Saturday, April 30, 2022

निर्भयता ही कलात्मक सर्जनाची शक्ती

पु. ल. देशपांडे यांनी साहित्य समारंभात केलेल्या भाषणाचा सौ. मीना मराठे यांनी केलेला अनुवाद

मी गेली वीस वर्ष या लेखनाच्या धंद्यात आहे, आणि तरी अजूनही माझं लेखनावर प्रेम आहे. तसं प्रेम माझ्या प्रकाशकांचंही आहे. ते बहुधा माझी पुस्तकं चांगल्या प्रकारे खपतात म्हणून असावं. परंतु त्यामुळे माझे टीकाकार मला लोकप्रिय लेखक म्हणून निकालात काढतात. मी त्यांना दोष देत नाही. मीही त्यांना 'टीकाकार' म्हणतो आणि निकालात काढून टाकतो.

माझा धंदा हसवण्याचा असला, तरी तो दिसतो तेवढा सोपा नाही. त्याचं कारण एकतर अलीकडे जो तो हळवा बनलेला - मग तो भांडवलदार असो, धर्ममार्तंड असो, वा बापडा शाळामास्तर असो. त्यात आणि युनियनची ताकद त्यांच्यामागे. अशा परीस्थितीत कोणाच्या पायावर केव्हा चटकन पाय पडेल आणि केव्हा कोणती निषेधसभा भरवली जाईल, याचा काही नियमच उरलेला नाही. कम्पॉझिटर्सबद्दल बोलत असताना 'प्रुफे ही कधीच फुलप्रुफ नसतात असं मी बोलून गेलो मात्र, लागलीच कम्पॉझिटर्सची निषेधाची सभा! खरं पाहता त्यांनी हा विनोद भिकार आहे, श्लेष रटाळ आहे, असं म्हणायला हवं होतं. परंतु त्यांनी निषेधाचा एक छापील ठराव पाठवला. “आपण आमचा व्यावसायिक प्राइड दुखावला आहे' असं त्यांनी त्यात लिहिलं होतं. परंतु त्यातही पुन्हा इमानानं छपाईची चूक करून त्यांनी व्यावसायिक प्राइडला व्यावसाइक ब्राइड केलं. आणि तेव्हापासून कम्पॉझिटर्सबरोबर माझी पत्नीही माझ्याकडे संशयानं पाहू लागली.

माझे आजोबा लेखक होते. त्यांनी हिंदू सणांचा इतिहास लिहिला आणि टागोरांच्या गीतांजलीचं भाषांतर केलं. माझे वडील कारकुनी आणि कागद

विकण्याचा धंदा करीत. त्यांनी कोरे कागद विकण्याचा अधिक प्रामाणिक धंदा केला, मी छापलेले कागद विकतो. मी वकील व्हावं, ही वडिलांची इच्छा - तसा मी वकिलीची परीक्षा पास झालो आहे - परंतु वकील होण्याबरोबरच मी गवई व्हावं अशीही त्यांची इच्छा होती. बहुधा वकिलीचा धंदा मला जमणार नाही, तेव्हा पोटापाण्यासाठी तरी मी गवई व्हावं; असंही त्यांना वाटलं असेल. आता पाहा, माझ्या आजोबांना मी लेखक व्हायला हवा होतो, वडिलांना मला गवई करायची इच्छा होती, आणि मला नट व्हायचं होतं. सध्या मी माझ्या पित्याची, पितामहांची आणि माझी स्वत:ची; अशा सर्वांच्या इच्छा पुऱ्या करण्यात गुंतलो आहे. नट, वकील, लेखक, गवयी एकदम होण्यात तशी गंमत आहे.

परंतु त्याहून गंमत अशी की - गवई मला लेखक मानतात, लेखक माझ्या गाण्याच्या ज्ञानाचं कौतुक करतात, आणि सहकारी नटमंडळी माझ्याकडून कायद्याचा सल्ला घेतात - हे व्याप मला पुरून उरतात.

कलेला कुरूपतेचं वावडं
मला विनोदकार म्हटलेलं आवडत नाही, मी विनोदाचा कारखाना उघडलेला नाही. मला जसं लिहायला आवडतं, तसं मी लिहितो. वाचक हसले म्हणजे मला आनंद होतो. परंतु त्यांना विनोदातील कारुण्याचं दर्शन घडतं, तेव्हा मला खरं समाधान मिळतं. विनोदाचा उपयोग मी अनेकदा शस्त्रासारखा केला आहे. परंतु कमरपट्ट्याखाली न मारण्याची दक्षता मी घेतो - आता हे कमरपट्टेच काही लोक फार वर बांधतात, त्याला माझा नाइलाज आहे. जो विनोद दुखावतो, तो कुरूप असतो. कलेला कुरूपतेचं कौतुक असू नये...

माझा वाड्मयीन प्रवास सुखाचा झाला आहे, कारण मी कधी सक्तीनं लिहिलं नाही. खेरीज आधुनिक कथेतील प्रवाहांवर जिथं चर्चा होते, बदलत्या समाजातील आजच्या लेखकाचं स्थान वगैरे विषयांवर जिथं पेपर्स वाचले जातात, असले वाड्मयीन परिसंवाद मी टाळत आलो आहे. दिवसाचे चोवीस तास मला लेखकाच्या भूमिकेत राहायला आवडत नाही. मी लिहायला बसतो, तेव्हा मी लेखक असतो, स्टेजवर मी नट असतो आणि बसच्या लांब क्यूमध्ये उभा असलो म्हणजे मी इतर प्रवाशांबरोबर बस कंपनीला जोरजोरात नावं ठेवीत असतो. म्हणूनच परिसंवादाचे धूर्त व्यवस्थापक विद्वानांच्या मेळाव्यात भाग

घेण्यासाठी मला कधी बोलावत नाहीत आणि भारतीय किंवा कोणत्याही वाड्मयातील प्रवाह माहीत नसल्यानं मीही त्यांना चुकवून, त्या विद्वत्तेच्या जंजाळात अडकण्याऐवजी एखाद्या थिएटरमध्ये संगीतज्ञांच्या संगतीत रंगून जाणं, किंवा माझ्या आवडत्या पानांच्या दुकानासमोर वेळ घालवणं मी पसंत करतो. आपण तरुण आहोत असं तिथं मला वाटतं...

लेखकाचं स्वातंत्र्य
लेखकाच्या स्वांतत्र्याविषयी अलीकडे बरीच चर्चा चाललेली आहे. निर्मितिक्षम असा लेखक मला पाण्यावर तरंगणाऱ्या बर्फाच्या तुकड्यासारखा वाटतो. पाण्यातून जन्म घेऊन, आणि अधिकांश पाण्यात राहूनही तो जसा जरासा पाण्याच्या पातळीवर राहतो, तसाच समाजातून निर्माण झालेला सर्जजशील लेखक समाजातच मरतो, परंतु कलावंत म्हणून समाजाहून जरा उंचीवर जगतो. त्या बर्फाच्या खड्याचं अस्तित्व जसं पाण्यावर अवलंबून असतं, तसं त्या लेखकाचंही अस्तित्व समाजावरच पोसलेलं असतं, परंतु नीट निरखता यावं यासाठी जरा उंचीवर जगणं त्याला भाग असतं. लेखकाचं एवढं किमान स्वातंत्र्य मान्य केलं पाहिजे. जर त्याचं मस्तक उन्नत नसेल, तर त्याच्या निर्भय मनाचा, निर्भय वृत्तीचा साक्षात्कार अशक्य आहे आणि ही निर्भयता तर कलात्मक सर्जनाची मोठीच शक्ती आहे. समाजात रमणारा, त्यावर प्रेम करणारा लेखक या स्वातंत्र्याचा दुरुपयोग कधीही करणार नाही. मात्र ही विनीत वृत्तीची ओढ आंतरिक असायला हवी. याच वातावरणात लेखकाला आपल्या निष्ठांशी इमान राखता येईल. आपल्या निष्ठांना मानावं, इतरांना मानू द्यावं हा मला जाणवलेला लोकशाहीचा अर्थ आहे. केवळ तंत्रांच्या कोड्याचं अमानवी असमर्थनीय अशा निर्मितीचं प्रेम मला नाही. स्पेडला स्पेड म्हणा, असं जॉ पॉल सार्त्र यांनी म्हटलं आहे. शब्द जर दुबळे झाले, तर त्यांना ताकद देण्याचं आमचं काम आहे. जे दुर्बोध आहे, त्याचा भरवसा मला वाटत नाही. सर्व प्रकारच्या औद्धत्याचं ते मूळ आहे, असं मला वाटतं.

म्हणूनच टीकाकार जेव्हा मला लोकप्रिय लेखक म्हणतात, तेव्हा त्यातील कुचेष्टेच्या सुराकडे मी दुर्लक्ष करत आलो आहे. उलट माझे वाचक मला समजू शकतात, याचा मला अभिमान आहे. त्यांनी मला समजावं हीच माझी इच्छा आहे. मी त्यांच्यासाठी लिहितो, पण त्यांच्या खुशामतीसाठी लिहीत नाही. तुम्ही लिहिता म्हणजे काय करता, तर जो तुमच्याशी मनःसंवाद साधू शकेल, तुमच्याबरोबर हसू शकेल, रडू शकेल अशा वाचकांच्या शोधात तुम्ही असता. जे-जे विरूप आहे, विकृत आहे, ज्यातून विफलतेची भावना निर्माण होत आहे, त्याविरुद्ध मी आवाज उठवत आलो आहे. ढोंगीपणाविरुद्ध, तथाकथित बुद्धिवाद्यांच्या शाब्दिक शिष्टपणाविरुद्ध आणि 'इतरांशी आम्हांला काय कर्तव्य' या भूमिकेविरुद्ध मी नेहमीच शस्त्र उसपले आहे. हे शस्त्र आपोआपच माझ्या हाती आलं.

मी हसतो, मलाच हसतो. माझे वाचकप्रेक्षकही मग मला हसतात आणि एकाएकी त्यांच्या लक्षात येतं की, आपण स्वतःलाच हसत आहोत. समाजाच्या एकूण तब्येतीस ते बरं असतं. माझ्या लेखनातून एवढंच हाती लागावं, ही अपेक्षा. नेपोलियननी जोसेफाइनला म्हटलं, “मी तुझ्यावर प्रेम करतो, परंतु मला तुझ्यावर याहून शतपटीने प्रेम करायचं आहे''- मलाही म्हणावंसं वाटतं, “मी साहित्यावर प्रेम करतो, परंतु मला साहित्यावर अजून शतपटीनं प्रेम करायचं आहे!

पुस्तक - गाठोडं

Friday, April 29, 2022

रसिकतेचा महापूर : आणि मी एक पूरग्रस्त

एके काळी मला प्रश्न पडायचा की, माणसं इतक्या अरसिकपणानं जगूच कशी शकतात? आयुष्यात एकाही गाण्याला न गेलेली, नाटक न पाहिलेली, क्रिकेटमध्ये काय पाहायचं म्हणून विचारणारी, हॉटेलात भूक लागली तरच जायचं असतं असं मानणारी- अशी अरसिकतेच्या क्षेत्रातली एकाचढी एक मातब्बर माणसं मी पाहिली आहेत. त्या उलट रात्र ही गाण्या-बजावण्यासाठी किंवा नाटक-सिनेमा पाहण्यासाठी किंवा (परीक्षेला न लावलेलं) मस्त पुस्तक वाचण्यासाठी निसर्गानं निर्माण केलेली सोय आहे, अशी आमची धारणा असल्यामुळे ही घनगंभीर माणसं पाहिली की, एके काळी मला भीती वाटे. आपण रसिक आहोत अशी आपली बदनामी होऊ न देण्याची खबरदारी घेत ही माणसं आपली अरसिकता कसोशीनं जपत जगायची, पण आता मात्र अमक्या अमक्याला साहित्य-संगीत-कला यात अजिबात रस वाटत नाही असं ऐकलं की त्या माणसाला कडकडून भेटावं असं मला वाटतं. असली माणसं नवकवितेतल्या प्रतिभासृष्टीबद्दल बोलायची आपल्यावर सांस्कृतिक जिम्मेदारी आहे असं मानत नाहीत. कधी बायकापोरांनी फारच टुमणं लावल्यामुळे नाटक पाहायला गेले तरी नाटककारांनी नायिका परंपरानिष्ठ रंगवली आहे, की बंडखोर रंगवली आहे, याची त्यांना काळजी पडत नाही, उलट समोर जी दिसली तिला मेकअप करणाऱ्यांनी रंगवली होती, याची त्यांना खात्री असते. नाटक पाहायला गेलं की, रडू आलं तर रडायचं, हसू आलं तर हसायचं आणि पहिला अंक पडला की बटाटेवडा खायचा एवढंच त्यांना ठाऊक असतं आणि तेवढंच पुरतं. अशी सरळ गाण्याला गाणं म्हणणारी, नाटकाला नाटक, गोष्टीला गोष्ट आणि नाचाला नाच म्हाणणारी माणसं आता अल्पमतात जायला लागली आहेत.

एके काळी माणसं इतकी कलासक्त रसिक वगैरे झाली नव्हती आणि मुख्य म्हणजे त्यामुळे आपल्याला दुय्यम नागरिकत्व येतं अशी त्यांच्या मनाला खंत नव्हती, पण आता हे रेडिओ, व्हिडिओ, टी. व्ही., टेपरेकॉर्डर, सिनेमे, नाटक, एल. पी., टी. व्ही., टेपरेकॉर्डर, सिनेमे, नाटक, एल. पी., साहित्यजत्रा, पुस्तकदिंड्या, दरमहा भरणारी नाना प्रकारची साहित्य संमेलनं, परिसंवाद या भानगडीमुळे रसिकतेची लागण न झालेला निरोगी माणूस भेटणं मुश्कीलच झालं आहे. त्यातून तुम्ही , गायक, नट वगैरे होऊन चुकलेले असलात तर तो आकाशातील प्रभूच तुमचं रक्षण करो! तुमच्याशी बोलणारा “इरेस पडतो तर बच्चमजी मीही लेखक झालो असतो” अशा थाटात स्वतःची रसिकता तुमच्यावर फेकायला लागतो. नुकताच मी एका पंचतारांकित संस्कृतीतल्या नवरसिकाच्या तावडीत सापडलो. त्याच्या बायकोला- चुकलो मिसेसना “इकेबाना'मध्ये टेरिबल इंटरेस्ट आहे. माझ्यासारख्या रायटरनं एकदा 'विथ युवर ओन आईज' रेखानं केलेली इकेबाना फ्लॉवर अरेंजमेंट पाहावी, अशी त्याची इच्छा होती. त्यावर “रेखा कोण?” हा आमचा येडपट प्रश्न. त्यावर त्या फाइव्हस्टार गृहस्थाचं “रेखा म्हणजे माय वाईफ.” त्यावर “असं असं, युवर ओन वाईफ होय?” हा आमचा 'विथ युवर ओन आईज" मधला “ओन? डोक्यात चिकटल्यामुळे झालेला भोटमपणा. एवढं सगळं यथासांग झालं. मी म्हणालो, “मला काय कळतं?” ते म्हणाले, “जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात रस घेऊन जगावं-नाही तर ती नुसती श्वास घेतल्याची आणि सोडल्याची घटना झाली - इट इज नॉट जीवन! असं आपणच म्हटलंय...” (माझ्या कुठल्यातरी लेखात बेसावधपणे लिहून गेलेलीच वाक्यं लोक लक्षात का ठेवतात कोण जाणे!) शेवटी त्याच्या इम्पोर्टेड गाडीत बसून त्याच्या अठ्ठाविसाव्या मजल्यावरच्या फ्लॅटमध्ये गेलो. ज्याच्या घराणातल्या दहा पिढ्यांच्या आधीपासूनचे पूर्वज हसले नसतील अशा एका गांभीर्यमूर्ती नोकरानं दार उघडलं - दिवाणखान्यात हल्ली प्रचंड कापड दुकानात दर्शनी काचेच्या मागे जिवंत बाईसारखी दिसणारी शाडूची बाई साडीबिडी नेसवून उभी करतात त्या नमुन्याची स्त्री उभी होती. असल्या बायकांना पूर्वीचे कवी 'कमनीय' वगैरे म्हणायचे. “ही रेखा”, त्यांनी आपल्या मिसेसची ओळख करून दिली. मग रेखाबाईंनी मला मेणाच्या प्रदर्शनातल्या बाहुलीसारखा कळसूत्री नमस्कार केला आणि टी. व्ही.वर आजच्या बातम्या संपल्यानंतरच्या छापील हास्यासारखं हास्य केलं.

दिवाणखाण्यात पाहावं तिकडं नाना प्रकारच्या फुलदाण्यांत रंगीबेरंगी फुलं, देठ, गवताची पाती, नाना प्रकारचे अंगविक्षेप करीत उभी करावीत तशी मांडली होती, कर्तव्यबुद्धीनं मी ती पाहत होतो. वा! छान! वगैरे म्हणत होतो. वास्तविक 'इकेबाना' हा शब्द जरा जास्त ठसक्यात उच्चारला तर मराठीत शिवी म्हणून खपून जाईल. आणि रेखाबाई मला जपानमध्ये घराणी आहेत वगैरे ऐकवत होत्या व पुन्हा आपल्यासारख्या साहित्यिकांना आम्ही काय सागणार?" हे होतंच. आम्ही चांगले चार-पाच प्रकाशक पचवलेले साहित्यिक असल्यामुळे हे वाक्य नुसतेच 'गुगली' आहे हे ओळखून होतो. तेवढ्यात त्या देवीजींनी 'आपल्या देशात फुलांचं मनोगत जाणून घ्यायची कुणालाच कशी ओढ नाही" वगैरे सांगून आपली तलम रसिकता माझ्या लक्षात आणून दिली.

'फुलांचं मनोगत' वगैरे लेखी शब्द तोंडी झालेले पाहून चमकलोतच. माझ्या डोळ्यांपुढे फुलांचा मोठासा हार विकत घेतल्यावर “साहेब, पुड्यात तुळशीची पानं टाकायची ना?” हा प्रश्न विचारणारे आमचे मामा फुलवाले आले. फुलांचा उपयोग मयत, देव आणि पुढारी या व्यतिरिक्त इतर कशासाठीही केलेला खुद्द आमच्या फुलवाल्यालाच अमान्य - फार तर लग्नात नवरा-नवरीच्या गळ्यात टाकायला आणि इथे रेखादेवी फुलांच्या मनोगताच्या गोष्टी सांगत होत्या. फुलांच्या बाबतीत देव, मयत आणि पुढारी या वास्तव्यापासून दूर असलेल्या रेखाबाईंच्या त्या अर्ध्या टक्क्याच्या संस्कृतीबद्दल चार शब्द ऐकवणार होतो. (मी चालू साडेतीन टक्‍क्‍यांच्या संस्कृतीतल्या जमाखर्चातला अर्धा टक्‍का दहाव्या मजल्याच्या वरच्या मजल्यावर राहणारांसाठी राखून ठेवला आहे.) तेवढ्यात “आपण काय घेणार?” हा आल्हाददायक प्रश्न आणि तोही नाजूक स्त्रीस्वरात ऐकू आला आणि साडेठशहाण्णव टक्क्यांचं प्रतिनिधित्व करायचं माझं अवसान एकदम गळून पडलं.

पण तो चहा, केक, बिस्किटं आणि सांजा वगैरे गोष्टी मला भलत्याच महागात लागल्या. सांजाबिजा होईपर्यंत मिस्टरांनी आणलेल्या स्टिरिओ-साऊंड-टेपडेक वगैरे भानगडीवर मला रवीची सतार आणि त्यावरचं रसग्रहण ऐकावं लागलं. या सर्व वाजंत्रीवाल्यांचा उल्लेख रवी, विलायत, झाकीर, हरी असा एकेरी सलगीनं करणं हाही एक आपल्या रसिकतेची पिचकारी ऐकणाऱ्यांच्या अंगावर उडवायचा प्रकार आहे. तेवढ्यात रेखादेवींना 'इकेबाना'च्या जोडीला कवितेतसुद्धा इंटरेस्ट असल्याचं मिस्टरांनी सांगितलं. वास्तविक फुलांचं मनोगत वगैरे शब्दयोजनेतून मला या धोक्याचा अंदाज यायला हवा होता. काय घेणार? या प्रश्नानं घोटाळा झाला होता. "आपल्यासारख्या ख्यातनाम सा साहित्यिकांना माझ्यासारखीनं स्वतःची कविता वाचून दाखवायची म्हणजे एक प्रकारचे धाडसच आहे - पण....” अशी आणखी थोडी थोडी गुगली बॉलिंग करून त्यांनी आपली वही उघडली. अठठाविसाव्या मजल्यावरून आपण खाली उडी मारली तर आपण नक्कीच मरू की नुसत्याच तंगड्या मोडतील? हा प्रश्न माझ्या मनात चटकन तरळून गेला. तोवर अत्यंत कातर स्वरात कानावर पहिली ओळ आली. बाई भलत्याच भावनाबंबाळ झाल्या होत्या. “कवितेचे नाव आहे एक उदास सांज...' माझ्या डोक्यात उगीचच “आता माझा प्रवास आहे सांज्याकडून सांजेकडे' ही ओळ उड्या मारून गेली. इकडे बाई त्या कवितेतून निर्माल्य, अश्रूफूल, वेदनांनी झुकलेली वेल वगैरे बरंच काही होत चालल्या होत्या. मी कविता ऐकण्यात तल्लीन झाल्याचा अभिनय करीत शेवटच्या ओळीची वाट पाहत होतो. किंचित अळणी असलेल्या सांज्यात काही मिनिटांपूर्वी घातलेल्या मिठाला तरी जागणं प्राप्त होतं. शेवटी त्या उदास सांजेला कवयित्री धुळीत पडलेली कळी झाल्या आणि पाच-सहा सेकंद पुढची ओळ कानावर आली नाही. तेव्हा कविता संपली असेल याची खात्री पटून (आणि सांज्याला स्मरून) “वा छान!” म्हणालो. “उगाच!” रेखादेवी म्हणाल्या. “उगाच ना. खरंच,” मी. “उगाच हे माझ्या पुढच्या कवितेचं शीर्षक आहे!" रेखादेवी. आपण सिक्सर मारली अशा भ्रमात असलेल्या फलंदाजाला आवाज आला तो आपल्या बॅटचा नसून त्रिफळा उडाल्याचा होता, हे लक्षात आल्यावर जे काही वाटत असेल ते याहून निराळं नसणार. मग ती 'उगाच' सुरू झाली. “आज पाखरं का आली? उगाच! आज आसू का आले? उगाच! हे का झालं? उगाच! ते का झालं? उगाच! विष्णूसहस्त्रनामासारखं हे उगाच सहस्त्रनाम चालू होतं. मी नाइलाजानं त्यातल्या प्रत्येक उगाचला सलाम करीत ते उगाचच उगाळणं चालू असताना तो सगळा इम्पोर्टेड दिवाणखाना पाहून घेतला. “ही कविता म्हणायची रेखाला, कविसंमेलनात फार फर्माईश होते,” रेखापती म्हणाले. “मी मी आसू आसू झाले! डोळ्यातच बुडुनी गेले!” रेखाबाईनी आणखी एक पान उलटलं होतं. मला एक कोडं आहे. कवयित्री जितकी श्रीमंत तितकं तिच्या दु:खाचं माप जास्त. असं का? इथे चारी बाजूला घट्ट गादीतून कापूस उसवावा तशी त्या फ्लॅटमध्ये श्रीमंती उसवून बाहेर सांडत होती. आणि बाई कवितेतून सुई टोचल्यासारखी सारखी स्स-स्स-स्स करीत बसली होती. आणि तिला इतक्या सुखात ठेवणारा हा तिचा हा तिचा नवरा तिचं ते दु:ख नुसता ऐकत नव्हता तर चारचौघांना चहाबिहा देऊन ऐकवीत होता. आणि हे सारं करा पण आम्हांला रसिक म्हणा” यासाठी!

अशा वेळी सतार आणि तुणतुणं यातला फरक आपल्या बापालासुद्धा कळला नाही, असं सांगून सतारीच्या कार्यक्रमाची तिकिटं गळ्यात घालायला आलेल्या कुठल्याशा संस्थेच्या सेक्रेटरीला दारातूनच वाटेला लावणारे आमचे आप्पा सामंत मला शूरही वाटतात आणि सुखीही वाटतात. घरी जेवायला बोलावलं की सामंत वैनी ताजे फडफडीत मासे तळतात - मस्तपैकी बांगड्याची आमटी करतात. सोलाची कढी करतात- आग्रह करतात, कविता करून ऐकवीत नाहीत. आप्पा सामंत फक्त मासे या विषयावरच बोलतात. जेवताना उगीचच टेपरेकॉर्डरवर रविशंकर लाव, संतूरचं तुणतुणं चालू ठेव, भीमसेनचं (त्याच्या भाषेत सांगायचं म्हणजे) 'हा हू' ऐकव, असला रसिकपणा उधळीत नाहीत. त्यांच्या आयुष्यात त्यांनी कुठल्याही कलेची किंवा कलावंताची सावली आपल्या अंगावर पडू दिली नाही. त्यामुळे त्यांची कुठे थयथयही झाली नाही. आहार, निद्रा, भय मैथुनाच्या मस्त पातळीवर जगत आले.

“साहित्य-संगीत-कलाविहीन माणूस हा शेपूट किंवा वशिंड नसलेला साक्षात बैल आहे,' असं कुठल्याशा सुभाषितकारांनी म्हणून घोळ करून ठेवला आहे. पण साहित्य-संगीताची आवड नसलेले बैल दु:खी असतात म्हणून कुणी सांगितलं? आणि असलंच दुःख तर ते चूपचाप भोगतात. त्याच्या कविता करून इतरांना ताप देत नाहीत किंवा आपली गरिबी, दैन्य, वेदना वगैरे साहित्याच्या बाजारात मोडून खात नाहीत.

या सर्व प्रकारांत साहित्याइतका तर बिनभांडवली धंदा नसेल. बरं, एके काळी लेखक मंडळी आपला साहित्यिकपणा ग्रंथातून किंवा मासिकातून प्रकट करायचे! आपला साहित्यिकपणा प्रकट करून “हम भी कुछ कम नही' हे दाखवायची जबाबदारी वाचकांवर हल्लीसारखी पडली नव्हती. त्यातलं सगळ्यात कीव आणणारं प्रकरण म्हणजे हल्लीच्या लडिवाळ साहित्यिक लग्नपत्रिका! “आमच्या रंजूच्या लग्नाला नक्की या हं' असल्या लाडेलाडे ओळींची संपणारी आमंत्रणपत्रिका आली की मी ते लग्न टाळतो. तसल्या पत्रिकेतून इतकं लालित्य आणि लडिवाळपणा सांडत असतो की, त्या रंजूची मम्मी आपलं स्वागत गालगुच्चा घेऊन करील आणि “आयशकलीम खाऊन जायच्यं बरं का-” असं काहीतरी करील अशी भीती मला वाटते. माझ्या डोळ्यापुढे जुन्या लग्नपत्रिका उभ्या राहतात. त्यात कुणाचं लग्न कुठे, किती वाजता सगळं स्पष्ट असायचं. साहित्यिकपणा नव्हता. उलट लग्नांना 'शरीरसंबंध' वगैरे म्हणून माणसं सत्याच्या जरा अधिक जवळ जात होती. आणि इथे माझ्या पुढ्यात एक लग्नपत्रिका पडली आहे. त्यातली पहिलीच ओळ, “ओळखा पाहू कोण आहे ते?” अशी आहे. आता नुसती पत्रिका पाहून काय ओळखणार? मी आमंत्रणपत्रिकेच्या खाली आपले नम्रबिम्न काही दिसताहेत की काय ते पाहायला लागलो. त्यात नुसतं विसू आणि नलू एवढंच होतं. विसू आणि नलू या नावाची लेबलं चिकटलेली काही डझन मनुष्यमात्रे माझ्या ओळखीची आहेत कोण हे विसू-नलू म्हणत मी ती आमंत्रणपत्रिका वाचायला सुरुवात केली आणि माझ्या प्रतिक्रिया उमटत गेल्या. “ओळखा पाहू कोण ते?” (मी नाही ओळखत-गेलात उडत.) “तुम्ही तिला पाहिली असेल पाळण्यात.” (आम्ही शेकडो पोरं पाळण्यात पाहिली आहेत.) “ऐकले असतील तिचे बोबडे बोल” (पोरांपेक्षा आयाच जास्त बोबडं बोलतात.) “आमची पिंकी एक कळी उमलते आहे.”(नो कॉमेंट्स) “पिंकी आता नववधूच्या वेशात उभी राहणार आहे,” (नववधू ही काय भानगड आहे? जुनी वधू असते का?) “पिंकीला पप्पूसारखा जीवनसाथी मिळतोय,” (आता का? नववर म्हणा की!) स्वर्गातून देवांनी पुष्पवृष्टी करावी असे हे दृश्य." (देवांना दुसरा धंदा नाही.) “नक्की या हं!” (हा मराठीतला "हं कुणीतरी तडीपार करून कानडी नाहीतर गुजरातीत नेऊन टाकारे.) “तुमचे विसू आणि नलू.”

आता ही काय लग्नाची आमंत्रणपत्रिका आहे, की बेबीफूडची जाहिरात? त्या पत्रिकेवरच माझ्या प्रतिक्रिया लिहून त्या विसू-नलूला पाठवाव्या म्हणून पत्ता पाहायला लागलो, पण आपण साहित्यिकपणा मिरवायच्या नादात विसू-नलू पत्ताच काय, पण ते लग्न कुठल्या कार्यालयात आहे याचासुद्धा तपशील छापायला विसरले होते.

रसिकपणाची मी अशी हाय खाल्ल्यामुळे सांस्कृतिक सप्ताह, संगीत महोत्सव, हेमंत व्याख्यानमाला, नवरात्र महोत्सव वगैरे जाहिराती पाहिल्या की मला धडधडायला लागतं. माणसाला इतकी व्याख्यानं, गाणी, परिसंवाद, नाटकं, नाच वगैरे मिसळलेले हे इतकं सांस्कृतिक आंबोण खायची गरज आहे का?

त्यात पुन्हा शासनानं 'सांस्कृतिक खातं' काढून आणखी घोळ करून ठेवलाय, खरं तर साहित्य, संगीत कलांचा हा महापूर आवरता कसा येईल याचा विचार करायला हवा. अशाच विचारात मी एका सांस्कृतिक सप्ताहाच्या उद्धघाटनाला मुंबईला डेक्कन क्वीननं निघालो होतो. (चालू बांधिलकीच्या जमान्यात लेखकांनी स्वतः होऊन डे. क्वी.सारख्या भांडवलशाही गाडीच्या पहिल्या वर्गातून प्रवास केल्याचा जाहीर बभ्रा करू नये. गुपचूप जावे आणि कथा किंवा कविता लोकलमधून लोंबकळून जाणाऱ्यांवर लिहावी, हे साहित्यक तंत्र मी जाणतो. पण सत्य सांगायला हवे म्हणून डेक्कन क्वीनचा उल्लेख.) एक पहिलवान संघटनेचे किंवा तंबाखू अडत दुकानदार परिषदेचे अध्यक्ष वाटावेत असे गृहस्थ माझ्या शेजारच्या रिकाम्या सीटवर स्थानापन्न झाल्याच्या थाटात बसले. त्यांच्याबरोबरचा माणूस चेहऱ्यावर आदबीचा थर थापून उभा होता. काही वेळाने त्या आदबशीर गृहस्थांनी यांच्या हातात एक कागद दिला, आणि माझ्या कानावर प्रश्न पडला, “का हो भिरुंडे, हा बालगंधर्व म्हटांत तो होता कोण?” पुणे-मुंबई प्रवासात “बालगंधर्व कोण होता?” हा प्रश्न अस्सल मराठीत इतक्या खणखणीत आवाजात विचारणारा महाभाग आपल्याला प्रवासात शेजारी म्हणून लाभल्यामुळे पुढचे चारेक तास सुखात जाणार या आनंदात मी होतो, तेवढ्यात त्यांनी मलाच सवाल केला, “काय बाम्भेला निघाला का?” “हो!” “काय बिजनेस आपला?" “बिजनेस वगैरे काही नाही-पुस्तकं लिहितो.” “कितवीची?” “शालेय नाही, ललित साहित्याची लिहितो.” या उत्तराऐवजी मी नुसतं क ख ग घ ड म्हटलं असतं तरी चाललं असतं. “काय नाव?” प्रश्न आला. मी माझं नाव सांगितलं, ते त्यांच्या कानावर यापूर्वी कधीही पडलेलं नव्हतं. एके काळी मी थोडासा खट्टू झालो असतो. पण आज मी खुषीत होतो. “काय मिटिंग बिटिंगला निघाला काय?” “हो!” “तरीच फस्टक्लास. टीयेडीये असेल... स्वत:च्या पैशांनी आजकाल कोण जाईल फसमधून. आम्ही नेहमी कारनीच जातो, आज कार बोंबलली तेव्हा ट्रेननी जाणं आलं!”

“नक्की तंबाखू अडत दुकानदार परिषदेचे अध्यक्ष,' मी मनात म्हटलं.

“आपले नाव?” “आम्हाला वळखलं नाही का? भिरुंडे, सायबांना पेप्रातला फोटो दाखवा.” मग भिरूंड्यांनी पेपरातला त्यांचा फोटो दाखवला. फोटोखाली नाव होते आणि पुढे मजकूर होता. “सांस्कृतिक खात्याचे नवे मंत्री," मी, युरेका!' म्हणून ओरडायचं बाकी ठेवलं होतं.

सध्याचा सांस्कृतिक महापूर आवरायला असलंच भक्कम धरण पाहिजे होतं. रसिकतेच्या महापुरात वाहत चाललेल्या पूरग्रस्तांना हा केवढा दिलासा! साहित्य-संगीत-कला वगैरे भानगडींपासून निर्लेप राहिलेल्या त्या महा (काय) पुरुषाचं खडकी ते मसजिद बंदरपर्यंत चाललेलं घोरणं एखाद्या गवयाची दरबारातील आलापी ऐकल्यासारखी ऐकत राहिलो.

लेखक - पु. ल. देशपांडे
कालनिर्णय १९८४

Thursday, April 28, 2022

फैय्याज यांच्याशी पुलंविषयी बातचित - सुधीर गाडगीळ

गाडगीळ : नमस्कार... या ठिकाणी फैय्याजजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या चांगल्या मुहूर्तावर आजचा कार्यक्रम होतोय, याचा मला मनापासून आनंद होत आहे. सोलापूरकरांना कदाचित कल्पना नसेल मुळातल्या सोलापूरच्या असलेल्या फैय्याजजी प्रथमच आपला वाढदिवस सोलापुरात साजरा करताहेत, ही आज जास्त आनंदाची गोष्ट आहे. कलावंताचं वय सांगायचं नसतं, पण त्या खूप बिनधास्त आहेत, म्हणून हे कळण्याकरता त्यांचं वय कळावे. ७१ फक्त पूर्ण करतायत. फैय्याजजी, पहिलं नाटक तुम्ही पुलंचं केलं ना? या सगळ्या करिअरला आरंभ होताना ते कुठे आणि कोणतं?

फैय्याज : आता तुम्ही म्हणालात की मी १९६५ साली सोलापूर सोडलं. मुंबईला गेल्यानंतरचा हा सोलापूरचा पहिला वाढदिवस. म्हणजे मला मुंबईला जाऊन ५३ वं वर्ष चालू आहे. त्या काळामध्ये आधी सोलापुरात असताना मी लहानपणी कलापथकानं, मेळ्यातनं काम करत होते. जय हनुमान, जय बजरंग, श्रद्धानंद, मास्तर हसन याचं जे कलापथक होतं. म्हणजे मेळ्यांमध्ये मी गायची, काम करायची, डान्स करायची. नैतुद्दीन नावाचे माझे नातेवाईक होते. राम साठे म्हणून एक अधिकारी रेल्वेत काम करणारे गृहस्थ होते. त्यांनी सांगितलं 'छोटासा रोल आहे ढुल्ले आहे तुजणशी मधलां तो कर.' म्हटलं आधी मी पुस्तक वाचते. मी पुस्तक वाचले. त्याच्यात त्यांनी मला सांगितलं तुला मिसेस नाडकर्णीची भूमिका करायचीय. मिसेस नाडकणींचं “अय्या 555! वंडरफुलचं की ही!' असं त्यामध्ये आहे. विशाल महिला मंडळामध्ये मी त्यावेळेला काम केलं होतं. रेल्वेतली सगळी माणसं खूप आनंदानं काम करणारी. मी खूप कौतुकानं सांगते. निरंजन गोकर्ण, डॉ. रांगणेकर, उत्तम कसबे, जगन्नाथ ड्रायव्हस्चे काम करणारे बाबूराव कसबे, ह्या सगळ्यांच्या ग्रुपमध्ये मी पहिल्यांदा तुज्ञे आहे तुजपाशी मध्ये काम केलं. त्या नाटकामध्ये नंतर एकदोन प्रयोगात मी मिसेस नाडकर्णी केली आणि नंतर मी गीता म्हणून उभी राहिले, मुख्य भूमिकेत. गीताचा रोल करताना माझ्याबरोबर शामचं काम आजचे सोलापूरचे प्रख्यात, प्रथितयश दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी शामचं काम केलं होतं... (टाळ्या)

गाडगीळ : आपण 'विदुषक' आणि पुलंकडे जाणारच आहोत. जब्बारमधून बाहेर काढतो तुम्हाला आणि पुढे विचारतो. पुलंची आणि तुमची पहिली भेट कुठे नि कशी झाली?

फैय्याज : खरे म्हणजे ती माझ्या लहानपणीच झालेली आहे. तेव्हा पुलं सोलापुरात डॉ. दिवाडकरांच्याकडे यायचे.

गाडगीळ : दिवाडकर म्हणजे पहिली सासरवाडी

फैय्याज :- होय. भागवत चित्र मंदिरात ते एकपात्री प्रयोग करायचे. त्यावेळेला सकाळी ९.३० चा प्रयोग असायचा. डॉ. दिवाडकर आमचे फॅमिली डॉक्टर. आम्ही दिवाडकरांकडे जात असू. तिथे मी पहिल्यांदा पुलंना पाहिले व्यक्‍ती म्हणून. एकदिवसमी डॉक्टरांना म्हणाले ''डॉक्टर, मला त्यांचा कार्यक्रम ऐकायचाय.'' डॉ. दिवाडकरांचा मुलगा माझा क्लासमेट. त्यांची मुलगी निशा (आताची निशा पाटील) त्यावेळेला डान्स शिकत होती. डान्सची प्रेरणा मला निशापासून मिळाली. माझ्या शेजारी मीना किरपेकर राहायची. मीना गाणं शिकायची. रोज तिच्या तानपुऱ्याचे स्वर कानी पडायचे. तेव्हा मलाही असं वाटलं आपणही गाणं शिकावे. या सगळ्यांमुळं माझ्या मनामध्ये गाणं, डान्स आदींविषयी आवड निर्माण झाली.

गाडगीळ : दिवाडकरांकडे येत असतानाच पुलंना पाहिलं की पुलंची एखादी कलाकृती पाहिली.

फैय्याज : नाही, मी डॉक्टरांकडे गेळे आणि मग त्यांनी मला पुलंचा प्रयोग पाहायला नेलं.

गाडगीळ : कुठे?

फैय्याज : भागवत चित्रमंदिरात. त्यावेळी बटाट्याची चाळ'चा प्रयोग होता, एवढ्या मोठ्या सभागृहात लोक कान टवकारून, डोळे वटारूनऐकताहेत, पाहताहेत, हे मी त्यावेळेला अनुभवलं त्यावेळेला मी लहान होते. त्यामुळं मला त्यातलं काही कळत नव्हतं. पण हे गृहस्थ म्हणजे एक अजब रसायनच आहेत, हे मला जाणवलं होतं. मी घरी निघून आले. त्याच्यानंतर माझी पुलंशी जी भेट झाली ती थेट मुंबई येथे.

गाडगीळ : बरं... ती कुठे आणि कशी?

फैय्याज : त्यावेळेला पुलं देशपांडे हे अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष होते. मी त्यावेळी पेंढारकरांच्या 'जय जय गौरीशंकर'मध्ये काम करत होते. शिवाय नाट्य संपदेच्या म्हणजे मोहन वाघांच्या (मोहन वाघ आणि पणशीकर एकत्र होते.) नाटकातही मी काम करत होते. त्यावेळेला असं होतं की आपला एखादा कलावंत दुसरीकडे काम करायला जातो, हेच मुळी आवडायचं नाही. मी पेंढारकरांकडे काम करतेय म्हणजे काय! मोहन वाघ रोज साहित्य संघात पुलंकडे जाऊन पुलंचे डोकं खायचे. “आहो भाई, हे बघा ना, आमचे तिच्याकडे कॉन्ट्रॅक्ट आहे. ती पेंढारकरांच्या नाटकात काम करते. आमचाही प्रयोग त्याच तारखेला आहे. तेव्हा काय करायचं?' रोज ऐकून, ऐकून भाईंनी एकदा विचारलं, “काय रे मोहन ही कोण फैय्याज? या फैय्याजविषयी तू मला रोज येऊन त्रास देतोस.' असं म्हटल्यानंतर, त्यांनी सांगितलं. “आहे एक मुलगी सोलापूरहून आलीय. गाते, काम करते.' असं झालं. हा विषय तिथच राहिला. नंतर आले ते “कट्यार काळजात घुसली' प्रयोगाला.

गाडगीळ : बरे तुम्ही वसंतरावाबरोबर कट्यार करत असताना.

फैय्याज : वसंतरावांबरोबर मी एकदोन नाही तर ५०० प्रयोग केले. सोळा वर्ष. वसंतराव देशपांडेंचा सहवास आहे मला. म्हणजे मी मँहबोली बेटीच होती त्यांची. बसंतराव देशपांडे आणि पु. ल. देशपांडे खूप जिवलग मित्र. देशपांडे आडनाव जरी होतं तरी तसे ते जिवश्‍च-कंठश्च मित्र होते. पुलं आमच्या प्रयोगाला- कट्यार पाहायला आले. आमचा “कट्यार काळजात घुसला'चा प्रयोग साडे सहा तास चालला. म्हणून तर अत्र्यांनी लिहिलं ना त्यावेळेला की, “"कट्यावर घड्याळात घुसली.' ही अशी संगीतमय कट्यार हजार वर्षांत क्वचितच काळजात घुसली असं ते म्हणाले. अन्ने साहेबांनी भाषण केलं, या कट्यारीची एक धार आहे कलावंतांची. दुसरी आहे पं. जितेंद्र अभिषेकींची, टोक आहे पुरुषोत्तम दारव्हेकरांचं, मूठ आहे पणशीकरांची, मॅन आहे रसिक प्रेक्षकांची... असं अण्णांनी भाषण केलं. माझ्या अंगावर काटा येतो. इतकं सुंदर भाषण केलंय म्हणून सांगते तुम्हाला. भरभरपूर कौतुक केलं. पण मग पुलं, वसंतराव आणि पणशीकरांनी निर्णय घेतला की, हे नाटक आपण थोडसं एडिट करूया. पण दारव्हेकरांच्या परवानगीने. त्यावेळेला दारव्हेकर नागपूरला ऑल इंडिया रेडिओला नोकरीला होते. आणि आज तुम्ही जी “कट्यार' बघताय ती भाईंनी एडिट केलीय; वसंतराव देशपांडेंनी एडिट केलेली आहे, हे आज मुद्दाम मला प्रेक्षकांना सांगायचं आहे.

गाडगीळ : मात्र हे पुलंनी संपादन केलंय- (हो) हो (म्हणजे साडेसहा तासांवरून साडेचार-पावणे पाच-पाच तासांवर आणावं लागलं हे नाटकं)

गाडगीळ : तुमचं नाटक पाहायला आल्यानंतर त्यावेळेला 'कट्यार'विषयी दाद आणि सूचना पुलंनी कशी केली?

फैय्याज : ते आमच्या प्रयोगाला आले. दुपारी ४ वाजता प्रयोग होता. आधल्या रात्री बेगम अख्तरांचं गाणं होतं. मी खूप भाग्यवान होते. कारण बेगमबाईंच्या बरोबर भाईंनी पेटी वाजवली. तबला वसंतराव देशपांडेंनी वाजवला आणि तानपुर्‍यावर मी होते. अर्थात मी लिंबू-टिंबू. हे सगळ बघतच मी मोठी झाले. केवढी मोठी व्यक्तिमत्त्वे माझ्या शेजारी आहेत! आणि दुसर्‍या दिवशी भाई 'कट्यार...'विषयी बोलले. म्हणाले, 'काल बेगमचे गाण मी ऐकलं त्याची प्रचिती आज फैय्याजचं गाणं ऐकून आली.' (टाळ्या)

गाडगीळ : क्या... बात है...

फैय्याज : मी आणि भाई काम करत गेलो. नंतरच्या काळात कट्यारच्या २०० व्या, ५०० व्या प्रयोगाला आले. त्या खूप आठवणी माझ्याकडे आहेत. प्रचंड म्हणजे प्रचंड आहेत. पण भाईंनी सांगितलं की काल रात्रीच मी बेगमबाईंचं गाण ऐकलं, ही मुलगी होती म्हणे तिथे. आणि आज हिची ठुमरी मी ऐकली. तर तिच्या गाण्याची प्रचिती मला आज आली.

गाडगीळ : त्या गाण्याची प्रचिती आम्हालाही याबी म्हणून... ती ठुमरी इथं... तिचा छोटा मुकडा इथं..

फैय्याज : लागी कलेजवा कट्यार... (ही ठुमरी गायली) बेगम अख्तरांची स्वर लावायची एक पद्धत होती. ते म्हणायचे की बघ त्या बाईंच्या गाण्यामध्ये काही तरी आहे, ती ईश्‍वराकडून घेऊन आली होती.

गाडगीळ : आता फैय्याजजींनी उल्लेख केला. त्याप्रमाणे वसंतराव देशपांडेशी मी अनेकदा गप्पा मारल्या. वसंतराव मला सांगायचे की, पुलं आणि मी एका घरातलेच असल्यासारखेच होतो इतकी आमची घट्ट मैत्री होती. एक दिवससुद्धा आम्हाला एकमेकांशी भेटल्याशिवाय चैन पडत नसे. फक्त मी गेलो की गप्पाष्टकं इतकी रंगतात की पुलंचं लेखन तसंच राहून जात असे. त्यामुळे सुनीताबाई शक्‍यतो, मी आलो की भाई झोपलाय, असे काय काय सांगायच्या. असं वसंतरावांनी त्यावेळी मला सांगितलं होतं. एक गंमत त्यांनी सांगितली होती की वसंतराव म्हणाले की मी त्यावेळेला एका डिफेन्स अकाऊंटस्‌मध्ये कामाला होतो. आणि पिल्याचा फोन यायचा (म्हणजे पुलंचा). वसंता, तुझ्या ऑफिसच्या जबळच शरद तळवलकर, राजा परांजपे वगैरे सगळ्यांचं शुटिंग आहे. सांगतो बरं का पिल्याचा फोन आला की माझा कोट काढून त्या खुर्चीला लावायचो. अशासाठी की ऑफिसमधल्या लोकांना वाटावं इथंच कुठंतरी गेलाय. सायकलवरनं टांग टाकून मी पलीकडच्या गोळीबार मैदानावरच्या मंगल स्टुडिओमध्ये जायचो तिथे हे सगळे मराठीतले अवलिया कलाकार जमलेले असायचे. तिथे एक सिनेमाचं चित्रण चाललं होतं. पिल्यामुळे मी त्याच्यात काम केलं आणि ६ आवाजात ते गाणं गाजलं. 'पेडगावचे शहाणे'मधलं. असो. मला एक सांगा पुलंच्या 'वटवट'मध्ये पहिल्यांदा तुम्ही काम केलंत प्रत्यक्ष त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते कसं काय?

फैय्याज : ते साल होतं १९७१. मी 'तो मी नव्हेच!' मध्ये काम करत होते. तेव्हा पण मी चन्नक्का करत होते तेव्हा. एकंदरीतच मी 'तो मी नव्हेच!'चे हजार प्रयोग केले. त्या हजार प्रयोगांमध्ये दोन अडीचशे मी चन्नक्का केली. पुढचे सातशे साडेसातशे सुनदा केली भाईंच्या बटाट्याची चाळ'चा प्रयोग बालगंधर्वला होता. आणि आमचा तो सेट म्हणजे सबंध कोर्ट सीन असायचा. पणशीकर त्या पिंजऱ्यामध्ये जी साक्ष असेल ती इकडच्या पिंजर्‍यामध्ये, मध्ये सगळे बसलेले बकील वगैरे. बर जज बसलेला असायचा. माझी एंट्री झाली. नंतर जेव्हा 'वटवट'मध्ये माझं सिलेक्शन झालं, तेव्हा मला सुनीताबाईंनी सांगितलं. “तुला माहितंय का? भाईंनी तो चन्नाक्काचा सीन पाहिला आणि आम्ही ठरवलं, अरे, ही मुलगी गुणी आहे. हिला आपण आपल्या कुठल्या तरी एका प्रॉडक्शनमध्ये घेऊया आणि तुला घ्यायचं ठरवलं. मध्ये मी तीन-चार गाणी, भाईंबरोबर एक ड्यूएट लावणी. एक नाट्यसंगीत, तीन-चार सीन. ते आकाशवाणीवर्चे डिरेक्टर आणि तो एक परिसंवाद असतो. तर तिथं मी बोलणार आहे. तो कुठला परिसंवाद तर “कुटुंबनियोजन... मी इतकी हसायची की मला हसू आवरता यायचं नाही. माझं पोट दुखायचं. पण भाईंकडून हे शिकले की आपण लोकांना हसवायचं असतं. आपण नाही हसायचं... भाई यत्किंचितही हसायचे नाहीत. पण मला सवय नव्हती ना. विनोदी नाटकात मी कधीच काम केलं नव्हतं. अशा छोट्या छोट्या गोष्टी मला भाईंकडून शिकायला मिळाल्या. त्याच्यामध्ये एक वाक्‍य होतं की 'अहो, काय बळीभद्रे मॅडम... तुम्ही म्हणे रोज बोलत म्हणे...अहो रोज कुटुंबनियोजन करून करून मला बाई आता कंटाळा आला.' (हशा) अशा त्या बळीभद्रे बाई. मला ना भयंकर हसायला यायचं. पण त्यांची भीती पण असायची, एवढं मोठं व्यक्तिमत्त्व आपल्या शेजारी काम करतंय...

गाडगीळ : प्रॅक्टीस कुठं व्हायची ती?

फैय्याज : पहिले काही दिवस तालीम झाली ती भुलाभाई देसाई रोडला मुंबईत आणि नंतर जे जुनं रवींद्र होतं तिथे प्रभादेवीला. तिथे आमच्या तालमी झाल्या. बघा, ही माणसं का मोठी होती हे त्यावेळेला कळलं. भाई बासरी-ढोलकी - भाई पेटी वाजवायचे. भाईंचं लिखाण, भाईंचं संगीत-दिग्दर्शन... म्हणजे सबकुछ पुलं म्हणजे पुलं आणि सुनीताबाई. ही मंडळी खूप प्रामाणिक होती. पहिल्या दिवशीच मला कल्पना दिली, 'फैयाज, आम्ही कुठल्याही पात्राचं नाव अँडव्हरटाईजमध्ये देत नाही. फक्त पु. ल. देशपांडे प्रतिष्ठानचे कलावंत असं देतो. आम्ही अनाऊंसमेंट करू अंक सुरू व्हायच्या अगोदर, पण पेपरमध्ये वर्तमानपत्रात कुणाचंही नाव नाही. पु. ल. देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित “बटबट वटबट' प्रमुख भूमिका सुद्धा नाही.' मला सांगितलं होतं, तुला दीडशे रुपये नाईट देऊ. इतके प्रामाणिक. मी पणशीकरांना विचारलं, मी काय करू? त्यावेळेला माझे “विच्छा माझी पुरी करा', “अश्रूंची झाली फुले', “तो मी नव्हेच', कट्यार काळजात घुसली' आदी चालू होतं. म्हटल, मी काय करू? पणशीकर म्हणाले, 'सोड ही सगळी नाटकं. एक कट्यार कर आणि भाईंच्या बरोबर काम कर.'

गाडगीळ : वटवट करणं...

फैयाज : आणि मी 'बटवट'मध्ये काम केलं. न भूतो न भविष्यती असा एका वेगळा अनुभव म्हणजे, वसंतरावांबरोबर काम करताना भाईंबरोबर्चा वेगळा त्यांचा असा क्रीम ऑडियन्स असायचा- मध्यमवर्गीय, पांढरपेशा. म्हणजे फारच क्रीम हो.

गाडगीळ : मला एक सांगा, की पुलं नाटक बसवून घेत असताना ते करून दाखवत की फक्त उच्चारण करत आणि तुम्हाला करायला सांगत.

फैय्याज : ते स्वतः करून दाखवायचे. हाच तर त्यांचा दिग्दर्शनाचा भाग होता. ते खूप सुंदर शिकवायचे. माझ्या मनात खूप इच्छा आहे की “वटबट' कुणी तरी करावं किंबा मी स्वतः करावं. पण भाईंची भूमिका करणारा मला कुणीच दिसत नाही. बासरी कोण वाजवणार? ढोलकी कोण वाजवणार? पेटी बाजबायला मिळेल, पण गाणार कोण? पुलंचं काम करणार कोण?

गाडगीळ : आता ज्या “बटवट'मुळे टाळी आली. त्या 'बटवट'मधल्या सात-आठ गाण्यांपैकी एक गाणं तरी पुलंनी कसं शिकवलं? आणि तुम्ही कसं पाठ केलं ते सांगा.

फैय्याज : एक ड्युएट घेऊयात. द्वंद्वगीत जे भाईंबरोबर शिकले.

गाडगीळ : इथे दोन्ही आवाजात तुम्हीच म्हणणार ना.

फैय्याज : हो... हो. द्वंद्वगीत - मी मागीन ते सांगीन ते सांग देणार का?

गाडगीळ : फैयाजताई याच काळामध्ये तुम्ही ऋषीकेश मुखर्जींच्या बरोबर काम करत असल्यामुळे मुखर्जी हे अनेकांना घेऊन प्रयोग पाहायला येत असत ना... त्यांच्यात आणि पुलं-सुनीताबाईंचा संवाद व्हायचा का? पुलं आणि सुनीताबाईंच्या काही अटी असायचा का?

फैय्याज : नाही हो, हे जे दाम्पत्य होतं ना, अतिशय शिस्तीने वागणारं होतं. कधी-कधी असं वाटायचं, काय बाई तरी...पण नाही, आता वाटतं की शिस्त हवीच. प्रत्येक कलावंतामध्ये एक रंगभूमीची म्हणून एक शिस्त असते. ती शिस्त या दोघांमध्ये होती. ते मी बर्‍याचदा अनुभवलंय. “वटवट' बघायला त्यावेळेला सलील चौधरी (संगीतकार), हेमंतकुमारांना आणलं, ऋषीदांनी आणल ही सगळी बंगाली माणसं आपलं आपलं सगळ जपून असतात बर का! फक्त मराठी माणूसच जपत नाही. एकमेकांचे पाय ओढण्यात आपण धन्यता मानतो.

गाडगीळ : मराठी माणसांमध्ये एक गोष्ट कॉमन पक्की आहे. दुसर्‍याच्या निगेटिव्ह गोष्टींवर चर्चा करण्यात आपण पॉझिटिव्ह वेळ खूप घालवतो. (हशा)

फैय्याज : आता बघा ना... पंजाबी लोकसुद्धा त्यांचं कपूर, खन्ना, अमुकतमुक सगळं, आपलं धरून असतात. बंगाली लोकसुद्धा मुखर्जी काय मुख्योपाध्याय काय, कुणाल सेन काय. तुम्हाला सांगते कारण त्यावेळेला सगळ्या बंगाली लोकांना घेऊन यायचे. कौतुक एवढ्यासाठी आहे मला भाईंचं. या काळात ते “बटवट'च्या अगोदर कलकत्त्याला जाऊन तीन महिने राहिले होते. शांतीनिकेतनमध्ये ते बंगाली शिकायला राहिले. कारण रवींद्रनाथ टागोरांचं साहित्य आपल्याला समजावं, वाचल्यानंतर कळावं, हा ध्यास त्या वयामध्येसुद्धा पुलंना होता.

गाडगीळ : कमाल! तुमच्याकडे नाटक पाहायला आलेली ही जी कलावंत मंडळी होती, त्यांना पुलंना बंगाली येतं, हे कळलं होतं का?

फैय्याज : माहीत होतं त्यांना. कौतुक होतं त्यांना की भाई कलकत्त्याला जाऊन बंगाली शिकून आले. म्हणून तर एवढ्या लोकांना घेऊन यायचे ऋषिदा.

गाडगीळ : काय प्रतिक्रिया होती सलीलदांची. प्रत्येकाच्या सांगा.

फैय्याज : जया भादुरी आणि अमिताभचं नुकतंच लग्न झालं होतं तेव्हा. ऋषिदा आले आणि त्यांनी सांगितलं की पुलंना... 'आमिताब बच्चन और जया को ये दिखाना चाहता है हम...' चाहती है, चाहता है हा त्यांना स्त्रीलिंगी -पुल्लिंगीचा बंगालींना प्रॉब्लेम असतो बरं का! तर पुलंनी उत्तर द्यायच्या आत सुनीताबाई म्हणाल्या, 'काही हरकत नाही आणायला, पण अमिताभ बच्चनला मोठी गाडी घेऊन येऊ नको म्हणून सांग बाबा. कारण आमच्या शिवाजी मंदिरला पार्किंगला तेवढी जागा नाहीए. पण त्यांनी छोट्या गाडीत यावं. आणि तिसरी बेल व्हायच्या अगोदर स्थानापन्न व्हावं पहिल्या रांगेत. कारण एकदा आमचा पडदा उचलला गेला. भाईंची एंट्री झाली आणि जर का... अमिताभ आणि जया आले तर सगळं लक्ष त्यांच्यावर केंद्रीत होणार आणि भाई डिस्टर्ब होणार.' पण बिचारे अमिताभ बच्चन आणि जया तिसऱ्या बेलच्या अगोदर येऊन बसले हो तिसर्‍या रांगेत! आख्खं नाटक त्यांनी पाहिले. कौतुक केलं. आतमध्ये आले भेटले सगळ्यांना.

गाडगीळ : मला एक सांगा 'वटवट'मध्ये ७,८ पदं आहेत, त्यात एक लावणीदेखील आहे, कुठली?

फैय्याज : मेला म्हातारा' ही लावणी हृषीदांना फार आवडायची. ते म्हणाले की 'ओ आमको पशंद है बो लावनी' त्यांनी मदन-मोहनला आणलं एक दिवस. मदन-मोहनला सांगितलं की तुला शब्द बांधून देईन, पण या लावणीच्या चाळीचे गाण बावर्चीमध्ये घालायचं ठरलं.

फैय्याज : ते स्वतः याच्यात म्हातारा बनून यायचे काठी घेऊन. भाईंचं बोलणं म्हणजे खूप छान. त्याकाळी माणिकबाई दिसायला सुंदर होत्या. पुलं, वसंतराव देशपांडे आदींना माणिकबाईंविषयी जरा जास्त आपुलकी होती. वेगळ्या अर्थानं नाही, पण आपुलकी होती. त्याकाळात वयोमानापरत्वे असेल. जेव्हा अमर वर्मांशी बाईंचे लग्न झाले, त्या दिवशी भाईंनी एक सांगितलं, अमरने बाईशी लग्न केलं आणि आमच्या सगळ्यांच्या वर्मावर म्हणे घाला घातला.

गाडगीळ : मला एक सांगा फैय्याजजी की. तुमच्या गद्य आवाजाबद्लसुद्धा ते काही बोलले होते ना. काय म्हणाले होते?

फैय्याज : खरं म्हणजे मागे एकदा तुम्ही हा प्रश्‍न मला विचारला होता की, तुम्ही सिनेमात बरीच गाणी गायलीत. तर तुम्ही त्यात- प्लेबॅक सिंगींगमध्ये - करिअर का नाही केले? तर त्यावेळेला मी तुम्हाला उत्तर दिलं होतं की, आवाजाच्या काही जाती आहेत. तर माझी जी आवाजाची जात आहे. मला न्यूनगंड होता. त्यामुळे मी गाऊ शकत नाही. सिनेमात हिरॉईनच्या तोंडी माझं गाणं नाही. त्यामुळे लोकप्रिय होत नाही. असा माझ्यामध्ये एक कॉम्प्लेक्स आला होता. वाईट वाटायचं मला. ड्यूएट गातानासुद्धा भाईंना थोडा त्रासच झाला. पण तेच संगीत-दिग्दर्शक असल्याने ते त्यांनी सगळं बरोबर अरेंज केलं. बर्‍याच ठिकाणी मला त्रास व्हायचा गाताना, पट्टी सांगावी लागायची. कधी पांढरी सात, काळी ५ सुद्धा. वसंतराव म्हणाले, “अरे... या पोरीच ना... दीड सप्तकी आवाज आहे. त्यांनी सांगितलं पुलंना.. दीड सप्तकी आवाज आहे. पुलं म्हणाले, “अरे वसंता, जगातले, सगळ्यात बेस्ट क्वॉलिटीचे जे आवाज आहेत ते बेसमधले आहेत. ती क्वॉलिटी आहे. माझी समजूत घातली. दोघांनी समूपदेशन केलं माझं. पण नाही ना. माझा आवाज चढा नाहीए, त्याला मी काय करू? मग वसंतराव म्हणाले, “अग, फैय्याज खाँ साहेबांचे दीड सप्तकी तर आहे.'' पण त्या एक सप्तकामध्ये सुद्धा काय नखरा, काय गाणं होतं. माझी खूप समजूत घातली. म्हणून मी सिनेक्षेत्रात, पार्श्वगायनामध्ये फार गेले नाही. ज्याला एक उत्तम बॅकग्राऊंडचं गाणं लागतं. गाण्याला एक सिच्युएशन अशी असते की, हिरोईन गाणार नाही, पण बॅकग्राऊंडला गाणं वाजतं. मग अशी गाणी माझ्याकडून जयदेवजींनी गाऊन घेतली. आर. डी. बर्मननी माझ्याकडून गाऊन घेतलं. माझ्याकडून वसंत देसाईंनी, सी. रामचंद्र यांनी गाऊन घेतलं.

गाडगीळ : या सगळ्या गाण्यांच्या प्रकारामध्ये तुमचा स्वतःचा व्यक्‍तिगत रस आणि पुलं आणि वसंतरावांनी या तुमच्या निकट असलेल्या, पुलंचाही रस गझल, ठुमरी यामध्ये मुख्यत्वे होता.

फैय्याज: नाही मला, लहानपणापासूनच उत्तर हिंदुस्थानी गायकीमध्ये रस होता.

गाडगीळ : अहो, त्या तिघांबरोबर तुम्हाला काम करता आलं. त्या त्या बिंदूला पुढे केवढं महत्त्व आलं.

फैय्याज : या तिघांच्या सहवासात मला काम करता आलं, खूप काही शिकता आलं, याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजते. वसंतरावांबरोबर १६ वर्षे काम केलं. त्यानंतर बेगम अख्तर यांच्या सहवासात राहिले. बेगम अख्तरांनी मला गंडा बांध म्हणून सांगितलं होतं. हे मी अनेकदा सोलापूरकरांच्या समोर बोलून झालंय, की मला बोलावलं होतं लखनौला. “हमारा गंडा बनवाओ, हमारी बेटी बनके, हमारे साथ लखनौ मे रहो' पण नाही जाणं झालं मला.

गाडगीळ : पुलंना आवडलेली ठुमरी आणि तुमची गझल.

फैय्याज : बोलण्यासारखं सांगण्यासारखं खूप आहे. जेव्हा पुलं आजारी होते, त्याही अवस्थेमध्ये ते शुद्धीवर यायचे तेव्हा बऱ्याचदा असं व्हायचं की थोडं विस्मरणात जायचे थोडं परत बोलायचे. मला म्हणाले की. 'अग. एक बेगमची गझल गाऊन दाखव' आता म्हणायला तर पाहिजे. पण माझी अशी तयारी नव्हती. कारण तब्बेत बरी नाहीये. पण मी म्हटलं ते गाणं. त्यावेळी सुनीताबाई, त्यांचे भाऊ सुभाष ठाकूर तेथे होते. म्हंटल मी.. गाणं- हर है मंझील... राहे मुश्किल. आलाम है. तन्हाई आलम है तन्हाईका... लगेच भाई म्हणाले, “बघ बेगमच्या गाण्यामध्ये सरगम नाही, ताना नाहीत, फार फिरक्या नाहीत. पण तिचं गाण म्हणे हृदयातलं आहे.

गाडगीळ : व्वा...

फैय्याज : जी दर्द आहे, ती भरून आली. आवाज म्हणजे लोणी आहे ग लोणी! हे शब्द आहेत बरं का भाईंचे.

गाडगीळ : फैय्याजजी, मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो की, मला वाटतं भैरबीसुद्धा तुम्हाला पुलंनी शिकवलेली आहे ना?

फैय्याज : अशोक रानडे काय किंवा पुलं काय हे दोघेही ग्रेटच होते. भाईंनी माझं कौन्सलिंग तर आवाजासाठी केलंच केलं. पण मला अनेकवेळा सल्ला दिला. ते मला म्हणायचे, “फय्याज, आज तुझी परिस्थिती अशी आहे, की तू गाण्यांचा एक मंच उभा कर, नवीन गाणी घे, त्याला चाली लाव आणि नवीन लोकांकडून गाऊन तू एक तुझा ग्रूप फॅर्म कर. तुझ्याकडे बेगम साहेबांचं गाणं आहे २-४ ठुमर्‍या, एक ७-८ गझला असा एक कार्यक्रम तू बसव आणि ते आम्ही सादर करू. आम्ही आमंत्रण देऊ थेटर आमचं असेल आणि पब्लिसिटी आम्ही करू. उर्टूचे सरदार अली जाफरींना आपण बोलवूया, महंमद एहमद खान साब जे होते बेगम साहेबांच्या बरोबर, तसा वाजवणारा पाहिजे. बेगम अख्तर स्वत: वाजवून गायच्या ना. हा त्यांचा प्लस पॉईंट होता. त्या स्वत: बाज्या वाजवायच्या.''

(जन्मशताब्दी पुलोत्सव, सोलापूर, दि. ५ जानेवारी २०१९ रोजी सुधीर गाडगीळ यांनी अभिनेत्री फैय्याज यांच्या घेतलेल्या मुलाखतीचा संपादित अंश.)

शब्दांकन : पत्रकार संतोष पवार
असा असामी पुलं 

Thursday, April 21, 2022

भाईकाका - (जयंत देशपांडे)

प्रत्येक पिढी ही भाग्यवान असते. आमच्या पहिल्या पिढीने महात्मा गांधी, बालगंधर्व, मास्टर दीनानाथ, ह्यांच्या सारखी अनेक थोर माणसं पाहिली. आमची पिढीही भाग्यवानच म्हटली पाहिजे, कारण आम्ही लता मंगेशकर, ग. दि. माडगूळकर, सुधीर फडके, शिरवाडकर, पु. ल. देशपांडे ह्यांना पाहिलं व ऐकलंही. माझ्या हातून गेल्या जन्मी काहीतरी मोठं पुण्य झालं असणार म्हणूनच माझा जन्म देशपांडे कुटुंबात झाला. सर्व कुटुंबच मुळी रसिक. सर्वात मोठी वच्छीआत्या, भाईकाका, नंतर माझे वडील उमाकांत व नंतर रमाकांत. वच्छीआत्या व मीराआत्याचे लग्न माझ्या जन्माआधीच झालं होतं. वच्छीआत्या म्हणजे मायेचं पांघरूण होतं. सर्व भावंडांना आईबरोबरच तिने वाढवल्यामुळे तिच्याबद्दल सर्वांना आदरयुक्त प्रेम! धाकटी मीराआत्या ही समाजकारण, नाटक ह्यातच नेहमी गुंतलेली असायची. माझे वडील व रमाकाका यांच्यापैकी माझे वडील तबला वाजवायचे व नाटकात काम करायचे. रमाकांत हे उत्कृष्ट चित्रकार व चांगले अभिनेते-दिग्दर्शकही होते. जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्‌मध्ये ते शिकवत.

भाईकाका (पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे उर्फ पुलं) हे एक अजब रसायन होतं. काही लोक दैवी देणगी घेऊनच जन्माला येतात, त्यातलेच ते एक. हजरजबाबीपणा, तल्लख विनोदबुद्धी, मनमोकळा स्वभाव. वसंत बापट नेहमीच म्हणत, ‘भाईने अनेक क्षेत्रांत स्वैर संचार केला. संगीत, नाटक, लिखाण, समाजाबद्दल जाणीव, चित्रपटसृष्टी, पण कुठेही ‘गुळाचा गणपती’ होऊन बसले नाहीत. मात्र रसिकांच्या हृदयातली जागा त्यांनी कधीही सोडली नाही. त्यामुळेच ते महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व झाले.’ भाईकाका घरात एक व बाहेर एक असे कधीच वागले नाहीत. घरातही त्यांची थट्टामस्करी, विनोद सतत चालूच असायचे. एखादं अगदी साधं उदाहरण द्यायचं तर 'भाईकाका आंघोळ झाली?' उत्तर कधीही सरळ नाही. 'वाटत नाही? वास येतोय?' शेवटी व्हीलचेअरवर असतानाही गप्पांना बसत आणि बाथरूमला जायला निघाले की, ‘प्रवास झेपला तर येतो परत गप्पांना’ असं म्हणत हसत हसत जात. घरातही ते तेवढेच रमलेले असायचे. आमच्या घरातली सर्व मुलांची नावं भाईकाकांनी ठेवली आहेत. माझं जयंत, माझा धाकटा भाऊ हेमंत, बहीण मंगल, तसंच रमाकांतकाकाच्या तिन्ही मुलांची नावं विभावरी, राजेंद्र, मिलिंद ही सर्व त्यांनीच ठेवलेली. एवढंच काय, मला मुलगी झाली हे ज्यावेळी त्यांना मी फोन करून सांगितलं, त्यावेळी ‘‘जयंत हिचं नाव चंदा ठेव हं!’’ असं बजावलं होतं. घरातल्या सर्व मुलांचं त्यांना कौतुक होतं.

सुरुवातीला भाईकाका ग्रँटरोडला मॉडेल हाऊस येथे चौबळांच्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहायचे. नंतर ते वरळीला ‘आशीर्वाद’मध्ये राहायला गेले. मधूनमधून पार्ल्याचे दत्ता पाखाडे मला व आजीला सकाळी कामावर जाताना त्यांच्या गाडीतून भाईकाकांकडे सोडत व संध्याकाळी परत घेऊन येत. तो पूर्ण दिवस भाईकाका-काकीच्या सहवासात, छान छान गोष्टी ऐकण्यात जाई. त्या काळात घरात मोटार असणं हे श्रीमंतीचं लक्षण मानलं जाई. माझे वडीलही तेव्हा ‘फ्रेंच मोटर कार’ कंपनीत होते. त्यामुळे माझ्या बालबुद्धीला मोटार हे एकमेव श्रीमंतीचं माप वाटे. एकदा अचानक माझ्या लक्षात आलं की, भाईकाकांकडे मोटार नाही. मला तो त्यांचा कमीपणा वाटून त्यांना मी तसं विचारलंही. त्यावर त्यांनी मला खाली आणलं आणि टॅक्सीला हात केला. मला तिच्यातून छानपैकी फिरवून आणल्यावर उतरताना मला सांगितलं, ‘तुला जितक्या काळ्या-पिवळ्या गाड्या दिसतायत ना, त्या सगळ्या माझ्याच आहेत.’ त्यांना थांबवून माझं नाव सांग. तुला पाहिजे तिथे त्या नेतील. ह्या सांगण्यावर मात्र त्यांनी काकीकडून व आजीकडून लाडिक दमही खाल्ला. ‘काय रे भाई, काहीतरी शिकवू नको त्याला.’ पण, पुढे भविष्यात मीही तोच धंदा स्वीकारला व स्वतःची कार हायरिंग कंपनी काढली.

भाईकाका मला म्हणत, ‘अरे जयंत, आपण दोघांनीच आपल्या घराण्यात धंदा केला, मी हसवण्याचा आणि तू फसवण्याचा.’ माझा फसवण्याचा का, तर मी टूरिस्ट टॅक्सीवाला म्हणून आणि शेवटी टॅक्सीवाला हा फसवणारा म्हणून प्रसिद्ध असतो ना!


भाईकाकांनी घरचा गणपती कधी चुकवला नाही. खरंतर त्यांचा व काकीचा देवावर विश्वास नव्हता. तरीही ते १९७४ सालापर्यंत दरवर्षी गणपतीला पार्ल्याला येत. आमच्यासाठी ती एक पर्वणी असायची. ते येणार म्हटल्यावर त्यांचे सर्व जुने मित्र त्यांना भेटायला येत. त्यांचे एक जुने मित्र श्री. साठे (भाईकाका त्यांना बन्या म्हणत) हे दरवर्षी चेंबूरहून येत. ते येईपर्यंत आरती होत नसे. किंबहुना ही सर्व मैफल जमली की काकी किंवा माझी आई सतत माझ्या वडिलांना पूजा आटोपून घ्यायची सूचना देत. परंतु भाईकाकांची मैफल रंगात आली की ते म्हणत, ‘सुनीता, थांब थोडा वेळ. गणपती कुठे जाणार नाही. तो आमच्या गप्पांत सामील झालाय.' असं म्हणत आरती व जेवण होईपर्यंत संध्याकाळी दर्शनाला येणारी मंडळी येऊ लागत. त्यांची वाहवा मिळवण्यासाठी आम्ही मुले जीव तोडून आरास करीत असू. मी लहानपणी ढोलकी व तबला वाजवीत असे व माझा भाऊ हेमंत झांज. त्याचा एक सुरेख पाठ असे. पुढे १९७४ साली माझी आई कॅन्सरने वारली आणि भाईकाकांनी गणपतीला येणं बंद केलं. ती आजारी असताना शेवटी शेवटी भाईकाका रोज येत आणि निरनिराळे विषय काढून असे रंगवत की तात्पुरता आम्हांला आमच्या दुःखाचा विसर पडत असे.

प्रिमियर पद्मिनी
१९७५ सालची गोष्ट... मी त्यावेळी ‘बॉम्बे सायकल ॲण्ड मोटर एजन्सी’मध्ये कामाला होतो. भाईकाकांनी त्यावेळी फियाट गाडी घ्यायचं ठरवलं. भाईकाका गाडी घेत आहेत ही गोष्ट कंपनीत मालक लालचंद शेटजींपर्यंत गेली व त्यांनीही फॅक्टरीत, ‘व्हीआयपी गाडी करून द्या’ असं फर्मान काढलं.

गाडीची डीलिव्हरी घ्यायला मी आणि भाईकाका जाणार होतो. मी गाडी घ्यायच्या आधी चेक करतो असं सांगितल्यावर, माझे वडील जे स्वतःही त्याच कंपनीत कामाला होते, मला रागावले. म्हणाले, ‘अरे सर्वजण व्हीआयपी गाडी तयार करत आहेत. तू गुपचूप जाऊन डिलिव्हरी घे.' ठरल्याप्रमाणे मी आणि भाईकाका शोरूमला गेलो. त्यांनी भाईकाकांसाठी छोटा समारंभ ठेवला होता, तो आटपून आम्ही दोघंही आजीला गाडी दाखवायला पार्ल्याला निघालो.

पेडर रोडवरून खाली उतरताना गाडी टणाटण उडत होती. मी हाजी अलीला पेट्रोल पंपावर चाकातली हवा चेक केली तर काय, प्रत्येक चाकात दुप्पट हवा होती (व्हीआयपी गाडी). जरा पुढे जातो तर लक्षात आलं की, दरवाजाला आतून एक हँडलच नाही. घरी येऊन कंपनीला फोन केला. सायनला एक इंजिनीयर हँडल घेऊन उभा राहिला होता व तोच पुण्यापर्यंत आमच्याबरोबर येणार होता.

गाडी चेंबूर सोडून नव्या मुंबईच्या कोकण- भवनच्या चढावर त्रास देऊ लागली. पुढे हळूहळू आम्ही खोपोली गाठली. चहा घेऊन ऐतिहासिक खंडाळा घाट चढायला सुरुवात केली. दोन-तीन वळणं घेऊन गाडी गरम होऊन बंद पडली, थंड झाल्याशिवाय पुढे जाता येत नव्हतं. थंड होईपर्यंत भाईकाकांनी एक अप्रतिम विनोदी लेख लिहिला. त्या तापलेल्या आणि बंद पडलेल्या गाडीची तुलना त्यांनी भडकलेल्या बायकोबरोबर केली होती. लेखाचं नावं होतं, ‘माझी पद्मिनी जेव्हा रुसते’! पुण्याला पोहोचताच त्यांनी लालचंद शेटजींना फोन करून रविवारच्या ‘महाराष्ट्र टाइम्स’मधला लेख वाचायला सांगितला. परंतु दुसऱ्या दिवशी कंपनीची माणसं येऊन गाडी घेऊन गेली व सर्व ठीकठाक करून लगेच आणून दिली. त्यामुळे भाईकाकांनी तो लेख प्रसिद्ध केला नाही. पुढे तीच ऐतिहासिक गाडी त्यांनी मला आठवण म्हणून दिली.

एनसीपीए
साधारण १९८० च्या सुमारास भाईकाकांनी एनसीपीएच्या (नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्टस्‌) मराठी सांस्कृतिक विभागाची, संचालक म्हणून जबाबदारी स्वीकारली. जोडीला दुर्गाबाई भागवत व अशोक रानडे यांसारखी प्रतिभावान माणसंही होती. त्या काळात ह्या सर्व मंडळींनी मराठी रसिकांना अनेक सुंदर कार्यक्रम दिले. महिन्यातून साधारण ४ ते ५ दिवस ते एनसीपीएमध्ये राहत. त्यांची राहण्याची सोय एनसीपीएने फार छान केली होती. त्याच आवारात ‘रंगोली’ नावाचं एक चांगलं रेस्टॉरंट होतं. तिथे त्यांची, तसंच भेटायला येणाऱ्या पाहुण्याची जेवणाखाणाची सोय होती. भाईकाका तसे उत्तम खवय्येही होते. कुठलाही पदार्थ चवीने खात व आवडल्यावर तोंडभरून स्तुती करत. पण ‘रंगोली’त पदार्थांच्या किंमती जास्त आहेत म्हणून ते त्यांच्या ॲटेंडंटला त्यांच्यासाठी डाळभात लावायला सांगत. मिळतंय म्हणून त्याचा फायदा घ्यायचा, असं काकी व भाईकाकांनी कधीच केलं नाही. पार्ल्याच्या आमच्या घरी मात्र दीपाच्या हातचं जेवायला हक्काने येत. दीपा मालवणी किंवा कारवारी जेवण चांगलं करायची (म्हणजे आत्ताही करते). चायनीजही चवदार करायची. भाईकाका मुद्दामहून वेळ काढून जेवायला येत आणि बरोबर मित्रांनाही घेऊन येत. गोंविदराव तळवलकर, मल्लिकार्जुन मन्सूर, कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे अशा अनेक दिग्गजांचे पाय आमच्या घराला लागले. साधुसंत येती घरा, असा तो काळ होता.

भाईकाकांचा हजरजबाबीपणा आणि विनोदबुद्धी ही घरातही तेवढीच तल्लख असायची. नवरा- बायकोच्या कामाच्या वाटण्या हा काकींचा अगदी कळकळीचा विषय होता. त्यांचं ठाम मत होतं की बायका सगळी पुरुषांची कामं करतात, पण पुरुष कधीही बायकांची कामं करत नाहीत. एकदा भाईकाका म्हणाले, ‘‘सुनीता, हे तुझं काही खरं नाही हां... बालगंधर्वांनी पुरुष असून जन्मभर बायकांची कामं केली!’’

काकींचा आवाज मोठ्ठा आणि खणखणीत होता. त्यावरून भाईकाका नेहमी त्यांना चिडवत. एकदा ते खोलीत शिरले, तेव्हा काकी फोनवर बोलत होत्या. जरा चिडून बोलत असल्याने मोठा वाटतं होता आवाज. फोन संपल्यावर भाईकाका म्हणाले, ‘‘फोनवर बोलत होतीस ती, पुण्यातच की पुण्याबाहेर?’’ त्या म्हणाल्या, ‘‘अरे पुण्यातलेच एक संपादक.’’ त्यावर भाईकाका म्हणाले, ‘‘अगं मग फोनची तरी गरज काय आहे? नुसती त्या दिशेला तोंड करून बोललीस तरी ऐकू येईल त्यांना.’’

भाईकाकांच्या हजरजबाबीपणाचं आणखी एक उदाहरण - दादरच्या किंग जॉर्ज शाळेत भाईकाकांची मुलाखत चालली होती. राजकारणी, साहित्यिक, अनेक मान्यवर उपस्थित होते. सुधीर गाडगीळ मुलाखत घेत होते. खच्चून गर्दी. सुधीरनी एक प्रश्न पटकन विचारला- भाई, तुम्ही अनेक क्षेत्रांत संचार केलात, नाव कमवलंत, पण राजकारणात गेला नाहीत, ते का?’’ एका क्षणात भाईंनी उत्तर दिलं, ‘‘माझ्यात एक दोष आहे म्हणून मी राजकारणात गेलो नाही!’’ साहजिकच दुसरा प्रश्न ताबडतोब आला, ‘‘दोष म्हणालात तो कोणता?’’ हसत हसत भाई म्हणाले, ‘‘मी जे सकाळी बोलतो ते मला संध्याकाळी आठवतं!’’ लोकांनी जोरात टाळ्या वाजवल्या. फक्त एकटे पंतप्रधान श्री. नरसिंह राव उभे राहिले आणि कोपरापासून नमस्कार केला.

भाईकाका आणि काकींचे ड्रायव्हिंगचे किस्से ऐकण्यासारखे आहेत. भाईकाकांनी आयुष्यात कधी ड्रायव्हिंग केलं नाही. कायम काकी ड्रायव्हर. भाईकाका भित्र्या मनाचे, तर काकी अगदी उलट! भाईकाकांना गाडीची काच खाली करायची असली की अनेकदा दारच उघडायचे. हँडल्सचा गोंधळ आणि काय! त्यामुळेच गाडी रस्त्यावर आली की भाईकाकांची सुरुवात होई... सुनीता कुत्रा येतोय. मग त्या म्हणत- तो मलापण दिसतोय.

एकदा कोल्हापुरात गावातल्या शाळेत कार्यक्रम होता. ह्यांची गाडी शाळेच्या पटांगणात शिरली, तेव्हा मुलं लगोरी, गोट्यांसारखे खेळ खेळत होती. ती आरडाओरडा करत पळू लागली. ‘धावा धावा. बाई गाडी चालवतिया!’ म्हणून इतरांना सावध करू लागली. इतक्यात एका मोठ्या आणि शहाण्या मुलानं ओरडून सर्वांना सांगितलं की, ‘आरं नगा घाबरू शिकिविनारा बाप्या बाजूला बसलेला हाय.’ शिकिवनाऱ्या बाप्याची कॉलर एकदम टाईट.

आमचं १९३२ साली बांधलेलं बैठं घर पाडून तिथे इमारत उभारायची असं ठरलं आणि १९८३ च्या मध्यावर कामाला सुरुवात झाली. प्रत्येक स्लॅब घालण्याच्या वेळी म्युनिसिपालिटीचे चीफ इंजिनियर जातीने हजर असत व इतर वेळीही येऊन काम तपासत. कामगार लोक हे पाहून आश्चर्यचकित झाले. तेव्हा कॉन्ट्रॅक्टरने त्यांना सांगितलं की, ही पुलंची वास्तू आहे आणि ते स्वतः इथे राहायला येणार आहेत. मराठी माणूस कितीही कमी शिकलेला असला तरी त्याला पुलं माहीत असतातच. इमारत पूर्ण झाली आणि कॉन्ट्रक्टर कांबळेंनी एक दिवस आम्हाला सांगितलं की, सर्व कामगारांना पुलंना भेटायची, निदान बघायची इच्छा आहे. वेळ, दिवस ठरला. सर्वजण वेळेच्या आधीच येऊन उभे होते. भाईकाका बरोबर ठरल्या वेळी आले. सर्वांना प्रेमाने भेटले. प्रत्येकाची नावा-गावासकट चौकशी केली. तीही प्रत्येकाच्या खांद्यावर हात ठेवून. आयुष्यभर पुरला असेल नाही तो स्पर्श त्यांना! कर्मधर्मसंयोगाने आमच्या बिल्डरचं नाव लक्ष्मीकांत ठाकूर होतं. भाईकाका त्याला मस्करीने नेहमी म्हणायचे ‘‘सुनीताच्या अनेक प्रश्नांचा धबधबा तुमच्यावर पडला नाही, कारण तिचं देखील माहेरचं नाव ठाकूर होतं.’’ आमचं काम पूर्ण केल्यानंतर ठाकूरांनाआजूबाजूच्या पाच-सहा इमारतींची कामं मिळाली. भाईकाका त्यांना नेहमी मस्करीने म्हणायचे, ‘‘आता आमच्या विभागाला ‘ठाकुर्ली’ नाव द्यायला काहीच हरकत नाही!’’

माझा मुलगा निखिल फिल्म इन्स्टिट्यूटला कॅमेराच्या शिक्षणासाठी जायला धडपडत होता. भाईकाकांची मनापासून इच्छा होती की, त्यानं फिल्मलाइनीत जाऊ नये. तसं त्यांनी त्याला फोनवरून समजावण्याचा प्रयत्नही केला. शेवटी त्यांनी आम्हाला पुण्याला बोलावलं व त्यांचे मित्र सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राम गबाले यांनाही बोलावून घेतलं. त्या दोघांनी मिळून निखिलचं बौद्धिक तर घेतलंच, पण भाईकाकांनी काही मजेशीर गोष्ट सांगितल्या सुरुवातीच्या काळात त्या दोघांना एक चित्रपट मिळाला होता. चित्रपटाचं नाव होतं ‘दत्तगुरू’. त्याचा फायनान्सर एक मारवाडी माणूस होता. भाईकाका पटकथा-लेखक होते व दिग्दर्शक राम गबाले. चित्रीकरणाच्या वेळी त्यांना अनेक अडचणी येत होत्या. दत्तमहाराज म्हटले की एक गाय व तीन कुत्रे सोबत असायलाच हवेत. पण शूटिंगच्या वेळेला ‘लाइटस’ सुरू झाल्यावर कुत्रे घाबरून दत्तमहाराजांबरोबर राहत नसत. ते पळून जात. प्रोड्यूसर-फायनान्सरने कुत्रे दत्तमहाराजांबरोबर असल्याशिवाय पुढील पैसे देणार नाही, असं निक्षून सांगितलं. भाईकाकांच्या सुपीक डोक्यात एक कल्पना आली. त्यांनी शूटिंगच्या वेळेला तिन्ही कुत्र्यांना उपाशी ठेवलं व नंतर शूटिंगच्या वेळी दत्तमहाराजांच्या कमंडलूत मटणाचे तुकडे ठेवले. त्यामुळे पूर्ण चित्रपट, महाराज आणि कुत्रे वेगळे झाले नाहीत. सांगायचं तात्पर्य की, सीनेसृष्टीकडे बघणाऱ्या लोकांना जे दिसतं तसं कधीच नसतं. हेच त्या दोघांना निखिलला समजावून सांगायचं होतं.

गोवा ट्रिप
१९९४ साली भाईकाकांना पार्किन्सनची सुरुवात झाली होती. त्याच वेळी त्यांना गोवा कला अकादमीचा, ‘महादेवशास्त्री जोशी पुरस्कार’ जाहीर झाला होता. सीताकांत लाड अकादमीचे अध्यक्ष होते. त्यांनी खूपच गळ घातली. डॉक्टरांचं म्हणणं होतं की, भाईंची इच्छा असेल तर गोव्यातल्या त्यांच्या मित्रमंडळींना भेटून यायची ही शेवटचीच वेळ असेल. तोवर ते चांगले हिंडत-फिरत होते. पार्किन्सन कधी आपला विळखा घट्ट करेल याचा नेम नव्हता. काकीने विचारपूर्वक गोव्याची ट्रिप आखली. त्याच दरम्यान मी गोव्यात मंगेशीला घर बांधलं होतं. भाईकाकांनी मला फोन केला, आपण गोव्यात जाऊया, आपल्या गोव्याच्या घरातच राहू असं ठरलं. आमच्या बरोबर डॉ. ठाकूर, प्रफुल्ला डहाणूकर, विद्याधर निमकर, मालतीबाई आडारकर अशी भाईकाकांची खास मंडळी गोव्याला निघाली.

आमचा पहिला मुक्काम कोल्हापूरला होता. तिथे भाईकाकांना अनेकजण येऊन भेटत होते. कोल्हापूरच्याच एका नामांकित डॉक्टरांनी त्या रात्री मेजवानी दिली होती. कोल्हापुरातली काही मान्यवर मंडळीही बोलावली होती. डॉक्टरांच्या पत्नी हौशी गायिका होत्या. त्यांनी त्या छोटेखानी समारंभात भाईकाकांना एक विनंती केली की, मी लताबाईंची काही लोकप्रिय गाणी म्हणून त्यांची एक कॅसेट तयार केली आहे. भाई तुम्ही कृपा करून तिचे उद्‌घाटन करा. भाईकाका कधी कुणाला दुखवत नसत, पण त्या दिवशी मात्र त्यांनी ‘नाही’ असं ठामपणे सांगितलं.

दुसऱ्या दिवशी तिथून बाहेर पडताना मी सहज त्यांना विचारलं की, ‘‘भाईकाका मोजून २०-२५ माणसं होती. का ठामपणे नाही म्हणून सांगितलंत?’’ भाईकाका म्हणाले, ‘‘खुळा का रे तू? अरे लताचा जिथे सूर जातो तिथे हिची नजरही जाणार नाही रे!’’ गोव्यातही अनेक चाहते होते. माझा एक मित्र श्री. अनुप प्रियोळकर हा तर भाईकाका गोव्यात येणार ह्या कल्पनेनेच वेडा झाला होता. त्याने मला येऊन, ‘तुम्ही इथे असेपर्यंत जेवण माझ्या घरून येणार’ असंच सांगितलं. मीही ताबडतोब होकार दिला. पहिल्या दिवशी दुपारी माशाचं सुंदर जेवण घेऊन आला. त्यात त्याने ‘नाचणीचे सत्व’ आणलं होतं. पुडिंगसारखं असतं ते. गोव्याची स्पेशालिटी. खरंच सुरेख झालं होतं. भाईकाकांनी त्या पदार्थांची स्तुती केली. झालं. रात्रीच्याही जेवणात त्याने तेच नाचणीचे सत्व करून आणले. दुसऱ्या दिवशीही तेच. नंतर जाताना त्याने भाईकाकांना घरी येण्याची विनंती केली आणि भाईकाकांनी ती स्वीकारलीही. आम्ही घरी पोहोचल्यावर त्यानं नाचणीचं सत्व ठेवलं. ते पाहून भाईकाका माझ्याकडे पाहत म्हाणाले, ‘‘जयंता, तुझा मित्र माझी सत्वपरीक्षाच पाहतोय रे!’’

अमेरिका वारी
पर्किन्सनच्या विकाराने विळखा घट्ट केला होता. महाराष्ट्रातील असंख्य डॉक्टर मित्रांनी त्यांच्यासाठी अभ्यास सुरू केला होता. कोल्हापूरच्या डॉ. वझे ह्यांनी अमेरिकेत एक डॉक्टर अशा रोगावर ऑपरेशन करतो, अशी माहिती मिळवली. काकीचा त्यावर अभ्यास सुरू झाला. त्याच्याकडून काही व्हिडिओ पाठवले गेले की, पेशंट थरथरत आत जातोय व ऑपरेशन झाल्यावर ठणठणीत चालत बाहेर येतो. पुण्यात काही डॉक्टरांबरोबर बसून ते पाहिले गेले व ऑपरेशनला जाण्याची तयारी सुरू झाली. लांबचा पल्ला असल्यामुळे डॉ. लोकरे बरोबर जाणार होते. भाईकाका अमेरिकेला उपचारांसाठी जाणार ही बातमी सर्व पेपरांत आली. जाण्याच्या दिवशी पार्ल्याच्या घरी लवकर आले. विश्रांती घेतली व रात्री विमानतळावर जायला निघाले. मी आणि दीपाही सोडायला एअरपोर्टवर गेलो. त्यांचे अनेक चाहते विमानतळावर आले होते. त्यात माजी पोलिस महासंचालक भीष्मराज बामही होते. त्यांना व्हीआयपी लाऊंजमध्ये बसवण्यात आलं. पत्रकार मंडळीही तिथे हजर होती. त्यांनी प्रश्नांची सरबत्ती चालू केली. एकाने विचारलं, ‘‘भाई, बरे होऊन आल्यावर बटाट्याच्या चाळीचा प्रोग्रॅम करा!’’ तर दुसऱ्याने विचारलं, ‘‘आल्यानंतर काय करायचं ठरवलं आहे?’’ भाई पटकन म्हणाले, ‘‘बरा होऊन आल्यावर कुस्त्यांचा फड लावतो की नाही ते बघा!’’

७० वा वाढदिवस
भाईकाकांचा ७० वा वाढदिवस आम्ही सर्व कुटुंबियांनी पार्ल्याच्या गोमंतक हॉलमध्ये थाटात साजरा केला. त्यांची मोठी बहीण वच्छीताई पंडित, धाकटी बहीण मीरा दाभोळकर, माझे वडील उमाकांत, धाकटे काका रमाकांत व आम्ही सर्व पुतणे, भाचे कंपनी. पन्नासेक मंडळी जमली होती. प्रत्येकजण मधल्या काळात विशेष काय घडलं किंवा काय पाहिलं ते भाईकाकांना सांगण्यात दंग होता.

माझ्या मुलीला, म्हणजे नेहाला विनोद सांगण्याची खूप आवड आणि सर्वात गंमतीची गोष्ट म्हणजे ती भाईकाकांना म्हणजे तिच्या भाईआजोबांनाच जोक्स सांगायला बसायची. तेही मनापासून दाद देत. त्या दिवशी सर्व जमलेले असताना तिला काय लहर आली कोण जाणे, तिनेभाईकाकांना सांगितलं ‘‘भाईआजोबा, मी तुम्हाला एक कोडं घालते. त्याचं उत्तर द्या!’’ भाईकाका हसत म्हणाले, ‘‘घाल बघू!’’ तिने सुरुवात केली की, ‘‘शिवाजी महाराजांनी अनेक गड सर केले, पण त्यांना एक गड सर करता आला नाही, तो कोणता?’’ झालं... भाईकाकांनी उगाच डोकं खाजवल्यासारखं केलं आणि हरलो म्हणून सांगून टाकलं. नेहानेही विजयी मुद्रेने सांगितल, ‘‘कलिंगड!’’ खरंतर जोक संपला होता. परंतु भाईकाका क्षणाचाही वेळ वाया न घालवता नेहालाम्हणाले, ‘‘आता मी तुला कोडं घालतो त्याचं उत्तर तू दे! महाराजांच्या वेळी एक गड नव्हता, तो आत्ता आहे, तो कोणता?’’ नेहानेच काय, सर्वांनी डोकी खाजवली. तेव्हा भाईकाकांनी हसत-हसत सांगितलं, ‘‘भानगड!’’ नंतर नेहमीप्रमाणेच गाण्यांचा कार्यक्रम सुरू झाला. माझा आतेभाऊ प्रकाश पंडितला मामानं गायला सांगितलं. स्वतः पेटीवर बसले. त्याने, ‘‘मामा काय गाऊ?’’ म्हणून विचारले. भाईकाका मिश्किलपणे म्हणाले, ‘‘अरे, ते गाणं म्हण ना लंगोटावरचं!’’ प्रकाश पंडितही त्याचाच भाचा. त्याने लगेच ‘‘देहाची तिजोरी ...... भक्तिचाच ठेवा’’ हे गाण सुरू केलं.

संचेती हॉस्पिटल
एकदा घरीच उठायचा प्रयत्न करत असता भाईकाका पडले. संचेती हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं. मी व दीपा दोघंही भेटायला हॉस्पिटलमध्ये गेलो. त्यावेळी ते बरे झाले होते. पण काकीच्या म्हणण्याप्रमाणे हॉस्पिटलमध्ये देखभाल चांगली होते, तेव्हा दोन दिवस जास्त राहिले तरी चालेल. पूर्ण बरा होऊनच तो घरी येईल. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे स्पेशल रूम असली तरीही इतर रोग्यांमुळे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात, तर त्यांना घरी नेलेले बरे. मधू गानूकाकाही तिथेच होते. आम्ही पोहोचताच घरी नेण्याचा निर्णय घेतला होता. गानूकाका ॲम्ब्युलन्स आणायला गेले. मी व दीपा काकांबरोबर गप्पा मारत होतो. भाईकाका हॉस्पिटलला कंटाळले होते. शांतपणे पडून होते. इतक्यात दोन-तीन तरुण डॉक्टर मुली तिथून जात होत्या. भाईकाकांना पाहताच त्या एकदम जवळजवळ किंचाळल्याच ‘अय्या पुलं!’ आणि त्या अवस्थेतही सही मागू लागल्या. जमेल तेवढ्या संयमाने भाईकाका त्यांना हसत म्हणाले, ‘‘आधी इथून सहीसलामत घरी जातो व मग तुम्हाला हव्या तेवढ्या सह्या देतो.’’

भाईकाकांनी बिछाना धरला होता. त्यांना कुठे हलता-फिरता येत नव्हतं. त्याच सुमारास काकीला
छातीत दुखायला लागलं. ब्लडप्रेशर स्थिर राहत नव्हतं. संपूर्ण चेकअप करायला त्यांना दोन दिवस डॉ. प्रयागांच्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं. आम्ही दोघंही त्यांना बघायला गेलो. तोपर्यंत सर्व गोष्ट स्थिरावल्या होत्या. आम्ही जाताच तिने डॉक्टरांना सांगितलं, ‘‘माझा पुतण्या व त्याची बायको आली आहे. तुमची हरकत नसेल, तर मी त्यांच्याबरोबर घरी जाते!’’ डॉक्टरांनीही ‘जा’ म्हणून सांगितलं.

काकीला घेऊन आम्ही दोघंही ‘मालती- माधव’मध्ये आलो. दारापर्यंत दारापर्यंत काकी पटापट वर
आली, पण घरात गेल्यावर ती हळूच भाईकाकांच्या खोलीजवळ आली व आत न जाता तिने
दरवाजाच्या मागून डोकावलं. भाईकाका समोरच्या खिडकीतून शून्यात बघत होते. तिने हळूच आत डोकावून भाईकाकांना विचारलं, ‘‘काय हो पुलं कसे आहात?’’ खिन्न स्वरात भाईकाकांनी उत्तर दिलं, ‘‘आहोत अजून!’’ आजही ह्या प्रसंगाची आठवण येते आणि मन व्याकूळ होतं.

९ जून २००० ची सकाळ.
काकीचा अचानक फोन आला. तिने मला व तिचा भाऊ डॉ. श्रद्धानंद ठाकूर यांना तातडीने पुण्याला बोलावलं. भाईकाकांना प्रयाग हॉस्पिटलमध्ये दाखल करून व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं. त्यांना फारसं कळत नव्हतं. मधूनमधून फक्त डोळे उघडत होते. डॉक्टरांनी सर्व नातेवाईकांनाबोलावून घेतलं, ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली आणि हॉस्पिटलसमोर प्रचंड गर्दी झाली. प्रत्येक पुलंप्रेमी आपल्यापरीने देवाकडे त्यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना करत होता. प्रत्येकाच्या डोळ्यांत आपल्या घरचंच कोणी आजारी असल्याची काळजी होती. ह्या सर्व मंडळींत सर्व थरातील माणसं होती. भाईकाकांचा उल्लेख ‘आपले पुलं’ किंवा ‘आपले भाई’ असा होत होता. त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे ‘इतरांनी आपलं म्हणणं’ हा एक फार मोठा किताब. त्यांनी तो आपल्या कर्तृत्वानं मिळवला होता. खऱ्या अर्थाने ते महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व होते, ते दिसत होतं. आम्ही सर्व दिनेशची वाट पाहत होतो. तो अमेरिकेहून निघाला होता. ते ३ दिवस मी व काकी हॉस्पिटलात त्यांच्या बाजूलाच होतो. चौथा दिवस काळदिन ठरला आणि एका महापुरुषाचा अंत मी अगदी जवळून बघितला. काकी चोवीस तास भाईकाकांजवळच बसून होती. तिच्या बाजूला मीही. मी तिला सांगितलं की, तू घरी जाऊन थोडा वेळ आराम कर. मी इथे आहे ना. तू काळजी करू नकोस. त्याही परिस्थितीत तिने दिलेल्या उत्तराने मी अवाकच झालो. ती म्हणाली, ‘‘भाईला जी औषध दिली गेली आहेत, त्यामुळे जर काही वैज्ञानिक चमत्कार झाला आणि त्यानं डोळे उघडले आणि मी समोर नाही हे त्याच्या लक्षात आलं तर तो आणिक कावराबावरा होईल.

त्या दोघांचं भावनिक नातं फार वेगळं होतं. त्यांच्या मृत्यूने अनेकांची झालेली वेडी अवस्था मी पाहिली. आमचा काका खऱ्या अर्थाने ‘पुरुषोत्तम’ होता, हे त्याच्या कर्तृत्वाने सिद्ध झालं होतं. खरंतर त्यांचा फक्त देहच पंचत्वात विलीन झाला. आजही ते प्रत्येक मराठी घरात पुस्तकांच्या, कॅसेटच्या रूपाने आहेत. त्यांचे अनेक विनोद, असंख्य कोट्या यांच्या शिदोरीवर आपलं प्रत्येकाचं उर्वरित आयुष्य निश्चितच आनंदात हसत जाईल. माझा मुलगा निखिल ह्याला भाईआजोबांचे ‘असा मी असामी’, ‘बटाट्याची चाळ’ इत्यादी साहित्य तोंडपाठ आहे. पावलोपावली तो मास्टर शंकर, अंतू बर्वा, चितळे मास्तर ह्यांच्या आठवणी काढून हसत असतो. मनोमन त्यांच्याशी बोलत असतो. माझी आजी तर नेहमी म्हणायची की, मन सैरभैर झालं की मी भाईचं कोणतंही पुस्तक उघडते व वाचायला सुरुवात करते. मन शांत होऊन कधी हसू लागतं कळतही नाही.....!

लेखक - जयंत देशपांडे
महाराष्ट्र टाईम्स, दिवाळी २०१८ मधून साभार
संग्रह - असा असामी पुलं देशपांडे जन्मशताब्दी गौरवग्रंथ

Wednesday, April 20, 2022

आहे मनोहर तरी गमते उदास -- (मुकुंद कुलकर्णी)


सुनिताबाई देशपांडे
3 जुलै 1926 - 7 नोव्हेंबर 2009

पुलं मध्ये एक खेळिया दडला होता . त्यांचा स्टेज परफॉर्मन्स अप्रतिम असे . त्यांना सुनिताबाईंची तेवढीच तोलामोलाची साथ लाभत असे . उभयतांनी सादर केलेला बा. भ. बोरकरांच्या कविता वाचनाचा कार्यक्रम रसिकांना मंत्रमुग्ध करत असे . पुलंच्या पेटीवादनासोबत सुनिताबाईंच्या गप्पांचा कार्यक्रमही रंगतदार होत असे . स्वतः सुनिताबाई तरल कवीमनाच्या होत्या . पुलंच्या स्मरणार्थ झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी पद्मा गोळे यांच्या दोन कविता सादर केल्या होत्या , त्या ऐकणे हा अवर्णनीय आनंदानुभव होता . कविता वाचन कसे असावे याचा तो आदर्श वस्तुपाठ होता . त्या स्वतः उत्तम परफॉर्मर होत्या . महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व पुल यांच्या अर्धांगिनी सुनिताबाई या स्वतः उत्तम साहित्यिक होत्या . इ.स.1945 मध्ये त्यांची भाईंशी भेट झाली . दि.12 जून 1946 रोजी भाई व सुनिताबाई विवाहबंधनात बांधले गेले . पूर्वाश्रमीच्या सुनिता ठाकूर या मराठी लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या भाईंशी विवाहबद्ध झाल्या . पुल आणि सुनिताबाई यांनी ओरिएंटल हायस्कूल येथे शिक्षक म्हणून काम केले होते . सुनिताबाईंनी पुलंबरोबर अनेक नाटकात काम केले होते . रत्नागिरी येथे सुनिताबाईंचे पुलं बरोबर लग्न झालं होतं . सुनिता ठाकूर ही देखणी , बुद्धीवान मनस्वी तरुणी रत्नागिरीच्या समृद्ध निसर्गाच्या साक्षीने पुलंची अर्धांगिनी झाली .

सुनिताबाईंनी लिखाणाला सुरूवात फार उशीरा केली . इ.स.1990 मध्ये त्यांचे ' आहे मनोहर तरी ' हे पारितोषिकपात्र पुस्तक प्रसिद्ध झाले . आहे मनोहर तरी हा आंबटगोड आठवणींचा गुलदस्ता आहे . ही मराठी साहित्यातील एक सर्वोत्तम कलाकृती आहे . आहे मनोहर तरी .... सर्वांनाच खूप आवडले . अनेक भाषांत त्याची भाषांतरे झाली . ' मनोहर छे पन ' गुजराथी अनुवाद सुरेश दलाल , ' है सबसे मधुर फिर भी ' हिंदी अनुवाद रेखा देशपांडे , ' अँड पाईन फॉर व्हॉट इज नॉट 'इंग्रजी अनुवाद गौरी देशपांडे तसेच उमा कुलकर्णी यांनी आहे मनोहरचा कन्नड अनुवाद केला आहे . भारतभरातल्या वाचकांपर्यंत हे पुस्तक पोहोचले आहे.

पु.ल. जसे रसिकांचे भाई तशा सुनिता देशपांडे सुनीताबाई . सुनिताबाईंनी वंदे मातरम आणि नवरा बायको या मराठी चित्रपटात तसेच सुंदर मी होणार राजेमास्तर या नाटकातून भूमिकाही साकारल्या आहेत . तसेच त्यांचा एकपात्री प्रयोग राजमाता जिजाऊ ही खूप गाजला होता . ' प्रिय जी ए ' या त्यांच्या जी ए कुलकर्णी यांच्या बरोबरच्या पत्रव्यवहाराचे पुस्तक हा तर मराठी साहित्यातील एक अमूल्य ठेवाच आहे . आहे मनोहर तरी , प्रिय जी ए , मण्यांची माळ , मनातलं अवकाश , सोयरे सकळ , समांतर जीवन या आपल्या साहित्यकृतींनी सुनिताबाईंनी मराठी वाङमय समृद्ध केले आहे . जी ए कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पहिला ' प्रिय जी ए पुरस्कार ' सुनिताबाईंना इ.स. 2008 साली मिळाला होता .

सुनिताबाईंच्या प्रतिभेला जी हिरो प्रतिमा अभिप्रेत होती ती श्रीकृष्णासारखी सर्वगुणसंपन्न होती . राकट कणखर तरीही अति मृदू , तरल . फ्रेंच पायलट , लेखक सेंट एक्झुपेरी हा सुनिताबाई आणि जी ए यांना भावणारा समान दुवा होता .' दि लिटिल प्रिन्स ' या पुस्तकात तो लिहितो , " what is most impossible is invisible . " असं काहीसं झाल होतं . पुलंनी या विषयावर नाटक करावं अशी सुनिताबाईंची इच्छा होती , पण पुलनी ते फारसं मनावर घेतलं नाही . पिग्मॕलियनच ती फुलराणी हे रुपांतर पुलंनी केलं . बर्नार्ड शॉ आणि पुल हे एकाच जातकुळीचे , सहज सुंदर आणि निर्मळ . तसेच जी ए , सुनिताबाई , खानोलकर ग्रेस हे समविचारी . जी ए आणि सुनिताबाई यांच्या पत्रव्यवहारात हे पदोपदी जाणवतं . ' सन विंड अँड स्टार्स ' हे एक्झुपेरीच पुस्तक त्यांच्या पत्रसंवादात येतं . जी ए आणि सुनिताबाई यांच्या पत्रसंवादात जगभरातील साहित्याचे संदर्भ तर येतातच , पण एकमेकांविषयीचा आदर , आस्था ही व्यक्त होते ." विपरीत अनुभवांची वेदनाच बरोबर घेऊन चालणारा एक हळवा , मनस्वी कलावंत जी एं च्या रुपाने भेटला आणि सुनिताबाईंनी त्याच्यावर स्नेहाचा वर्षाव केला . " अरुणा ढेरेंची ही प्रस्तावना यथार्थच आहे .

कार्लाईल या सुप्रसिद्ध इंग्रजी लेखकाच्या आणि त्याच्या पत्नीवरच्या लेखावरून पुल आणि सुनिताबाई यांच्यात वाद होतात आणि सुनिताबाईंची लेखणी धारदार होते . तोच संघर्ष पुढे आहे मनोहर मध्ये सुनिताबाई आणि भाई यांच्या माध्यमातून अवतरला आहे . काही असलं तरी गाणारा , अभिनय करणारा , विनोदांनी लोकांना तणावमुक्त करणारा , स्नेह्यांचा प्रचंड गोतावळा बांधून असणारा , सर्व लोकांचा हिरो हाच त्यांचा हिरो होता . तसाच तो सर्वगुण संपन्न लिटिल प्रिन्सही होता . भाई आणि सुनीताबाईंच हे मैत्र खरोखरच अलौकिक होतं

अत्यंत समृद्ध , परिपक्व सहजीवन जगलेल्या या महाराष्ट्राच्या लाडक्या दंपतीचे आदरपूर्वक स्मरण . सुनिताबाईंना सादर प्रणाम !

मुकुंद कुलकर्णी ©

Tuesday, April 12, 2022

Naiksaheb (Dr. J. P. Naik) -- P L Deshpande

Sixteen or seventeen years ago I was working in the Directorate-General of All India Radio in Delhi. We were discussing in a meeting with the Director-General a series of talks on education for the National Programme. While the names of various educationists of an all-India reputation were being suggested, I made a mention of Mr J.P. Naik. The Director-General, Mr Jagdish Chandra Mathur, an ICS officer and a keen educationist himself, almost jumped from his chair and asked me:

“How do you happen to know Mr Naik?”

“My Guru”, I said.

“Same here”, said Mr Mathur.

The subject for discussion for the next 15 to 20 minutes was J.P. Naik, the man and his mission.
     
Naiksaheb, as we all affectionately call him though there is nothing of the proverbial “Saheb” in him, was not so widely known in the Delhi official circles then as he now is. Delhi has a habit of knowing people and valuing them by the official posts they hold. Naiksaheb did not hold any such post then. Mr Mathur had to educate the members of that committee on Naiksaheb’s outstanding contribution in the field of education.

“Where is he now?”, asked Mr Mathur.

“That’s one question, Sir, which very few people can answer about Naiksaheb”, I said.

I would rather quote Naiksaheb himself on his “whereabouts”. In a delightful article written for circulation among his friends Naiksaheb

This refers to the first article in this volume, “To Begin a Revolution with a Revolution”, written in 1965 when the Education Commission 1964-66, of which Mr Naik was Member-Secretary, was at the height of its glory - and labours. -Ed.

has let out the secret of his “everywhereness” and “nowhereness”, so to say.

I am not, dear Reader, a habitual dreamer. On the other hand, I sleep like a log and either do not dream at all or at least never recollect what I have dreamt, very probably because I do most of my dreaming when awake. (There are, of course, a few friends who assert that I hardly do anything else. But I am afraid they are a little unkind.)

So, there you are. Here is someone who like the seer described in the Bhagwadgita is fast asleep seeing dreams while the rest of the world thinks itself to be fully awake. It is a pity that the world does not have enough great dreamers like Naiksaheb who dedicate their lives to convert such wonderful dreams into realities which make life worth living. One has only to be by his side and watch him work. One feels exhausted by the magnitude of it. Yet there is an equal amount of pleasure too. It is like watching a sculptor chiselling out a statue out of hard stone. I believe this is due to a certain breeziness and ease in the manner in which he approaches and tackles the problems that face him. He just loses himself in the tasks on his hands with the ease of an under-water swimmer. And that is where perhaps we lose his track. Many a time I have found during a conversation with him that he was both listening and not listening. I wonder if there are one hundred different refuges in his mind for him to disappear, like the caves of the ancient seers where they could disappear, not as an escape from the world around them but to think with a greater concern on the problems of humanity and try if they could find out solutions for its ills.

Naiksaheb’s inward haunts can be extremely delightful too. One has only to have the good fortune to get an entrance into them along with him. They are not like the protective and lonely caves of the ascetics. They are more in the nature of treasure-houses of gems collected from oceans of literature, from thoughts that have illuminated the human race throughout the ages, and from his own experience, which is much stranger than fiction. Naiksaheb leaves one aghast by his erudition without making one feel that he is a Pandit. He has never indulged in impressing. As in a flower, the fragrance is already there. One should be lucky enough to get a favourable wind and possess a sensitive nose.

Though I would not pride myself on having a very sensitive nose, I can never forget the fortune of the favourable wind, which I had

years ago when my wife Sunita and I were driving with him from Kolhapur to Satara. It is about two hours’ drive. During the course of our conversation someone made a reference to Robert Browning. And for the rest of the journey Naiksaheb lifted us and took us round the Browning-land. Line after line from Browning’s poems started flowing, out of him. It was not merely a feat of memory. It was a regular journey through that land of hope, of love, of sights sometimes full of clear sunshine, at others a little baffling due to the poet’s cunningly putting a transparent veil on it and enhancing its mystery. Years have passed since then, but that blissful ride with Naiksaheb taking us round by the hand as it were is still fresh in our memory.

Theatre people, like us, I believe, are a little extra sensitive to the quality of human voice. Voice for us is not a mere vehicle of words. It brings along with it a distinct personality of its own. There is a natural quality of persuasion in Naiksaheb’s voice. Even a casual “hello” from him suggests a sincere concern about others. Even when he addresses a crowd, apart from the conviction which he carries about what he says, this endearing quality of his voice makes you want to listen to him all the more. He always makes you feel that he is only helping you discover what is already lying hidden within you. If education attempts to take the students from the known to the unknown, Naiksaheb’s teaching amply demonstrates this truth, whether it is a lesson for teachers in a training college; a public meeting, or just an informal conversation with friends. Half an hour with him, and you come out “a chastened man”, as an eminent medical expert put it. Apart from his superb intellect and an unusual capacity for work, this rare quality of his silken and persuasive voice also contributes a great deal to this kind of “chastening”.

To get back to the Browning story, Naiksaheb’s recitation, I must confess, did come to us as a pleasant surprise. We had known Naiksaheb for quite some time but our conversation usually centred round education in general and rural education in particular. Naiksaheb’s recitation and the tender discourse on love, with Robert and Elizabeth Browning as the point of take-off, disclosed something within him which was not only unknown to us but was also rather confusing. We realized our folly much later when we remembered that we had left him at the house of Dr (Miss) Chitra Naik who was then Inspector of Schools in Satara and was later to become Dr (Mrs) Chitra Naik. We had totally missed this third dimension, which made Naiksaheb’s recitation so pleasing and so much in tune with the great

poet of hope and love. I feel ever grateful to that moment of luck which started the favourable wind. It is like being suddenly exposed to beautiful strands of music, with the experience ever vibrating in your memory.

This mention of a musical experience takes me back to our first meeting. Though I take pride in calling him my Guru, I have never been his student in any of the educational institutions where he taught. I had lost my faith in formal education even while it was forced on me within the four walls of a school or a college. I met Naiksaheb some twenty -five years ago in Kolhapur and that too, of all the places, in a musical soiree. Mr Baburao Joshi, a legal practitioner - most probably by paternal compulsion - and a musician by choice was the com- mon friend and host for the evening. The late Acharya Bhagwat, who was perhaps the dearest friend, philosopher, and guide of Naiksaheb, was also present on that occasion. There was a wonderful fusion of Gandhian selflessness and Tagore’s unceasing pursuit of all that was sublime and beautiful in life in the Acharya’s personality. For reasons best known to himself, he hid a tender heart under a rough exterior and a sharp tongue to match it. We know each other pretty well, he treating me with great affection and scantiest respect and I always touching his feet in all reverence yet suppressing my irresistible desire to pinch them. He never forgave my wife for marrying a good- for-nothing fellow like me though he had a paternal and immense affection for her. There were a few other friends who had come to listen to music. It was Acharya Bhagwat who introduced me and Sunita to Naiksaheb. The musical recital started and Naiksaheb’s face gradually took on a strange resemblance to that of a passenger who realizes that he had boarded the wrong train after it had left the station and gathered speed. Later on I was to realize, with a sense of relief, that the performing arts such as dance, drama, and music were one sphere which had escaped his attention. The performing artistes should be thankful to him for that. He would have otherwise left many of us out of jobs, and made us take shelter under some school or another as schoolmasters which, in spite of Naiksaheb’s best efforts, is still in many cases the last resort of the educated, semi-educated, and the maladjusted unemployables in our society.

Since I was not a stranger to Kolhapur, I had heard of Naiksaheb much before I met him, not only as an educationist but also as one

who in the course of official duties as Development Secretary in Kolhapur state had done a great deal to give that ancient town a new and modern look. I knew how he had brought down a number of old houses fully or partially to widen the roads and almost coaxed the simple Kolhapur folk into believing that the new widened roads would even help them widen their outlook. He had established a reputation as a master town-planner, an expert on cooperative marketing of the village produce and had succeeded in creating self- confidence among the farmers in the surrounding rural areas. His “destruction” campaign had earned him an affectionate nickname, Pada Pad Mantri - Minister for Demolition - from the people of Kolhapur who loved him and held him in the highest regard. There was no end to stories and legends about him — such as his filling the pockets of his famous half-pants and half-shirt with baked peanuts and munching them in the street while passing orders to his subordinates to bring down the obstructing houses and such other structures. There was yet another equally popular story about his working round the clock in his office in three shifts with his subordinate staff moving in and moving out according to the schedule and the boss sticking fast to his seat with a cup of tea and a handful of peanuts for his breakfast, and two cups and two handfuls of peanuts for his lunch. He always skipped dinner perhaps, they would say, to keep his waistline intact. It was also strongly rumoured and believed that he used the top of his office table as his bed with a few big size bound volumes of reports on education, agricultural reforms, etc., for his pillow, wound a towel around them for a softer touch, spread the morning newspaper for a bed-sheet - he had a fresh one everyday - and stole a nap or two between the shifts. The towel, people said, was perhaps his only other sartorial possession barring, of course, a pair of half-pants and half-shirts.

In a feudal set-up where officialdom always went with pomp and splendour and corruption of every sort, Naiksaheb’s austere living and extraordinary devotion to the welfare of the people in the exercise of his duties as a government servant was something which the poor state subjects had hardly ever heard of or seen before. Besides Naiksaheb being a Kolhapur man himself, many of them knew about his brilliant career as a student of the Rajaram College. They knew that he had sacrificed a comfortable future either as an ICS officer or a barrister at the altar of Gandhiji’s Satyagraha movement. They were fully aware of the fact that he had insisted on drawing a monthly

salary which was even less than that of a village schoolmaster, when he was entitled to ten times more than what he drew.

When I first met him at that musical session, his career as “Minister for Demolition” was over. But the intensity with which he studied the Kolhapur town and executed the town-planning programme suddenly came to my notice when I found him directing a stranger to a certain house. Naiksaheb was rattling off the various numbers and names of the houses nearby with an ease that would have put a postman to shame. It looked as if he knew almost every house in the city and the name of its occupant and perhaps even the number of school-going children playing hide-and-seek with their teachers. It is amazing to witness his total involvement, and total withdrawal too.

I WONDER HOW MANY OF HIS ACQUAINTANCES know that he was probably the first “barefoot doctor” even before Mao proclaimed this idea to the underdeveloped world. He was given a two years’ sentence for participation in the Satyagraha movement in 1931. While he was serving the term in a jail in Karnataka, he noticed that some of the murderers, dacoits, and other convicts serving long-term imprisonments were assigned the duties of male nurses in the jail hospital. Their method of nursing the sick inmates of the jail was not far different from that of the tyrants who once upon a time passed as village schoolmasters and who were more inventive in the methods of punishment than those of education. Naiksaheb, who then was hardly twenty-four, requested the jail superintendent to allow him to nurse the ailing prisoners. He obtained his permission to borrow books on medical science from outside and studied them. After their release, most of the Satyagrahis opted for politics, some of them went back to their professions, and the shrewder among them secured offices of power after Independence. But young Naiksaheb went and settled down in a village in Karnataka and started his one-man free medical centre. It was here that he must have studied in depth not only the physical but the spiritual ailments of the villagers in our country and discovered that the root cause of their malady lay in the lack of education which could liberate them in the true sense of the term. He found an approach through his study of medicine. He went in as a political prisoner to the jail, came out as a doctor of medicine, again went in as a doctor of medicine in villages and emerged as an educationist. As he has no formal degree in medicine, he does not have any in education either. Yet years after he had given up his medical

practice, where he earned nothing except the blessings of the poor patients he treated, he is still well informed about the current developments in medicine. He once had a discussion with my brother- in-law who is an eminent gynaecologist in Bombay. After Naiksaheb left, my brother-in-law casually asked me where “Dr Naik” practised. “Nowhere”, I said. He refused to believe that Naiksaheb had no formal education in medicine. “Even many of us who practise medicine are not aware of the latest developments in medical science to which Dr Naik was referring”, he said, still insisting on calling him “Dr Naik”.

It is said that after seeing the architectural design of “Shyamoli”, a cottage built in Shantiniketan by Rabindranath Tagore for Mahatma Gandhi’s stay, a world-famous architect had exclaimed: “Thank God, the poet did not practise as a professional architect. He would have left many of us jobless.” Naiksaheb’s phenomenal grasp of subjects varying from bricklaying to giving discourses on the philosophy of education and the tremendous range of interests he has must have made many an expert repeat what the architect had said. But here, again, one should remember that all the knowledge he has gathered and the deep interest he has taken in all that goes on in life is ultimately meant to serve the sole purpose of his life - peoples' education. I regard him as the real torch-bearer of the fundamental idea of education as spelt out by the two great modern educationists - Tagore and Gandhi. Said Tagore: “The highest education is that which does not merely give us information but makes our life in harmony with all existence.”

The growth of schools and colleges in the bigger cities with the English language as the medium of teaching was compared by Tagore with the growth of mushrooms. He uses the Bengali word byanger chhata (“frogs’ umbrellas”). They bred human frogs in those city ponds, resulting in the creation of a new Indian society which talked like the British but never acted like them. They were severed from their fellow-men rotting in the villages in conditions of ever-growing penury. A few of these newly educated thrived and fattened while millions of their brethren were allowed to decay both physically and mentally. Thus the term “rural” came to be equated with ignorance and backwardness. It was Tagore who drew the attention of the “educated” to this lop-sidedness in Indian society. A country suffering from extra-accumulation of fat on one side and emancipation on the other was doomed to remain paralysed.


It is unfortunate that the anguish of such great minds as Tagore and Gandhi is not shared by most of the “educated” people, who still cherish the most unscientific notions about modernity. Gandhi’s concept of Basic Education is perhaps the most revolutionary one in the field of education in modern times. It is, again, a great misfortune that this dynamic concept was choked to death by many of the Mahatma’s own followers, who, after his death, tried with their own mediocre intellectual apparatus to imagine how Gandhi would have developed the Basic Education Programme. There is something rather tragi-comic about the way many of them handled this plan and twisted it into a lifeless ritualistic routine. I sometimes wonder how every dynamic philosophy in our country so easily gets itself transformed into a moribund ritual.

However, with his extraordinary intellectual calibre and first-hand knowledge of conditions in the rural areas, Naiksaheb succeeded in winning over educationists of international repute to the philosophy of Basic Education and its adaptability to differing conditions in different parts of the world. He could do this mainly because he refused to accept the ritualism which had entered into the minds and life-style of the Gandhians. Naiksaheb lives simply, dresses simply, and eats simple food. Yet he has never made a fetish of it. Even simplicity if it amounts to a ritual would sound odd to him. A ritual has its own appeal so long as the spirit behind it is alive. The moment the dynamic spirit, which is always in search of fresh ideas and plans of work, fades away, the ritual loses its impact and becomes a lifeless activity generating nothing. I have come across quite a few Gandhians who were never able to lift their heads above such daily ritualistic trifles. They refused to see the manifoldness of life. I have seen Naiksaheb move with complete ease in many different situations in life without compromising any of his principles. Wherever he has been, he has helped in lightening other peoples’ burden and taken care not to be a burden to them by making any kind of demands to inflate his ego.

I have seen him totally engrossed in his work in the most uncomfortable surroundings. Once, while he was busy writing the history of the Department of Education of the old Bombay state during its centenary year, I came to know that Naiksaheb had come to Poona to go through some old office records. I was shocked to know that he had put up at a hotel called the Badshahi Boarding House. (One should not be misled by the word “Badshahi”. Poona has

its own connotation for certain words and “Badshahi“ is one of them.) The room he occupied had hardly anything Badshahi or royal about it. It was cramped with three cots and a chair or two for the visitors. A naked bulb hung from the ceiling threw light on the disorder that reigned supreme in that “royal” parlour. Naiksaheb was sitting cross- legged on one of the cots. The other two were occupied by a wholesale onion merchant and a junior PWD supervisor on transfer. The onion merchant had brought samples of his merchandise as was easily seen from the onion peels scattered all over. The supervisor was supervising trunks, beddings, boxes of various shapes and sizes and such other domestic property. There was hardly any room left for a visitor. Naiksaheb’s cot was laden with files and records and other source material for the history of the Department of Education, a chapter of which he was dictating to a stenographer who had occupied one of the two chairs and was using his own lap as a substitute for a desk. The room smelt of smoke emitted by the railway steam engines. Street noises made any conversation impossible. To add to the din, there was an intermittent puffing and panting of those engines and outbreaks of shrill whistles which suggested anything from sheer joy to utter helplessness. An old fan added more noise than breeze to the at- mosphere.

Unmindful of all this, Naiksaheb was giving the dictation. After a while he asked the stenographer to get it typed and send the other stenographer for further dictation. He had a severe cold and was coughing constantly. He told us some of the very interesting episodes he had come across while going through those records. I still remember the harrowing tales he narrated about the tortures suffered by the poor young Brahmin widows who had found shelter in Mahatma Jatirao Phule’s school for girls. They were found in class- room compositions written by these unfortunate young women.

Naiksaheb has an enormous fund of stories and anecdotes. Most of them are from his personal experience. I wish he would write them out, especially the humorous ones. We were once sitting with him listening to such small titbits till past midnight and rolling with laughter. That was the time when Sunita and I had decided to join him in a rural educational project in Malegaon in the Nasik district. The late Bhausaheb Hiray who was then Minister for Revenue in the Bombay state had started a pretty big rural education centre called Mahatma Gandhi Vidya Mandir. I used to teach in a college in

Bombay and Sunita in a high school in those days. Both of us left our jobs and joined this institution. Our visits to the Mouni Vidyapeeth at Gargoti, of which Naiksaheb was the main architect, had already converted us to his philosophy of education in the rural areas. We could meet Naiksaheb more often and watch him work from close quarters. There used to be endless discussions with architects, engineers, educationists, government officials; plans of various kinds were being prepared. There was no end to Naiksaheb’s trips from Gargoti to Malegaon, to Bombay, io Delhi. He would suddenly make his appearance at an odd hour of the day, with papers and files bundled in a bath towel under his arm. It could as well be at the dead of night. Naikshaeb blissfully unaware of the unearthly hour would pick up the thread from where he had left it during his last visit and start discussing the progress of the work, the difficulties encountered by us, and other matters relating to the project. (More than myself, Sunita had taken a deeper plunge into the project, though I am not averse to hard work so long as it does not involve me in mathematical calculations, drafting of constitutions, checking bills, etc.) Naiksaheb would even remember the measurements of the plinth level of some of the buildings that were coming up on the campus. In between the discussions Sunita would rush to our room which in fact was a fairly spacious yet unused bathroom in the new school building - and cook some food for him. I would quietly sneak out with Acharya Bhagwat and listen to his discourse on the stars in the midnight sky.

After finishing the work and whatever little food Sunita could offer him he would recline and before one could say Alexander he was fast asleep. Next morning he would jump into a jeep and proceed onwards. Sunita used to keep a pair of neatly washed and pressed half-pants and a half-shirt for him to change. That was his life-style, which we all admired, liked, and even made a little fun of.

Unfortunately the Malegaon experiment failed to take shape on the lines on which it was planned out. I went to the world of performing arts, where angels like Naiksaheb fear to tread and our meetings became very infrequent. Years after that I met him in Delhi. He was an important man in Delhi, now that he was holding an important post in the Ministry of Education. Naiksaheb invited me to dinner and even suggested that we meet at eight in the evening, I was not exactly happy to find Naiksaheb getting into the formal ways and etiquette of the Delhiwallahs and inviting me to dinner and to add

insult to injury even suggesting the time of the dinner. Punctuality, I knew, had never been his strong point.

I went to the address he had given me at the appointed hour. It was raining cats and dogs and I had to wade my way through knee-deep water to get into the building after getting out of the taxi. It was quite a huge building and a floor or two, I thought, were used as hostels. Someone guided me to Naiksaheb’s room. And there he was sitting on a cot with files and piles of books around, and a junior officer helped me take a few away from the chair where Naiksaheb asked me to sit and relax till he finished a little business with that officer. But for the din and noise and the onion merchant, things were not much different from the Badshahi Boarding House. I heaved a sigh of relief for one reason and the junior officer, who was asked to meet him the next morning and dispatched, for another. We sat chatting for a good half an hour and to my great surprise, entered Chitratai from the adjoining room. Naiksaheb had totally forgotten to mention that she was in town. She too joined us in the conversation. Another half an hour and no dinner announced. It was getting near ten and I do not know if I showed some signs of hunger on my face but Chitratai suddenly asked me if I had had my dinner. “Naiksaheb had invited me here for one. . .”, I said, and poor Chitratai almost rushed out to find if anything was left in the hostel canteen. I was more than filled from within to find that Delhi had failed to corrupt Naiksaheb. It should have been the most unusual experience for “the man who came to din- ner ” in any one of the houses in Delhi - the host finishing his dinner before the arrival of the guest, the hostess being kept completely in the dark about his arrival, and the poor guest waiting to share pot-luck with the canteen cook. Yet it was such a great relief to discover that Delhi had failed to change this man who lived in one of the most for- mal cities and refused to surrender his non-formality. Even Chitratai, an eminent educationist herself, seems to have failed to educate her husband on “How to invite friends to dinner and to remember it’ 5 .

SUNITA AND I WERE AMONG THAT SMALL GROUP of Naiksaheb’s friends who attended his wedding. It was a beautiful wedding in the lovely natural surroundings of the Panhala Fort. Among others, his life-long friend and close associate in the Indian Institute of Education, the late Rambhau Parulekar was present to give his blessings to the couple. In spite of his old age, Rambhau had never lost his impish sense of humour. He took me aside and closing his eyelids - a

characteristic gesture of his whenever he was up to making some mischievous remark - whispered in my ears:

“Do you know, P.L., J.P. and I have been very close friends for a number of years.”

“I know that, Rambhau; he has a great regard for you.”

“Not as much as he has for Chitra. Mind you, he has been never so punctual with me. This is the first time I see him arrive on time and more so at the destination where we all have been expecting him to arrive.”

Old Rambhau is no more with us, but he is one person whom we will all miss on Naiksaheb’s 70th birthday celebration. And the other one is the late Acharya Bhagwat. But there are hundreds who will be wishing Naiksaheb a long and a happy life. One is surprised to find how from some unexpected corners one gets a spontaneous response to the very mention of Naiksaheb’s name. At an international seminar in Vienna in 1974, I presented a paper on “The Impact of Modern Music on Youth in Rural Areas in India”. During the course of the discussion that followed I referred to some observations made by Naiksaheb. I was sitting next to a Malaysian-Chinese dignitary from UNESCO. He turned to me and told me that he knew J.P. very well.

“And how’s that?”, I asked him.

“My Guru”, he said.

An eminent thinker like Gunnar Myrdal quotes Naiksaheb profuse- ly in his book, The Asian Drama . He has been rightly described as the educator of educators. He is honoured, respected, and invited for consultations and advice by countries all over the world. He once sudden- ly dawned before us in the lounge of the famous DaiTchi Hotel in Tokyo.

“What brings you here?”, he asked me.

“The Japanese Kabuki, the Nov — ”

“And the cherry blossom”, said my wife.

“And you, Naiksaheb?”

“The primary education of the Japanese people”, Naiksaheb said.

A couple of Japanese had already started bending and unbending before him and off he went with them for a meeting with the Japanese educationists.

Dai-Ichi is a five-star hotel. It was pretty cold even inside the lounge. Naiksaheb was wearing a khadi achkan and chudidar but the scarf which he wound round his head and chin to protect his ears from the chill outside was absolutely in the style of a villager out to sell

fresh vegetables in the early hours of the day in the weekly bazar of a town nearby.

He has always carried within him that tiny little village Bahirewadi, where he was born 70 years ago. Here is a man who has always been up to date in his information, most modern in his ideas, contemporary in his attitude towards life, yet no power on earth has been able to sever him from his roots in rural India.

It was Gandhi who said that every project which men in authority undertook should have one basic thought behind it, viz. the betterment of the poor man’s life in our country. And the only person who has become “powerful by knowledge” and attained fulness by sympathy whom I have had the good fortune of knowing is Naiksaheb. He is the one who, to quote the poet again, has realized as a teacher of teachers that “we rob the child of his earth to teach him geography, of language to teach him grammar”.

It is really a very happy coincidence that Naiksaheb should have made his first appearance in the world in a small remote village on 5 September, which is celebrated as the Teachers’ Day in our country. His mission in life even at the age of 70 seems to me to see that in a country like ours, where the bulk of the population lives in the villages, every day should look like the Teachers’ Day, with every villager fired by the desire to learn and every teacher yearning to teach.

His favourite poet Browning has, I am sure, given him a mantra as it were of six immortal words: “The best is yet to be.” “Age cannot wither, not custom stale” the incorrigible optimist that Naiksaheb is.

- P. L. Deshpande