Saturday, September 20, 2008

नटराजाचा लाडोबा - पंडीत दामले

चित्रपट व्यवसायाबद्दल सगळ्यांनाच कुतुहल असते. मी आणि माझा धाकटा भाऊ यशवंत, आणी ही गल्लीच्या न्यु एंजिनीयरींग कॉलेजात १९४८ मध्ये दाखल झालो. तेव्हा तर आम्हाला ’प्रभात’च्या वलयाची पार्श्र्वभूमी होती. सहाजीकच कॉलेजच्या वस्तीगृहात आमच्याविषयीचे औत्सुक्य होते. प्रत्यक्षात आम्ही लेंगा, शर्ट, कोट अशा वेशात गेलो आणि सर्वांमध्ये मिसळून गेलो. 

त्यावर्षी प्रसिध्द लेखक पु.ल. देशपांडे एम. ए. शिकण्यासाठी विलिग्टंन कॉलेजात येणार असल्याची बातमी समजली. त्यांच्या विषयी आमच्या मनात वेगळीच प्रतीमा होती. पण तिला छेद देत ढगळ सदरा-पायजमा, पायात चप्पल अशा थाटात पु.ल. दाखल झाले. तेव्हा ’पु.ल.’ पेक्षा दामले बरे असे म्हणायची पाळी त्यांच्यावर आली. आमच्या अंगावर कोट तरी होते. प्रभात कंपीनीमुळे पु.ल. ची आणि आमची चांगली ओळख होती.आता तिचे मैत्रीत रुपांतर झाले. 

पु.ल ना विश्रामबागेत खरं तर शांतता मिळत होती. चाहत्यांच्या गराड्यात जखडले जात नव्हते. कोल्हापुरात १९३३ साली साहित्य संमेलन झाले होते. या संमेलनात आचार्य अत्रे, गिरीश, यशवंत, सोपान देव चौधरी, संजीवनी मराठे, मायदेव या कवींनी भाग घेतला होता. स्टुडीओत निम्मीत करुन त्याच्या काव्यरचनांचे त्यांच्या आवाजात चिकीरण करण्यात आले होते. त्यावेळी कवी गिरीश यांनी आपली सुप्रसीध्द कवीता "न्यारीचा टाकु त होईल...मैतरणी बिगी बिगी चल" सादर केली होती. कवि गिरीश यांच्या बंगला विश्रामबागेत होता. पु.ल. च्या बरोबर आम्ही सुध्दा गिरीशांकडे गप्पा मारायला जायचो. कवींचा पु.ल. वर फार जीव होता. पु.ल. मुळेच या थोर कवींचा सहवास आम्हाला लाभला. आम्ही अनेकदा संध्याकाळी सांगली-मिरजला फिरायाला जात असू. परतण्यास उशीर होऊन विश्रामबागला जाणारी शेवटची गाडी कधीकधी चुकायची. त्या उतररी पु.लं. ची मैफल असायची. पु.लं. च्या सहवासात आम्ही विश्रामबाग स्टेशनच्या प्लेटफॉर्म वर रात्र जागवत असू. त्यावेळी नकला, गाणी, विनोदी कथा, प्रसंग यांची रेलचेल होत असे. यातुन पु.ल. च्या विवीध कलापैलुंच बहुरुपी दर्शन आम्हाला घडे. किती भाग्यवान आम्ही! त्यावेळी यासर्व गोष्टीचा आनंद घेत वर्ष संपले. आम्ही पुण्याला परतलो. 

पुण्यात आल्यावर प्रभात स्टुडीओत पु.ल. च्या गाठीभेटी होत राहिल्या. खुप वर्षानंतर नुकताच सांगलीला गेलो होतो. विश्रामबागेत स्टेशनची भग्न अवस्था पाहून डोळ्यात पाणी उभे राहिले. लेखन, अभिनय, संगीत, वक्तृत्व वगैरे कितीतरी कला पु.ल. ना अवगत होत्या. भरुनभरुन मिळाल्या. नुर्त्यकला द्यावी अशी नटराजाची इच्छा असेल. पण एवढं ओझ त्यांच्यावर लादु नका, असा सला पर्वती देवींनी दिला असणार. तरी पु.ल. नी स्वतंत्र न नाचता, आपल्या चित्रपट गिताच्या तालावर अनेक चित्रपट तारे-तारकांना नाचवले. एवढ भरभरुन देऊन सुद्धा देव समाधानी नव्हता. सुनीतावहीनी ही शक्ती त्यांच्यामागे उभी केली. अर्धनारी नटेश्वराचे मनोहरी रुप साकार झाले. नटराजाचा लाडोबा त्यांच्याच आज्ञेवरुन कैलासाकडे रवाना झाला आहे. 

- पंडीत दामले

0 प्रतिक्रिया: