यू काय करतो ? त्याचा प्रभाव, त्याची टांगती तलवार वगेरेला खरेचकाही अर्थ आहे का ? की त्याच्या बाबतीतही `अतिपरिचयात् अवज्ञा' हेच तत्त्व लागूपडते ? मला वाटते, अनेकांच्या बाबतींत, त्या क्षणी त्याचा घाव जाणवतो, इतकेच. बाकीइतकी लौकर बरी होणारी एवढी मोठी जखम दुसरी कोणतीही नसेल. स्वतःच्यास्वभावातून निर्माण होणारे सव मात्र संवेदनाशील माणसांना जन्मभर टोचचत राहतात.

मी सासूबाईंशीबी अधूनमधून वाद घालत आले. त्यांच्या अधिक्षेप न करता त्यांचीचेष्टा करत आले. पण आमचे भांडण असे कधी झाल्याचे आठवत नाही.

पारल्याच्या आमच्या त्या छोटयाशा बेठका घराला वरती एकच खोली होतीय ती
------------------------------------------------------------------------------------------------

पान नं. 28

भाईच्या वडिलांनी खास त्याच्यासाठीच बांधली होती. आमच्या लग्नानंतर अर्थातचतीच आमची खोली झाली. आणचे कुणीही पाहुणे,दोस्तमंडळी आली तरी ती मगआमच्या खोलीतच आमच्याबरोबर राहत. घरच्या इतरांना परकी अशी नानाजोग, जे. पी. नाईक, भय्या वगेरे मंडळी मुक्कामाला आली तरी ती त्या वरच्याखोलीत आमच्याबरोबर असत. अशा एखाद्या वेळी भाई कामानिमित्त बाहेरगावीगेलेला असला आणि मी एकटीच असले तरी माझ्या सासूबाईंनी या पाहुण्यांच्यावास्तव्याला कधी हरकत घेतली नाही. माणसाच्या सभ्यतेवर, सुसंस्कृतपणावर त्यांचाविश्वास होता. त्यांच्या तुलनेने माझी आई या बाबतीत फार कर्मठ, सोवळ्याविचारांची होती. असे प्रसंगक्वचित एकदोनदाच आले असतील, पण त्या वेळीमाझ्या सासूबाईंनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मला फार मोलाचा होता. याबाबतीत आईपेक्षा त्यांचे पारडे जड होते. आणि ही गोष्ट मी त्यांच्या माझ्यासंबंधातल्या कोणत्याही संदर्भात विसरूच शकत नाही. त्यांच्या वागण्यातून आम्हांसगळ्यांना अनेकदा मनस्ताप होत आला आहे. त्या त्या वेळी त्यांचा फार रागहीयेतो. पण मग मला दयाही येतो. स्वतःपलीकडे दुसऱ्या कुणावर तरी जीव तोडून प्रेमकरण्यातला आनंद त्यांच्या ललाटी लिहिलाच गेला नाही, त्यामुळे जमेची बाजू खूपअसूनही त्यांची ओटी फारशी कधी भरली नाही खरी.

गेल्या काही वर्षांपासून माझ्या अंतर्मनात सुरू असलेली एक प्रक्रिया आप्पा-आीच्यामृत्यूनंतर जरा तीव्र झाली आहे. मनाच्या खेळात मृत्यूच्या विचाराभोवती पिंगा घालणंजरा जास्तच व्हायला लागलंय. जन्म आणि मृत्यू हे दोन्ही आपल्या हाती नाहीत. पणया दोहोंना जोडणारा प्रवास तरी ? तोही आपल्या हाती नाही ? अनुकूल किंवाप्रतिकूल परिस्थितीची ताकद आणि आपले आईबाप आणि पूर्वज यांच्या वारशातूनलाभलेल्या पिंडाची ताकद या दोन ताकदींची गुंतागुंत. त्यात खर्ची पडणाऱ्या शक्तीतूननिर्माण होणारी सुखदुःखे सगळेच परस्वाधीन. त्यातला अहंकारी `मी' हा तरी मुळातमनाजोगा असावा ! तो `मी' म्हणजेच पिंड ना ? आई-बाप, पूर्वज या साखळीतले काहीदुवे आणि त्यांत आपल्या निर्मितीमुळे पडलेला आणखी एक वळसा. हे सगळं मोठंविचित्रच आहे.

मी मृत्यूचा विचार करते,म्हणजे नक्की काय करते ? माझ्या डोळ्यांपुढे दोनतीनप्रसंग पटकन येऊन जातात. मी खूप लहान होते, धामापूरला आजीकडे होते.पावसाळ्याचे दिवस. खूप रान वाढलेले. त्या काळी त्या भागात संडास ही गोष्टचनव्हती.
------------------------------------------------------------------------------------------------

पान नं. 29

शेतात कुठेतरी जायचं. मी जाऊन बराच वेळ झाला म्हणून आजी शोधायलाआली. माझ्या बोलण्याचा आवाज ऐकू आला म्हणून ती त्या दिशेला आली.माझ्यासमोर जवळच काही अंतरावर एक नाग वेटोळं घालून, फणा काढून ऐकत (?)होता, आणि मी त्याच्याशी गप्पा मारत होते.- त्याला काहीतरी सांगत होते. मला हीसवयच होती. कावळा,चिमणी, मुंग्या, तांदळातल्या किडी, हालती पाने-फुले, झाडेयांच्याशी बोलताना पाहून""अशांनी एक दिवशी वेड लागेल !""असे आईहीम्हणायची. धामापूरच्या त्या वेळच्या आमच्या घरात भिंतीवर एक खूप मोठठे नागोबाचेचित्र रंगवलेले असे. दरवर्षी नागपंचीमीच्या आधी ती भिंत सारवून नवा नागोबारंगवला जाई. आणि नागपंचमीला त्याची यथासांग पूजा होई. ती एक संरक्षक देवताचमानली जाई. खरा नागदेखील कधीमधी दिसे. पण तरी त्याला मारायचे नसे. आजीत्याला राखणदार म्हणे. मी ज्याच्याशी बोलत होते तो इतरत्र कुठेही दिसला असतातरी आजीने हात जोडून त्याला ""राखणदारा,भलं कर बाबा सर्वांच"" असेच म्हटलेअसते. पण तो रक्षणकर्ता असला तरी शेवटी विषारी जनावरच ते. त्याच्यापासूनकिती दूर राहायचे याची अक्कल माणसाला हवी. त्या वयात मला ती निश्चितचनव्हती. भिंतीवरचा नाग तर चोवीस तास घरातच असे. त्याला मी हातदेखील लावतअसे. त्याच्या फणेवर गंध-पुष्पे लावली जात. हात जोडून नवस बोलले जात. त्यामुळेअसेल कदाचित, पण या खऱ्या नागाचे मला जरादेखील भय वाटले नव्हते. आणिम्हणूनच मी त्याच्याशी बोलत बसले होते असेन.त्याला संरक्षक देवता मानणारीआजी मात्र भलतीच घाबरली आणि मला मागच्या मागे बकोटीला धरून उचलूनधावत घरी आली. मग मला देवाच्या पायावर घालणे, भिंतीवरच्या नागोबापुढेस्वतःचे आणि माझे नाक,डोके घासणे वगेरे बरेच काही आजीने केले. मला नसमजणारे बरेच समजावूनही सांगितले. त्याचले काहीच आता आठवत नाही. पणमृत्यूचा विचार आला की हा प्रसंग न चुकता आठवतो.

दुसरा प्रसंग खूप मोठया वयातला आहे. आम्ही दिल्लीला होतो. साठ सालचीगोष्ट असावी. संध्याकाळ झाली होती. भाई ऑफिसमधून घरी येऊन टेबलावर`अपूर्वाई' या प्रवासवर्णनातला पुढला भाग लिहित होता आणि मी समोरच बसूनपूर्वीच्या भागाची `किर्लोस्कर' ला पाठवण्यासाठी प्रेसकॉपी करत होते. आभाळ भरूनआले होते. खोलीत दिवा, पंखा लावून आमचे काम चालले होते. अचानक गडगडाटसुरू झाला. ती मेघगर्जना तर होतीच, पण पृथ्वीच्या पोटातूनही काही विचित्र आवाजयेताहेत असा भास झाला आणि सगळं थरथरायला लागलं. आम्ही दोघंहीएकमेकांकडे पाहून ""धरणीकंप! असे म्हणत जागचे उठलो. आम्ही वरच्यामजल्यावर राहत होतो. पंडारा रोडला, मधे मोठे मोकळे मेदान आणि भोवताली हीसरकारी घरे होती. धरणीकंप झाला की इमारती कोसळतात, तेव्हा घर सोडून शक्यतितक्या लौकर उघडया जागी जाणे आवश्यक असते, हे आम्हां दोघांनाही माहीतहोते. भाई धावत खाली उतरून मेदानात गेला. जाता जाता त्याने आमच्याकडे
------------------------------------------------------------------------------------------------

पान नं. 30

कामाला असलेला पोरगा भेदरून रडायला लागला होता त्यालाही खाली नेले.भोवतालच्या सर्व घरांतली बहुतेक सगळी माणसे धावत मेदानात गोळा झाली होती.मी मात्र प्रथम दिवा आणि पंखा बंद केला. टेबलावरचे कागद उडू नयेत म्हणूनत्यावर पेपरवेट ठेवले. भाईने पेन उघडेच टाकले होते ते नीट बंद करून खणातटाकले. खाली उतरताना घराला कुलूप घातले. मी खाली जाऊन पोचेपर्यंत धरणीकंपकधीच थांबला होता. त्यानंतर पुढले काही दिवस माझी ही वर्तणूक हा आमच्यामित्रमंडळीत चेष्टेचा विषय होता. या गोष्टीलाही आता कितीतरी वर्षे झाली. पण मृत्यूचाविचार म्हटला की हाही प्रसंग न चुकता डोळ्यांपुढे जसाच्या तसा लख्ख उभा राहतो.

तिसरा प्रसंग मात्र अगदी याच्या उलट आहे. मला वाटते, शेहेचाळीस सालच्याऑक्टोबरातलीच गोष्ट असावी. दिल्लीजवळ ओखल्याला डॉ. झाकीर हुसेन यांचीजामिया मिल्लिया इस्लामिया ही संस्था. भय्या (मीर असगर अली )हा तिथला विद्यार्थी.त्या संस्थेचा रौप्यमहोत्सव होता. त्या निमित्ताने प्रथम ओखल्याला, मग मीरतलाकॉग्रेसचे सेशन होणार होते तिथे, आणि परतताना उत्तर हिंदुस्थानातली प्रसिध्द स्थळेपाहायला, असा दौरा आखून भय्याबरोबर भाई आणि मी जायचे नक्की केले होते.आयत्या वेळी भाईचा बेत रजा न मिळाल्याने रद्द झाला आणि भय्या आणि मीदोघेच दिल्लीला आणि तिथून ओखल्याला गेलो. माझी उतरायची व्यवस्था प्रो. आगाअश्रफ यांच्या घरी होती. अगदी डोळ्यांचे पारणे फिटेल असा सुंदर सभारंभ पहिल्यादिवशी पार पडला. गांधी,नेहरू,आझाद,जिना वल्लभभाई, राजाजी, सरोजिनीनायडू-- नाव घेण्यासारखा त्या काळचा देशातला प्रत्येक राजकीय पुढारी त्या प्रचंडस्टेजवर बसला होता. अनेकांची भाषणे झाली. सभारंभानंतर जवळपासचे म्हणजेदिल्लीहून वगेरे आलेले पाहुणे परत गेले. जेवणे, गप्पा होऊन आम्ही झोपलो.मध्यरात्री प्रचंड आरडाओरडा ऐकू आला आणि मी जागी झाले. घरातले इतरहीलोक उठले होते. फाळणीपूर्वीचा तो काळ. ठिकठिकाणी मधूनमधून जातीय दंगेउसळत होते. त्या रात्री ओखल्याच्या शेजारच्या गावातून हिंदुंचा प्रचंड जमाव हातांतपलिते घेऊन मुसलमानांचे हे विद्यापीठ जाळायला हल्ला करून येत होता.`हर हरमहादेव' च्या घोषणा ऐकू येत होत्या. प्रो. अश्रफ माझ्याजवळ आले आणि म्हणाले,""घाबरू नको. काही होणार नाही. ते लोक खूप दूर आहेत. पोलिसांची गस्त चालू आहे.""

हे जरी खरं होतं तरी मी भेदरून थरथरत होते. हा प्रसंग आठवला म्हणजे नचुकता मला माझी भयंकर लाज वाटते. मी मृत्यूला घाबरले म्हणून नव्हे. ती प्रतिक्रियानेसर्गिकच होती. त्यात कमीपणा मानायचे काय कारण ! पण मला शरम वाटते तीत्या क्षणी माझ्या डोक्यात क्षणभर का होईना, पण येऊन गेलेल्या एका विचाराची.मला वाचले, मुसलमानांना मारायला आलेले हे हिंदू. मी त्यांच्यातलीच आहे, हिंदूआहे हे त्यांना कळणार नाही आणि मला निष्कारण मरावे लागणार.

मी त्यांच्यातलीच आहे' म्हणजे काय ? मी धर्म मानत होते का ? त्या काळीभय्याइतका जवळचा मला दुसरा कुणीही मित्र नव्हता. घरदार, नातीगोती, कोणतीही
------------------------------------------------------------------------------------------------

पान नं. 31
बंधने न मानणारी मी, सुंदर जीवनमूल्यांना जिवापाड जपणारी मी, क्षणभर काहोईना पण त्या अविचारी जमावाला `आपला मानते ? प्रसंग आलाच असता तरप्रो. आगा अश्रफ आणि त्यांच्या घरातल्या इतरांनीही त्यांच्या घरच्या माझ्यासारख्यापाहुणीला वाचवण्यासाठी स्वतःच्या जिवाची पर्वा केली असती, हे त्या क्षणीही मलाकळत होते. त्यांचा तो धर्मच होता. त्या क्षणी त्या मुसलमानांतला माणूस जागा झालाहोता आणि माझ्यातला हिंदू डोकं वर काढू पाहत होता. हल्ला करून येणाऱ्यांचा लोंढापरतून सगळे स्थिरस्थावर होण्यात अर्धाएक तास तरी गेला असेल. तो महाभयंकरविचाराचा क्षण कधीच मागे गेला होता. प्रत्यक्ष प्रसंग आलाच असता तर स्वतःवर सूडकाढण्यासाठी मी कदाचित सर्वांत अधिक धेर्य आणि माणुसकी दाखवली असती. इतरकुणाला काहीही कळले नाही; पण मला मात्र माझं एक वेगळंच दर्शन झालं होतं.
या वृत्ती एरवी कुठे असतात ? प्रसंगी केवढी उसळी मारून ज्वालामुखीतूनविध्वसंक लाव्हा अचानक उफाळून यावा तशा येतात ! या एवढयाशा जीवात असंकाय काय एकवटलेलं असतं आणि संस्कार करून न घेता स्वतंत्र अस्तित्व बाळगतअसतं ? आपल्यालाच आपण अद्याप ओळखलेले नाही.
भीती ही शारीरिक असते की मानसिक ? माझ्या असे लक्षात आलेय, की इतरांच्यादृष्टीने अत्यंत क्षुल्लक वाटणाऱ्या काही प्रसंगी मी शारीरिक आणि मानसिक दोन्हीदृष्टींनी अगदी अळुमाळू होऊन भेदरून लागते आणि जिथे सर्वसामान्यांचेधेर्य खचते तिथे मी अगदी सहजतेने वावरू शकते. उदाहरणच द्यायचे झाले तरअगदी जवळच्या व्यक्तीचादेखील आजार, अगर मृत्यू, अपघात, ऑपरेशन, वेडा,राजकीय लढयातील दंडुकेशाही किंवा गोळीबार, आग, युध्द, असल्या गोष्टींचे अगरनेसर्गिक आपत्तींचे मला कधीच भय वाटलेले नाही. पण दारू पिऊन झिंगलेला माणूस,चोरी, मारामारी, दंगे, अगदी चित्रपटातले बॉक्सिंग किंवा कुस्तीचे दृश्य, असल्या गोष्टीमी पाहू शकत नाही. मला कसेतरीच व्हायला लागते. मळमळायला लागले, थरथरायलालागते, आपल्याला भोवळ येईलसे वाटू लागते. मी क्राइम-स्टोरीज वाचू शकते, म्हणजेवाचताना ती दृश्ये डोळ्यांसमोर उभी राहतातच ना ? पण त्या वेळी असे काही होत नाही.प्रत्यक्षात मात्र अशा वेळी माझी मी राहतच नाही. म्हणजे निश्चित काय ?मला वाटते, माझ्यातले जिवाला अतिशय घाबरणारे, दुबळे, नेसर्गिक अस्तित्वअशा वेळी जागृत होऊन माझ्या संस्कारित अस्तित्वावर मात करते. म्हणजेच मलावाटते माणसाला दोन पिंड असावेत. एक आई-बाप आणि पूर्वज यांच्यापासूनलाभलेला आणि पुढे आपल्या वंशजांचे आपण पूर्वजच होणार या अर्थाने आपल्यास्वतःच्या आयुष्यातल्या नव्या अनुभवाने थोडा बदलेला असा संस्कारित पिंड; आणिदुसरा आदिमायेकडून (इथे मूळ शब्द `आदिमाया' नसून `आदिमाय' असा असायलाहवा ) लाभलेला, कोणतीही संस्कार करून घ्यायला राजी नसलेला मुळ पिंड. ---वाटले तरअसे म्हणून या, की भूगोलावर आधारलेले जिवंत शरीर म्हणजे हा मूळ पिंड आणि
------------------------------------------------------------------------------------------------

पान नं. 32

इतिहासावर आधारलेले मन हा संकरित पिंड. म्हणजे मग हे द्वेत झाले. आजचेवेद्यकशास्त्र हे शरीर आणि मन यांचे अद्वेत मानण्याकडे झुकत असताना हाद्वेतविचार योग्य आहे का ? अचूक आहे का ? मलाही शंका आहे, पण त्याबरोबरच हा विचारही आहेच.

आता वय उताराला लागलंय. स्वतःच्या प्रकृतीची मी कधीच काळजी केलेलीनाही. तेव्हा मला काय वाटतं याची काळजी न करता आता प्रकृतीने मला इंगादाखवायचं ठरवलं तर मला तक्रार करण्याचा अधिकार नाही. आपल्याला शेवटचाआजार कधी येईल आणि कोणत्या स्वरूपाचा येईल हे जरी अनिश्चित असलं आणिआपल्या हाती नसलं तरी त्या वेळी नातेवाईक आणि मित्रमंडळी यांचं आपल्याशी जेवर्तन राहील ते बरंचसं आपलं आयुष्यभर त्यांच्याशी जे वर्तन राहिलं त्यावरचअवलंबून असणार.त्यामुळे या बाबतीत कुणाकडूनही कोणतीही अपेक्षा ठेवण्याचामला अधिकार नाही. मी मला वाटले तसेच वागत आले, इतरांना काय वाटेल याचाविचार कधीच केला नाही. म्हणजे मी माझ्यासाठीच जगले, इतरांसाठी नाही. मग मीमरताना इतरांनी स्वतःच्या आयुष्यातला काही वेळ आणि काही शक्ती माझ्यासाठी कांखर्च करावी ?

म्हणजे मग हा प्रश्न सोडवायचा एकमेव उपाय म्हणजे आत्महत्या का ?

स्वतःच्या विचारानेच जगणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तींनी खरं तर एकटं राहावं,एकटं जगावं, एकटं मरावं. हा विचार आला की मला न चुकता फक्त माझ्या आजीची आठवण येते. तिचा- माझा सहवास माझ्या लहानपणी घडला तेवढाच. पण आम्हां दोघींचाएकमेकींवर इतका जीव होती, की आयुष्यातला अत्यंत सुखाचा काळ कुठला या प्रश्नाला,लहानपणी धामापूरला होते तो, किंवा धामापूरच्या आजीच्या सहवासात गेला तो, इतकेचउत्तर मी देऊ शकेन. या आजीचे मला दिसलेले रूप फार सुखद आहे आणि तिच्यापूर्वायुष्याची वाडवडिलांकडून कानावर आलेली कहाणी विलक्षण आहे.

तसे आम्हां दोघींचे रक्ताचे नात नव्हते. ती माझी सावत्र आजी. आम्ही ठाकूरधामापूरचे. माझे पणजोबा खूप श्रीमंतही होते आणि मोठे व्युत्पन्नही होते. त्यांच्याघोडयाच्या नाला म्हणे चांदीच्या असत. त्या काळातल्या श्रीमंत जहागीरदारांना साजेसेते रूबाबात राहिले असणार, आपल्या लहरीप्रमाणे मनमाना कारभार केला असणार.त्या मोठया कुटुंबात आणि गावात त्यांचा दरारा फारच होता. धामापूर हे मालवणपासून बारा मेलांवर आहे. मालवणहून नेहरूपाराला नदीपाशी येणारा रस्ता धामापूरला जातो.

--------------------------------------------

Monday, January 22, 2007

मुबंईने व्यापक दॄष्टी दिली -- पु.ल.

मुबंईने व्यापक दॄष्टी दिली माझा जन्म मुंबईत गावदेवीतल्या एका चाळीत झालेला असला तरी मी वाढलो पार्ल्यासारख्या मुंबईच्या उपनगरात. ह्या उपनगरी मुंबईने मला खुप काही दिले. मुख्यतः चाळीत दुर्लक्ष असलेली मोकळी हवा दिली. खेळायला मोकळी शेते दिली. पावसाळ्यात तिथे काकड्या पडवळ दोडक्यांचे मळे फुलायचे. गिरगावातच राहिलो असतो तर बैलांनी ओढलेले नांगर, बैलगाडी वर लादलेल्या काकड्यांच्या राशी पहायला मिळाल्या नसत्या. ट्रॅमवाली मुंबई आणि आमची उपनगरी मुंबई यात खुप फरक होता. आमच्या मुंबईवर ग्रामीण शिक्का होता. पावसाळ्यात पार्ल्यातल्या विहिरी तुडुंब भरायच्या आणि पारध्यांच्या, चित्र्यांच्या विहिरीवर पोहणाऱ्या पोरांचा दंगा सुरु व्हायचा. मुटका मारुन पाणी उडवून काठावरच्या पोरांना भिजविणे हा अत्यंत आवडता खेळ होता. हे सुख मुंबईच्या मुलांना नव्हतं. त्यांना चौपाटी होती, पण आम्हाला जुहूचा लांबलचक किनारा होता. स्टंपा, ब्याटी वगैरे गोष्टी परवडण्या सारख्या नव्हत्या. त्यामुळे खो खो, हुतुतू (याची त्याकाळी कबड्डी झाली नव्हती), आट्यापाट्या, विटीदांडू अशा बिनपैशाच्या खेळावर भर होता. हे देशी संस्कार घेऊन वाढत गेलेल्या मुलांपैकी आम्ही होतो. हाफपँट, बाहेर लोंबकळणारा शर्ट ही आम्हा सगळ्यांची वेशभूषा होती. इस्त्रीचे कपडे ही अनावश्यक गोष्ट वाटत होती. त्या मानाने मुंबईची पोरे फ्याशनेबल कोटबीट घालायची. त्यांच्या पोशाखाचा हेवा वाटत नव्हता असे नाही. पण स्वदेशीपणाचा अभिमान होता.

 महात्मा गांधींच्या सत्याग्रहाच्या चळवळीचे विलेपार्ले हे मुख्य केंद्र होते. तिथे सत्याग्रहांची छावणी होती. आज त्याच जागेवर बिस्किट फॅक्टरी आहे.माझ्या विद्यार्थिदशेतला बहुतेक काळ हा मुंबईतच गेला. त्यावेळी सार्वजनिक क्षेत्रातल्या दिग्गजांची भाषणे ऐकण्याचे भाग्य लाभले. माझे जीवन समृद्ध करणाऱ्या त्या मुंबईचे आताचे रुप पाहतांना मनाला यातना होतात. ज्या मुंबईत जगन्नाथ शंकरशेट, फिरोज शहा मेहता, डॉ. भाउ दाजी लाड यांच्या सारख्या लोकाग्राणींनी जनजीवन सुखी व्हावं म्हणून आपलं आयुष्य वेचलं, त्या जुन्या मुंबईचा ताबा आता अफाट गर्दीने आणि सर्वच क्षेत्रांतल्या गुंडांनी घ्यावा हा दैवदुर्विलास म्हणावा लागेल.

अपूर्ण 
- महाराष्ट्र टाइम्स, 
रविवार २३ जुलै १९९३

Thursday, January 11, 2007

गोष्टीरूपं पु.लं.

दादरच्या एका हायस्कूलमध्ये एक शिक्षिका क्लासरुममध्ये पुस्तक वाचण्यात गढून गेल्या होत्या सकाळचे साडेनऊ वाजत आले होते. शाळ सुरू व्हायला अजुन बराच वेळ होता. नेहमीप्रमाणे घरकाम आटोपुन त्या लगेच शाळेत येत व क्लासरुममध्ये निवातंवाचन करीत. शाळा साडेदहाला सुरु होत असल्यामुळे त्यानां वाचन करायला भरपुर वेळ मिळत असे. 

नेहमी प्रमाणे आज वाचन करीत असताना त्याचां कानावर पावलांचा आवाज एकु आला. मान थोडी वर करीत त्यांनी पाहीले तर नीलम त्याचांकडे येत होती. 

"नमस्ते मॅडम! येऊ का?" नीलमने भीतभीतच विचारले 

"ये, ये, बसना आज तू लवकर कशी आलीस? शाळा भरायला अजून बराच वेळ आहे बघ." 

"होनं बाई मी तुम्हाला मुद्दामच भेटायला आले. थोडं सागांयचं आहे. सांगू?" 

"अगं सांग की! माझी परवानगी कशाला पाहीजे?" 

"मॅडम तो दहावीतला भगत आहेनं तो माझ्या ओळखीचा आहे. तो मराठी शिकविणाऱ्या देशपांडे सरांबद्दल खुप सांगत होता. नाटक साहित्य चित्रपटांची त्यानां बरीच माहिती आहे असे म्हणत होता. सर रोज पार्ल्याहुन शाळेत येतात. देशपांडे सर 'ग्रेट' आहेत असेही भगतने सांगीतले. आणी....आणी..." इथे नीलम घोटाळली. 

"आणी काय? ते लेखनही करतात" मॅडमनी निलमच वाक्य पूर्ण केलं. 

"पण मॅडम हे तुम्हाला कसं माहीत? ते स्टोरी लिहीतात व पेपरवाले छापतात सुद्धा" 

"हो, हो, आमच्या टिचर्सरुम मध्ये त्यांनी आम्हाला "अभिरुची" मासीकांचे अकं दाखविले होते. त्यात त्यांचे लेख छापून आले होते. मॅडम म्हणाल्या. 

"बर मॅडम मी येते हं. "असं म्हणुन नीलम लगबगीने निघून गेली. 

देशपांडे संराबद्दल बोलतांना सुनीता ठाकुर मॅडमचा चेहरा खुलला होता हे चाणाक्ष नीलमच्या नजरेतुन सुटले नाही. दिवस सरत होते. विद्यार्थी वर्गात देशपांडे सरांची लोकप्रियता वाढत चालली होती. शाळेचे गॅदरीगं जवळ येत चालले होते. देशपांडे संरानी मुलांचे "बेबंदशाही" नाटक बसविलं होत. सरांच्या कुशल दिग्दर्शनामुळे नाटक यशस्वी झाले. नाटकात काम करणाऱ्या कलाकरांसाठी चहा पाण्याच्या कार्यकम झाला. त्यावेळी सर्व टीचर्सही उपस्थित होते. त्यावेळी देशपांडे सरांनी पेटीवाचन केले. राजा बढेंच 'माझिया माहेरा जा" व काही निवडक भावगीते म्हणुन दाखविली. 

पार्ल्याचा मुख्य रस्त्यावरुन एक गोरीगोमटी तरुणी हातात एक करंडी घेऊन आत गल्लीत वळली. जिथे गल्ली संपते, तिथेच असलेल्या एका बंगलीत शिरली. रेल्वे स्टेशनवरुन पायी येताना करंडी हातात धरुन जड झाल्यामुळे ती दुस-या हातात घेतली व तिनं बेल वाजवली. "आई नमस्कार, मी सुनीता!", आई म्हणाली. "मी नागपुरला गेले होते, कालच आले.. सरांसाठी संत्री आणली आहेत. हातातील करंडी खाली ठेवत ती म्हणाली. "बाळ भाई झोपला आहे. रविवारच उशीरा जेवण झालं एवढ्यात उठेलच. तू बसनं. चहा टाकते हं," आई. "नको, मी संत्री ठेवुन जाते! " "अगं बस की, चहा होईपर्यंत तो उठेलच," असं म्हणुन आई चहा करायला आत गेल्या. थोड्या वेळाने सर उठेलच . हॉलमध्ये बसलेल्या सुनीताला हसतच विचारले "केव्हा आलीस ? मी काल स्टेशनवर गेलो होतो. पण गाडी बरीच लेट असल्यास समजले, म्हणुन थांबलो नाही, संत्री आणलेली दिसताहेत.!" "हो मी आता निघते." " थांब, आईने चहा टाकला आहे. चहा घेऊनच जा!" चहा घेतल्यावर आईंना सांगुन सुनीता निघाली.  गोऱ्यापान, लोभस व्यक्तिमत्त्वाच्या सुनीताकडे बघतच राहील्या. भाई दादरच्या ओरीएंट शाळेत नव्यानेच ओळख झालेल्या सुनीता बाबत अधुनमधुन आईला सांगत असत तरी प्रत्यक्षांत त्या दोघींनी एकमेकींना पाहीले नव्हते. आज नागपुरी संत्र्यांनी भरलेल्या करंडीच्या निमित्ताने ती संधी दोघींना मिळाली. सुनीताला पाहिल्यावर आईला मनोमन आनंद झाला. भाईंची पहीली पत्नी लग्नानंतर थोड्या दिवसातच अचानक अल्पशा आजाराने देवाघरी गेल्यामुळे त्यांच्यावर दुसरेपणाचा शिक्का बसला. या दुःखद घटनेनंतर भाईनी पुन्हा लग्न करण्याचा विचार केला नव्हता असे नाही. परंतु परीस्थीती अनुकुल नव्हती. भाई पितृछ्त्राला अकाली पारखे झाल्यामुळे कुटुबांची जवाबदारी त्यांच्यावरच होती. 

भाई भावगीत गायनाच्या मैफली, नाटक कंपनीतील नोकरी, गाण्याच्या शिकवण्या करुन अर्थाजन करीत. कधीकधी संगीत शिक्षकाचे पैसेही बुडायचे. या कारणामुळे कुटंबातील उपवर मुली भाईकडे संगीत, नाटक, साहीत्य हे अनमोल गुण असून सुद्धा त्यांना जन्माचा जोडीदार म्हणून कशा स्वीकार करणार होत्या? आता सुनीताला पाहील्यावर भाई तिची पत्नी म्हणुन निवड करणार अस आईंना वाटल खरं. गॅदरीगं, नाटक अशा शाळेच्या उपक्रमांमुळे देशपांडे सर व सुनीता ठाकुर एकमेकांच्या जवळ आले. 'सत्तेच्या गुलाम' या नाटकात सरांनी कान्होबाचे पात्र रंगविले तर सुनीताबाई क्षमेच्या भुमीकेत रंगमंच्यावर आल्या. त्यावेळी सुनीतामॅडम माटुंगा भागात राहत होत्या. अनेकदा देशपांडे सर त्यानां भेटण्यासाठी जात असत. कधीकधी ती दोघेजण हॉटेलमध्ये चहा घेत. बिलाचे पैसे मॅडम देत असत. मॅडम स्वताःसाठी खाणावळीतुन जेवणाचा डबा घरी घेऊन येत तेव्हा अनेकदा सर त्यांना सोबत करीत. वाटेत दोघांच्या गप्पागोष्टी चालत. अशा रितीने दोघांच्या परिचय वाढत गेला व ते  दोघेजण एकमेकांच्या प्रेमात पडली. 

मॅडममध्ये एक आर्कषक असा लोभसपणा व नेटकेपणा होता. त्याच्यांत प्रचंड उत्साह, खुप काम करण्याची जिद्ध होती. या शिवाय मॅडममधील काटकसरीपणाचा गुण सरांनी हेरला होता. प्रियाराधनच्या दिड- दोन वर्षाच्या काळात मॅडमनी स्वतःबद्दल अनेक रोचक किस्से सरांना सांगितले. त्यांतील १९४२ च्या स्वांतत्र्य चळवळीत पुढाकार घेऊन संगिनी रोखलेल्या गोऱ्या शिपायांना मॅडमनी मोठ्या धर्याने कसे तोंड दिले याचे वर्णन ऐकून सर प्रभावीत झाले होते. तसेच पुस्तकातल्या कृती वाचून बॉंम्बच्या साहाय्याने ब्रिटीश सरकारचे शस्त्रागार उडवुन देण्याच्या धाडसी कृत्यात त्यांचा सहभाग होता, थोडक्यात देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपण सर्वस्व ओतुन काही करत आहोत यात सर्व जण धन्यता मानीत, यामुळे सरांना वाटले की, सुनीता आपली जन्माची जोडीदार होण्यास पूर्ण लायक आहे. तसं झालं तर आपली पती पत्नीची जोडी कुणीही हेवा करावा इतकी भाग्यवान व आर्दश होईल. भाई लग्न करुया असे म्हणू लागले. मॅडमची वृत्ती जरा वेगळीच असल्यामुळे सुरवातीला लग्नाच्या बंधन स्विकाराव्या त्या राजी नव्हत्या. परंतु भाईचा विसर करणे त्यांना जमेना. "माझ्यासाठी हो म्हण", या भाईच्या मोजक्या लाघवी शब्दांनी मॅडम वर जादू केली व त्यांनी लग्नाला होकार दिला. "बेटा, तुझी निवड चुकणार नाही याची मला खात्री आहे. GO AHED!,"आप्पा सुनीताला म्हणाले. मॅडमने त्यांना भाईबाबत कळवल्यानंतर मुलीला भेटण्यासाठी ते रत्नागिरीहून मुबंईला आले. "आप्पा मी तुम्हाला भाईबद्दल काय काय सागूं! आणि किती म्हणून सागूं? आणि सुरुवात तरी कुठुन करु? त्याला लेखन, गायन, नाटक, वक्तृत्व, विनोद अशा विविध कला अवगत आहेत. पार्ल्याला राहतो व तेथुनच शाळेत येतो." "त्यानां संगीताची आवड कशी निर्माण झाली?" आप्पांनी विचारले."भाई गाणे रेडिओवर घरीच शिकला. रेडिओ सतत ऐकुन त्यांचे गाणे तयार झाले. त्यांच्या आजीचा गळा फार गोड होता. हा गाण्याचा वारसा आजीकडुन त्यांच्या मातोश्रींकडे व पुढे त्यांच्या कडे आला. आईचा गळा मोकळा व सुरेल होता. घरी रोज संध्याकाळी गाण्याची मैफल व्हायची. भाई पेटीवर व धाकटा भाऊ तबल्यावर. भाई पेटी वाजवण्यात तरबेज आहे. त्यांच्या आईला संगीताची आवड असल्यामुळे त्यांनी भाईना पेटीच्या क्लासला पाठवले. वयाच्या दहाव्या वर्षी पार्ल्याच्या टिळक मंदीरात बालगंधर्वासमोर त्याने 'सत्य वदने वचनाला' हे नाट्यगीत वाजवुन शाबासकी मिळवली. त्यांच्या वडलांबरोबर नाटकाला जायचा. आम्ही दोघे अधुन मधुन चहासाठी होटेल मध्ये जायचो त्यावेळी तो बोटांनी टेबलावर सरगम करायचा मला आठवतं. " मी सुराच्या साथीन वाढलो" असं तो म्हणला होता. त्याच्या नकला करण्याकडेही ओढा होता. त्यावेळी तो जोगेश्वरीच्या सरस्वती बाग नावाच्या सोसायटीत राहत होता. आई बरोबर देवळात किर्तन ऎकुन आल्यावर दुस-या दिवशी तो त्याची नक्कल करीत असे. थोडक्यात घरातील वडीलधा-या मंडीळीनी त्याला कलोपासनेत प्रोत्साहन दिले." 

"काय ग, देशपांडे कुठले राहाणार? त्यांचा गाव कुठला?" आप्पांनी सुनीताचे बोलणे मध्येच खंडीत करत विचारले. " देशपांडे तसे बेळगावचे असले तरी त्यांचे मातुल घराणे कारवारचे. त्यांच्या आजोबांचे नाव दुभाषी पण लेखणासाठी त्यांनी 'त्रूग्वेदी' हे टोपण नाव वधारण केले. त्यांच्याकडे वक्तृत्वाची कला व विनोद बुद्धी होती. अनेक भाषांचे ते जाणकार होते. ते रविंदनाथांचे वाडःमय आवडीने वाचत. 'गीतांजली' चे मराठी रुपांतर 'अभंग गीतांजली' या नावाने लिहीले व प्रकाशीत केले. त्यांनी मला आजीच्या अनेक गमती जमती, विनोद किस्से सांगीतले. घरी मासे आणले की, माश्यांना 'मोरोपंत' व खेकडे-कुर्ल्यांना 'घाटकोपर अशी अचूक टोपण नावे तिने ठेवली होती. भाईनाज़ विनोदाचा वारसा त्यांच्या मातुल घराण्यातुन मिळाला. त्यांच्या समाधीटपणा आहे. स्टेज फियर नाही, हे मला आम्ही शाळेचे नाटक बसवले त्यावेळी समजले. भाई बालपणी आजोबांना किर्तनात पेटीवर व पद्यात साथ करायचा. त्याने आजोबांप्रमाणेच लेखनासाठी 'पुरूषराज अलुरपांडे' हे टोपण नाव घेतले. आप्प मी तुम्हाला सांगते एका बाबतीत त्याने माझ्यावर कुरघोडी केली. "ती कशी?" आप्पांनी विचारले. "अहो, साहीत्य क्षेत्रातला त्याचा अधीक आवडता प्रकार म्हणजे कविता! "सुनीता. "अस्सं, तुला सुद्धा काव्याच वेड आहेच की१" आप्पा. "अहो, त्याचे आवडते कवि म्हणजे कुसुमाग्रज, गोविदंग्रज, बी.तांबे 'गर्जा जयजयकार' ने त्याला अगदी झपाटले होते." "वा! वा!, तो काळ तसाच होता बेटा. पण आता पुरे, जावईबापू हरहुन्नरी आहेत. पोरी तु नशीबवान आहेस." आप्पा शांतपणे म्हणाले. " आप्पा, तुमचा दोन दिवसाचा मुक्काम आहे नं, उद्या रविवार आहे. शाळा नाही. भाई संध्याकाळी येणार आहेत तुम्हाला भेटायला. त्याची भेट घेऊन जा." 

भाई सुनिताच्या वडिलांना म्हणजे आप्पांना भेटायला चालले होते. ते दादर रेल्वे लाईनला समांतर असलेल्या तुळशीपाईप रोडने पुढे निघाले. सुमारे एक मॆल अंतर तोडल्यावर सुनिताच्या घरा जवळ पोचले. आपल्याला एका निष्णात फोजदारी वकीलाच्या प्रश्नांच्या सरबत्तीला तोंड द्यायचे आहे याची मनाशी गाठ बांधुनच सर्व धेर्य एकवटुन त्यांनी घराचे जिने चढायला सुरुवात केली. घरात प्रवेश करताच आप्पांनी त्यांचे स्वागत केले व आपल्या जवळ बसविले. फोजदारी वकीलाची कठोर प्रतिमा त्यांच्या अंतःचकुक्षुसमोर उभी होती. परन्तु प्रत्यक्षात आप्पांचे सोम्य दर्शन झाल्यावर ते चित्र धुसर होत गेले. ते तसे खुपच प्रेमळ आहेत, व आपल्या लग्नाला त्यांचा विरोध नाही असे एकदा सुनीताने भाईना सांगीतले होते. लग्न नोंदणी पद्धतीने करायलाही त्यांचा विरोध नव्हता, आप्पांनी भाईच्या पाठीवर हात फिरवीत गप्पा सुरु केल्या. काही वेळ बसुन भाई निघाले. घरी आल्यावर ते आईला म्हणाले," आई, मी सुनीताशी लग्न करण्याचे ठरवीले आहे. लग्न तिच्या माहेरी रत्नागिरीला नोंदणी पद्धतीने करणार आहोत. १२ जुन १९४६ ही तारीख ठरली आहे. तिचे वकील आप्पा फोजदारी वकील आहेत रत्नागिरीत." नोंदणी पद्धतीच्या लग्नाला भाईचा विरोध होता असेही नव्ह्ते. परंतु आपल्या भारतीय जीवन प्रणालीत विवाह हा करार नसुन एक पवित्र संस्कार मानला गेला आहे. काही अनीष्ठ वृत्तीने कुटुंब संस्थेचा पाया उद्ध्वस्त होऊ नये म्हणुन वॆदिक संस्कृतीने संस्काराचे बधंन निर्माण केले आहे. त्यांत पती-पत्नीचे हे पवित्र नाते अंतर्भूत असुन त्याचे पावित्र अबाधित राखणे हे पवीत्र नाते अंतर्भूत पद्धतीच्या विवाहातही तशीच जवाबदारी दोघांवर असते. नोंदणी पद्ध्तीने विवाह झाल्यावर हे नाते भाई व सुनीता या दांपत्यांने आयुष्यभर अभंग टिकवले का ते आता आपण पुढील पानातून पाहणार आहोत. 

लग्न झाल्यावर काही महिन्यांनी सुनीताबाई व पु.ल. रत्नागिरीला गेले. त्यावेळी त्यांच्या बरोबर भाईच्या मातोश्री होत्या. विहिणबाईची ओळख करुन घ्यायला आलेल्या कांही महिलांपॆकी एक म्हणाली," तुम्हाला छान सुनबाई मिळाली!" यावर भाईच्या मातोश्री लक्ष्मीबाई लगेच म्हणाल्या," आमचा भाई काय वाईट आहे? लहानणी किती गोरा होता. सॆदेव प्रसन्न व टवटवीत असासचा मोठा झाला तरी प्रसन्नता कायम आहे." असे मोजकेच शब्द त्यांच्या मुखातुन बाहेर पडले, तरी त्यापेक्षा अधिक कितीतरी त्यांना बोलुन दाखवायचे होते. पण ते त्यांनी मनातच ठेवले. भाईच्या वडिलांनी आपल्या अखेरचा काळात जे काही सांगीतले होते ते त्यांना आठवले, "तुझ्यापोटी रत्न आले आहे. तू त्याचे मोठे मान सन्मान बघशील!" एखाद्या व्यक्तीत एकच गुण असला तरी त्याला ब-यापॆकी प्रसिद्धी मिळते. पु.ल. च्या बाबतीत सांगायच झाल्यास त्यांना अनेक गुण एकाच वेळी लाभले होते. साहित्य, संगीत, नाटक, विनोद व वक्तृत्व अशा अनेक क्षेत्रात लाभलेल्या गुणांमुळे त्यांचे स्थान जनमानसात खुप उचांवले व त्यांना जीवनात अनेक उच्चामान सन्मान मिळाले. लहानपणासुन पु.ल. चा नकला करण्याकडेही ओढा होता. जोगेश्वरीतील 'सरस्वती बाग' या सोसायटीत राहत असतांना ते आई बरोबर कीर्तनास जायचे व घरी आल्यावर कीर्तन करायचे. वक्तृत्वात तर प्राथमिक शाळेपासुन भाग घ्यायचे. सोसायटीच्या गणेश उस्तावात नकलाकार कामात त्यांच्या नकला पाहील्यावर त्यांच्यात नकलांची आवड निर्माण झाली. नरसोबाच्या वाडीला सकाळी पु.ल. ची मुंज झाली. संध्याकाळी भटजींनी मुजं कशी केली याची पु.ल. नी नक्कल करुन दाखवीली. ते पाहुन भटजीची हसता हसता पुरेवाट झाली. 

पु.ल. चा पिंड तसा खोडकरपणा, लहानपणापासुन ते खोडकर होते. घरी कुणी आल्यावर त्यांच्या आईंना वाटायच की, ते काही तरी खोडकरपणा करणार म्हणुन ती माउली त्याना डोळ्यांनी दटावत बाहेर घालवायची. एकदा जाहीर कार्यक्रमांत पु.ल. नी न.ची. केळकरांनी प्रश्नोत्तरांच्या वेळी राजकारणावर प्रश्न विचारला असता. ते म्हणाले. " बाळ, मुलांना हा विषय कळणार नाही. तेव्हा तुला समजेल असा प्रश्न विचार!" या पु.ल. नी विचारलं. "हल्ली पुण्यात अंजीराचा भाव काय आहे?" कॉलेज मध्ये शिकत असतांना पु.ल. चा खोडकरपणा कायम होता. पु.ल. चा एक साधा भोळा मित्र कॉलेजच्या हॉस्टेल मध्ये राहात होता. तो मित्र कॉलेज मधील एका मुलीवर एकतर्फी प्रेम करीत होता. पु.ल. व त्यांची मित्रमंडळी त्या मुली वरुन त्याची फिरकी घेत असत. एक दिवस ते सारेजण त्याच्या खोलीला कुलुप असतांना गेले व शेजारच्या मित्राकडुन हलवाहलव केली. फराळाचा डबा फस्त केला. नंतर बाहेर जाण्याच्या आधी पु.ल. नी त्या मुलीच्या नावे एक चिठ्ठी लिहुन ठेवली. त्यात त्या मित्राला दुपारी दोन वाजता लक्ष्मीरोड वरील गोखले हॉलच्या बसस्टॉपवर भेटायला बोलावले. त्या बसस्टॉपसमोर पु.ल. तळमजल्यावर राहत असल्यामुळे, तो भाबडा दोन तीन वेळा बस स्टॉपवर चकरा मारून गेला हा सारा प्रकार पु.ल. खोलीतून मिष्कील पणे पाहात होते. एकदा पु.ल. च्या खोडकरपणाचा प्रसाद श्री जयवंत दळवी व काही लेखकांना मिळाला.त्याच असं झालं एका संध्याकाळी गेले होते. कामाची बोलणी संपल्यावर पु.ल. च्या वरळी येथील निवासस्थनी गेले होते. कामाची बोलणी संपल्याव्र पु.ल. नी विचारलं, "मंडळी काही घेणार का?" दळवींनी होकार देताच, पु.ल. नी सुनीता बाईना फ्रेंच वाईन आणायला सांगीतले. थोड्या वेळाने सुनीताबाईंनी ट्रेमधून लाल रंगाच्या वाईनने भरलेले काचेचे नाजूक चषक उचलल्यावर पु.ल. म्हणाले, "एकदम पिऊ नका. सिप करा!" प्रत्येकाने चषक ओठाला लावले, पण फ्रेंच वाईन त्यांच्या जिभेवर न आल्याने एकाने चषक तोंडात उपडा केला. दळवींनी आत जीभ फिरवून आस्वाद घेण्याचा खटाटोप केला. पण सारे व्यर्थ, हे सारे पाहुन पु.ल. मोठमोठ्याने हासत राहिले. या संदर्भात दळवी लिहितात, " ते चषक नाट्य प्रयोगासाठी पु.ल. नी पॅरीसहून आणले होते. त्याच्या कडा पोकळ होत्या व त्यात वाईनसारखे दिसणारे लाल द्रव भरले होते. प्रत्यक्षात चषक रिकामेच असल्याने ते ओठाला लावल्यावर वाईन तोंडात येत आहे असे भासायचे ! असा हासवणूकीचा प्रयत्न खरं तर व्रात्य, खोडकर मुलांनी करायचा!" 

थोडक्यात पु.ल. चा खोडकरपणा लहान मुलाला शोभणारा परंतु निष्पाप होता. पु.ल. मराठीतले अव्वल विनोदकार होते. त्यांना विनोदी लेखक व विनोदी वक्ता म्हणुन अमाप लोकप्रियता लाभली. परंतु ते भाबडे होते व शेवटपर्यंत भाबडेच राहीले. त्याचं असं झाल. पु.लं. वरळीला श्री. चांदोरकर याच्या मालकीच्या 'आर्शीवाद' या नावाच्या बिल्डींगमध्ये राहात होते. त्या वेळची ही घटना आहे. चांदोरकरांचा लाडूचा धंदा होता. त्यांत त्यांनी भरपूर कमाई केली. पण ते व्यवहारात सरळ मार्गाने जाणारे नव्हते . आपला भाडेकरु एक नावाजलेला लेखक, कलाकार आहे या महत्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष करुन त्यानी पु.लं. ना राहात्या जागेचा ताबा मिळवण्यासाठी त्रास देण्यास सुरुवात केली. याचं कारण काय तर पु.लं. नी ए मुबंई सोडुन पुण्याला वास्तव्य केलं असं त्याचं म्हणणं होतं. चे घनीष्ट मित्र सरन्यायाधीश श्री. यशवंत चंद्र्चुड्यांनी त्या जागेचा ताबा न देण्याचा सल्ला दिला. पण पु.लं. नी तो मानला नाही. याचे कारण त्यांना कोर्ट कचे-या नको होत्या. पु.लं. नी जागेचा हव्यास धरला नाही व आपणहून ती घरमालकांच्या ताब्यात दिली. थोडक्यात घरमालक महाराष्ट्राच्या या लाडक्या व्यक्तीमत्वाकडे अनेक वर्ष आपला भाडेकरु एकाच दृष्टिने पाहात होते. पु.लं. चा शेजार म्हणजे एक पर्वणी असायची, पुण्याची 'रुपाली' मधील त्यांचा निवास्थानाच्या शेजारी विनय हर्डीकर काही वर्षे राहात होते. त्यांच्याकडे येणारा प्रत्येक जण प्रथम पु.लं. च्या घराकडे पाहुनच आत येत असे . पु.लं. चा एक शेजारी म्हणुन हर्डीकरांना खूप अभिमान होता. 

आयुष्याच्या या सफरीत माणसाला अनेक जण भेटत असतात. तसे पु.लं. ना सुद्धा भेटले. त्यांच्या संचार अनेक क्षेत्रात असल्यामुळे त्यांचे गणगोतही मोठे होते. त्यांना अनेक मातब्बर मंडळींचा स्नेह लाभण्याचे भाग्य लाभले होते. मॆत्री करायची व ती टिकवुन ठेवण्याचे कसब पु.लं. ना लाभले होते. पु.लं. चा वसंतरावांची देशपांडे याची मॆत्री पुण्याला अलका टॉकीज जवळ असलेल्या गाण्याच्या एका क्लास मध्ये झाली. १९४०-४१ साला मधील ही गोष्ट आहे. त्यावेळी पु,लं. फर्गसन कॉलेज मध्ये शिकत असतांना भावगीताचे कार्यक्रम करीत. अशाच एका मॆफलीत त्यांचा गायन क्लासचे मालक सारंगिये महमद हुसेन खॉ साहेबांशी परीचय झाला. खॉसाहेब अतिथ्यशील असल्यामुळे कॉलेजमधील गाणे, बजावण्याची हेस असलेली तरुण मंडळी त्यांच्या क्लास मध्ये एकत्र येत. तिथे अशाच एका संध्याकाळी पु.लं. कुठलेतरी एक पद म्हणत असतांना, नागपुरी रुंद काठाचे धोतर, डोक्याला टोपी, भेदक डोळ्याचा व शेदुंर लावलेला एक विशीतल्या जवानाच्या एंट्री मुळे त्यांचे लक्ष वेधुन घेतले, "आई ये वसंतराव म्हणाले, "असे म्हणत खॉ साहेबांनी त्यांचे स्वागत केले. पु.लं. चे गाणे थांबले यावर वसंतराव म्हणाले, "भय्या, बंद क्यो हो गये? चलने दो." कांही मिनीटे गाणे एकल्यावर वसंतराव यांची पहीली वहीली भेट. वसंतराव तबल्याची साथ करीत. पुण्यात या जोडीने अनेक कार्यक्रम केले. पुढे वसंतराव गवयी व पु.लं. पेटीवर असा बदल झाला. एकदा एका शहरात वसंतराव देशपांड्यांचा गायनाचा कार्यक्रम होता. पु.लं. काही कारणामुळे त्या शहरात एकटेच गेले. स्टेशनवर हजर असलेल्या स्वयंसेवकांना पु.लं. नी स्वतःची ओळख करुन दिली, "मी वसंतराव देशपांड्याचा पेटीवाला. अमुक अमुक गावावरुन आलो आहे." कार्यक्रमाला पु.लं. येणार आहेत हे त्या स्वयंसेवकांना माहीत नव्हते. त्यांच्या कानांवर पु.लं. ची कीर्ती आली होती. तरी पु.लं. ना या आधी पाहीले नव्हते. त्यामुळे पेटी वादकाचे यशोचीत स्वागत झाले नाही. पु.लं. कार्यक्रमाच्या स्थळी पोहचले. कार्यक्रमात पु.ल. पेटीची साथ करणार आहेत अशी घोषणा झाल्यावर ही सारी मंडळी खजील झाली. पु.लं. च्या चेह-यावर कशी गंमत केली असा खोडकर भाव होता. 

वसंतराव फक्त गायकच होते असे नव्हते तर ते एक उत्तम नटही होते. पु.लं. चे 'तुका म्हणे आता' या नाटकात त्यांनी संतूतेली या पात्राची भूमिका समर्थपणे साकारली होती. एवढेच नव्हे तर संगीताची जवाबदारी उचलुन अभंगांना व पदांना सुंदर चाली दिल्या होत्या. पु.लं. च्या 'दुधभात' या चित्रपटात वसंतरावांनी खानादानी गवयाचं काम उत्तम रितीने वठवले होते. पु.लं. नी संगीत दिलेल्या सर्व चित्रपटात वसंतराव गायले होते. एकदा नागपुरच्या मॆफिलीत रात्रभर गाणे झाले. दुस-या दिवशी बाबुराव देशमुखांकडे चहा घेऊन अकराच्या गाडीने मुंबईला जायचे होते. गाडीला अवकाश असल्यामूळे संपली. सूराच्या दुनियेतील या वेड्यापीर कलावंतांना गाडीचे भान राहिले नव्हते. पु.लं. च्या पुणे येथील बि-हाडी वसंतराव देशपांडे, मधू गोळवळकर, भीमसेन जोशी, मधू ठाणेकर, अशी गुणी मंडळी जमत व अधुन मधुन जात. सतत दोन शनिवारी गाण्याच्या अप्रतीम दोन मॆफली झाल्या. त्या अविस्मरणीय झाल्या असा उल्लेख सुनीताबाईच्या 'आहे मनोहर तरी' या पुस्तकात आढळतो. त्याचं असं झालं एका शनीवारी भीमसेन जोशी उत्तम गाउन गेल्यावर दुस-या शनिवारी वसंतराव गाणार होते. शाहू मोडकांनाही आमंत्रण होते. त्यांना वसंतरावांचे गाणे ऎकायचे होते. पण वेळ कमी असल्यामुळे तासभर बसुन जाईन. अशी बोली मोडकांनी केली होती. परंतु वसंतरावांच्या अप्रतिम गाण्याचे त्यांना मॆफल संपेपर्यत खिळवून ठेवले. एवढेच नव्हे तर गाण्यानंतर झालेल्या संगीताच्या गप्पागोष्टीतही ते सामील झाले. पहाट झाल्यावर सर्वजण घरी गेले. परंतु सकाळीच भीमसेन जोशी पु.लं. च्या घरी परत आले. त्यांचं कारण अस होते. की, आदल्या रात्रीच्या गाण्यात वसंतरावांनी त्यांच्यांवर कुरघोडी केल्यामुळे ते बॆचेन झाले होते. आल्यावर ते पु.लं. ना म्हणाले. "आता हे माझे गाणे ऎका! " दिवाणखाण्यातील बॆठक तशीच होती. तिथेच असलेले तंबोरे भीमसेन जोशी लावू लागले. मॆफलीला रसिक श्रोते हवे होते. तसेच साथीलाही तबलजी. तेव्हा या कामगीरीवर पु.लं. सायकलस्वार होऊन लगेच निघाले. मंडळी जमल्यावर सकाळी आठच्या सुमारास दुर्मीळ स्पर्धेतून सुरु झालेली ती मॆफील भीमसेन जोशींनी तीन-साडेतीन तास अप्रतीम रंगवली. थोडक्यात असे म्हणता येईल की, कलांवत कितीही मोठा असो अगर छोटा असो तो दुस-या कलांवतावर बाजी मारण्याची संधी शोघत असतो. हे पु.लं. च्या घरी झालेल्या मॆफिलीने दाखवून दिले. 

पु.लं. कॉलेज मध्ये शिकत असतांना नाटकातून कामे करीत असत. त्यावेळी त्यांचा कॉलेजचा संबंध हजेरी पुरताच असायचा. सकाळी नऊ पासून संध्याकाळपर्यंत नाटकाच्या व नंतर रात्री नऊ-दहा वाजे पर्यंत गाण्याच्या तालमी असा चिंतामणराव कोल्हटकरांच्या ' ललितकलाकुंज' या नाटक कंपनीतला भरगच्च कार्यक्रम असायचा . कंपनीच्या बाहेरगावच्या दॆ-याबरोबर पु.लं. ही पाठीवर बि-हाड घेऊन निघायचे . एकदा कंपनीचा मुक्काम कोल्हापूरला होता. त्यावेळचा प्रसंग आहे. राजाराम कॉलेजचे विद्यार्थी गॅदरींग साठी आचार्य अत्रे कृत 'लग्नाची बेडी' हे नाटक रंगपटाच्या एका हॉल मध्ये बसवत होते. हॉलच्या बाजूला पु.लं. चा अभ्यास चालू असतांना त्यांनी हॉल मध्ये चुकूनही डॊकावले नाही. तालमी संपल्यावर पु.लं. आत गेले व कलाकारांना उद्देशून म्हणाले , "अवधुतचा रोल कोणी केला? त्याचं नाव काय?" हे ऎकताच एक पोरसवदा तरूण पुढे आला व म्हणाला,"मी, मीच, मी राम". त्याच्या कडे पाहून पु.लं. म्हणाले," एवढाच एक समजून बोलतोय!" अशी ही पु.लं. देशपांडे व राम गबाले यांची पहिली वहीली भेट. पुढे या दोघांचा चित्रपट क्षेत्रात एकत्र केलेल्या कामातून निकटचा मित्रत्वाचा संबंध आला. सुरुवातीच्या काळात गबालेंनी दिग्दर्शित केलेल्या 'वंदे मातरम' या चित्रपटात पु.लं. व सुनीताबाईंनी नायक नायिकेच्या भुमीका केल्या. १९४२ च्या स्वातंत्र संग्रामावर आधारलेला हा चित्रपट १९४८ साली पु.लं., सुनीताबाई, सुधीर फडके, ग.दि.माडगूळकर. अशा निष्ठावान मंडळींनी अल्पावधीतच पुर्ण केला. 'वदं मातरम' चे वास्तव चित्रण, अत्यंत तन्मयतेने केलेला अभिनय, आकर्षक संवाद, ग.दि. मांची चॆतन्य पूर्ण स्फूर्ती गीते या मूळे हा चित्रपट आवर्जून पाहिला. वंदे मातरम नंतर पु.लं. च्या रूपेरी कारर्किदी च्या यशाच्या आलेख उंचावत गेला. चंदेरी दुनियातील कलाकाराबद्दल अनेकांच्या काही वेगळ्या असतात. 'वंदे मातरम' प्रदर्शित होण्याआधी नुकताच पु.लं. च्या विवाह झाला होता. रत्नागिरीला आप्पांना म्हणजे सुनीताबाईच्या वडिलांना कुणीतरी हटकले "अहो आप्पा, तुमचे जावई व मुलगी सिनेमात काम करणार म्हणे, तिथं चांगली माणसं नसतात," परंतू आप्पांनी त्यांना समर्पक उत्तर दिले. 

एकदा पु.लं. रत्नागिरीले गेले असतांना तेथे असतांना तेथे एका परिचीताने आपली स्वतःची तर्जनी नाकपुडीला लावीत सिनेमातील नट्यांबद्दल एक कुत्सिक प्रश्न विचारला. त्या प्रश्नाला पु.लं. नी उत्तर दिले नाही. पु.लं. नी अनेक क्षेत्रात संचार केला. त्यांचे वॆयक्तीत चरित्र अतिशय स्वच्छ होते. त्यांचा समाजातील सर्व थरांची सर्पक होता. चित्रपटसुष्टीच्या आपल्या कारर्किदीत पु.लं. ना वसंत पवार हा एक कलंदर भेटला. पवार हा एक कुशल सतार वादक, नृत्य दिग्दर्शक , संगीत दिग्दर्शक, चतुर सभांषण करणारा होता. पु.लं. च्या स्वभावात उत्स्फूर्तपणे भारुन जाण्याचा एक गुण होता. साहजिकच पु.लं. च्या सहका-यांत वसंत पवार सामील झाले. एकदा स्टुडीओत पवार हंसाबाईना नाचाची तालीम देत होते. त्या तालमी पाहातांना पु.लं. ची काय प्रतिक्रिया झाली, ती आपण जाणून घेऊ या. या संदर्भात पु.लं. लिहीतात, "त्या नाचाच्या तालमी पाहातांना मराठी तमाशाच्या नाचाचे खानदान मला पाहायाला मिळाले. हिडीसपणाचा तेथे स्पर्श नव्हता. उत्कटता व उत्तानता यांची सीमा रेषा पवारला कळली होती. पु.लं. च्या संगीत दिग्दर्शनाच्या सुरुवातीच्या काळातला हा प्रसंग आहे. नवयुग स्टुडिओत एका गाण्याची चाली ऎकण्याची इच्छा व्यक्त केली. पु.लं. नी त्यां ऎकवल्या. निर्वीकार चेह-याने त्या चाली ऎकल्यावर वितरक म्हणाले, "अहो, नौशाद सारख्या चाली करा. मला तुमच्या चाली पसंत नाहीत. "त्या वितरकाचे पारडे जड असल्यामुळे पु.लं. ना स्वतःची बाजू मांडण्यास वावच नव्हता, पु.लं. खिन्न होऊन सिगारेट ओढत बसले असतांना त्यांच्या जवळ वसंत पवार आले व म्हणाले, "पी.ल. साहेभ, मी सांगतो, चाल मस्त आहे. पण या सिने इंडस्ट्रीत वितरकांची पैशाची थैली बोलते." पु.लं. नी चित्रपटांसाठी अनेक प्रभावी कथा पटकथा लिहील्या. अशा कथांतून जिवनातल्या संवेदनांच्या, अनुभूतींचा, अनुभव प्रेक्षकांना मिळत असे. त्यांचे संवाद अतिसय नैसर्गिक व बोली भाषेत असायचे पु.लं. चे देवबाप्पा व दुधभात हे कौटुंबीक जिव्हाळ्याचे चित्रपट करूण रसाने ओतप्रत भरलेले होते. चित्रपटाच्या कथानकाचे महत्व विषद करतांना एकदा पु.लं. म्हणाले, " उत्तम चित्रपटांचे यश हे प्रतिभासंपन्न लेखकांनी लिहीलेल्या कथा-कादंब-यावर आधारलेले असते. आपल्या भारतीय भाषेत अशा अनेक उत्कृष्ट कथा आहेत की, ज्यांच्यावर उत्तम चित्रपट तयार करता येतील." पु.लं. नी मोठी माणसं, देव पावला, नवरा बायको, मानाचे पान, आपलं घर, दूध भात, देव बाप्पा, गुळाच्या गणपती अशा अनेक चित्रपटांना संगीत दिले. 'दूधभात' या चित्रपटाची पटकथा पु.लं. व राम गबालेंनी बेळगावला रावसाहेबांच्या थिएटरच्या एका सुंदर खोलीत तयार केली. मूळ कथा पु.लं. ची होती. पु.लं. बेळगावला १९५० साली मराठीची प्राध्यापकी करीत होते. त्यावेळी कृष्णराव हरिहर उर्फ रावसाहेब या रसिक व भावनाप्रधान व्यक्तीबरोबर त्यांची मैत्री झाली. पटकथेचे काम चालू असतांना रावसाहेब खोलीत अधून मधून डोकावून जात. "ष्टोरी सुरु केली काय ? अहो, आज नको. कारण अमावस्या आहे नं, तेंव्हा उद्या सुरु करा, दोस्तांचे पिक्चर चालले पाहीजे, " असे सांगायचे. पटकथेत एका क्षेत्राच्या गांवातील देवळातल्या भटजींची मुलगी जी नायिका असते. तीला 'सतार वादक दाखवा' अशा एक ना अनेक सुधारणा रावसाहेब सुचवायचे व त्यांच्या दृष्टीने त्या बेस्ट असायच्या. भटजीबुवांच्या भुमिकेत वसंतराव देशपांडे होते. त्यांच्या सोबत सुलोचना, उषा किरण , चित्तरंजन कोल्हटकर, विवेक अशा नामंवत कलाकारांनी आपल्या भूमीका प्रभावीपणे केल्या. 

पु.लं. चे संवाद अतिशय प्रभावी होते. वसंतराव देशपांड्यांनी गायलेल्या तोंडी ऎकून पु.लं. नी चित्रपटातून रागदारी संगीताचा यशस्वीपणे उपयोग केला असे दिसून आले. 'दूधभात' चित्रपट अतिशय लोकप्रिय झाला. 'दूधभात' चे मराठी भाषेपुरतेच हक्क निर्मात्यांना देण्यात आले होते. याचा अर्थ असा होता. की, अन्य भाषेत हा चित्रपट निर्माण करायचा असेल तर मुळलेखकाची परवानगी घेणे अत्यावश्यक होते. 'दूधभात' ची कथा, पटकथा, संवाद, पु.लं. चे असल्यामुळे त्यांची रीतसर परवानगी घेणे जरुरीचे होते. परंतु मराठीच्या निर्मात्यांनी परस्पर विकले. वर्तमान पत्राकातून ही बातमी पु.लं. व सुनीताबाईंनी वाचली तेव्हा त्यांनी संबंधीत व्यक्तींना नोटीस पाठवली. ही सारी कहाणी सुनीताबाईंनी 'आहे मनोहर तरी' या पुस्तकात विस्ताराने कथन केली आहे. 'आहे मनोहर तरी' चा पहिला श्रोता वाचक पु.लं. होते. लेखन पुरे झाल्यावर ते वाचून पु.लं. नी काही सुचना केल्या. असे विजया राजाध्यक्ष यांनी 'पडद्यामागचे पी.ल.' या लेखात लिहीले आहे. तसेच विजयाबाई व श्रीनिवास कुलकर्णी यांनी आस्थेने हस्तालिखीत वाचले व काही सूचना केल्या. गोविंदराव तळवळकर यांनी 'महाराष्ट्र टाईम्स' च्या १९८८ च्या दिवाळी अकांत सूनीताबाईच्यां मातोश्री व आप्पांबद्दल काही मजकूर प्रकाशित केला. त्यानंतर पुस्तकाचे लेखन यथावकाश पुर्ण झाले. एखाद्या पुस्तकाची निर्मीती होत असतानां लेखकाने कुठला मजकूर लेखनात समाविष्ट करावा, कूठला गाळावा या बद्दल अनेकजण त्याला सल्ला देतात. परंतु सर्वात महत्वाची बाब म्हणजे लिहीण्याच्या संकल्प त्याने तडीस न्यावयास पाहीजे. 'आहे मनोहर तरी' या पुस्तकाचे लेखन चालु असतांनाचा 'मौज प्रकाशगृहाकचे' श्री पु. भागवत यांनी ते पुन्हा पुन्हा वाचुन लेखिकेला प्रोत्साहन दिले. त्यामुळे पुस्तकाचे लेखन पुर्णत्वास गेले. सुप्रसिद्ध कथालेखक जी. ए. कुलकर्णी यांनी लेखिकेत पुस्तक लिहीण्याबाबत आत्मविश्वास निर्माण केला म्हणुन हे पुस्तक साकार झाले. आत्मचरित्र लेखनासाठी वेगवेगळ्या त-हेच्या पद्धती आहेत. त्यातील एक अशी की, स्वतःच्या जन्म तारखेपासुन प्रारंभ करुन आपण जे जीवन जगलो हे सारं क्रमाक्रमाने कथन करायचे. ही पद्धत तशी आकर्षक नसल्यामुळे सुनीताबाईंना एक आगळ्यावेगळ्या पद्धतीचा अवलंब केला आहे. एखादी कल्पना व्यक्ती किंवा विषय डोळ्यासमोर ठेऊन तिच्या भोवती स्वतःचे विचार आठवणींची माला गूंफायची अशी नाविण्यापुर्ण पद्धती त्यांनी अंगिकारली आहे. 

आपल्या प्रदीर्घ जिवनाच्या यशस्वी वाटचालीत लेखिकेने पु.लं. च्या सोबतीने जीवनाचे विवीध रंग पाहिले. स्वतःच्या व पु.लं. च्या विवीध क्षेत्रातील अनुभव व आठवणी लेखिकेने 'आहे मनोहर तरी' या आत्मकथेत ग्रथित केला आहे. व्यक्ती जेव्हां आपल्या आयूष्याच्या अखेरच्या टप्प्यावर येते, त्यावेळी तिच्या मनात जुन्या आठवणी येतात. त्यातील काही गोड तर काही कडु असतात. जीवनातील सूखदायक आठवणी त्या प्रत्यक्षात पुन्हा जगता येणे अशक्य असते. कल्पनासुष्ट्रीत ते जीवन पुन्हा जगण्याची संधी मिळून पुनःप्रत्ययाची आनंद घेता येतो. म्हणून आत्मचरीत्राची निर्मिती होते. लेखक आत्मकथेत स्वतःच्या आयूष्याबद्दल लिहीत असतो त्यामुळे त्याला 'मी' पणाचा स्पर्श होणे स्वभावीकच आहे. त्याने असे केले नाही तर त्याला आत्मचरीत्र लिहीणे शक्य होणार नाही. जीवनात अनेक व्यक्तींशी त्याचा वेगवेगळ्या परिस्थितीत संबंध आलेला असतो. म्हणून ज्या आठवणी कडु किंवा विस्मृतीत जमा झाल्या असतील त्या लेखनात समाविष्ट करणे शक्य होईल काय? तसेच स्वतःच्या खाजगी जीवनातील घटनांचे चित्रण कागदावर लिहून ते वाचकांसमोर आणणे कितपत योग्य ठरेल? ही आत्मचरीत्राची पथ्ये लेखकांनी पाळली नाहीत तर त्याच्या हातून अनेक परिचीत दुखावले जाण्याची शक्यता निर्माण होईल. पु.लं. नी आयुष्यात आत्मचरीत्र लिहायचे नाही असा संकल्प सोडला होता. असा उल्लेख 'अपूर्वाई' या गाजलेल्या पुस्तकात आढळतो. मात्र त्यांच्या विपूल लेखनातून पु.लं. चा आत्मचरीत्रात्मक भाग न्यात होतो. पु.लं. कोणाच्याही चुका दाखवित नसत. 'माणसांनी गुणां बद्दल बोलावे, उणेपणा काढु नये' असे त्यांचे मत होते. थोडक्यात दुस-याच्या मोठे पणा बद्दल दाद देण्याची दिलदार वृत्ती पु.,लं. मध्ये होती. स्वतःच्या व्यक्तीमत्वातील हा पैलू त्यांनी गानसंम्रानी केसरबाई केरकर यांच्यावर लिहीलेल्या 'एक तेजःपुंज स्वराचा अस्त' या लेखात दाखवला आहे. प्रसंग असा होता की, पु.लं. चा एक गूणी व संगीत प्रेमी शिल्पकार बंगाली मित्र शर्वरी यांनी केसरबाईंना दहा-बारा दिवस पोज साठी बसवून त्यांचा अर्थपुतळा प्लास्टरमध्ये तयार केला. या कामा साठी पु.लं. नी केसराबाईंना राजी केले. पुतळा तयार होईपर्यंत पु.लं. नी ती लगेच मान्य केली. याचे कारण त्यांना केसरबाईंच्या गायनाच्या टेप्स, मैफलीतील अनेक अविस्मरणीय आठवणी ऎकवण्याची संधी मिळणार होते. एके दिवशी झालेल्या गप्पागोष्टित पु.लं. नी केसरबाईंना एक प्रश्न विचारला, "संगीतीची विद्या आत्मसाद करायला गुरू आवश्यक आहे का? टेपरेकॉर्डवरुन तालीम घेता येणार नाही का?" पु.लं. च्या या प्रश्नाला उत्तर देतांना केसरबाई ठामपणे म्हणाल्या. "नाही. टेपरेकॉर्डवरुन चीज ऎकल्यावर ती गळ्यावर बराबर बसली नाही हे टेप सांगू शकणार नाही. स्वतःचे गाणे स्वतःच बसून ऎकतात, तुझ्यासारखे त्यांचे दोस्त कधी त्यांना त्यांच्या चुका सांगणार नाही. कशाला उगाच वाईटपणा घ्या? काय बरोबर आहे नं!" 

एकदा मुलाखतीतून पु.लं. नी सांगीतले, "सर्व कलांत संगीत हे मला अधिक प्रिय आहे. संगीताच्या क्षेत्रात मला अंग आहे आसे समजले त्याच बरोबर याच क्षेत्रात आपण कूठपर्यंत मजल मारू शकू याबद्दल मी साशंक होतो. बालगंर्धव, मल्लिकार्जुन मन्सूर, कुमार गंधर्व, अशा दिगज्जापंर्यत पोहचण्यापर्यंत आपल्या पंखात ताकद नाही हे मला समजले." आपल्या संगीताच्या प्रेमाबद्दल पु.लं. ना एकदा सांगीतलं होतं की आमच्या घरी बहिणीची मंगळागौर जागवतात. त्या रात्रीच्या कल्लोळाने मला आनंद दिला. आकाशवाणीतले आपले एक सहकारी श्री. मनोहर नगरकर यांना पाठवलेल्या पत्रात पु.लं. नी लिहीले, "मी मनापासून जर कशावर प्रेम केले तर ते संगीतावर त्या कलेने मात्र माझ्यावर अनुग्रह केला नाही. फक्त नादाला लावून ठेवले." पु.लं. नी सुर व लय यांच्यावर मनापासून प्रेम करतांना कुठल्याही घराण्याचा गंडा बांधला नाही. 'गणगोत' 'गुण गाईन आवडी' या गाजलेल्या लेख संग्रहात समाविष्ट केलेल्या अनेक लेखातून त्यांच्या संगीत प्रेमाचा अविष्कार जाणवतो. मुंबईतल्या गणपती उत्सवात सूरांच्या दुनियेमधील वेडेपिरांनी गिरगावातले रस्ते रात्रभर गजबजलेले असायचे. शनिवारी रात्री ब्राहण सभेत मास्तर कृष्णराव, आंबेवाडीतील मल्लिकार्जुन मन्सूर, चुनामेलन मध्ये हिराबाई बडोदकर, शाश्री हॉल मध्ये सवाई गंर्धव असे अनेक गाजलेले गवई आपली गायनकला पेश करीत. पु.लं. गाण्याच्या बैठकीला जाण्याच्या वयाचे झाल्यावर माधुक-यासारखे हिंडुन आपल्या कानाच्या झोळीत ते सुर गोळा करीत. गानहिरा हिराबाईचे गाणे ऎकायला चुनामलेन गायक प्रेमींची खचाखच भरलेली असायची. त्यातून काही मित्रमंडळींकडून बातमी यायची की शाश्री हॉलमध्ये सवाई गंधर्वाचा आवाज लागलाय पण त्यावेळी हिराबाईचा वरचा षडज लागलेला असायचा. म्हणुन कुणीही मैफल सोडुन जायचा राजी नसायचे. निरनिराळ्या वाड्यात गाजलेले गवई आपली कला सादर करीत. तेव्हा रसिकांना निवड करायला भरपूर वाव असायचा. यामुळे पु.लं. सारख्या अनेक गायक प्रेमी रसीकांची ओढाताण व्हायची. कुणा कुणाच्या गायनाला जायचे ? अशी धावाधाव पहाटेपर्यंत चालायची. नंतर जायफळाच्या कॉफी ऎवजी इराण्याच्या 'पावणा' बनमस्का खाऊनच गाण्याची सांगता होत असे. 

पु.लं. चे चरीत्र म्हणजे संगीत, लेखन, वक्तृत्व, अभिनय अशा विवीध क्षेत्रांत नैपुण्य मिळवण्यासाठी केलेले तपश्र्चर्येचा इतीहास आहे. आपल्याला उत्तम साध्य झाले पाहीजे, न कंटाळता उत्तम आत्मसात केले पाहिजे अशी त्यांची अलौकिक जिद्द होती. तिथे अल्प संतोषाला वावच नव्हता. कुठलेही क्षेत्र असो, संगीत असो, लेखन असो, अभिनय असो, दिग्दर्शन असो, रेडिओवरचे भाषण असो, एक पात्री किंवा बहुरुपी प्रयोग असोत पु.लं. तिथे जिव तोडुन कामे करीत. इतीहासाने नोंद केलेल्या थोर व्यक्तींच्या जिवनातले असे अनेक प्रसंग पु.लं. च्या डोळ्यासमोर होते. अभिनयाबाबत पु.लं. नी चिंतामणराव कोल्हटकरांच्या तालमीबद्दल पु.लं. नी सांगीतले, "आम्ही तालमीला अभे राहिलो म्हणजे आमच्या कंबरा ढिल्या व्हायच्या पण चिंतामणराव शकत नसत." ललित-कला कुंज या नाटक संस्थेत पु.लं. नी व्यावसायिक नट व नाटककार म्हणुन आपल्या ध्येय साधनेच्या पूर्ततेसाठी उग्र तपस्या व धडपड केली. रंगभूमाचा साज-सजावट, नाटकाच्या तालमी, चिंतामणरावांच्या भूमीका एखाद्या निष्टावंत विद्यार्थ्या प्रमाणे पु.लं. नी डोळे उघडे ठेऊन पाहिल्या. गान संम्राग्नी केसरबाऊ केरकर यांनी कठोर साधना करून भारताच्या अभिजात संगीताच्या जगात आपले व गुरूंचे नाव कसे अजरामर केले या संदर्भात पु.लं. नी एका लेखात केसरबाईंचे उदगार उद्धुत केले आहेत. पु.लं. लिहीतात, "डोळ्यात तेल घालून शागीर्दाचे गाणे पाहाणारा, चुकले की कान पीळणारा गुरू लागतो, अरे, आठ-आठ दिवस तान घासली तरी अल्लादियाखाँसाहेबाच्या तॊंडावरती सुरुकुती हलायची नाही, वाटायचे, देवा नको हे गाणे," एव्हा प्रत्येक क्षेत्रातील अलौकिक गुरू आपली विद्या आपल्यांनतर टिकून राहावी अशिच्ग इच्छा मनात बाळगुन असतो. गायन क्षेत्राबाबत सांगायचे झाल्यास न्यानी गूरू आणि रियाझचे घंटे किती झाले ते न मोजणारा शिष्य असेच गाण्याचे शिक्षण व्हायला पाहिजे, केसरबाईंनी गायन साधनेसाठी अतिशय चिकाटेने अतोनात मेहनत केली. त्यांच्या आवाज रुंद, मोकळा, जोशपूर्ण व मेहनतीने लवचीक झाला होता. आपले गुरू अल्लदियाखाँ साहेबांच्या तालमीत अविरत मेहनत करून त्यांनी हा आवाज कमावलेला होता. 

पु.लं. पधंरा वर्षाचे असतांना पार्ल्याला त्यांनी दहा वर्षाच्या एका बालकलांवताचे गाणे ऎकले होते. त्या बालगवयाबद्दल पु.लं. ना अतोनात उत्कंठा होती. याचे कारण काही दिवसांपूर्वी मुंबईच्या जिना हॉलमध्ये त्याने गाजवलेल्या मैफलीची रसभरीत वर्णने पु.लं. नी वर्तमानपत्रातुन वाचली होती. अनेक श्रोते मैफलीतून बाहेर पडतांना म्हणत होते, "हा दैवी चमत्कारच आहे," या बालकलाकाराचे नाव होते 'कुमारगंधर्व'. गतजन्मीची पुण्याई, दैवी देणगी अशा गुळगुळीत झालेल्या शे-यांनी कुमार गंधर्वाचा गौरव करणे हा त्यांच्यावर अन्याय करण्यासारखा आहे असा उल्लेख पु.लं. नी 'मंगल दिन आज' या कुमार गंधर्वावर त्यांच्या पंन्नासाव्या वाढ दिवसानिमीत्त लिहीलेल्या एका लेखात केला आहे . मौज प्रकाशनाच्या 'गुण गाईन आवडी' या पुस्तकात हा लेख समाविष्ट केला आहे. कुमार गंधर्वाचे गाणे त्यांच्या बरोबर जन्माला आले तरी त्यांना असामान्य जिद्द व डोळस परीश्रमांच्या साहाय्याने त्या गाण्याचे संवर्धन व सांगोपण केले व अभिजात संगिताच्या क्षेत्रात मानाचे स्थान मिळवले. एकदा पु.लं. व कुमार गंधर्व एकत्र बसले असतांना रेडिओवरुन कुणीतरी छायानटातील चिज गात असतांना त्या दोघांना त्या पेशकारी बद्दल नापंसती व्यक्ती केली. पु.लं. म्हणाले, "काय सुदंर चीज आहे पण हाल चालवले आहेत." यावर कुमार म्हणाले, "भाई, नुसते जरीची भारी कपडे असून चालत नाहीत. ते अगांला यावे लागतात. जरीची भारी टोपी डोक्यावर बसली नाही तर विचीत्र दिसते. परंतु स्वस्त गांधी टोपी नीट बसली तर शोभुन दिसते," कांही कांही गवयी गाण्याच्या आधी आपण कूठला राग गाणार हे सांगत नसत. कुमार गंधर्व मात्र तसं करीत नसत. कधी कधी असे व्हायचे मैफलीत रंगत वाढाली की, या रागांचा नाव अमूक अमूक आहे असे कुमार जाहीर करायचे. उलटपक्षी केसरबाई केरकर मैफलीत रागांची नांवे सांगत नसत. या संदर्भात पु.लं. लिहीतात, "एकदा राग सुरू झाल्यावर त्याचे नांव कळले नाही तरी त्याच्या आस्वादात काही फरक पडत नाही. मात्र रागाचे चलन ध्यानात आल्यावर त्या लाईनीवरुन गवई कसा चालतो ते मी पाहातो." पु.लं. ना कधी कधी रागाचे नांव समजले नाही तर ते आपली शंका गायक नाव गुप्त ठेवत असत, याचे कारण केसरबाई गाण्याच्या आधी रागाचे नाव गुप्त ठेवत असत, याचे कारण केसरबाईंच्या चरीत्रात वाचकांना आढळेल. हे चरीत्र केसरबाईंचे बंधु बाबूराव केरकर यांनी लिहीलीले आहे. एकदा मैफलीत एका जाणकाराने त्यांना विचारले, "आता या गायलेल्या रागाचे नाव काय?" केसरबाई मिस्कील पणे हसतं म्हणाल्या. "आपले संधेतईल नांव काय?" यावर ते गृहस्थ स्वस्थ बसले. त्या उत्तरात मेख अशी होती की, मुंज बंधनाच्या वेळी गुरू बटुच्या कानात मंत्र सांगतात, त्याचे संधेतील नाव सांगतात, ते नाव गुप्त ठेवायचे असते. गुरु मंत्र व गुरुने सांगीतलेले नाव जसे सांगायचे नसते तसेच गुरुने ठेवलेले नांव व संगीत मंत्र उघड करायचा नस्तो. ही गुरुची आग्न्या. केसरबाई गणपती उत्स्वात गायला नाहीय. त्यांच्या समोर मायक्रोफोन कधीच नसायचा. त्या कधी नाट्यगीत गायच्या नाहीत. 

एकदा पु.लं. सहज म्हणाले, "माई, तुमच्या कालात नाट्यगीते खूप लोकप्रीय होती तरी तुम्ही कधी गायला नाहीत," यावर केसरबाई उत्तरल्या, "नाटकातली पदे नाटकात म्हणायची, त्याला ख्याल कशाला करायला हवेत?" एकदा ब्राम्हण सभेत बालगंधर्वाच्या गाण्याला केसरबाई उपस्थित होत्या. त्यावेळी बालगंधर्व भजनेच गात, भजन संपल्यावर एक श्रोता म्हणाला , " नारायणरावांनी एखादे नाट्यगईत गात त्यावेळी ते 'लुग्ड्यात' असत. ते आता धोतरात आहेय. सर्व नाट्यगीते रागरागिण्यांवर बसविलेले असतात. तरी त्यांना त्या राग रागिण्यातून म्हणावयास सांगा!" केसरबाईंच्या 'ते लुगड्यात असत' या शब्दप्रयोगात स्वतः बालगंधर्व व सर्व श्रोते खळखळुन हसले. केसर्बाई चतुर संभाषणकार होत्या. त्यांचे संभाषण विनोदगर्भ असे. त्यांच्या बोलण्यात थट्टा मस्करीही असायची. त्या मैफलीच्या स्थानी डौलदारपणा येत असत. त्यांच्या नुसत्या येण्यानेच दबदबा निर्माण होत असे. मैफलीत कुणी फर्माईश केलेली त्यांना रुचत नसे. पु.लं. ना अनेक वेळा त्यांचे गाणे ऎकण्याचा योग लाभला. पु.लं. बारा तेरा वर्षाचे असतांना केसरबाईचे गाणी त्यांनी प्रथम मुंबईत एका लग्न समारंभात ऎकले. पुढे त्यांच्या परिचयाचा योग आला व पाहुणचारही लाभला. गप्पागोष्टीत त्या एखादे वेळी पु.लं. ना भरपुर तंबाखू घालून पान जमवून देताल व असेही म्हणतील, "अरे, पान खा ना ! जीभ भाजली तर भाजू दे आणि गॅलरीतून पिचकारी मारतांना खाली कोणाच्या डोक्यावर पडणार नाही तेवढं मात्र बघहं!" इति पु.लं. पु.लं. च्या लेखनात गवयांच्या वैशिष्ठांचे, लकबीचे अचुक चित्रण वाचकांना आढळते, गवयाच्या घरी तंबाखु, पान, सुपारी, सुवासिक तंबाखुचे विवीध प्रकार, मोहीनी, पानाचे तबक असा सरंजाम असायला पाहीजे. चीज घोळवणारा गवई पान घोळवुन थुंकतो त्या साठी पिकदाणी आवश्यकच असते. कुमार गंधर्वाना स्वतःची पिकदाणी इतर कुणी स्वच्छ करुन ठेवणे रुचत नसे. कुमार नेहमीच कामात व्यस्त राहत. कुठे तंबो-याच्या तारा स्वच्छ करुन ठेव, घरातील मोरी साफ कर, सुपारी कतरुन बाटलीत ठेव अशी एक ना अनेक कामे ते करीत. मुंबई सारख्या मोठ्या शहरात राहणा-या पु.लं. च्या घरी पानाचे तबक, पिकदाणी व तंबोरे जुळवणारी मंडळी पाहून राम भैय्या दाते उदगारले, "तुम्ही बॉम्बेचे आहात हे खरंनाही वाटत, भैया!" पु.लं. नी लिहीलेल्या 'पानवाला' हा लेख 'खोगीरभरती' या संग्रहात समाविष्ट केलेला आहे. पानवाल्याला मसालापान खाऊन गिळणा-या गि-हाईअकापेक्षा पान थुंकणारे गि-हाईकच आवडते, असे पु.लं. नी लिहीलेले आहे. पु.लं. ना त्यांचा नेहमीचा पानवाला ब-याच वर्षानी भेटला. तो. पु.लं. ना म्हणाला, "साब आपके बाल सफेद हुवे मगर आपका गाना............". 

एक काळ असा होता की गणपती उस्तवात बायकांचे गाणे होत नसे. तसेच बायकांनी गाण्याला जाणे हे निषिद्ध मानले जाई. परंतु लोकमान्य टिळकांच्या गणेशोत्स्वाने सामाजिक जीवनाला एक अनोखे वळण दिले. एकदा हिराबाई बडोदेकर पुण्यातल्या रास्तापेठेतच्या गणेशोत्सवात प्रचंड जनसमुदायासमोर गायल्या. त्यांनी १९२५ साली आर्यभूषण थेटरमध्ये तिकीट लावून अभिजात संगिताचा पहिला जलसा केला. यामुळे बायकांच्या गायनाला पोरीबाळींच्या समवेत उजळ माथ्याने जाणे शक्य झाले. हिराबाईंनी केलेली ही सामाजिक क्रांती मोलाची आहे असे पु.लं. नी लिहेलेले आहे. मणिक वर्मा म्हणाल्या. "हिरबाईंच्या प्रयत्नांमुळे गाणा-या स्रियांना प्रतिष्ठा मिळाली." पु.लं. चे चिंतामणराव कोल्हटकरांच्या 'ललित कला कुंज' या नाट्यसंस्थेंतर्फे रंगभूमीवर पदार्पण झाले. पु.लं. लहानपासुनच नाटकात कामे करीत त्यामूळे व्यावसायिक रंगभूमीवर त्यांच्या हालचाली मंचभयापासून मुक्त होत्या. तेथे सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा पर्यंत नाटकांच्या तालमी, व रात्री नऊ पर्यंत गाण्याच्या तालमी असा पु.लं. चा भरगच्च दिनक्रम होता. ते ललिताकलाकुंजात जवळ जवळ एक वर्ष चिंतामणराव कोल्हाटकरांच्या सहवासात होते. त्यांनी आपल्या ध्येह साधनेच्या पुर्ततेसाठी उग्र तपस्या व धडपड केली. त्यांनी नाटकांच्या तालमी व चिंतामण रावांच्या भुमिका एखाद्या निष्ठावंत विद्यार्थ्याप्रमाणे डोळे उघडे ठेऊन पाहिल्या व शंका समाधानासाठी वितंडवाद न घालता चर्चा केल्या. चिंतामणरावांसारख्या एका कसबी नटाच्या व श्रेष्ठ दिग्दर्श्काच्या कडक शिस्तीत राहून पु.लं. नी नाट्यकलेत प्राविण्या मिळवले. पुढे नाट्यव्यवसायचे आसन डळमळीत झाले. १९४५ साली 'ललितकलाकुंज' ही नाट्यसंस्था बंद पडली. फक्त मो.ग. रांगणेकरांची 'नाट्य्निकेतन' ही नाट्यसंस्था आपले पाय रोवून उभी होती. अशा परिस्थितीत पु.ल. 'ललिताकुजांत' आत्मसात केलेली अनमोल नाट्यकलेची शिदोरी घेवून रांगणेकरांच्या 'नाट्य-निकेतन' मध्ये डेरे दाखल झाले. तिथे त्यांना 'वहिनी' या नाटकातील लाडक्या भावोजीची भूमीका देण्यात आली. वहिनीची भूमिका ज्योत्स्ना भोळे करीत असत. तिथे अल्पावधीतच पु.ल. आपल्या मिस्कील व खॊडकर स्वभावामुळे सर्वांचे लाडले झाले. 

पु.लं. च्या नाट्यनिकेतनमधील प्रवेशामुळे कंपनीला एक हरहुन्नरी कुशल नट लाभला. एवढेच नव्हे तर ज्योत्स्ना भोळे यांना एक जिवलग मित्र मिळाला, व पु.लं. ना एक बालमैत्रिण मिळाली. ज्योत्स्नाबाई पु.लं. च्या पेक्षा वयाने चार-पाच वर्षानी जेष्ठ असल्यामुळे भावोजींची कान पकडण्याचा हक्क त्यांनी बजावला व पु.लं. नी ज्योत्स्नाबाईंना तो पकडूही दिला. नाट्यनिकेतन मधील पु.लं. चा तो प्रवेश क्षण 'भाग्याचा' होता. ज्योत्स्नाबाईंच्या साठी निमित्त पु.लं. नी 'माझी बालमैत्रीण' हा लेख लिहीला. त्याच सुमारास पु.लं. साहीत्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. त्यानिमित्त ज्योत्स्नाबाईंनी सुद्धा पु.लं. च्यावर लेख लिहिला. तो लेख वाचनात आल्यावर पु.लं. नी फोनवरून सांगितले, ज्योत्स्नाबाई, तुमचा लेख वाचून माझे डोळे भरून आले. मी तुमच्यावरही लेख लिहिला आहे. हे दोन्ही लेख वाचल्यावर अस वाटतं की आपण दोघांनी एकत्र बसून एकमेकांवर लेख लिहिलेत!" पु.लं. ची ही बालमैत्रिण त्यांच्याबद्दल लिहिते, माझ्याशी तो खुप लाडीगोडीने वागायचा. एक दिवस मी त्या हूड पोराला `ए~पी. एल' अशी हाक मारली. गंमत म्हणजे पुढे आयुष्यभर तशीच एकेरी राहिली. आपल्या लेखात पु.ल. लिहितात, "मी साठीला पोहचलो तरी माझं लहानपण जपण्याचे श्रेय माझी बालमैत्रीण ज्योत्स्ना भोळेचं आहे. एखादा चविष्ट पदार्थ केला तर माझ्यासाठी तो तीन-चार दिवस राखून ठेवणारी, माझ्यापेक्षा वयानं ती जेष्ठ आहे म्हणून मला `जादा गडबड करु नकोस' म्हणून दटावणारी, `वहिनी' नाटकातील गाणी मेहनत करुन नीट म्हण असं सुनावणारी आणि विशेष म्हणजे मला 'ए~ पी. एल' या नावाने लाडीगोडीने हाक मारणारी, जिच्या सान्निध्यात मला माझ्या मोठेपणाचा विसर पडतो अशी ही माझी बालमैत्रिण." पु.लं. चा नाट्यनिकेतन या नाट्यसंस्थेतील तो प्रवेश पाहून नियती उद्गारला." क्षण आला भाग्याचा!" १९८३ मध्ये पुणे आकाशवाणीवर पु.लं. नी ज्योत्स्नाबाईंची मुलाखत घेतली होती. मुलाखत घेणारा व देणारी व्यक्ती ही दोघेजण संगीतातील जाणकार असल्यामुळे मुलाखत श्रवणीय झाली. मुलाखतीत ज्योत्स्नाबाईंनी सांगीतलं ते असं-- मला ईश्वराने चांगला आवाज दिला. लहानपणापासून मी गाण्यात रंगून जात असे. साहजिकच माझे अभ्यासाकडे लक्ष लागत नसे. शाळेत बाई मला नेहमी रागावत असत. एक दिवस त्यांनी मला शाप दिला. "जा, जन्मभर गाण म्हणत बसं." शाळा बदल्यावर मी आंतरशालेय संगीत स्पर्धेत भाग घेतला व मला बक्षिसह निळाले. "मला बालगंधर्वाना जवळून पाहण्याची इच्छा होती. तसेच त्यांनी माझे गाणही ऎकावं असं मनोमन वाटत होतं. आमच्या शाळेत बालगंधर्वाच्या कुटुंबातील एक मुलगी होती. या बाबत मी तिला विचारलं. एक दिवस ती मला बालगंधर्वाच्या घरी घेऊन गेली. त्यांनी माझ गाणं ऎकलं व मला शाबासकी दिली. यावर पु.लं. म्हणाले, " ज्योत्स्नाबाई, लहानपणी मी पण बालगंधर्वाना पेटी वाजवून दाखवली होती व तुमच्यासारखी मलाही त्यांनी शाबासकी दिली." मुलाखतीत पु.लं. पुढे म्हणाले, "ज्योत्स्नाबाई, तुमच्या `कुलवधू' या नाटकाला प्रचंड यश मिळाले. 

एक दिवस असा आला होता की, धो धो पाऊस पडत असताना तिकीट विक्री चालू होती. आठ काऊंटर्स उघडले होते. मला आठवतं मी सुद्धा तिकीट विक्रीला बसलो होतो. `कुलवधू' च्या कांही प्रयोगात मी पण भूमिका केल्या होत्या." यावर ज्योत्स्नाबाई म्हणाल्या." `कुलवधू' मध्ये `भानुमती' ची भूमिका मी सतत पंचवीस वर्षे केली. माझ्या बरोबर `अविनाश' यांनी दहा वर्षे काम केले. कुलवधू चा पहिला प्रयोग ९-८-१९४२ रोजी ऑपेरा हाऊसला होता. परंतु शहरातील मिरवणूकींमुळे पहिला प्रयोग रद्द झाला. `आंधळ्याची शाळा' मध्ये माझ्या बरोबर केशवराव दाते यानी उत्तम काम केले." ज्योत्स्नाबाईंचे ५-८-२००१ रोजी वार्धक्याने निधन झाले. त्यांनतर पुणे आकाशवाणीने त्यांची सुकन्या वंदना यांची १९८३ साली घेतलेली मुलाखत पुन:प्रसारण केली. त्यांत ज्योत्स्नाबाईंनी आपल्या प्रदीर्घ संगीत कारकीर्दीतील काही रोचक आठवणी सांगीतल्या. एकदा ज्योत्स्नाबाई दिल्लीला गेल्या होत्या. काकासाहेब गाडगीळ यांच्या निवासस्थानी त्यांचे गाणे चालू असतांना तिथे एक तार आली. त्यात हैदराबाद संस्थान खालसा केले असा मजकूर होता. ती वाचून काकासाहेब आनंदाने उद्गारले."ज्योत्स्नाबाई, गाणे थांबवा व क्षण आला भाग्याचा हे गाणं म्हणा." "रंगभुमीवरील गाजलेल्या भुमिकांपैकी `आंधळ्याची शाळा' व `कुलवधू' या नाटकाचा उल्लेख करता येईल. `आंधळ्यांची शाळा' मधील `एकलेपणाची आग लागली हुद्या' हे माझं गाणं सुरू झाल्यापासून चरणाच्या अखेरपर्यंत बरोबर असलेल्या केशवराव दांतेचा तो असामान्य मूक अभिनय या सा-यांनी प्रेक्षक धुंद होऊन जात. विशेष म्हणजे हे गाणे चालू असतांना केशवराव भोळे सेटिंगमागे गुप्तपणे आपला छोटासा वाद्यावृंद घेऊन उभे असायचे." 

नाटक म्हणजे नेमके काय? नाटक हा एक साहित्य प्रकार असून या साहित्याला रंगमंचावर जिवंत ठेवण्याचा प्रयत्न नाट्य व्यवसाय करीत असतो. नाटक ही समुदायापुढे उभी करून दाखवायची कला आहे. नाटक हे केवळ दृश्य आहे केवळ वाच्य नाही. फक्त पात्रांच्या संवादामार्फत कथन केलेली कथा अशी नाटकाची व्याख्या करता येईल. थोडक्यात नाटककाराने लिहीलेले नाट्यसंवाद प्रेक्षगारात सर्वांना स्वच्छ ऎकू जातील अशी कलापुर्ण व अभिनय कौशल्याने सादर करण्याची जबाबदारी पात्रांची असते. नाटक कंपनी म्हणजे विवीध व नानारंगी रसिक माणसांचा मेळावाच. नाट्यकलेत पारंगत असलेले नट व नट्या नाटककाराने मानवी स्वभावांच्या छटांना दिले नाट्यरुप रंगमंचावर सादर करतात. नाटक हे गर्दीपुढे करून दाखवण्यासाठी असतं यावर सर्व कलाकारांची नितांत श्रद्धा असते. मात्र नाटकाचे यश प्रेक्षगारात बसलेल्या प्रेक्षगारात बसलेल्या प्रेक्षकांना हा अविष्कार कितपत रुचला यावरच अवलंबून असते. प्रेक्षगारात विवीध रुची असलेले प्रेक्षक बसलेले असतात. त्या दृष्टीने समुदायाला चटकन आकलन होईल अशा कल्पनांचा व शब्दांचा खेळ नाटककाराला मांडावा लागतो. रंगमंच व प्रेक्षगार एक दिलाने एकत्र आले तर नाटकाचा प्रयोग यशस्वी होतो. नाटक प्रेक्षकांच्या डोळ्यासमोरुन सतत पुढे सरकत असते. रंगमंचावर चाललेले नाटक यशस्वी झाले किंवा नाही हे नाट्यगृहातच समजून येते. नाटक डोळसपणे कसे पाहावे व ऎकावे याचे सुंदर चित्रण पु.लं. नी `केशवराव दाते' या शीर्षकाच्या लेखात केले आहे. (संदर्भ: गुण गाईन आवडी). `आंधळ्याची शाळा' या संगीत नाटकात `बिंबाच्या' भूमिकेत ज्योत्स्ना भोळे व `मनोहर' ची भूमीका श्रेष्ट नट केशवराव दाते करीत. संगीत रंगभूमीवर गाणा-या पात्राच्या बाजूला असणा-या नटाला ते गाणे ऎकण्याचा मूक अभिनय करावा लागतो. परंतु हा मुक अभिनय मोजक्याच नटांना जमला. मात्र मनोहरच्या भूमिकेत केशवराव दात्यांनी आपल्या सुंदर मूक अभिनयामुळे ज्योत्स्नाबाईंनी आपल्या सुरेल स्वरांनी श्रोत्यांनी मंत्रमुग्ध केले. या बाबतीत केशवराव दातेंचे अभिनय पदुत्व श्रेष्ठ मानले जाते. `नाटकातल्या अभिनयात नटाची खरी गुंतवणूक ही बोलतांना जितकी असते त्याच्याहून कित्येक पट अधिक इतर पात्रांनी बोललेले ऎकण्यात असते. " असे पु.लं. नी लिहीले. 

पुरूषॊत्तम लक्ष्मण देशपांडे ही अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेली व्यक्ती चार प्रमुख नावांनी ओळखली जात असे. पहिले नाव पुरुषोत्तम. या नावाचा वापर खूपच कमी असे. दुसरे नाव पु.ल. या केवळ दोन आद्याक्षरांतील सुटसुटीत व सुलभ संक्षेपात असंख्य मराठी वाचक त्यांना ओळखत असत. यात असामान्य आपुलकीचे प्रतिबिंबही दिसत असे. पी.एल हे तिसरे इंग्रजी आद्याक्षाराचे नाव. हे फारसे कुणाच्या वापरात नसे. `भाई' हे चौथे कौटूंबिक नाव. घरातल्या कुटुंबियांसाठी, निकटवर्ती यांसाठी सोयीचे होते. पु.लं. च्या मातोश्री त्यांना भाई म्हणत असत. हे घरगुती सलगीचे एकवचन सुनीताबाई देशपांडे यांनी `आहे मनोहर तरी' या आपल्या आत्मकथेत उपयोगात आणले आहे. पु.ल. हा एक ईश्वरी चमत्कार आहे. त्यांना नियतीने अनेक देणग्या दिल्या आहेत. विनोदाची देणगी, संगीताची देणगी, वक्तृत्वाची देणगी अशा अनेक देणग्या मिळाल्या. परंतु असे कौतुकास्पद शेरे किंवा उद्गार काढणे हा त्यांच्यावर एक प्रकारचा अन्याय करण्यासारखेच आहे. हे नेत्रदिपक यश त्यांना सहजासहजी मिळाले नाही. पु.लं. चे जीवन म्हणजे एक असामान्य जिद्द, डोळस परीश्रम यांची एक गाथा आहे. असे थोडक्यात म्हणता येईल. पु.ल. म्हणजे सतत वाहाणारा हास्याचा धबधबा, घरी सतत खो खो हसणारे पु.ल. अशी त्यांची एकांगी प्रतिमा तयार झाली. परंतु पु.लं. चा विनोद व संगीत ऎकणे, त्यांच्या लेखनाचा अस्वाद घेणे ही मनाला अल्हाद देणारी घटना होती. त्यांचे प्रत्यक्षात दर्शन फोटोतून, चित्रातून किंवा दुरदर्शनवरून घेणे हा एक विलक्षण अनोखा आनंद होता. पु.लं. ना मिळालेल्या अनेक देणग्यांपैकी एक सर्वात मोठी अमोल देणगी परमेश्वरांनी त्यांना दिली, ती म्हणजे सौ. सुनिताबाई, त्यांच्या `आहे मनोहर तरी' या पुस्तकातून पु.लं. चा बहुरंगी व्यक्तीमत्वाचं एक आगळच दर्शन वाचकांना घडलं. पु.लं. च्या मातोश्रींनी आपल्या गुणी सुनेच यर्थात चित्रण या शब्दात असं केलं, "सुनितानेच भाईच्या आयुष्याला वळण व शिस्त लावली. ती अगदी खंबीर भेटली म्हणून बंर नाही तर भाईची परवड झाली असती. हा कुठेतरी जातो, वाटेल तसे कार्यक्रम ठरवितो, नि मग तिला सर्व निस्तरांव लागतं. भाई सिनेमात काम करायचा. रात्री तो शुटींग संपल्यावर पहाटे चार वाजता घरी यायचा. भाई केव्हा परत येईल याचा अंदाज घेवून ती रात्री उशीरा स्वयंपाकाला सुरवात करी. तो आल्यावर त्याला आधी ती अन्न घेत नसे. अलीकडच्या किती मुली नव-यासाठी एवढे करतील?" 

`आहे मनोहर तरी' या गाजलेल्या पुस्तकात सुनीताबाईंनी पु.लं. च्या व्यक्तीरेखेचे विविध पैलूंचे चित्रण केले आहे. १२ जून १९९० रोजी हे पुस्तक प्रकाशित झाल्यावर वाचकांच्या अनुकूल-प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांना दोघांमधील मतभिन्नता जाणवली. महाराष्ट्रात जणू काय एक वादळ निर्माण झाले. परंतु पु.लं. चा सतत समझोता करण्याचा स्वभाव असल्यामुळे पेल्यातील वादळपेल्यात शमले. सुनीताबाई `आहे मनोहर तरी' मध्ये लिहीतात, "माझ्या मनाविरुद्ध मी वागावे असा आग्रह त्याने चुकुनही कधी केला नाही. पण हे जे तो करतो ते कुणावरही दडपण आणणे सक्ती करणे, कुणाचेही व्यक्तिस्वातंत्र्य हिरावून घेणॆ हे त्याच्या स्वभावातच नसल्याचे लक्षण आहे." थोडक्यात पु.लं. च्या व्यक्तीमत्वातील या पैलूबद्दल. सुनीताबाईची पारख अचूक आहे, असं विजया राजाध्यक्ष यांनी एका लेखात नमुद केले आहे. या पुस्तकाने केसरी मराठा संस्थेचे पारितोषिक, व केशवराव कोठावळे पुरस्कार असे दोन मानाचे सन्मान पटकावले. पु.लं. ना सुनीताबाई बद्दल पत्नी म्हणून व लेखिका म्हणूनही प्रगल्भ कौतुक होते. स्वतः पु.लं. नी ही आनंदाची बातमी विजया राज्याध्यक्ष यांना फोनवरून कळवली. सुनीताबाईंचे हे लिखाण वाचकांसमोर आले पाहिजे असे पु.लं. चे मत होते. पुस्तक `मौज प्रकाशनातर्फे' प्रकाशित करण्याचे निश्चित झाल्यावर त्याला समर्पक शीर्षक शोधणे अत्यावश्यक होते. `तळ्यात मळ्यात'. `अशी ही एक' अशी काही नावे सुचली पण ती पटली नाहीत. लेखिकेच्या मनात योग्य नावांसाठी मनात सतत विचार चालू असतांना एक दिवस देशपांडे पती पत्नी गाडीतून जात असतांना सुनीताबाईंनी "मनोहर बेकरी" या नावाची पाटी पाहिली. घटना साधी होती पण त्यातून लेखिकेला तिच्या पुस्तकाला समर्पक शिर्षक मिळण्याची नामी संधी प्राप्त झाली. त्याचं असं झालं, `मनोहर' या शब्दातून सुनीताबाईनी `आहे मनोहर तर गमते उदास' ही सरस्वती कंठभरणा यांच्या कवितेची ओळ आठवली. यामुळे त्यांच्या पुस्तकांच्या नांवाचा पश्न लगेच सुटला. आपल्या पुस्तकाला हे नाव आवडल्यावर प्रकाशन श्री. पु. भागवतांबरोबर झालेल्या चर्चेनंतर `आहे मनोहर तरी' हे नाव कायम झाले. प्रकाशकांच्या मनात पुस्तकाचा जाहिर समारंभ करावा असे होते. याचे कारण पुस्तकाची जाहिरात होऊन विक्रीला हातभर लागतो. परंतु लेखिकेची या सुचनेला मान्यता मिळाली नाही. तेव्हा १२ जून १९९० रोजी मुंबईला एन.सी.पी.ए. मधील वातानुकूलित खॊलीत अनौपचारिक प्रकाशन समारंभ झाला. त्यावेळी पु.लं. व सुनीताबाईंचा आवडता दिनेश व त्याची पत्नी, गोविंदराव तळवळकर, राज्याध्यक्ष पती-पत्नी अशी मोजकी मंडळी हजर होती. पु.लं. व सुनिताबाईंच्या आयुष्यात १२ जून या तारखेला विशेष महत्व प्राप्त झाले होते. 

याच तारखेला रत्नागीरीला १९४६ साली सुनीता ठाकूर या सुनीता देशपांडे झाल्या. आपल्या भारतीय जीवन प्रणालीत विवाह हा एक पवित्र संस्कार मानला गेला आहे. त्याचे पावित्र्य १२ जून १९४६ पासून ५४ वर्षे भाई व सुनिताबाईंनी अभंग टिकवले. `आहे मनोहर तरी' प्रकाशित झाल्यावर वाचकांची शेकडो पत्रे आली. विशेष म्हणजे या पुस्तकाचा आढावा घेण्यासाठी पाच भागाचे एक चर्चा सत्र यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात झाले. पु.ल. व सुनिताबाईंनी चर्चासत्रातील शेवटच्या भागाला येण्याचे कबूल केले, व त्याप्रमाणे उपस्थित राहिले. दोघांनी ते सत्र दुरच्या खुर्चीवर बसून अलिप्तपणे ऎकले. एकदा या चर्चासत्रा आधी पु.ल. गमतीने म्हणाले, "काय, न्याय आहे पहा. आम्ही जन्मभर लिहीलं. त्यावर चर्चासत्र वगैरे काही नाही. पण या पुस्तकावर मात्र........." `आहे मनोहर तरी' या पुस्तकाची विक्रमी विक्री झाली. प्रकाशकांकडून घसघशीत रॉयल्टी येण्याआधी सुनीताबाईनी पु.लं. नी विचारले, "भाई, हे माझ्या कमाईचे पैसे आहेत. त्यातून तुला काय आणू?" भाई उद्गारले," तुझ्या कमाईचे कसे? माझ्यामुळे तर तुझे पुस्तक खपलं!" हे किस्से विजया राज्याध्यक्ष यांनी कथन केले. साहित्य-संगीत-नाटक व गप्पागोष्टी यांमधून पु.लं. च्या बहुढंगी व्यक्तीमत्वाचं आगळं दर्शन `आहे मनोहर तरी' मधून वाचकांना घडलं. या पुस्तकात थोडक्यात अस सांगता येईल की, सुनिताबाईना स्वतःच्या व्यक्तिमत्वाला बांध घातला व वेळोवेळी अप्रियता पत्करुन सारण्याची भूमिका पार पाडली. या संदर्भात श्री. जयंत नारळीकर लिहीतात:- "या सारथ्यानं केवळ मागे बसलेल्या महारथ्याच्या सांगण्यावरुन रथ चालवला नाही तर स्वतःच्या व्यावहारिक दृष्टीकोनातून त्यला वेगळी दिशाही दाखविली व काही प्रसंगी त्या महारथ्याला व्यावहरिकगीता देखील सुनावली." १९७७ मध्ये लोकसत्ता निवडणूका जाहिर झाल्या. अन्य कोणाही व्यक्त्यापाशी नसलेले धारदार विनोदाचे शस्त्र हाती घेऊन पु.लं. नी जनता पक्षाच्या बाजूने प्रचारीत उडी घेतली. पु.लं. ची भाषणे ऎकण्यासाठी लाखोंनी अभूतपुर्व मिळालेला प्रतिसात पाहून सर्वांनाच समाधान लाभले. थोडक्यात रथाची वेगाने घोडदौड सुरू होती. पु.लं. च्या भाषणांचा जनतेवर मोठा प्रभाव पडला. परिणामी जनतापक्ष सत्तेवर येण्याचे निश्चित झाल्यावर पुण्याला एस. पी. कॉलेजवर विजयाची सभा ठरली. त्यांत पु.लं. चे भाषण तयार होते. परंतु सारण्यानं लगाम आवळले व म्हटले.:- "भाई त्या सभेला जाऊं नये असं मला वाटतं. ती सभा जनता पक्षाच्या विजयाची सभा आहे. आता भाईचं काम संपलं आहे." "मी माझा मोठेपणा सांगत नाही. पण आज लोक जमणार. त्यातले बरेचसे माझे भाषण ऎकण्यासाठीच. माझं नाव जाहिर झालयं. मी गेलो नाही तर त्यांना फसवण्यासारखे होईल." भाई. अखेरीस भाई सभेला गेले नाहीत. लोकांचा गैरसमज होऊ नये म्हणून भाईंनी आपले भाषण कॅसेटवर रेकॉड करावे व ते सभेत ऎकवावे असे ठरल्यावर या विषयावर पडदा पडला. कर्तूत्वान पुरूषांच्या घरात स्त्रियांचे सार्वभोमत्व असतं अशा अनेक नोंदी इतिहासात आढळतात. 

दुसरे महायुद्ध अखेरच्या पर्वात होते. ब्रिटनचे त्यावेळचे पंतप्रधान चर्चिल यांनी बर्लिनवरचे बॉम्बहल्ले पाहाण्याच्या हट्ट धरला. परंतु त्यांची पत्नी सारा म्हणाली, "यू नॉटी बॉय, यू विल नॉट गो!" आणि चर्चिल गेले नाहीत. सर डॉन ब्रॅडमनची पत्नी जेसी त्यांना सांगू शकत असे, "डॉन, डोन्ट बी सीली!" पु.ल. च्या बाबतीत सांगायचे झाल्यास एकदा विद्याधर पुंडलीक यांनी ललित मासिकातर्फे घेतलेल्या मुलाखतीत पु.लं. ना विचारले, "सुनिताबाईंच्या तुमच्या घरातील सार्वभोमत्वाचे रहस्य काय? " यावर पु.लं. उत्तरले, "कुणाच्या घरात बायकोचं सार्वभोमत्व नसतं?" पु.लं. पुण्याचे भूषण असल्यामुळे त्रिदल संस्था पुणे यांच्यातर्फे दरवर्षी देण्यात येणारा `पुण्यभूषण' हा मानाचा किताब त्यांना ३० मे १९९३ रोजी बालगंधर्व रंगमंदिरात समारंभपूर्वक बहाल करण्यात आला. कला, साहित्य, समाजसेवा, आदि क्षेत्रांमध्ये, कौतुकास्पद कामगिरी करणा-या व्यक्तिंना हा पुरस्कार दिला जातो... याआधी भीमसेन जोशी, डॉ. बानु कोयाजी, शंतनुराव किर्लोस्कर अशा मान्यवर व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला होता. रंगमंदिरात रसिक, पु.लं. चे चहाते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रकृति बरी नसल्यामुळे पु.लं. मोजकेच बोलले. पण नेहमीसारखीच श्रोत्यांनी भाषणाला मनापासून दाद दिली. त्यावेळी पु.लं. च्या घरी नातेवाईक मंडळी जमली होती. त्यांत सुनीताबाईंची घाकटी बहीण शालन पाटील होती. समारंभ झाल्यावर दुस-या दिवशी बहुतेक सर्व जण आपापल्या घरी गेली. शालनला सोबत म्हणून सुनीताबाईंनी काही दिवस राहण्याचा आग्रह केला. आणि एक दिवस अघटित घडले. भाई बाथरुममध्ये पाय घसरून पडले. त्यांनी उठण्याचा प्रयत्न केला. पण ते शक्य न झाल्याने घरातील मंडळींनी त्यांना उचलून पलंगावर झोपवले. संकट आले होते. डॉक्टर्सनी प्रयन्तांची शर्थ केल्यावर पु.लं. ना बरे वाटायला लागले. हे पाहून शालन माईंना म्हणाली, "भाई आता हिंडू फिरू लागले आहेत. तेव्हा मी आता घरी जाईन म्हणते." "शालन अगं काय घाई आहे? आणखीन थोडे दिवस राहा नं! मला एक छान कल्पना सुचली आहे. भाई आता पुर्वी सारखाच वावरायला लागला आहे, चालू बोलू लागला आहे. तेव्हा त्याच्या पुढ्यात टेपरेकॉर्डर ठेऊन त्यानेच आपल्याला त्याच्या आयूष्यातील महत्वाच्या घटना, प्रसंग त्याला आठवतील तशा कथन करायच्या, यामुळे काय होईल की तो बिझी राहिल आणि स्मरणशक्तीलाही चालना मिळेल. कशी कल्पना वाटते?" "माई वा नाईस आयडिया!" सुनीताबाईंची ही कल्पना पु.लं. नी उचलून धरली व प्रत्यक्षात सुद्धा आणली. कथानकाला प्रारंभ करण्याआधी पु.लं. म्हणाले, "मला जशा घटना आठवतील, तशा मी रेकॉर्ड करीन. या क्षणाला माझ्यासमोर `जयंत नारळीकर' आहेत. याचे कारण सकाळी लवकर जाग आली म्हणून रेडिऒ लावला. नारळीकरांचे `चिंतन' हा कार्यक्रम कानावर पडला. सहाजिकच नारळीकरांची मला आठवण झाली. त्यांच्याबद्दल मी आता सांगतो. "मी लंडनला टेलिव्हिजनच्या शिक्षणासाठी गेलो होतो. लंडनमधील प्रेक्षणीय स्थळे पाहून झाल्यावर मी एडिंबरला नाट्य, संगीत महोसव पाहायला गेलो. 

दर वर्षी त्या महोत्सवात नाटके, नृत्यनाटके, चित्रकला प्रर्दशने, कळसूत्री बाहूल्यांचा खेळ असे कार्यक्रम होतात. मी व सुनीता सकाळपासून एडिंबरात भरपूर भटकलो. दुपारी लंच घेतल्यावर तेथील गजबजलेल्या प्रिन्सेस स्ट्रीटवर आलो. तेथे एका दुकानाची शोकेस पाहात असलेल्या दोघां तरुणाकंडे माझे लक्ष गेले. माझ्या कानावर त्यांचे मराठी बोलणे पडले. तेव्हा मी त्यांच्या जवळ जाऊन म्हणाले, "हॅलो आपण कुठले?" ध्यानी मनी नसता अचानक मराठी शब्द कानावर आल्यामुळे ते दोघे जण जरा चमकले. मी त्यांना संभ्रमात न ठेवता माझी व सुनीताची ओळख करून दिली. त्या दोघापैकी एक होते आपल्या भारताचे शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर. पुढे काही दिवसांनी मी आणी सुनीता केंब्रिज विद्यापिठात गेलो. तिथे नारळीकर भेटले. त्यांच्याबरोबर विद्यापीठ पाहून झाल्यावर मी म्हणालो, "चला, आता मी तुम्हाला `चितंन' वाचून दाखवतो. नारळीकरांच्या खोलीत मी वाचन केले. शालन तुला माहितच आहे `चिंतन' माझ्या बटाट्याची चाळ या बहुरुपी प्रयोगाचा शेवटचा भाग आहे. माझे काही विनोदी लेख हंस, सत्यकथा, किर्लोस्कर या मासिकांतून वेळोवेळी प्रकाशित झाले होते. १९५८ साली हे लेख `बटाट्याची चाळ' या नावाने मौज प्रकाशनने प्रकाशित केले. मी लंडनला महाराष्ट्र मंडळातर्फे या पुस्तकातील काही लेखांचे अभिवादन केले होते. त्याच सुमारास मी तेथे डिलन टॉमस या सुप्रसिद्ध वेल्श कवी याच्या साहित्यकृतीवर आधारलेला साभिनय कार्यक्रम पाहिला. अडिच-तीन तास चालणारा हा अश्रूंचा व हास्याचा खेळ ब्रिटीश नट एमलिन विल्यम्स रंगभूमीवर सादर करत असे. आपली स्वतःची अस्खलित वाणी, डिलन टॉमसची अलौकिक प्रतिभा व रंगभूमीवरची एक घडीची खुर्ची. या शिदोरीवर विल्यम्स प्रेक्षकांना जागेवर खेळवून ठेवत असे. विल्यम्सच्या दर्शनाने माझ्या बहुरुपी प्रयोगांना चालना मिळाली. सुनीता मला म्हणाली, "भाई, तुच हे काम का करत नाहीस?" नंतर `बटाट्याची चाळ' प्रयोगरुपाने रंगमंचावर सादर करण्याचा मी निर्णय घेतला. चाळीचे प्रयोग बंदिस्त नाट्यगृहातच मी करत असे. 

खुल्या रंगमंचावर अनेक पात्रांच्या वेड्यावाकड्या हालचाली करणे मला शक्य होते तरी तसे केल्यास माझ्या आवाजावर परिणाम होण्याची शक्यता होती. चाळीचे पहिले दोन प्रयोग भारतीय विद्याभवन, चौपाटी येथे झाली. पुढे बिर्ला मातोश्री सभागृह, मुंबई व बालगंधर्व रंगमंदीर पुणे, येथे प्रयोग मी सादर केले. या प्रयोगात चेह-यावरच्या हावभावापेक्षा सबंध शरीराच्या हालचालवर माझा भर असे. भ्रमण मंडळाचे सभासद प्रवासासाठी बोरीबंदरला जाण्यसाठी निघतात त्यावेळच्या प्रसंगात व्हिक्टोरीयात बसलेल्या माणसांचे गचके मी देत असे. प्रेक्षक याला कडकडून टाळी देत. बेहोषीतल्या त्या टाळीचा कडकडाट काही निराळाच होता. "भाई, मी तुमचं बोलण थोडावेळ खंडीत करते, "शालन म्हणाली." तुमच्या `अपुर्वाई' मध्ये विल्यम्सच्या खेळाची तुलना तुम्ही आपल्याकडील जुन्या पट्टीच्या कीर्तनकाराशी केली आहे. निजामपुरकर बुवा, कवीश्र्वर बुवा केवळ ह्या अस्खलित शब्दासामर्थ्यावर श्रोत्यांना रात्ररात्र तरंगत ठेवीत. आपण पुढे असेही लिहीले आहे की व्यंकटेश माडगूळकरांनी आपल्या गोष्टी गावोगावी जाऊन कां सांगू नयेत? त्यांची कथनशैली सुंदर आणि त्यांच्या गोष्टीत गोष्टी आहेत, विनोदी आहेत, कारुण्य आहे. 

मनुष्य स्वभावाचे शेकडो ह्र्द्य नमुने आहेत. मराठी रंगभूमीवर प्रयोगांची आवश्यकता आहे. ती ह्या अशा प्रयोगांची! बरं तुमचं कथन आता पुढे चालू करा." "हो, चाळीच्या प्रयोगात रंजकता व विनोद असल्यामुळे लोकांना तो आवडला. प्रयोगाचा शेवट मी करूण दाखवला कारण संपूर्णपणे वाईट मी पाहूच शकत नाही. केवळ `चिंतन' ऎकण्यासाठी माझ्या आईने `चाळीचे' सात-आठ खेळ पाहीले. आता तुर्त एवढेच पुरे. उद्या आकाशवाणी वरच्या आठवणी सांगेन!" पुणे आकाशवाणीवर १९५५ मध्ये मी विशेष कार्यक्रमांसाठी प्रमुख म्हणून कार्यरत होतो. जागेची अडचण असल्यामुळे एकाच मोठ्या खोलीत आम्ही निर्माते एकत्र बसत असू. त्यांत मी, कविवर्य बोरकर, व्यंकटेश माडगूळकर, मिरासदार अशी मंडळी असायची. त्यावेळचा एक प्रसंग मला आठवतो. महात्मा गाधींची जयंती जवळ आली होती. तेव्हा २ ऑक्टोबरचे कार्यक्रम ठरवण्यासाठी केंद्र्संचालकानी निर्मात्यांच्या बैठकीत सूचना विचारल्या. कुणी काही कुणी काही कार्यक्रम सुचवले मी म्हणालो गांधाजींना मौन प्रिय होते. तेव्हा आपण २ ऑक्टोबरला मौन पाळावे व एकही कार्यक्रम ठेवू नये." यावर संचालकांसह सर्व जण खळखळून हसले. बा. भ. बोरकरांचे घरगुती नाव होते. 'बाकीबाब'. ते ऑफीसमध्ये टेलिफोन खणखणल्यावर रिसिव्हर उचलून म्हणायचे. "धिस ईज पोएट बोरकर स्पीकिंग! बोरकर आकाशवाणीवरच्या वरच्या श्रेणीच्या त्यांची काव्यमैफिल व्हायची. ते नवी कविता म्हणण्याच्या रंगात आलेले असतांना साहेबांचा शिपाई देखील त्यांना निरोप सांगायला कविता संपायची वाट पाहात उभा राहायचा. त्यांच्या ओठात एक तर वेगळ्या स्टाईलने धरलेली सिगारेट असायची किंवा कवितेची ओळ असायची बोरकरांची कविता गात गात जन्म घ्यायची आणि मग कागदावर तिचे नुसते टिपण व्हायचे. गांधीजींवर त्यांची निस्सिम श्रद्धा होती. `महात्मायाम' पुरे होण्यासाठी त्यांनी दिल्लीची दर्जेदार जागा स्विकीरण्याचा मोह टाळला. दुर्देवाने तो संकल्प पुरा झाला नाही. 

मुंबई मराठी साहित्य संघाच्या नाटकांच्या निमित्ताने व मुंबई आकाशवाणी वर नाट्यनिर्माता म्हणून काम करीत असताना मला अनेक कलाकारांचा सहवास लाभला. मी व सुनिता ओरीएंट हायस्कूल मध्ये शिकवत असतांना नीलम आमच्या शाळेत होती. नीलमचे वडील हिरामण देसाई नाट्यवेडे होते व ते माझ्या परिचयाचे होते. पुढे ती साहित्य संघाच्या नाटकातून भूमिका करू लागली. माझ्या `छोटे मासे मोठे मासे' मध्ये तिने तमासगीर बाईचा रोल केला. `वा-यावरची वरात' मध्ये आम्ही तिला सामील करून घेतले. आकाशवाणीच्या `पुन्हा प्रपंच' मुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली. नीलमला तिच्या वडिलांकडून गोड आवाजाची देणगी मिळाली. (नीलम म्हणजे नीलम प्रभू) मी विजया मेहताला, तेंडुलकरांच्या `श्रीमंत' व इतर एकांकिकेत पाहीले. मला तिचा अभिनय खूप आवडला, नंतर मी तिला आमच्या नाटिकांमध्ये रोल करण्यासाठी बोलवले. `तुझ आहे तुजपाशी' लिहीत असतांना उषाची भूमिका विजयाकडे सोपवण्याचा निर्णय मी घेतला होता. `सुंदर मी होणार' मधील बेबी राजेची भूमीका विजयाला दिली. तिला विल्सन कॉलेजच्या महोत्सवासाठी एकांकिका हवी होती. तेव्हा मी `छोटे मासे मोठे मासे' लिहून दिले. या प्रयोगाचा दर्जा इंटरनॅशनल लेव्हलचा होता. या तरुण मंडळींचा उत्साह व उभारी पाहून मी त्यांना `सांर कसं शांत शांत' व `सदू आणि दादू' अशा दोन एकांकिका लिहून दिल्या. विजयाचा आमच्या वा-यावरची वरातीत काही प्रयोगातही सहभाग होता, तिने अल्काझीकडे नाट्याचे धडे घेतले होते. `तुझ आहे तुज पाशी' मधील काकाजीची व्यक्तिरेखा विलक्षण असल्यामुळे ती भूमिका कोणाला द्यावी यावर चर्चा चालू होती. काही नावे पुढे आली, पण मी पल्लेदार आवाज असलेल्या व राजबिंड्या दाजी भाटवडेकरांना ट्राय करण्याचे ठरवले. त्याने काकाजींची भूमिका खूप उंचीवर नेऊन ठेवली. या नाटकाचा पहिला प्रयोग होण्याआधी आचार्यांचा रोल करणारा एकन टनाटन सोडून गेला. प्रयोगाची तारीख तोंडावर आली होती. आचार्यांची भूमिका काकाजींच्या रोल इतकीच महत्वाची असल्यामुळे अनुरुप पात्राची निवड करण्यास वेळ होता. परंतु याच नाटकात भिकू माळ्याची भूमिका करणा-या राजा पटवर्धन यांना आचार्यांच्या रोल मध्ये रंगमंचावर आणले. माझी निवड त्यांनी यशस्वी करून दाखवली. 

मी मुंबई आकाशवाणीवर नाट्यनिर्माता असतांना भक्ती बर्वे या बालकराकाराने `वयम मोठम खोटम' या नाटिकेत काम केले होते. ही नाटिका मी मुलांसाठी लिहीली होती. मी ती का लिहीली याचा एक गंमतीदार प्रसंग मी सांगतो. एकदा माझी छोटी भाची मला म्हणाली, "मामा, मला एक नाटक लिहून द्या की." मला लहान मुलांसाठी नाटक लिहीता येत नाही अस मी तिला सांगीतल्यावर ती म्हणाली, "अय्या! मग तुम्ही प्रोफेसर कसले? हुडत!" लहान मुलांना आपण मोठ्या माणसांप्रमाणे वागाव अस वाटत असतं व खरोखरच ती तशी वागतात. यातून मोठी फौज कशी तयार होते याचे चित्रण मी या नाटिकेत केले आहे. 'गणगोत' मध्ये मी माझा छोटा भाचा `दिनेश' याचे व्यक्तिचित्रण रेखाटले आहे. `बटाट्याची चाळ' पाहून आल्यावर तो माई आत्याला म्हणाला, "भाईकाका `विदूषक' आहे की नाय गं! कारण लोक त्याच्याकडे बघून हसत होते." पुढे काही वर्षांनी मी `ती फुलराणी' हे नाटक लिहीले. ते `पिग्मॅलियन' चे मराठीकरण आहे. परभाषेतील उत्कृष्ट कलाकृती मराठीत जरूर यायला पाहिजेत असे मी नेहमीच सांगत आलो आहे. शब्दांच्या वेगवेगळ्या उच्चारांमुळे होणारा विनोद हा त्या नाटकाचा कणा होता. समाजातील उच्च थरातील व्यक्तिंची भाषा शुद्ध मानली जाते. व्यक्तीला समाजात मानाचे स्थान पाहिजे असेल तर आपली भाषा शुद्ध असली पाहिजे. शुद्ध बोलणारी व्यक्ती अशुद्ध उच्चार करणा-या व्यक्तिपेक्षा स्वतःला श्रेष्ट समजते. पाणी या शब्दाला `पानी' किंवा `आणि' या शब्दाला `आनी' म्हणणा-या व्यक्तिकडे ती तुच्छतेने पाहाते. मी `पिग्मॅलियन' चा `संतु रंगेली' हा गुजराथी नाट्यप्रयोग पाहिला. मूळ इंग्रजी कथेवर मराठी भाषेचा साज चढवून इंडियन नॅशनल थिएटर्तर्फे `ती फुलराणी' मोठ्या दिमाखाने रंगमंचावर आली. मी नाटकात बालकवीची `फुलराणी' या गाजलेल्या कवितेचा उपयोग केला. भक्ति बर्वे, सतीश दुभाषी, अरविंद देशपांडे या गुणी कलाकारांनी नाटकात भूमिका केल्या. 

एकदा मी भक्तिला नाटकातील एक प्रसंग सांगत होतो. तो प्रसंग अधिक परिणाम कारक होईल असे तिला वाटून ती म्हणाली, "पी. एल. काका, हा प्रसंग तोंडात गोट्या ठेऊन करु का?" यावर मी तिला म्हणालो, "नको, भक्ति, तू चुकून गोटी गिळालीस तर? त्यापेक्षा तोंडात गोळ्या ठेव!" मला `फुलराणीतील' दगडोबा साळुंकेची भूमिका करायची इच्छा होती. पण सतीश मला म्हणाला, "भाई, तुम्ही सुरवातीच्या प्रयोगात दगडोबा उत्तम कराल. पण पुढे तुमच्या उत्तर व्यापांमुळे सवड मिळणार नाही. नाटकात भाई नाहीत तर आम्हाला कोण पाहायला येणार?" (`ती फुलराणी' वर आधारीत `पु.लं. फुलराणी आणि मी' हा प्रयोग वाई मध्ये १२/०२/२००१ रोजी सादर करुन भक्ती बर्वे मुंबईला परत येत असतांना मोटार अपघातात निधन झाले आणि फुलराणी अकाली कोमजली. या प्रयोगाची संहिता स्वतः भक्ती बर्वे यांनी तयार केली होती.) "शालन, हे बघ, आता मला थकल्यासारखं वाटत आहे. म्हणून रेकॉडर बंद करतेस का? उद्या मी बालगंधर्वाबद्दल बोलेन." माझ्या वडिलांना बालगंधर्वाचा सुरेल स्वर व अभिनय अतिशय आवडत असे. त्यांच्या बरोबर आम्ही दोघा भावंडांनी गंधर्वांची अनेक नाटक पाहिली. बालगंधर्वांचे गाणे व अभिनय देशपांडे कुटूंबाचे कुलदैवतच. रंगमदिरात ऑर्गनवर कांबळे. सारंगिये, कादरबक्ष व तबल्यावर अहमदजान हे ब्रम्हा, विष्णू, महेश बालगंधर्वांचा स्वर व व्यंजनेसुद्धां वाद्यातून उचलण्यास तत्पर असायचे. रंगभूमीवरचे ते मंतरलेले दिवस होते. ज्या प्रमाणे संताचे सहज बोलणे हे उपदेशपर असायचे त्याप्रमाणे बालगंधर्वांनी कुठलाही स्वर लावला तरी तो सुंदर असायचा. या डौलदार देखण्या राजहंसाने आपल्या जवळचा मोत्याचा चारा अनेकांना कित्येक वर्षे खाऊं घातला. त्यांच्या वार्धक्यात ते मला एकदा म्हणाले, "वीणा वाजत आहे. तारा गंजल्या आहेत, पण सुर न सुटता ते लांब जात आहेत, देवा!" वार्धक्याचा असह्य होणारा शाप तर प्रत्येकाच्या माथ्यावर ईश्वराने कोरलेला आहे. पण या शापाने खचत न जाता, नाऊमेद न होता. बालगंधर्व अपंग अवस्थेतही अडीचशे-तिनशे मंडळी घेऊन जंगी नाटक कंपनी काढून सर्वांचे मनोरंजन करण्याचे स्वप्न पाहात होते. वाढत्या वयाबद्दल बाह्य आकर्षणे शिथिल होत जातात. पण आतील गाभा मात्र चैतन्यमय राहतो. बालगंधर्वांचा हा आतला पिंड असामान्य कलावंताचा होता. थोर कलावंत सहजासहजी आपला पराभव मान्य करित नाहीत. एकदा मला तात्यासाहेबांनी (शिरवाडकर) नानासाहेब फाटकांनी हद्य हेलावून टाकणारी आठवण सांगितली होती. वृद्धावस्थेत हा नटसिंह एकाकीपणाच्या गुहेत खचत चालला होता. त्या अवस्थेत त्यांनी तात्यासाहेबांकडे एक नाटक मागितले. शेक्सपियर किंग लियरचं रुपांतर. शिरवाडकरांनी नानासाहेबांना नकार दिला नाही, ती मागणी पुर्ण करण्याचे प्रयत्न केले. पण ते जमले नाही. पुढे नानासाहेबांसारखा एखादा रंगभूमीवरचा राजाच नाटकाचा नायक होऊ शकेल असे कल्पून त्यांनी एक स्वतंत्र शोकांत नाटक लिहीले व ते `नटसम्राट' या नावाने रंगभुमीवर आले. त्यावेळी नानासाहेब पुर्णतः निवृत्त झाले होते. शालन, ही माणसे हरणारी नव्हती. मी बालगंधर्वांच्या भेटीला गेलो की त्या वृद्ध्मुर्तीकडे न बोलता पाहात बसायचो. मायबाप्पा! देवा! आमच्या अन्नदात्यांनी फार कौतुक केलं हो, आमच्या त्या वेळच्या आठवणी बालगंधर्व सांगत असतं. माझ मन मात्र वडिलांसमवेत बालगंधर्वांची नाटक पाहाण्यासाठी ऑपेरा हाऊसमध्ये शिरायचे. विश्वाचा पसारा अफाट आहे. या जगात मनातल्या सर्वच गोष्टींची, मनोगतांची, पूर्तता कोणी करू शकत नाही. तेव्हा मी अमूक एक करु शकलो नाही असं म्हणण कितपत योग्य आहे? आता हे सुंदर शरीर वार्धक्याने गलितगात्र झाले आहे. माझा गळा गेला, पायातील शक्ति गेली, डोळे निस्तेज झाले, वाणी कातर झाली. ही सारी वृद्धत्वाची लक्षणे आहेत. पण अजुनही असं वाटत कांही समाजिल गोष्टी करायच्या राहून गेल्या. संगीत हे माझ आनंदाच क्षेत्र, गरीबांच्या वस्तीतून, खेड्यापाड्यात जाऊन, तहान भूक हरपून गायला हवे होते. गायला सुरवात केल्यावर भराभर गायला पाखरं जमली असती. रंगबेरंगी कपडे घालून सुंदर दिसलो असतो. मोठ्यांसमोर नाचण्याची संवय झाली होती. मुलांचे मन रंजवण्यासाठी फार काही केलं नाही याची खंत वाटते. देवाने देणगी दिली आहे ती वार्धक्याने हरण केली. सुनीताबाई व शालन भाईंचे कथन लक्षपूर्वक ऎकत होत्या. अचानकपणे त्या दोघींना भाईंच्या सुरात फरक जाणवला. सुनीताबाईंनी पुढे येऊन पाहिले तर भाईंचा श्वासोच्छवास जोरात चालू असल्याचे त्यांनी दिसले. त्यांनी लगेच डॉ. प्रयाग यांना फोन केला. पु.लं. ना लगेच इस्पितळात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी प्रयत्नांची शिकस्त केली पण सारे व्यर्थ झाले. 

१२जून२००० रोजी पु.लं. ची प्राणज्योत मावळली. महाराष्ट्रावर वज्राघात झाला.... 
-------------------!!-------------------------