Wednesday, January 12, 2022

पुलंची मजेशीर पत्रे - ६

श्री. वामनराव यांना मालवणीत पत्र लिहितानाही पुल असेच मजा करून सोडतात.

प्रिय वामनरावांनू, तुमचा पत्र मेळला. वाचून खूब बरां वाटलां. कशाक म्हणश्याल तर तुमचो गाव धाम्पूरच्या तळ्याक लागून तशी माझी सासूरवाडी खुद्द धाम्पूरच. (धाम्पूरच खरा धामापूर न्हय.) तर सांगत काय होतो, धाम्पूरच्या ठाकुरांचो मी जावांय ! धाम्पूरच्या तळ्यात गुरां पाण्याक् घेवन् कोणच जात नाय ह्यां तुमचा म्हण्णा खरांच. पण चुकलां माकलां ढ्वार जाता मागसून गुराख्याचो पोर नसलेला. मगे बापडा पाय घसरून पडता तळ्यात , म्हणीचो अर्थ काय ? की माणसाक तान लागल्यावर खैसर जांवां आनि सर जांव नये ह्येचो इचार खणा नाय ! असां आपला माका वाटता, तां काय जरी आसला तरी धाम्पूरच्या तळ्याची सर काश्मीरच्या डाल लेकाक नाय. खरां की खोटां ? (१०-१-७८)

या पत्राच्या शेवटी "चुकीचं मालवणी वाचण्याचा तुम्हाला इतका त्रास दिल्याबद्दल क्षमा करा" अशी पुस्तीही पुल जोडतात. इतका लोभस त्रास पुनःपुन्हा दिला तरी चालेल, अशीच यावर वामनरावांची प्रतिक्रिया झाली असणार.

- सोनल पवार 
संदर्भ :अमृतसिद्धी

0 प्रतिक्रिया: