Wednesday, January 12, 2022

पुलंची मजेशीर पत्रे - ७

नंदा नारळकर यांना १९ जानेवारी १९७९ रोजी पुलंनी घटप्रभेहून पत्र लिहिलं, कर्नाटकातला मुक्काम म्हणजे भाषाही त्या ढंगाची लिहिणं ओघानं आलंच. त्या पत्रात पुल लिहितात,

प्रिय नारळकर अण्णा,
काल तुमचं भयंकर म्हणजे भयंकरच म्हणायचं असं आठवण झालं. काय झालं बघा तर संध्याकाळचं सूर्य अस्त जाण्यापूर्वीचं वेळ डोचकीवर झाडाचं सावली धरून अंगणात येकटच इजिच्येअरवर आंग आणि स्टूलवर पायगिय टाकून तुमचं वुड्डहौससाहेबचं युक्रिजचं गोष्ट वाचत होतो. ते साहेब- पोटात हासून हासून गोळी आणतंय बघा

'Who is he?"

'An uncle of mine," Ukridge.

"But he seemed respectable."

यवढं वाचलं आणि यकटाच ठोऽऽ करून हसलो तर झाडाचं मागची बाजूनी 'काय झालं हो साहेऽऽब ?' अशी आवाज आली. घाबरून पाळण्यातलं पोरगी आंग काढतात तसं अंग काढलं- काय भूतगीत काय की म्हणून तर आमचं जुनं ब्याळगावातलं वळकीचं गोव्याचं कपिलेश्वरी म्हणून येक थोड गवयकाम करणार- (पाप ! चांगलं माणूस) बरोबर हितलं पोष्टमास्तरण्णांना तुमच्या पायावर घालायला आणलं म्हणून घेऊन आलं बगा.


-सोनल पवार
संदर्भ :अमृतसिद्धी

0 प्रतिक्रिया: