Showing posts with label Pula speech. Show all posts
Showing posts with label Pula speech. Show all posts

Tuesday, January 24, 2023

मराठवाड्याच्या धुळीत अत्रे साहेबांनी दिलेला वसा पुलंनी आयुष्यभर टाकला नाही - प्रा. मिलिंद जोशी

पु.ल.देशपांडेंचे नुसते नाव जरी उच्चारले तरी मराठी माणसांच्या मनात आनंदाचं कारंजं सुरू होते. वक्तृत्व, साहित्य, नाट्य, संगीत, विनोद अशा सर्व कलांमध्ये रममाण होणार्‍या पुलंनी स्वत: आनंद घेतला आणि रसिकांनाही तो दिला. म्हणून तर आपण पुलंना ‘आनंदयात्री’ म्हणतो. श्री. म. माटे मास्तर म्हणत, ‘माणूस गेल्यानंतर जितका काळ त्याची आठवण काढली जाते, तितका काळ तो माणूस जिवंत असतो.’ महाराष्ट्रात असा एकही दिवस जात नाही की ज्या दिवशी पुलंची आठवण निघत नाही. इतकं त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं गारूड आजही कायम आहे.

नांदेडच्या नाट्यसंमेलनाचे पु.ल. अध्यक्ष होते. या संमेलनात आचार्य अत्रे आणि पु.ल. देशपांडे एका व्यासपीठावर आले होते. त्या वेळेस मराठवाड्यातल्या रस्त्यांची अवस्था फारच बिकट होती. रस्त्यावर असणारे खड्डे, प्रचंड धूळ यामुळे अत्रे त्रासलेले होते. आपल्या भाषणात त्यांनी राज्यकर्त्यांवर यथेच्छ तोंडसुख घेतले. अत्रे म्हणाले, ‘काय हे मराठवाड्यातले रस्ते आणि काय ही धूळ! या धुळीनेच मी हैराण झालो आहे.’

नंतर पु.ल. भाषणासाठी उभे राहिले. अत्रेंच्या या भाषणाचा संदर्भ घेत म्हणाले, ‘ज्यांनी आयुष्यभर सर्वांना धूळ चारली त्यांना या धुळीची इतकी भीती का वाटावी? ही मराठी भाषेच्या आजोळची धूळ आहे. या धुळीतून संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, समर्थ रामदास, जिजाऊ महाराज, छत्रपती शिवाजी महाराज अशी मोठी माणसं गेली आहेत. ही धूळ अंगावर घेत असताना त्या माणसांचे दर्शन आम्हाला घडते आहे असे वाटते. ज्याला पैठण आवडत नाही असा पुरुष शोधून सापडणार नाही आणि जिला पैठणी आवडत नाही अशी बाई शोधून सापडणार नाही. अशा मराठवाड्यात अत्रे साहेब आपण आहात.’ लोकांनी टाळ्यांचा अक्षरश: कडकडाट केला.

सभाशास्त्राचा नियम मोडून अत्रे उभे राहिले. त्यांनी पुलंच्या डोक्यावरती हात ठेवला आणि म्हणाले, ‘‘मावळत्या विनोदाने उगवत्या विनोदाला दिलेला हा आशीर्वाद आहे. महाराष्ट्राला हसवण्याचे काम आता यापुढे पुलंनी करावे. मी मरायला मोकळा झालो आहे’’. आचार्य अत्रेंचे शब्द खरे ठरले. अत्रेंच्या नंतर महाराष्ट्राला हसवण्याचे काम पुलंनी केले.

पुलंचा जन्म ८ नोव्हेंबर, १९१९ रोजी गावदेवी इथल्या कृपाळ हेमराज चाळीमध्ये झाला. त्यांचे वडील बेळगाव जवळच्या चंदगड गावचे. त्यांचं घराणं बेळगावजवळच्या जंगमहट्टीचं. घरासमोर गंधर्वगड आणि कलानिधीगड हे दोन गड होते. या दोन गडांचे दर्शन पुलंना रोज घडत होते. त्यांना ललित कलांविषयी आणि बालगंधर्वांविषयी जे आकर्षण वाटत होते ते कदाचित यामुळेच असेल.

पुलंचे आजोबा म्हणजे कारवारचे वामन मंगेश दुभाषी. त्यांनी ‘ऋग्वेदी’ या टोपण नावाने ग्रंथ लिहिले. त्यांनी ‘आर्यांच्या सणाचा इतिहास’ हा ग्रंथ लिहिला. टागोरांच्या गीतांजलीचे त्यांनी भाषांतर केले. नातवाने लेखक व्हावे असे आजोबांना वाटत होते आणि मुलाने गायक व्हावे असे वडिलांना वाटत होते. पुलंनी दोघांनाही नाराज केले नाही. पुलंच्या मातोश्री लक्ष्मीबाई यांचा गळा गोड होता. त्यांना पेटीवादनाची आवड होती. हे सारे वंशपरंपरेने पुलंमध्ये आले.

शाळकरी वयातच त्यांनी मास्तरांवर विडंबन लिहिलं होतं. ‘आजोबा हरले’ नावाचं प्रहसन लिहिलं होतं. नकला करणे, गाणे म्हणणे, पेटी वाजवणे, नाटकं लिहिणे, ती बसवणे, त्यात भूमिका करणे अशा अनेक गोष्टीतून पुलंचं व्यक्तिमत्त्व विकसित होत गेलं. १९४१ साली वडिलांच्या आकस्मिक निधनामुळे पुलंना त्यांचे मुंबईचे बिर्‍हाड आवरून पुण्याला स्थलांतरीत व्हावे लागले.

१९४२ साली त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात बी.ए.साठी प्रवेश घेतला. त्याकाळात त्यांना चरितार्थासाठी भावगीताचे कार्यक्रमही करावे लागले. १९५० साली सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयातून ते एम.ए. झाले. त्यानंतर बेळगावच्या राणी पर्वतीदेवी महाविद्यालयात, मुंबईच्या कीर्ती विद्यालयात आणि मालेगाव शिक्षण संस्थेत त्यांनी काही काळ अध्यापनाचे काम केले. १९४३ साली बडोद्याच्या अभिरूची मासिकामध्ये पुलंनी लिहिलेले अण्णा वडगावकर हे व्यक्तिचित्र प्रसिद्ध झाले. तिथून त्यांची अर्धशतकी लेखकीय कारकीर्द सुरू झाली.

चिंतामणराव कोल्हटकरांच्या ललित कलादर्शनाच्या नाटकानंतर मो. ग. रांगणेकर यांच्या नाट्यनिकेतन कंपनीच्या नाटकांमध्ये पु.ल. काम करीत असत. रांगणेकरांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या ‘कुबेर’ या चित्रपटात पुलंनी भूमिका केली. ‘जा जा गं सखी, जाऊन सांग मुकुंदा’ हे गीत पुलंनी गायले. इथून त्यांची मराठी चित्रपटसुष्टीतली कारकीर्द सुरू झाली. चोवीस मराठी चित्रपटात कथा, पटकथा, संवाद, संगीत, अभिनय, दिग्दर्शन अशा विविध क्षेत्रात पुलंची कामगिरी घडली.

‘तुका म्हणे आता’ हे मंचावर आलेले पुलंचे पहिले नाटक. त्याचा पहिला प्रयोग १९४८ साली पुण्यात झाला पण या नाटकाला यश मिळाले नाही. या नाटकात वसंतराव देशपांडे, वसंत शिंदे आणि वसंत सबनीस असे तीन ‘वसंत’ होते. एक संत आणि तीन वसंत असूनही नाटक चालले नाही असं पु.ल. म्हणत. त्यानंतर अंमलदार हे नाटक आलं, ‘तुका म्हणे आता’ हे गंभीर नाटक होते, ते लोकांनी विनोदाच्या अंगाने घेतले. अंमलदार हे विनोदी नाटक आहे, ते लोकांनी गंभीरपणे घेऊ नये असं पु.ल. म्हणाले.

२६ जानेवारी, १९५७ रोजी ‘तुझे आहे तुजपाशी’ हे त्यांचे नाटक रंगभूमीवर आले. ते मराठी नाट्यसृष्टीतील मैलाचा दगड मानले जाते. सौंदर्यासक्त काकाजी आणि जीवनविरक्त आचार्य या दोन जीवन प्रवृत्तीमधला संघर्ष पुलंनी या नाटकात मांडला. पुढे आलेल्या भाग्यवान, सुंदर मी होणार, तीन पैशाचा तमाशा, एक झुंज वार्‍याशी, ती फुलराणी, राजा ओयरीपौस या सारख्या नाटकांनी मराठी रंगभूमीला समृद्धी देताना प्रयोगशीलतेचे आणि नावीन्याचे भानही दिले. विशिष्ट विषयाचा आणि मांडणीचा आग्रह नाही. आपल्याला जे आवडते तेच लोकापर्यंत पोचवायचे हा पुलंचा सरळ हेतू होता.

पुलं स्वत: उत्तम अभिनेते, दिग्दर्शक, संगीतकार, निर्माते असल्यामुळे रंगमंचावर प्रायोगिक कसे व्हावे याचे प्रगल्भ भान त्यांना होते. म्हणूनच रंगभूमीच्या इतिहासात पुलंनी आपल्या विविधांगी कर्तृत्वाने मानाचे स्थान मिळवले. १९५५ मध्ये पुलं आकाशवाणीच्या सेवेत पुणे केंद्रावर रूजू झाले. १९५१ ते १९६१ या काळात भारतातल्या दूरदर्शनचे पहिले निर्माते म्हणून त्यांची दिल्लीतली कारकीर्द संस्मरणीय ठरली. याच काळात जनवाणी, साधना, दीपावली, शिरीष, विविध वृत्त वगैरे नियतकालिकांमधून बटाट्याच्या चाळीतल्या गमतीजमती विनोदी शैलीत मांडणारे त्यांचे लेख प्रसिद्ध होत होते. ते खूप गाजत होते. १९५८ साली मौज प्रकाशनगृहाने ‘बटाट्याची चाळ’ हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध केले.

पुढे युनेस्कोच्या शिष्यवृत्तीवर मीडिया ऑफ मास एज्युकेशनचा अभ्यास करण्यासाठी ते लंडनला गेले. लंडनमधल्या मुक्कामात बटाट्याची चाळमधील निवडक निवडक भागांचे अभिवाचन त्यांनी केले. त्यातूनच ‘बटाट्याची चाळ’ प्रत्यक्ष अवतरली. पुढे वार्‍यावरची वरात, असा मी असामी, वटवट, हसवणूकच्या माध्यामातून पुलंनी मांडलेल्या खेळाने मराठी माणसांना भरभरून आनंद दिला. बटाट्याची चाळ मधून पन्नास-साठ बिर्‍हाडांचा एक मानस समूह त्यांनी निर्माण केला आणि मध्यमवर्गीयांच्या जगण्याची त्यांनी मार्मिक उलटतपासणी केली. ती लोकांना भावली. पुलंच्या या सर्व प्रयोगांना रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

एका व्यक्तिला चारच तिकीटे मिळतील असा तो सुवर्णकाळ होता. प्रयोगाची वेळ आणि संहिता याबाबत पुलं आणि सुनीताबाई दोघेही खूप दक्ष होते. संहितेतला एक शब्दही बदलला जाता कामा नये. याबाबत ते आग्रही होते. कितीही मोठा अधिकारी किंवा पुढारी प्रयोगाला येणार असला तरी पुलंनी प्रयोगाची वेळ कधी बदलली नाही. ‘रसिकांनी पाच वर्षाखालील मुलांना प्रयोगासाठी आणू नये’ अशा त्यांना सूचनाच होत्या. नटांचे पाठांतर असलेच पाहिजे. ‘पाठांतर नसणे म्हणजे हातात लगाम न घेता घोड्यावर बसण्यासारखे आहे’ असं पुलं म्हणत.

त्या काळात या प्रयोगाचे पंधरा रूपये तिकिट ठेवले असते तरी लोक आले असते पण पुलंनी पाच रूपयेच तिकिट ठेवले. ‘बटाट्याची चाळ’ फॉर्मात असतानाच पुलंनी ‘वार्‍यावरची वरात’चे प्रयोग सुरू केले. नवे-नवे प्रयोग ते सतत करीत राहिले. पुलं थकताहेत, दम लागतोय हे लक्षात येताच त्यांनी प्रयोग बंद केले. सदाभिरूची न सोडता प्रेक्षकांपुढे आसू व हसूचे खेळ करून त्यांची करमणूक केली.

‘गर्दी खेचण्यासाठी सदाभिरूचीच्या मर्यादा ओलांडण्याची गरज नसते’ हे पुलंचे सांगणे आजच्या रसिकांच्या अभिरूचीवर स्वार होणार्‍या कलावंताना खूप काही सांगणारे आहे.

इंग्लंडमधल्या वास्तव्यावर, एकूण प्रवासावर आधारलेले ‘अपूर्वाई’ हे पुलंचे प्रवासवर्णन किर्लोस्कर मासिकात क्रमश: प्रसिद्ध झाले. १९६० मध्ये ते पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाले. त्यानंतर आलेल्या ‘पूर्वरंग’, ‘जावे त्यांच्या देशा’, ‘व्यंगचित्रे’ या प्रवास वर्णनातून पुलंनी मराठी माणसाला जगाचे दर्शन घडवले आणि त्यांच्या जाणिवांचा परिघ विस्तारला. पुलं गुणग्राहक होते. चांगलं काम करणार्‍या सर्व क्षेत्रातील माणसांविषयी त्यांना कमालीची आस्था होती. त्यांचा गुणगौरव करण्यासाठी पुलंनी व्यक्तिचित्रं लिहिली ती व्यक्ती आणि वल्ली, गणगोत, गुण गाईन आवडी आणि मैत्री या पुस्तकात संग्रहित झाली आहेत. पुलंची ही व्यक्तिचित्रं शब्दशिल्पच आहेत.

‘माझं पहिलं प्रेम संगीतावर आहे’ हे पुलंनी अनेकदा सांगितलं. संगीतात जो कैवल्यात्मक आनंद मिळतो त्याची सर दुसर्‍या कशालाही नाही असं पुलं म्हणत. दूरदर्शनवरच्या एका मुलाखतीत पुलं म्हणाले, ‘‘माझ्या लेखी शंभरपैकी साठ गुण संगीताला आहेत. संगीताकडं पुरेसं लक्ष देता आलं नाही याची खंत या जन्मात आहे. पुढच्या जन्मी ही चूक नक्की सुधारेन. माझ्या समाधीवर ‘याने कुमारगंधर्वांचे गाणे ऐकले आहे’ एवढेच लिहा.’’

पुलंच्या वाढदिवसाला किशोरी आमोणकरांनी शुभेच्छा देण्यासाठी फोन केला. किशोरीताई म्हणाल्या, ‘पुलं तुमच्यासाठी काय करू?’ पुलं म्हणाले, ‘‘गा’’. किशोरीताई फोनवर खंबावती गुणगुणल्या. पुलं म्हणत, ‘‘कालचक्राबरोबर फिरणारं ध्वनीचक्र माझ्या मनात नेमकं राहतं. माझ्या आवाजाच्या दुनियेत जास्त रंग भरला असेल तर तो संगीताने! ज्या वयात लहान मुलांचं प्रसादाच्या खिरापतीकडे लक्ष असायचं, त्या काळात माझं लक्ष कीर्तनकाराच्या कथेमध्ये, ते गात असलेल्या अभंग, श्‍लोक, आर्या यांच्या गायनामध्ये असायचे.’’

पुलं समर्थ पेटीवादक होते. लहान वयातच बालगंधर्वांच्या समोर त्यांचीच गाणी वाजवून पुलंनी त्यांची शाबासकी मिळवली होती. पुलं म्हणत, ‘माझ्या हातात प्रथम पेटी पडली त्याऐवजी सतार पडली असती तर माझी संगीतातली वाटचाल वेगळी झाली असती. रागवादन, आलापी, घरंदाज ख्याल, गायकी या दिशांनी झाली असती. पेटीवाले गोविंदराव पटवर्धन यांच्या सत्काराला पुलं प्रमुख पाहुणे होते. भाषणात पुलं म्हणाले, ‘‘मी इथं अध्यक्ष म्हणून आलो नाही. पेटीवाला म्हणून आलोय.’’

गीतरामायणात व्हायोलिन वाजविणार्‍या प्रभाकर जोग यांचा पुलंच्या हस्ते सन्मान झाला तेव्हा पुलं म्हणाले, ‘‘माणसं पराधीन असतात हे गदिमांच्या गीतरामायणात ऐकलं होतं पण इतकी स्वराधीन असतात हे जोगांचं व्हायोलिन ऐकल्यानंतर समजलं.’’

संगीत क्षेत्रातील कलावंतांविषयी पुलंना किती आस्था आणि आपुलकी होती, हे यातून दिसून येतं. पुलंची संगीत दिग्दर्शनाची कामगिरी दोन स्तरावरील आहे. एक भावगीतासाठी संगीत दिग्दर्शन आणि दुसरं चित्रपटगीतासाठीचं. पुलंनी बोलपटातील 88 गाण्यांना चाली दिल्याची नोंद आहे. संगीतकार जेव्हा साहित्यातून संगीताकडे येतो तेव्हा सूर, त्यांना वाहणारे शब्द व त्यामागील अर्थ यांचे परस्सर संबंध घट्ट होतात. अर्थ, भावना, सुरांवर तरंगतात. त्यात बुडून जात नाहीत म्हणूनच ते संगीत हृदयाला अधिक भिडतं, हे पुलंच्या संगीताचं वैशिष्ट्य आहे.

पुलंच्या सर्व आविष्कारामध्ये विनोदाची सुखद पखरण आहे. त्यांच्या विनोदाचं आणि विनोदबुद्धीचं मर्म प्रसिद्ध लेखिका मंगला गोडबोले यांनी नेमकेपणानं उलगडलं आहे. त्या सांगतात, ‘‘पुलंची कल्पनाशक्ती अव्वल दर्जाची होती. पुलं स्वत:च्या संवेदना स्वत:वर उधळणारे साहित्यिक होते. म्हणून ते कलेच्या विविध प्रांतात सहजपणे वावरले आणि रमले.’’ पुलंची दृकसंवेदना, नाट्यसंवेदना, अर्थसंवेदना, रससंवेदना, श्रोतृसंवेदना अतिशय तल्लख आणि सजग होती. ती संवेदना एकांगी आणि सामान्य पातळीवरची नव्हती तर ती अनेकांगी आणि असामान्य पातळीवरची होती, म्हणूनच त्यांचं साहित्य अनुभवसमृद्ध आहे.

सूक्ष्म निरीक्षणशक्ती, भाषेवर विलक्षण प्रभुत्व, उपहास, उपरोध, विडंबन यांचा सहज वापर, विविध क्षेत्रातील संदर्भांची समृद्धी, सहजता आणि तारतम्याचे भान यामुळं पुलंचा विनोद सहजसुंदर आणि निर्विष झाला. जगातल्या दोन महायुद्धांनी हादरलेली, देशाच्या पारतंत्र्याने पिचलेली, महागाई, टंचाई, कुचंबणा, कोतेपणा यांनी गांजलेली, वेळोवेळी येणार्‍या साम्यवाद, समाजवाद, स्त्रीवाद या नवविचारांचा अर्थ लावताना गांगरलेली, जीवनाचा उपभोग घेताना अपराधगंडाने पछाडलेली माणसं पुलंचं लक्ष्य होती. त्यांना पुलंनी मोकळं ढाकळं केलं. जीवनोन्मुख केलं.

खोगीरभरती, नस्ती उठाठेव, गोळाबेरीज, हसवणूक, खिल्ली, मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास ह्या त्यांच्या विनोदी लेखसंग्रहांनी लोकप्रियतेचा कळस गाठला. पुलंनी विनोद लिहिला. अभिनित केला. उत्तम वक्तृत्वाने तो लोकापर्यत पोचवला. सिनेमा-नाटकातून तो दाखवला. इतका दीर्घकाळ मुक्तहस्ताने विनोदाची चौफेर उधळण करणारा दुसरा विनोदकार मराठी समाजाला मिळाला नाही. अपार करुणा आणि आयुष्याविषयीची खोल समज यामुळे पुलंनी जे काही निर्माण केलं ते रसिक मनांचा ठाव घेणारं ठरलं. जीवनातील विसंगती आणि विकृतीकडं त्या बुद्धीनं पाहणार्‍या पुलंच्या विनोदाचं वैशिष्ट्य म्हणजे त्या विनोदानं कोणालाही जखमा केल्या नाहीत, बोचकारलं नाही आणि रक्तही काढलं नाही.

पुलंच्या विनोदानं मराठी माणसाला खळखळून हसवताना रसरशीत जीवनदृष्टी दिली. एखाद्या घरंदाज सुनेनं चार-चौघांसमोरून जाताना स्वत:चा पदर सावरत ज्या अदबीनं जावं तितक्या सभ्यपणे पुलंचा विनोद मराठी समाजात वावरला. शाब्दिक, प्रसंगनिष्ठ, कोटीबाज अशा सर्व प्रकारच्या विनोदाची उधळण पुलंनी केली. उत्तम लेखक उत्तम वक्ते असू शकत नाहीत याची अनेक उत्तम उदाहरणं आपल्याकडं आहेत. लेखणी आणि वाणी ही शब्दशक्तीची दोन्ही रूपं पुलंवर प्रसन्न होती. बोलताना पुलंचा विनोद एखाद्या कारंज्यातल्या पाण्याच्या धारेप्रमाणं सहज उसळून येत असे. याचा प्रत्यय त्यांच्या लहानपणापासूनच येत होता.

पुलं दहा-अकरा वर्षाचे होते तेव्हाची गोष्ट. पार्ल्याला टिळकमंदिरात साहित्य सम्राट न. चिं. केळकर यांचे ‘गर्व्हमेंट ऑफ इंडिया ऍक्ट’ या विषयावर व्याख्यान होते. व्याख्यानानंतर शंका निरसनासाठी प्रश्न-उत्तरं सुरू झाली. पुलं म्हणाले, ‘‘फेडरेशन राबविण्याचा मुद्दा पुन्हा एकदा स्पष्ट करून सांगाल का?’’ पुलंकडे पाहत केळकर म्हणाले, ‘‘बाळ, तुझ्या वयाला साजेसा प्रश्न विचार.’’ त्यावर पुलं म्हणाले, ‘‘सध्या पुण्यात अंजिराचा भाव काय आहे?’’ त्यावर न. चिं. केळकर यांनाही हसू आवरलं नाही.

पुलंनी वकिलीचं शिक्षण पूर्ण केलेलं होतं. एका मुलाखतीत त्याचा संदर्भ देत संवादक म्हणाला, ‘‘यांचं मन वकिलीत रमलं नाही.’’ त्यावर पुलं म्हणाले, ‘‘माझं मन वकिलीत रमलं नाही असं म्हणण्यापेक्षा अशिलाचं मन माझ्यात रमलं नाही असं म्हटलं तर जास्त योग्य ठरेल. ज्याप्रमाणे निष्पक्षपाती न्यायाधीश असतात त्याप्रमाणे मी निष्पक्षकार झालो असतो. ’’

पुलं आणि सुनीताबाईंनी बा. भ. बोरकर, आरती प्रभू यांच्याप्रमाणेच बा. सी. मर्ढेकर या कवींच्या काव्यवाचनाचे जाहीर कार्यक्रम केले. मुंबईला मर्ढेकरांच्या कवितांचं वाचन पुलं आणि सुनीताबाई करणार होते. मध्यंतरात पुलंना थोडंस काहीतरी खायला लागायचं. तशा सूचना त्यांनी संयोजकांना दिल्या होत्या. संयोजकांनी ढोकळे, सामोसे, बर्फी इतके पदार्थ आणले होते की ते पाहून पुलं म्हणाले, ‘‘लोक ‘मर्ढेकर’ ऐकायला आले आहेत. ‘ढेकर’ ऐकायला नाही.’’

विजापूरला शाळेत पुलंचं भाषण होतं. टेबलावर पाणी नव्हतं. पुलंना ते हवं होतं. संयोजक कळशी व तांब्या घेऊन आले. पुलं म्हणाले, ‘‘पाणी प्यायला हवंय. आंघोळीला नकोय.’’ जालन्याला पुलंच्या सभेत शेळी शिरली. पुलं म्हणाले, ‘‘येऊ द्या तिला, महात्माजींच्या नंतर प्रथमच तिला सत्य ऐकायला मिळणार आहे.’’ पुलंच्या लेखनाकडं आणि भाषणाकडं गांभीर्यानं पाहिल्यानंतर एक गोष्ट जाणवते, मराठी भाषेवर पुलंचे प्रेम आहे. म्हणूनच पुलंच्या शैलीविषयी महाराष्ट्र साहित्य पत्रिकेत लिहिलेल्या लेखात स. ह. देशपांडे म्हणतात, ‘‘पुलंचे भाषेवर प्रेम आहे तसा त्यांना भाषेचा अभिमानही आहे.’’

पुलं इंग्लंडला गेले. वर्डस्वर्थच्या स्मारकाजवळ जगातल्या इतर अनेक भाषातले त्या स्मारकाजवळ माहिती देणारे फलक होते, पण मराठीतला एकही फलक नव्हता. पुलंना ही गोष्ट खटकली. त्यांनी व्यवस्थापकाला विनंती करून परवानगी मिळवली. मराठीतला फलक स्वत: लिहिला.

पुलंनी भाषा वापरली, वाकवली आणि वाढवली. मानवेतर गोष्टींचं मानवीकरण हे पुलंच्या शैलीचं वैशिष्ट्य होतं. समाजात ज्यावेळी कसोटीचे प्रसंग येतात तेव्हा समाज विचारवंताच्या भूमिकेकडं मोठ्या आशेनं पाहत असतो. अशा काळात विचारवंतांचं सत्त्व पणाला लागलेलं असतं. आज कोणतीही भूमिका न घेणं, एवढीच एक भूमिका समाजातील विचारवंत घेत असतात. पुलंच्या बाबतीत मात्र असं घडलं नाही. त्यांनी गरज असेल तेव्हा नेहमीच ठाम भूमिका घेतली. आणीबाणीच्या काळात दुर्गाबाई भागवत वगळता अन्य साहित्यिकांनी भूमिका घेतली नाही असा अपप्रचार जाणीवपूर्वक काही मंडळींनी केला पण त्यात तथ्य नव्हतं.

जयप्रकाश नारायण यांच्या प्रिझन डायरीचा अनुवाद पुलं करत होते. त्याचा पक्का मसुदा सुनीताबाई करत. या कामासाठी पूर्ण वेळ देता यावा म्हणून ते सभा, सत्याग्रह यात सहभागी झाले नाहीत. या गोष्टीची पुलं आणि सुनीताबाईंनी कधीही जाहिरात केली नाही. आणीबाणीनंतरच्या निवडणुकात इंदिरा गांधींनी वीस कलमी कार्यक्रम जाहीर केला. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री म्हणाले, ‘ही वीस अध्यायाची गीता आहे.’ त्याचा समाचार घेताना पुलं भाषणात म्हणाले, ‘ही गीता आहे हे बरोबरच आहे, कारण सुरुवातीला संजयउवाच आहे.’ त्यावर एक राजकीय नेता म्हणाला, ‘यांना आता कंठ फुटला आहे.’ पुलं म्हणाले, ‘गळा यांनीच दाबला होता, मग कंठ कसा फुटणार?’ आपली ठाम भूमिका पुलंनी नेहमीच स्पष्टपणे मांडली.

आणीबाणीनंतरच्या निवडणुकात जनता पक्षाचा विजय झाला. एस. पी. कॉलेजच्या मैदानावर सभा होती. पुलंना न विचारताच त्यांचं नाव वक्ता म्हणून बोलणार्‍यांच्या यादी टाकण्यात आलं होतं. लोकाग्रहाला पुलंनी बळी पडू नये असे सुनीताबाईंना वाटत होते. पुलंनाही ते पटले. स्वत: न जाता पुलंनी त्यांच्या भाषणाची कॅसेट या सभेसाठी पाठवली. पुलं लोकप्रियता आणि लोकमान्यतेच्या शिखरावर होते. जनमानसात त्यांची एक प्रतिमा होती. पती म्हणून पुलंचे सुनीताबाईंना आलेले अनुभव वेगळे होते. ते आपण मांडले तर चाहत्यांच्या मनातील पुलंच्या प्रतिमेला धक्का बसेल का? असा विचार दुसर्‍या कोणीतरी निश्चितच केला असता. जे घडून जायचं ते घडून गेलं आहे. त्याचं चर्वितचर्वण कशाला? असा विचारही मनात आला असता पण तो सुनीताबाईंच्या मनात आला नाही.

पुलंच्या अलौकिक प्रतिभेविषयी, त्यांच्या माणसं जोडण्याच्या कलेविषयी, त्यांच्या हजरजबाबीपणाविषयी सुनीताबाईंना नितांत आदर होता. प्रतिभावंत म्हणून घडणारं पुलंचं दर्शन आणि पती म्हणून घडणारं पुलंचे दर्शन या दोन्हीची अतिशय सुरेख मांडणी ‘आहे मनोहर तरी’ या पुस्तकात सुनीताबाईंनी केली. अनेकदा पतीच्या प्रतिभेच्या, प्रसिद्धीच्या, मोठेपणाच्या तेजात त्याच्या पत्नीचं तेज लुप्त होऊन जातं. मग त्या तेजाचं लुप्त होणं हा कौतुकाचा विषय होतो. ‘पुलंचे मोठेपण निर्विवाद आहे, पण माझी म्हणून स्वतंत्र ओळख आहे, ती जपली गेली पाहिजे. इतर कुणी ती जपावी अशी अपेक्षा नाही, मात्र मी ती प्राणपणाने जपेन’ या भूमिकेतून सुनीताबाई स्वत्वाची आणि सत्त्वाची जपणूक कशा करीत राहिल्या, ते या पुस्तकात वाचायला मिळतं.

पुलंच्याकडं अलौकिक प्रतिभा होती. सुनीताबाईंकडं व्यवहारदृष्टी होती. प्रतिभेचं लेणं त्यांच्याकडेही होतं. पुलंचं यश घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता हे मात्र निर्विवाद. पुण्यात २००२ साली जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं त्यात ज्येष्ठ लेखिकांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. सुनीताबाईंनी हा सत्कार स्वीकारावा यासाठी संयोजकांनी प्रयत्न केला होता. सुनीताबाईंनी हे निमंत्रण नाकारलं. सर्वाधिक लोकप्रिय लेखकाची पत्नी तसेच स्वतंत्रपणे लक्षणीय लेखिका, वत्सल कुटुंबिनी तसेच कर्तव्यकठोर विश्‍वस्त, काव्यप्रेमी रसिक तसेच परखड समाज हितचिंतक असे सुनीताबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते.

आधुनिक महाराष्ट्रातल्या स्पष्ट, निर्भय, तेजस्वी आणि बुद्धिमान व्यक्तिमत्त्वांमध्ये सुनीताबाईंचं स्थान अगदी वरचं आहे. पुलंच्या उत्साहाला आणि अफाट सर्जन ऊर्जेला विधायक वळण देत सुनीताबाईंनी जे पुलंसाठी केलं त्याबद्दल मराठी माणसं नक्कीच त्यांच्या ऋणात राहतील, कारण त्यांच्यामुळंच पुलंच्या निर्मितीचा आनंद रसिकांना भरभरून घेता आला. पुलं आणि सुनीताबाईंनी केवळ भांड्याकुंड्यांचा संसार केला नाही. त्यांनी संसार केला तो सर्जनाचा. त्यामुळंच मराठी माणसांची सांस्कृतिक श्रीमंती वाढली.

पुलंची जन्मशताब्दी साजरी होत असताना सुनीताबाईंचं स्मरण केलं नाही तर ती कृतघ्नता ठरेल. पुलंनी महाराष्ट्राला खळखळून हसवलं आणि भरभरून आनंद दिला. त्याचबरोबर निखळ जीवनदृष्टी दिली. विनोदकाराबरोबरच विचारवंत आणि कलावंत म्हणूनही पुलंचं स्थान महत्त्वाचं आहे. ‘विनोदबुद्धीची ढाल हातात असली आणि अंगात रसिकतेचं चिलखत घातलं की जीवनातल्या सगळ्या संकटांना नामोहरम करता येतं’ हे जीवनतत्त्व त्यांनी मराठीजनांना हसतखेळत सांगितलं.

भाई, पुलं, पीएल, महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व अशा विविध रूपात वावरणारे पु. लं. देशपांडे ही केवळ एक व्यक्ती नाही, ती वृत्ती आहे. या जगातलं दु:खं नाहीसं करता येत नाही पण ते हलकं करण्याची आस या वृत्तीत होती. या वृत्तीला रसिकतेची आणि शुभंकराची ओढ होती. ‘जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते’ अशा सगळ्या गोष्टींचा ध्यास होता. स्वत: पुलंना इतरांना फुलवायचं आणि स्वत: आनंद घेताना तो इतरांनाही मिळावा यासाठी प्रयत्न करायचा हेच त्यांच्या जीवनाचं सूत्र होतं. त्यांनी स्वत:साठी काहीच साठवलं नाही. उलट समाजाकडून घेतलेलं समाजालाच वाटून टाकलं. पुलंची जन्मशताब्दी साजरी करत असताना ही ‘पुलकितवृत्ती’ अंगी बाणवण्याचा प्रयत्न केला तर ते पुलंचं कृतज्ञ भावनेनं केलेलं खरं स्मरण ठरेल.

प्रा. मिलिंद जोशी
कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे.
९८५०२७०८२३

सदर लेख साप्ताहिक चपराक मध्ये पूर्वप्रकाशित आहे

मूळ स्रोत - > https://thepostman.co.in/pu-la-deshpande/

Saturday, June 4, 2022

इचलकरंजी येथील अखिल भारतीय सुवर्णमहोत्सवी साहित्य सम्मेलनात केलेले अध्यक्षीय भाषण

पुलंनी इचलकरंजी येथील अखिल भारतीय सुवर्णमहोत्सवी साहित्य संमेलनात केलेल्या अध्यक्षीय भाषणातला काही भाग, पूर्ण भाषण 'मित्रहो' पुस्तकात वाचता येईल .

साहित्यप्रेमी बंधू आणि भगिनींनो, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ह्या सुवर्णमहोत्सवाच्या प्रसंगी मला आपण अध्यक्षाच्या जागी आणून बसवल्याबद्दल मी आपला फार आभारी आहे. मराठी साहित्याच्या प्रांतात गेली तीस-एक वर्षे मी जी काही 'चावटी” केली,त्याबद्दल अतिशय प्रेमाने मला हा मान दिलात याची मला कृतज्ञ जाणीव आहे. तसा मी भाग्यवान माणूस आहे. लेखक म्हणून माझ्या उत्साहाचा भंग व्हावा असं माझ्याबाबतीत वाचकांनी काही केलेलं नाही. समीक्षकांनीदेखील, लिहितोय बिचारा तर लिहू दे, म्हणून सोडून दिलं आहे. बरं, मी तसा बंडखोर लेखक वगैरे नाही. बंड वगैरे मला जमणाऱ्या गोष्टी नाहीत. महात्मा गांधींच्या चळवळीतदेखील, पोलिसांचा लाठीहल्ला सुरू झाला की, माझं धावण्याच्या शर्यतीतलं कसब पाहून माझं मलाच आश्चर्य वाटायचं! मी त्या कलेचा अभ्यास वाढवला नाही, त्यामुळे भारत एका मराठी मिल्खासिंगला मुकला असं माझं नम्र मत आहे.

मी एक ज्याला मध्यमवर्गीय म्हणतात असा माणूस आहे. तरीही जीवनाच्या वाळवंटातला 'प्रवासी कमनशिबी मी” असं म्हणण्यासारखे क्षण माझ्या वाट्याला फार कमी आले. जे आले ते मी माझ्या लिखाणातून सांगितले आणि वाचकांनी 'ते वाचून आम्ही पोट धरधरून हसलो.' हे आम्हाला ऐकविले! आयुष्यातले काही संकल्प सिद्धीला गेले नाहीत याचं मला दुःख आहे. उदाहरणार्थ, गीतारहस्य, ज्ञानेश्वरी, दास कापितालचे मराठी भाषांतर, आणि भारतीय दंडविधान असले ग्रंथ संपूर्ण वाचायचे संकल्प अजूनही सिद्धीला गेलेले नाहीत! मला काहीही पाहण्याचा कंटाळा नाही. वाचण्याचा तर मुळीच नाही. गप्पा मारण्यात माझ्या आयुष्याचा सर्वांत अधिक काळ गेला आहे. आता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून मी हे बोलणं वरं दिसणार नाही, पण मला तसा बराचसा लिहिण्याचाच आळस आहे! अलीकडे तर मी प्रस्तावनालेखक म्हणूनच अधिक प्रसिद्ध आहे! माझी लेखक म्हणून भूमिका अगदी साधी आहे. आयुष्यात मला चांगल्या साहित्यातून, जीवनातून जे जे चटका लावून गेलं - ज्या आनंदाचे क्षण मी भोगले, जी सुसंगती किंवा विसंगती जाणवली, ते मी माझ्या स्वभावधर्माला स्मरून सांगितलं! कथा, कादंबरी, कविता ह्या मातबर साहित्यप्रकारांत माझ्या खात्यावर एकाही महान निर्मितीची नोंद नाही. 'नाटक? हा मी विशुद्ध साहित्यप्रकार मानत नाही. मी जी काही नाटकं लिहिली, ती रंगमंचावरून करण्यासाठी लिहिली. नुसतं कथा-कादंबरी-कविता यासारखं एकांतात वाचण्यासाठी नाटक ही कल्पना मला रुचत नाही. नाटकाचं पुस्तक वाचायचा मला कंटाळा आहे. नाटकाच्या यशात नट-नटींचा आणि इतर अनेकांचा वाटा असतो. अपयशाचा स्वामी फक्त नाटककार! यामुळे फार तर चार विनोदी पुस्तके, काही प्रवासवर्णने, काही व्यक्तिचित्रे, एवढीच माझी साहित्यनिर्मिती ! माझ्यापासून कुठला कालखंड सुरू झाला नाही की संपला नाही!

माझ्या आधीच्या अध्यक्षांची नावे वाचून माझी छातीच दडपली. शेवटी मी हे अध्यक्षपद स्वीकारताना मनात मर्ढेकरांचा मंत्र म्हटला की, 'विदूषका वाली हास्यरस!' पूर्वीच्या महान अध्यक्षांनी दिलेले संदेश मी वाचले. सावरकरांनी तर आपल्या तरुण पिढीने आता लेखणी मोडून टाकावी आणि बंदूक उचलावी, साहित्यिक बनू नये तर आधी बनावे सैनिक -- असा संदेश दिला होता! आता मला हे थोडंसं एखाद्याच्या लग्नाला जाऊन बोहल्यावर त्याला “आधी विमा उतरवा आणि मग मुंडावळ्या बांधा”. हे सांगितल्यासारखं वाटलं हा माझा दोष असेल! कुणी साहित्यातून लोकजागृती घडवायला सांगितलं, तर कुणी राष्ट्रभक्त व्हा असा संदेश दिला. तसा त्यांना अधिकार होता. पण हेदेखील थोडंसं ललित साहित्याकडे एक विशुद्ध आनंद देणारी, जगताना जीवनातील जाणिवा तजेलदार करायला लावणारी कला आहे असे न पाहता, साहित्य म्हणजे कथा-कवितेची शर्करावगुंठित औषधाची गोळी किंवा फावल्या वेळी घालायची 'शीळ' आहे असे मानण्यामुळे झाले आहे असे माझे नम्र मत आहे. हे सारं सांगणं त्या अध्यक्षांना शोभून दिसलं. पण. आपण माझं साहित्य वाचल्यानंतरही मला अध्यक्ष केलंत, ते मोरोपंतांच्या शब्दांत, कधीतरी 'रखिवडिचा स्वाद का न चाखावा' अशाच उद्देशानं असावं! त्यातून विनोदी लेखक हा रेवड्या उडविणारा अशीही एक कल्पना आहे. पण ती बरोबर नाही. तो रेवड्या करणारा असेल. रेवडीत तीळ आणि गूळ असतो. तैलबुद्धी आणि गोडवा यांचा साक्षात्कार जर विनोदातून झाला नाही, तर ते हास्यं पौराणिक नाटकातल्या राक्षस पार्ट्यांसारखे विकट हास्य होईल. असो! तर संस्कृत नाटकातल्या 'धीरोद्धतां नमयतीव गतिर्धरित्रीम॑', अशा ह्या मोठमोठ्या नायकांचा प्रवेश संपल्यावर ह्या मंचावरचा माझा प्रवेश हा 'तत:प्रविशति विदूषक:' यासारखा आहे! हे माझं मलाच वाटायला लागलं आहे.

इचलकरंजीच्या लोकांनी ह्या संमेलनाच्या कार्याचा भार उचलला, त्यांचेही आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो. बाळकृष्णवुवा इचलकरंजीकरांचं गाव म्हणूनही ह्या गावाशी मला माझा ऋणानुबंध वाटतो. काशीची गंगा रामेश्वरी न्यावी, तसं बुवांनी ग्वाल्हेरचं हिंदुस्थानी अभिजात संगीत ह्या महाराष्ट्राला आणून देऊन आमच्यावर अनंत उपकार केळे आहेत. आज महाराष्ट्रात अभिजात संगीताविषयी जे एवढं प्रेम आढळतं, त्या संगीताची जी इमारत इथे फळा आली, त्याचा बाळकृष्णवुवा इचलकरंजीकरांनी रचिला पाया असेच म्हणायला हवे. तेव्हा मी इचलकरंजीला येताना बाळकृष्णबुवांच्या गावाला येतो आहे हीही भावना मनात आहे.

हे पन्नासावं साहित्य संमेलन आहे. पण माझं भाषण हे कृपा करून गेल्या एकोणपन्नास संमेलनांच्या काळातल्या मराठी साहित्याचं समालोचन आहे असं आपण मानू नये. ज्या मराठी ललित साहित्याच्या प्रदेशात मी हिंडलो, जिथे मीही चार रोपटी लावायचा प्रयत्न केला, त्या प्रदेशाचं हे एक प्रवासवर्णन आहे असं आपण फार तर समजा. अगदी लहान वय सोडलं तरी लिहिता वाचता यायला लागल्यापासून गेली चाळीस-पंचेचाळीस वर्षं, मी ह्या पुस्तकांच्या दुनियेत हिंडतो आहे. साहित्य-संगीत आणि नाटक ह्या तीन गोष्टींनी माझं जीवन कृतार्थ झालं आहे. मी लिहिलेल्या साहित्यामुळे किंवा मी रचलेल्या संगीतामुळे किंवा नाटकामुळे नव्हे, तर मला ह्या तिन्ही कलांतून जो अनुभव मिळाला -- जी जीवनदृष्टी मिळाली - मनावर चढणारी काजळी जी वेळोवेळी पुसली गेली, त्याचं कारण, माझा ह्या कलांशी जडलेला संग! आणि जे मला लाभलं ते इतरांनाही लाभावं ह्या एका हेतूने मी ही निर्मिती करायला लागलो. एक तीळ सात जणांनी वाटून खावा म्हणतात तसं जे मला तिळ तिळ लाभत गेलं ते मी वाटलं! तिळापासून होतं ते तेल. तेलाला स्नेह म्हणतात. ह्या वाटपातून तुमचा-आम्रचा जो स्नेह जडला, ती माझी कमाई! आणि ही केवळ माझीच्‌ कमाई नाही, ह्या जगात कलांच्या रूपाने आनंद देणारे आणि आनंद घेणारे जे जे कोणी आहेत, त्या साऱ्यांची खरी कमाई ही एवढीच आहे.

(अपूर्ण)
पु.ल. देशपांडे
(२६-१२-१९७४)

Saturday, May 28, 2022

P L Deshpande in Andaman Cell

(Shri PL Deshpande was in Andaman Island on 20th May 1983, to celebrate 100th birth anniversary of Veer Savarkar)

By Prem Vaidya

Shree Prem Vidya worked for the Films Division of Ministry of Information and Broadcasting of Government of India from 1954 to 1985. He rose from being a Cameraman to the position of Producer/Director. His greatest contribution was production of the documentary on Veer Savarkar, released in 1983. While shooting for the documentary on Savarkar on the Andaman Island he heard a speech by well-known Maratha, Purushottam Laxman Deshpande, popularly called P.L. Deshpande was a man of many talents; actor, writer, orator, film director and musician. He acutely observed peculiarities of human behaviour. He was awarded the title Padma Bhushana by Government of India. In 1974 he was elected President of Marathi Sahitya Sammelan and also President of Marathi

Natya Sammelan in the same year. Deshpande and his talented wife Sau Sunita donated hundreds of thousands of rupees to charities without seeking any publicity.


In 1983, on the occasion of the birth centenary of Savarkar, Pu La Deshpande visited the Cellular Jail in the Andamans. He gave an eloquent speech on Savarkar. The following is an English translation of Prem Vaidya’s narration of the episode -


P L Deshpande in Andaman Cell

A true story of the last century.

In life, one always experiences the extreme difficulties in pursuing a good cause. However, when faced with darkness from all sides, one also experiences some wonderful unforgettable moments.

In November 1977, I was asked to prepare an outline for a documentary film on Veer Savarkar. Unfortunately the work never got started. Then came Mrs Gandhi back in power in January 1980 and surprisingly on 15 August 1982, I was asked to start producing a documentary on Savarkar at the earliest. I covered the part of Savarkar’s life in Bhagur, Nasik, Pune, Ratnagiri, Shirgao in Maharashtra. I started shooting on the Andaman Islands some 2,000 miles away from Mumbai on 25 February 1983. On 26th, Shree Harshe, a retired prison officer who has settled on the islands said to me, “Today is the anniversary of death of Savarkar. By sheer coincidence, a famous Marathi writer Purushottam Laxman Deshpande is here on the islands. I have invited him to address the members of Maratha Mandal, Andaman. Marathas serving in the Indian Navy and stationed on the island will also be present. I therefore suggest that you suspend your shooting today.” It was a rare occasion indeed. I gladly suspended my shooting. In the evening P.L was welcomed by Marathas.

Savarkar was brought to the prison here 72 years earlier. P.L was taken along the same route. P L climbed the three storeys and after walking along a long and narrow corridor came to the cell where Savarkar was once kept. He went inside and in a choking voice said, “Our Tatya (pet name given to Savarkar by his family) was kept here?” He could not say another world. P.L always used to make people laugh. This was the unusual face of P.L that we were seeing. We never saw him so sombre before.

The cell barely measured 13 by 7 foot. With greatest respect, P L put a garland on the picture of Savarkar hung on the wall. For a moment or two, there was dead silence. Then someone said with great emotion, “Vande Mataram …. Bharat Mata Ki jai …..Long live Veer Savarkar. “

P L walked down to the ground level. This was the place where prisoners were once flogged during the British Raj. P.L then gave the most thrilling speech in memory of Veer Savarkar. He said –

“Friends, I consider today as a day of great fortune. I do not believe in re-birth, so I cannot say that I must have done something good in my previous birth as a result of which I have been given this opportunity. I say that I have done something somewhere in this life and as a result, I have this opportunity today.”

“We have just garlanded Savarkar’s picture. We always refer to that room as “A cell in Andaman”. But when a radiant person like Savarkar is kept there it becomes like a sacrosanct part of a temple. Before we take our meals we say Tejaswinaa vadhee tamastu. We say those words without realising their meaning. But if we have to search for a person in modern Indian History, who in his body, mind and soul was illustrious, we have to point out to Veer Savarkar. His life teaches us that we should utilise every second of our life to remain ever glowing. He was an enemy of darkness, whether that was in the form of ignorance, blind faith or slavery imposed by a foreign rule, he always fought against it.

Have faith in Science

A man has to struggle against three forces namely, Man and Nature, Man and another man, Man and himself. These battles are constantly going on. Maratha Saint Tukaram says,” We have to fight day and night.” In any war, you must believe that you are going to win. Any one, who thinks he would lose, would never win. Savarkar had emphasised time and again, “At least die fighting.” He said, ”fight wherever you see ignorance.” We need to show great respect for him for preaching faith in Science to resolve our problems. He asked us to be Science-oriented. He spent all his life for that. No other leader has preached that we should follow Science as Savarkar has done. Unfortunately we do not even read what he had preached. If I were to ask you, how many of you have read

the writings of Savarkar, I am sure very few would raise hands. The more we read his thoughts in depth, the more we realise what prophesies he had made. On what basis was he saying, “ A day will come when people will erect statues of us here?” He knew that once you start a fight with determination nothing can stop you. We have to follow Science in today’s times. There is no alternative to this or else we would become simpletons.

Be fearless

We say that 26 February is a day of Savarkar’s atmarparna (Self-immolation)* but that is in the words of mortals. His every day was a day of self-immolation.

Savarkar was a tremendous force in this cellular jail in Andaman. We feel terrified even when we just visit his cell. Can you imagine what he must have felt at the thought of spending 50 years in this place and that too in the company of those vicious scoundrels who would not hesitate to kill for a penny? And yet, he believed that one day the shackles would be broken up and be removed. He

once told his fellow political prisoners “A day will come when our statues will be erected on this ground.” What a self-confidence!! He was convinced that he would cause changes to take place. Hindu Dharma tells us that we are the sons of nectar (Amrutasya Putrah); we are here not just to die one day but live with dignity. Savarkar knew that God never favours the weak. He always denounced feebleness.

---------------------------------------------------------------------------------------------------

* Note - There is no equivalent word for atmarpana in English.

In 1966, at the age of 83, Savarkar decided that his life’s mission was accomplished and decided to say good-bye to the world. He fasted for 20 days and left this world on 26 February 1966. You have probably read what punishments he suffered in Andaman, from his book My Transportation for Life. However I am certain that, in this book, he has not described even 10 % of what he actually suffered, because he did not want pity or sympathy from us, neither did he want people to react and merely say, “My God, what horrors Savarkar suffered.” He wanted youngsters to react and say, “I too am prepared to suffer like Savarkar for our nation.” In his old days he did not meet many people. It is my conviction that he did not want anyone to see him as a tired old man with little energy. Just as a lion would not like to be seen weak in his old days but would prefer the spectre of being seen as a roaring animal in jungle. Similarly, Savarkar did not see many people in his old age. And it was because of this that he fearlessly met his death by atmarpana (self-immolation).

Savarkar always despised the weak, feeble, incapacitated, and those devoid of backbone. This is apparent in his writings, dramas, and speeches. He always told us, “You are descended from the divine (tejasya putraha).” At the same time, he did not want arrogance. Like Lincoln he too would have said, “As I shall not be a slave, so I shall not be a master.” In his book My Transportation for Life we find that he had a vision of a nation state encompassing ALL human race. (And yet today many Indian leftists brand him as a stooge of the British) How could he have tolerated the British Empire? All his life he fought against all forms of exploitations.

Excellent orator

Shree Harshe has requested me that I should tell you some of my personal Reminiscences of Savarkar. To tell you the truth I never dared go near him. He was like the Sun. We see Sun only from a distance for we fear that if we go any nearer we will be burnt. I met Savarkar through his books. I heard him speak on the occasion of his 75th birthday. What a thrilling experience it was. I heard his speeches as a young boy. They were like flow of the river Ganga.

Great linguist

Savarkar has made our language rich. Today we use many words once coined by him. But we know very little how he had to fight for introducing their use and how he was ridiculed by scholars of those days. Ah, those words were created by a sage and not by a Government Department. For ‘Reporter’ he suggested ‘Vartahar’, one who carries away the news. Today we say Mahapaur and not

Mayor. Same goes for Sampadak (Editor) and the titles of others in the newspaper industry. In the Film industry, the words we use freely were all gifted by Savarkar. But at the time he suggested those words he was laughed at and ridiculed.

If you feel that youngsters should be able to speak fluent Marathi, then make them read Savarkar’s essays loudly every day. They will become great Scholars of language as well as of thoughts.

True Rationalist


I give just one example of his Rationalism. In his will, he had stated that his body should be cremated in an electrical furnace, meaning that a dead body has no further function of any kind. But many a so-called Secularists insisted that his ashes should be immersed in the waters of Ganga, Yamuna or some such river. Savarkar also had stated that after his death no prayers should be said for his soul. Today we just can’t imagine how much people were angry with him when he propagated that the Cow is just a useful animal and nothing more.

Legacy of Savarkar

Persons like Savarkar never die, nor ever say Goodbye. They are eternal. Even one line or one word of from them gives us inspiration. In one of his poems Savarkar said – Kshana to Kshanat Gela. Sakhihatacha sutonee.

“Moment was lost within a moment. My friend, it was gone for ever.” What a wonderful idea! For this one line, he should have been given the Noble prize. He has become eternal because of his creations as this. We only have to see if out of his own light of wisdom, a ray from his light can produce a spark in our mind. When we offered flowers in his cell in memory of him we experienced something unique, we were emotionally moved. If we retain that sensation, it would make us a bit more fearless if circumstances demand. Our Bharatiya culture asks us to become fearless. Why did Savarkar suffer such hardships in this place? It was for our better future. Today we have come here as free men and women, which was made possible because of the hardships suffered by Savarkar and others. We revere him and want to participate in his Punya. If a man dies we merely observe his death anniversary and perform Shraaddha. But death anniversaries of persons like Savarkar are called Punyathithi, which are a day of remembrance as well as an auspicious day. That is the difference between the two. On the days of Punyathithis we are lucky that we share some

Punya of such great persons. We have inherited Freedom and Fearlessness from Savarkar.

One of the most inspiring poems for freedom was composed by Savarkar. Jayostute Shree Mahanmangale Shivapsade Shubhade …. What a wonderful poem! Let me tell you the thrilling experience I recently had. During his internment in Ratnagiri (1924 to 1937) Savarkar worked hard for the emancipation of the untouchables. He organised get together of people of all castes, social functions in which untouchables would be admitted, the famous Patit Pavan Mandir which was the first temple open to all Hindus including the untouchables. Savarkar wanted them to give up caste differences among themselves; and get educated. Recently I went to a village Mhaisal near Sangli. My friend Mr Madhukar-rao Deval runs a co-operative project for the Dalits. These people used to be so poor that their women had only one set of clothes and therefore were ashamed to come out of houses. But today, the circumstances have changed. They came out in expensive clothes. I was told that they were going to sing a song. From my recent experiences I naturally assumed that it must be a film song. It would be harsh to start with and these women would sing even more harshly and make me miserable. But surprise! Surprise!! They sang Savarkar’s famous song Jayostute shree Mahanmangale Shivapsade Shubhade …

I was thrilled. I thought to myself, “It is not I who should be listening to this, it should have been Savarkar being present here to listen to this song. He would have then appreciated what seeds he sowed and where it had borne fruit. He should have experienced at least one moment of this singing.” The seeds sown by him have been so deep rooted. Persons like him can never die by any vicious attacks, or neglect or propaganda against them. They are self-made. They live like the great Banyan trees providing comforts to others in their hour of need.

There is a difference between ordinary drinking water and holy water dispensed by a priest in a temple. There is difference between normal tap water which we use for bathing and the water of holy river Ganga. A place where we merely wash our bodies is called a bathroom. But a place where water cleanses mind as well as body is called a Tirtha. Our holy river Ganga does both; therefore it has become a Tirtha. Today, we have gathered at such a Tirtha. Andaman has become a place of pilgrimage.

Really, so much has happened here in this place that every Indian should come here and bow to the memory of our freedom fighters like Savarkar. We need to think how his thoughts could be spread in all the Indian languages. I have expressed this wish to Balarao Savarkar who was Veer Savarkar’s personal secretary for 14 years. He has devoted all his life for this mission. I am sure we all will support him in his endeavour.

Observe a day of remembrance

Once again I bow to the memory of our freedom fighters, who were imprisoned here. To remind our people every year, there should be a day of celebrations, right here in the Cellular Jail on national level. And it should be presided by the highest authority of the country.

-------------------------------------------------------------------------------------------------------
Notes –

* Balarao Savarkar died in Mumbai in November 1997. P L Deshpande died in Pune in June 2000.

* On 3 May 2003 Entire Works of Savarkar in Hindi was published in 10 volumes by Prabhat Prakashan of New Delhi, under the auspices of Indian Prime Minister A B Vajpayee.

Original article by Prem Vaidya published in Tumhi Ahmi Apan Saglech a Marathi bi-monthly of the period 21 February to 6 March 2000, edited by Avinash Dharmadhikari of Pune.

Translated by Dr V S Godbole in November/ December 2004

Tuesday, May 17, 2022

पुलं म्हणजे माणुसकीने लगडलेला सहज-साधा मोठेपणा -- भीमराव पांचाळे

अनाकलनीय ,अविश्वसनीय गोष्टी आयुष्यात घडू शकतात याची मिसाल म्हणजे भाईंचा लाभलेला स्नेह .अकोल्यात किशोरदादांमुळे अल्पशी भेट घडली. मुंबईला आल्यावर त्या भेटीचे स्नेहात रूपांतर कधी झाले ते कळलेच नाही.."गज़ल" हाच एकमेव दुवा. माझी पेशकश त्यांना आवडायची. मी त्यांच्या भेटीला माझ्या ऑफिस पासून जवळच असलेल्या एनसीपीए मध्ये जायला लागलो.कधी गीता पण सोबत यायची. गीता सारस्वत आहे आणि गोवन पद्धतीने मासे छान बनवते याचे त्यांना केवढे कौतुक..तिच्या हातचे तिसऱ्यांचे हुमण आवडीने खायचे. मी मासे खात नाही म्हणून त्यांची बोलणी खायचो.

खूप गप्पा मारायचो त्यांच्याशी आणि नंतर चकित व्हायचो की , असे कसे हे लोभस मोठेपण जे माझ्यासारख्या लहानशा कलावंताला इंप्रेस करून बुजवत नाही, संकोचही वाटू देत नाही. किती सहजपणे बोलू शकतो मी या एवढ्या मोठ्या माणसाशी..! माणुसकीने लगडलेला असा सहज साधा मोठेपणा मला कधी येईल ? आपल्या अंगी त्याचा अंश जरी आला तरी जिंदगी निहाल होऊन जाईल .
           
भाईंचा कृपालोभ आणि परिसस्पर्श लाभला हे मला स्वप्नवतच वाटते... एनसीपीए मध्ये माझी विशेष मैफिल घडवून आणणे..., 'एक जखम सुगंधी' या माझ्या पहिल्या गज़ल कॅसेटचे विमोचन.., चंद्रपूरच्या दलित साहित्य संमेलनात (भाई उदघाटक होते) , आग्रहाने मैफिलीचे आयोजन आणि विशेष म्हणजे मैफिलीचे प्रास्ताविक निवेदन स्वतः करून नंतर ऑडियन्स मध्ये बसून भरभरून दाद.., आमच्या संसाराला त्यांचे प्रेमळ आशीर्वाद... आणि असे खूप काही काळजाच्या अगदी जवळचे...! आता हसू येतं आणि माझ्याच हिमतीची मला दाद द्यावीशी वाटते ...

श्रीलाल शुक्ल यांची 'राग दरबारी' ही कादंबरी तुम्ही वाचली का भाई ? असा आगाऊ प्रश्न केल्यावर त्यांनी काय करावं ?, कानांच्या पाळ्याना हात लावत त्या अफलातुन कलाकृतीची तारीफ केली आणि एखाद्या कादंबरीचा नायक एक गाव असू शकतं यावर खूप बोलले.असाच आगाऊपणा अजून एकदा केला होता..तेव्हां तर मजाच आली.. गुईयानी गुरेश्चि हा एक अजब व्यंगकार व कार्टुनिस्ट , त्याबद्दल विचारल्यावर ते उडालेच. 'अरे ,तुला कसा काय हा लेखक माहीत , तू कसा आणि कधी वाचतोस हे ? ' ..मग मी त्यांना किशोर दादांनी मला वाचनाची लावलेली आवड , मराठी ,हिंदी आणि इंग्रजी पुस्तकांचा पाडलेला फडशा ,गुईयानीचं अपघातानेच हाती लागलेलं "The House that Nino Built" हे मस्तं पुस्तक , मग मुंबईला आल्यावर फूटपाथवरील पुस्तक विक्रेत्यांकडून जिद्दीने मिळवलेली सगळी पुस्तकं वगैरे सर्व सांगितले. भाईंनी यावर काय म्हणावे ?..ते एखाद्या लहान मुलासारखं म्हणाले - , मी फक्त एकच वाचले रे , मला देशील का सगळी वाचायला ?..मी १५ दिवसांत तुला परत करीन.
                      
खूप आठवणी मनात रुंजी घालत आहेत . ही अजून एक...

युरोपात मैफिलींचा दौरा होता..नेदरलँड्स , जर्मनी , फ्रान्स..इ... अठरा दिवसांचा मुक्काम (गीता आणि भाग्यश्री सह) आमर्सफोर्ट येथे.. मित्र आणि चाहते गिरीश ठाकूर व सौ.वृंदा वहिनी यांचे घरी. पु लं चे हे सख्खे भाचे. गप्पांमध्ये 'भाई ' म्हणजे आपुलकीचा विषय. एक किस्सा त्यांनी सांगितला . भाई त्यांना एकदा म्हणाले की, " तुमची मुलं इथे डच भाषेत शिकली , वाढली तरी घरात मराठी बोलतात याचा आनंद आहेच. पण ती भांडतातही मराठीत याचा मला अभिमान वाटतो.."

दुःखाला हसरं करणारे- असे हे पु लं... जणू माणसा-माणसातील संवादाचा पूल !

भाईंना जाऊन खूप वर्षे झालीत पण त्यांची याद कधीच गेली नाही... जाणारही नाही... कारण- अनगिनत आठवणींमध्ये ते महफूज आहेत.. असेही नाही की, कधी लिहावेसे वाटले नाही... पण आपले हे असाहित्यिक मनोगत कुणाला आवडेल का ?... असे वाटून नाही कधी लिहिले... आज लिहावेसे वाटले... कोरोना काळातील आष्टगावच्या या प्रदीर्घ आणि निवांत मुक्कामात ति. भाईंच्या स्मृती तीव्रतेने जागल्या आणि-

मन भरून आले...

यादोंका एक हुजूम मेरे साथ-साथ है
तुझसे बिछडके मै कभी तनहा नही रहा..



भीमराव पांचाळे
१२ जून २०२०
महाराष्ट्र टाईम्स

Friday, December 17, 2021

वस्त्रहरण नाटकाच्या १७५ व्या प्रयोगाला केलेले अध्यक्षीय भाषण

मछिंद्र कांबळी आणि गंगाराम गवाणकर यांचं लोकनाट्याचा बाज असलेलं धमाल विनोदी मालवणी नाटक म्हणजेच 'वस्त्रहरण'. पुण्यात रात्री प्रयोग होता. प्रयोग सुरू व्हायला फार थोडा वेळ बाकी असल्यावर कळालं की पहिल्या रांगेत पु.ल. देशपांडे, सुनिताताई, वसंतराव देशपांडे अशी दिग्गज मंडळी बसली होती. सर्वांना दडपण आलं होतं. प्रयोग उत्तरोत्तर रंगत होता. नाटक संपल्यावर पु.ल. देशपांडेंनी विंगेत येऊन गवाणकरांचं खूप कौतुक केलं. आणि चार दिवसांनी १९ ऑगस्ट रोजी पु.ल. देशपांडे यांनी गवाणकरांना पत्र पाठवलं. हे पत्र वस्त्रहरण च्या संपूर्ण टीमसाठी एक कलाटणी देणारं पत्र होतं. या पत्रातील दोन ओळी नाटकाच्या जाहिरातीत छापून आल्या. पु. ल. देशपांडे यांची मछिंद्र कांबळी ह्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप पडली आणि त्यांच्या कौतुकाचे बोल नाटकास लाभले. नाटक धो धो धावले. 



ह्या नाटकाच्या १७५ व्या प्रयोगाला श्री. पु.ल. देशपांडे ह्यांनी अध्यक्षपद भूषवले होते. 


Friday, December 3, 2021

पुलंची मजेशीर पत्रे - १

मुंबईचे ना कुलकर्णी यांनी मराठीच्या सांप्रतच्या रहासाबद्दल १२ डिसेंबर १९९० ला पुलंना लिहितात.

"आपल्यासारख्या ग्रेट पर्सनला असे फ्लिपंट पत्र लिहिल्याबद्दल सॉरी. पण इंग्लिश व हिंदी लँग्वेजेसच्या जॉईंट अँटँकमुळे मराठी लँग्वेजची जी बँड कंडिशन झाली आहे त्याबद्दलची माझी स्ट्रॉग फीलिंग्ज एक्सप्रेस करण्यासाठी मला बेटर मेथड स्ट्राइक झाली नाही क्षमस्व.

ही स्ट्रॉग फिलींग्ज कशाबद्दल ? तर,या दिवसा दूरदर्शनीय मराठीय कार्यक्रमांमध्ये तथा मराठीय समाचार पत्रांमध्ये तिलक, सावरकर, आदी फडतूस इसमांनी दिल्या असलेल्या मराठीय संग्यांचा प्रयोग कमी होत जाऊन राहिला आहे. तथा त्यांच्या बदल्यामध्ये हिंदी संग्यांचा प्रयोग बड्या पैमान्यावर सुरू होऊन राहिला आहे. "

या पत्राला लगेचच १८-१२-९० रोजी उत्तर लिहिताना पुलंनी एकच धमाल केली आहे :

"एकवीसमी सदीत मराठीचा माहौल अजिबच राहून राहणार आहे. भाषा ही सोसायटीच्या बिहेवियरवर डिपेंड करते. रहनसहनमध्ये फर्क पडला की, भाषेतही फर्क पडतो. मुंबईसारख्या भेलपुडी संस्कृतीत, तर राष्ट्रभाषा हिंदी (सियावर रामचंद्रकी जय) गुजराती, बिगर मर्हेटी श्रीमंतीपुढे संकोचून कोन्यात उभी राहिलेली मराठी तर सगळ्या भाषा घुलमिलाकर एक नवीच मर्हेटी तयार होणार आहे... पहिले माणूस टू माणूस भाषा कानावर यायची आता पेपरवाल्याचे मराठी, रेडिओवाल्यांचे मराठी, दुर्दर्शनवाल्यांचं मराठी अशी भाषिक घुसखोरी सुरू झाली आहे . त्याला एकच उपाय म्हणजे इतर भाषांचं बिनधास्त मराठीकरण करणं. हमारी आयडिया समझा क्या ? सुज्ञको अधिक सांगणेची गरजच नही."

ह्या पत्राच्या खाली 'भवदीय पु.ल. देशपांडे' अशी सही केलेली आहे आणि सहीखाली कंसात लिहिलं आहे, “आमच्या नावातच मराठी देश आणि हिंदी पांडे आहे हेही ध्यानी यावे.”

- सोनल पवार
संदर्भ- अमृतसिद्धी

Tuesday, May 11, 2021

एक जिप्सी - (मानसी पटवर्धन)

८ नोव्हेंबर १९१९...गावदेवी पुलाखालील "कृपाळ हेमराज" चाळीत दुपारी २.४० मिनिटांनी एक बालक "गुपचुप "जन्मले..वार होता न कर्त्याचा वार "शनिवार" आणि महिना होता "कार्तिक"..अगदी भर दुपारी,उकाड्यात, सूर्यदेव मध्यान्ही तळपत असता या बालकाचा जन्म झाला..पण जन्मानंतर तो लडिवाळ "ट्येsssहेsss "ऐकू आलाच नाही.सगळी मंडळी चिंतेत बुडाली.शेवटी सुईणीने सुई तापवून बाळाच्या हातावर व कपाळावर टेकविली... आणि ते नवजात बालक रडू लागले,त्याचा तो पहिला "ट्ये sssहेsss"ऐकून माता गहिवरली, हसू लागली , सारे घरदार,नव्हे "हेमराज चाळ" हसू लागली...जन्मत:च जणू "हास्याचे भांडवल" घेऊन या बालकाची रवानगी ब्रह्मदेवाने इहलोकी केली असावी..भर दुपारी जन्मल्याने ते आपल्या अंगच्या तेजाने तळपणार होते आणि साऱ्या जगाला त्या अद्भुत तेजाच्या वलयाने दिपवून टाकणार होते...हे बालक म्हणजेच आपले सगळ्यांचे लाडके "पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे".. ..साहित्यिकांचे लाडके "पी एल" आपले "भाई"...!!!

वसंत सबनीसांनी पु लं ना विचारले,"भाई ,पी देशपांडे किंवा डी पुरुषोत्तम असं एखादं नाव का नाही घेतलंत?..."अरे "पी देशपांडे" हे एखाद्या "टेलर" सारखे वाटते तर "डी पुरुषोत्तम "गुंटकल स्टेशनात काम केल्यासारखे "..म्हणून "पुरुषोत्तम" हे वाढत्या अंगाला फिट्ट बसणारे नाव मला देण्यात आले.

जणू लोकांच्या जीवनात भरभरून आनंद निर्माण करण्यासाठीच त्यांचे पृथ्वीतलावर आगमन झाले असावे...पु ल म्हणतात ,"मी लोकांना काय दिले याचा मी हिशोब कधीच ठेवला नाही,पण त्यांनी मात्र त्यांची एक बहुमोल गोष्ट मला दिली...."हास्य "..."!!लहानपणापासूनच माझ्या मनी मंगेश पाडगावकरांच्या कवितेतील "एक जिप्सी" दडून बसला होता."एक विदूषक","एक गायक" ,"एक लेखक" माझ्या मनी नित्य वस्तीला असत.."तू माझा सांगाती" या न्यायाने कोणी जन्माची साथ दिली असेल तर ती "रवींद्रनाथ टागोर" आणि "चार्ली चॅपलीन" यांनी...!!!तेच माझे "प्रेरणास्थान" बनले आणि हजारो व्यक्तिरेखा जन्मल्या...!!!"गुळाचा गणपती" या "सब कुछ पु ल" असलेल्या चित्रपटातील "नाऱ्याच्या" भूमिकेतून पदोपदी "चॅपलीन" डोकावतो..!!"पुढचं पाऊल" मधील ढोलकी वादक "कृष्णा महार"त्यांनी हुबेहूब साकारलाय .."जोहार मायबाप जोहार" मधील त्यांनी साकारलेली "चोखामेळ्याची" भूमिका हृदयस्पर्शी अशीच होती. "अमृतसिद्धी गौरव ग्रंथात" म्हटले आहे की त्यांचे "जावे त्यांच्या देशा" वाचून "कवी बोरकर" हेलावले...त्यातील "निळाईची गुहा" हा लेख तर त्यांना एखाद्या महाकाव्याचा "कळसाध्याय" वाटला .त्यांचा "बालगंधर्व" विशेषांकातील "जोहार मायबाप जोहार" हा व्यक्तिचित्राचा वस्तुपाठ होय..याचा "मलाव्य" म्हणून उल्लेख करता येईल.."मलाव्य"(महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व) या शब्दात व्यक्त होणारा अर्थ पुढीलप्रमाणे...

श्रवणं कीर्तनम् च विष्णो:स्मरणं पादसेवनं
अर्चनं, वंदनं, दास्यम् सख्यम् आत्मनिवेदनं

१९४४ मध्ये "भट्या नागपूरकर" हे पहिले व्यक्तिचित्र "अभिरुची" या मासिकासाठी पु लं नी लिहिले...साहित्यिकाच्या यशाचे मर्म त्याच्या सूक्ष्म अवलोकनात ,निरीक्षण शक्तीत आहे... पाच ज्ञानेंद्रिय जणू नित्य टिपकागदाचे कार्य करत असतात...सहवासात येणारी माणसे ,ठिकाणे यांचे सूक्ष्म अवलोकन करता करता त्यांचा मनावर उमटलेला ठसा शब्दरूप धारण करतो आणि जन्म होतो हरितात्यांचा,पेस्तनजींचा,नारायणाचा,अंतू बरव्याचा..पु लं ना भेटलेले "आबा चांदोरकर" इतिहासप्रेमी होते त्यांच्यात त्यांना "हरितात्या" भेटले..कोकणात गेले असता तिथल्या लोकांचे वैशिष्ट्यपूर्ण हेल काढत केलेले संभाषण,कोकणी संस्कृती त्यांनी टिपली आणि "अंतू बरव्याचा" जन्म झाला..पु लं ना विचारणा होई की आपल्या साहित्यात कथांचे प्रमाण कमी का?..."अहो व्यक्तिचित्रण म्हणजे कथाच नाही का त्या व्यक्तिमत्वाची?"...पु लं चे उत्तर असे...त्यांना भेटलेल्या अनेक व्यक्ती ,ज्याचा ठसा त्यांच्या मनी उमटला त्या व्यक्तिरेखा अमर झाल्या...त्यांचे शब्दप्रभुत्व इतके चपखल असे की ती व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर त्या चित्रदर्शी वर्णनातून उभी राही,नव्हे आपल्याला त्यांची ओढ लागत असे...त्यांच्या प्रभावी शब्दकळेने "पेस्तनजी","हरितात्या","नारायण","चितळे मास्तर"आपल्याला आपले "सुहृद" वाटू लागले...!

केसरबाई, माणिक वर्मा, ज्योत्स्ना भोळे, यासारख्या गायिका, म. वि. राजाध्यक्ष, कर्णिक, गोखले, इत्यादि साहित्यिक मित्र,ऋग्वेदी, अप्पा, यासारख्या आप्तस्वकीयांबरोबरच गजा खोत, नामू परीट यासारख्या व्यक्तींचेही व्यक्तिचित्रण त्यांनी रेखाटले. अर्थातच या व्यक्तीचित्रणातील व्यक्ती त्यांना कोठे ना कोठे तरी भेटलेल्या आहेत. त्या व्यक्तींबद्दल त्यांच्या मनात प्रेम, आदर, आपुलकी आहे.मुख्य म्हणजे त्या व्यक्तीच्या असामान्य कर्तृत्वाचा ठसा त्यांच्या मनी उमटला आहे."भास्करबुवा बखले","राम गणेश गडकरी" यासारख्या व्यक्ती त्यांच्या कलेतून,देखण्या पैलूंतून ,असामान्य गुणांमुळे त्यांच्यासाठी जिवंत आहेत.त्यांच्यामुळे मिळालेला आनंद त्यांनी शब्दरूप देऊन गौरविला आहे."बाबा आमटे -एक विज्ञानयोगी","एक गाण्यात राहणारा माणूस"(मल्लिकार्जुन मन्सूर),"आनंदयात्री बाकीबाब"(ब.भ.बोरकर),"मुली ,औक्षवंत हो"(लता मंगेशकर),"पंडित वसंतखा देशपांडे","मंगल दिन आज"(पंडित कुमार गंधर्व)हे त्यांचे "गुण गायन आवडी" मधील लेख म्हणजे "कृतार्थ भावनेने गुणवंतांचे केलेले स्मरण "होय.

पारल्याच्या टिळक मंदिरात अनेक नामवंत वक्त्यांची भाषणे होत असत.काही कार्यक्रम असला की तिथली घंटा त्याची पूर्वसूचना देई.इथेच पुलंनी सरोजिनी नायडू,विनायक दामोदर सावरकर,सुभाषचंद्र बोस ,आचार्य अत्रे यांनी भाषणे ऐकली.अत्र्यांच्या भाषणाचा त्यांच्या मनी खोलवर परिणाम झाला.भाषण करत असता प्रत्येक श्रोत्याला वक्ता आपल्याशी संवाद साधत आहे असे वाटले पाहिजे हे अत्र्यांच्या भाषणातून त्यांच्या मनी रुजले .

लेखन,साहित्य,संगीत,एकांकिका,नाटक,चित्रपट,
गीतलेखन,गायन,हार्मोनियमवादन,संगीत,पटकथालेखन,काव्यगायन अशा अनेक प्रांतात यशस्वीपणे मुशाफिरी केलेले पु. ल. लेखनात अधिक रमले.लेखनातील विविध प्रकार त्यांनी हाताळले."तुझे आहे तुजपाशी","सुंदर मी होणार" ,"भाग्यवान",'तीन पैशाचा तमाशा","ती फुलराणी" यासारखी नाटकं, "आम्ही लटीके न बोलू","विठ्ठल तो आला आला" सारखे एकांकिका संग्रह,"पुढारी पाहिजे" सारखे लोकनाट्य,"खोगिरभरती", "नसती उठाठेव","गोळाबेरीज","हसवणूक","असा मी असा मी","खिल्ली" यासारखी विनोदी पुस्तके,"अपूर्वाई","पूर्वरंग","जावे त्यांच्या देशा",'वंगचित्रे" यासारखी प्रवासवर्णने,"गणगोत","गुण गाईन आवडी" यासारखी व्यक्तिचित्रे ,याखेरीज बालनाट्य,भाषणे यांचाही समावेश त्यांच्या साहित्यात होतो.

पुलंचा विनोद "दर्जेदार" असे.कोणाच्या व्यंगावर बोट ठेऊन त्यांनी विनोद साधला नाही.त्यांच्या विनोदाने कधी घुसमट होत नसे,उलटपक्षी कोंदट वातावरणाला प्रसन्न करण्याचे त्यात सामर्थ्य होते...त्यांचा विनोद कधी "कच्च्या कैरीची" लज्जत देई तर कधी "कोकिळेच्या कूजनाची"..तो पक्षाच्या केविलवाण्या फडफडीगत कधीच भासला नाही.साध्या साध्या गोष्टीत ते सहज विनोद करत..पहा ना...कापड दुकानात काम करणारे त्यांना एखाद्या "योग्याप्रमाणे" भासत,कारण "बनारसी शालू आणि राजपुरी पंचा" ते एकाच निर्विकार मनाने दाखवत...शेकडो लुगड्यांच्या घड्या मोडल्या तरी त्यांच्या चेहऱ्यावरची घडी बदलत नसे.पुलंचा विनोद असा आरशासारखा स्वच्छ असे...भाजीत झुरळ सापडल्याच्या तक्रारीवर ते म्हणत,"मंथली ट्वेन्टी टु रुपीज मध्ये एलिफंट का यायचा भाजीत?हे जगप्रसिद्ध उत्तर देणारा खानावळ वाला पुलंच्या विनोदाचे दर्शन घडवितो.

पुलंचा "हजरजबाबी विनोद" हा विलक्षण होता..कविवर्य बा.भ.बोरकर हे त्यांचे श्रद्धास्थान...ते आजारी होते ,तेव्हा पुल त्यांना भेटायला गेले ,त्यांच्या प्रकृतीविषयी लिहिताना त्यांना राजाध्यक्षांना लिहिले,"डॉक्टरांनी बोरकरांना पेयांत प्रायश्चित्ताची शिक्षा सुनावली आहे."

"इन्स्टंट विनोद करून हसविणे" हा तर त्यांचा हातखंडाच होता.नागपूरला कडाक्याच्या थंडीत रांगणेकरांच्या नाटक कंपनीबरोबर गेले असता प्रत्येकजण "काय ही थंडी" असे म्हणू लागला.तबलजी मामा म्हणाले ,"रात्री इतकी थंडी पडली होती की दातावर दात आपटत होते.त्यावर पुल म्हणाले ,"मामा तुम्ही रात्री वाटीत काढलेल्या दातांच्या कवळ्यासुद्धा एकमेकांवर इतक्या आपटत होत्या ,की त्या आवाजानेच मी जागा झालो.पुलंना हा विनोदाचा वारसा त्यांच्या "बाय"(आईची आई)आजीकडून मिळाला असावा.ती सतत मजेशीर बोले."मोरी" माशाला "मोरोपंत" तर "कुरल्याना" "घाटकोपर" आणले असे म्हणे..!!

देशपांड्यांचं घराणं बेळगाव जवळच्या "जंगमहट्टीचं"...कोल्हापूरजवळ "कलानिधीगड" आणि "गंधर्व गड" असे दोन समोरासमोर किल्ले होते.कलानिधीगडाची वतनदारी पुलंच्या पूर्वजांकडे होती.१९४७ पर्यंत त्यांना वार्षिक २० रुपये वतन मिळे.पुढे कोणा पूर्वजाने हातातील तलवार टाकून हाती लेखणी धरली आणि ते गडकर्यांचे देशपांडे झालो..पुलंचे वडील "जे बी अडवानी" या कागद कंपनीत सेल्समन होते.त्यांना कुठे कल्पना होती की मोठेपणी आपले चिरंजीव याच कागदाची रिम च्या रिम साहित्य निर्मितीच्या नावाखाली वाया घालविणार आहेत?पुलंचे आजोबा "ऋग्वेदी" या नावाने ग्रंथ लिहीत.ते कीर्तनही करत.कीर्तनातील पदे सरधोपट पणे म्हणून संपविण्याकडे त्यांचा कल असे.पण मागे साथ करणारे पुल मात्र तीच पदे आळवून आळवून म्हणत..ज्या काळात मुलांचे खिरापतीकडे लक्ष असे ,तेव्हा पुलंचे लक्ष मात्र कीर्तनातील अभंग,ओव्या श्लोक यांकडे असे.आजोबांनी रवींद्रनाथांच्या गीतांजलीचे "अभंग गीतांजली" असे भाषांतर केले होते.आई चा स्वर निर्मळ होता ,ती अंगाई म्हणून निजवत असे.मामा नाट्यपदे म्हणत असे.त्यामुळे कलेचा वारसा घरातच होता,आणि त्यासाठी प्रोत्साहनही मिळत असे.

आजोबा संस्कृत भाषणे लिहून देत.

मनोहरा मधुरा च संस्कृत भाषा
एषा एव अस्माकं पूर्वजाणाम् आर्याणाम् सुलभा शोभना च भाषा...

पुलंच्या जाहीर भाषणाचा पहिला प्रयोग "जोगेश्वरीच्या सरस्वतीबागेत" वयाच्या चौथ्या पाचव्या वर्षी झाला.भाषण अभिमन्यूवर होते.भाषण करता करता पुल पदरची दोन वाक्ये बोलून गेले आणि पुढले भाषण विसरले.पण प्रसंगावधान राखून "माझी दूध पिण्याची वेळ झाली" असे सांगून त्यांनी वेळ मारून नेली.

हेमराज चाळीत त्यांचे जेमतेम १८ ते २० महिन्याचे वास्तव्य होते.त्यानंतर जोगेश्वरीतील "सरस्वतीबाग" नंतर "५ अजमल रोड,पार्ले "येथे त्यांचे वास्तव्य होते.पारल्याला आल्यावर "श्री दत्तोपंत राजोपाध्ये" यांच्या क्लासमध्ये ते हार्मोनियम शिकू लागले.लहानपणी जेवणं झाली की त्यांचा हार्मोनियम वादनाचा कार्यक्रम ठरलेला,धाकटा भाऊ रमाकांत तबल्यावर...आणि घरची मंडळी हक्काचे प्रेक्षक...!!राजोपाध्ये यांच्या क्लासमधील एक कार्यक्रमात दस्तुरखुद्द "बालगंधर्व" अध्यक्ष म्हणून आले होते.ते अगदी पुलंच्या समोर येऊन बसले.पुल वाजवीत होते त्यांचीच पदे..."सत्य वदे वचनाला नाथा".. विजेसारखी चपळता असलेल्या त्यांच्या बोटांतून बालगंधर्वांच्या गळ्यातील पाणीदार मोत्यासारखी तेजस्वी असलेली एकेक पल्लेदार तान निघत होती...बालगंधर्व खुश झाले त्यांनी पुलं ना शाब्बासकी दिली,त्यांचे खूप कौतुक केले...प्रत्यक्ष बालगंधर्व समोर बसले असता "सत्य वदे वचनाला" वाजविणे हे एक धाडस होते,नव्हे शिवाजीराजांसमोर भवानी चालविण्यासारखे होते..हा चमत्कार घडला होता...तेव्हा "बालगंधर्व" हे "सुरांच्या दुनियेतील प्रत्येकाचे आराध्य दैवत" होते.त्यांचं गाणं हा शब्दातीत अनुभव असे.पुलंच्या बालमनावर पहिला संस्कार बालगंधर्वांच्या सुरांचा झाला. पुलंच्या जीवनी सगळ्यात जास्त कोणी रंग भरले असतील तर ते संगीताने...सुरांनी...!!!त्यांनी सुमारे ११ चित्रपटात आपला ठसा उमटवला. काहींना त्यांनी संगीत दिले होते...काहींमध्ये अभिनय केला.

बालपणी अभ्यासापेक्षा त्यांचा संगीताकडे अधिक ओढा होता.संगीतकार होण्याआधी ते भावगायक झाले.. जी. एन. जोशी, गजानन वाटवे अशा दिग्गज मंडळींच्या जमान्यात तबल्यावर वसंतराव देशपांडे, सारंगीला मधुकर गोळवलकर व स्वत: पेटी वाजवत पुलंनी भावगीत गायनाचे अनेक कार्यक्रम करून श्रोत्यांची दाद मिळवली."वहिनी" नाटकातील "पाखरा जा त्यजुनिया" हे पद श्रीधर पार्सेकरांच्या संगीतात त्यांनी गायले होते.पुढे "केशवराव भोळे "यांची भेट झाली आणि त्यांच्या संगीताची छाप पुलंवर बसली,पुल त्यांना गुरुस्थानी मानत.रांगणेकरांच्या "कुबेर" या चित्रपटातून पुलंचा चित्रसृष्टीत प्रवेश झाला.१९४९च्या "मोठी माणसं" पासून ते संगीतकार बनले."देव पावला"या चित्रपटाची गाणीही खूप गाजली.

"देव पावला" चित्रपटातील "माणिक वर्मा" यांचे "कबिराचे विणतो शेले" हे गीत अजरामर आहे आणि आजही त्याची लोकप्रियता अभंग आहे."घरधनी' मधील गीतही त्यांनीच लिहिली होती.त्यातील वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातील "बशी कपाचे लगीन झाले ,बशी बायको नवरा कप"या गाण्याने मजा आणली होती.. १९५३ मध्ये पुलंनी ‘अंमलदार’, ‘माईसाहेब’, ‘विठ्ठलपायी’, देवबाप्पा’ आणि ‘गुळाचा गणपती’ या चित्रपटांना संगीत दिलं. यातील ‘देवबाप्पा’ आणि ‘गुळाचा गणपती’ या चित्रपटांची गाणी प्रचंड गाजली.देवबाप्पा मधील "नाच ग घुमा" च्या वजनावर लिहिलेले "नाच रे मोरा आंब्याच्या वनात" हे गीत "सदाबहार" आहे.कोणतेही स्नेहसंमेलन याशिवाय पूर्ण होत नाही."गुळाचा गणपती" मधील सगळीच गाणी गाजली..."इंद्रायणी काठी" तून भक्ती रस ओथंबून वाहतो ,भीमसेन जोशी यांनी त्या गीताचे सोने केले आहे."इथेच टाका तंबू" हे "अरेबिक स्टाईल" वर आधारलेले आणि "ही कुणी छेडिली तार" हे बहरलेला प्राजक्त पाहून "केदार" रागावर गदिमांनी लिहिलेले गीत ...खड्या सुरात गाऊन तानांची आतषबाजी करणाऱ्या वसंतरावांना "ही कुणी छेडिली तार" सारखे मृदू गीत पुलंनी गायला लावले आहे.

१९५५-मध्ये आकाशवाणीवर नोकरी करत असताना त्यांनी "अमृतवृक्ष" आणि "जनाबाई" अशा दोन संगीतिका सादर केल्या. कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेल्या ‘बिल्हण’ या संगीतिकेचं संगीतदिग्दर्शन व निर्मिती पुलंचीच. या संगीतिकेतील ‘माझे जीवनगाणे’ व ‘शब्दावाचुनी कळले सारे’ या गीतांच्या पुढे ध्वनिमुद्रिका निघाल्या व गाजल्या. याशिवाय पुलंच्या संगीतातील ‘माझिया माहेरा जा’, ‘बाई या पावसानं’, ‘हसले मनी चांदणे’, ‘तुझ्या मनात कुणीतरी तुझ्या मनात कुणीतरी लपलं गं’ या खाजगी ध्वनिमुद्रिकाही गाजल्या.

एखादी कविता,कथा,कादंबरी नव्या सृष्टीची कवाडे उघडून देते.लहानपणी संत पंत कविता ऐकलेल्या पुलंनी बोरकरांच्या कवितेचा उत्सव पहिला ,तेव्हा त्या शब्दांनी त्यांच्या मनावर गारुड केले."क्षणभर त्या शब्दांनी आपल्या पंखांवरून मला दूरच्या जगाची सफर घडविली" असे पुल म्हणतात."केशवसुत" त्यांचे नित्याचे साथी होते.बालकवींच्या "फुलराणीचे" त्यांना वेड होते,तशी नारायण सुर्व्यांची "मनी ऑर्डर" त्यांच्या मनी कोण्या एक स्त्रीच्या वेदनांचे काटे रूतवून जात असे.गालिब ,तुकोबा,शेक्सपिअर,कालिदास,रवींद्रनाथ ,गोर्की, मर्ढेकर,सुर्वे,खानोलकर,खलील जिब्रान,हेमिंग्वे सारे त्यांच्या मनी गुण्यागोविंदाने नांदत...त्यासाठी त्यांना पासपोर्ट लागत नसे. सुनीताबाईंबरोबर काव्यगायनाचे अनेक कार्यक्रम त्यांनी गाजविले आहेत.

वयाची पन्नाशी उलटल्यावर पुल १९७०मध्ये "बंगाली" भाषा शिकण्यासाठी शांतिनिकेतनात गेले.बंगाली भाषा आणि रवींद्रनाथांचे काव्य यांच्या ओढीचा वारसा देणारे होते त्यांचे आजोळ चे आजोबा,गीतांजलीचे भाषांतरकार "वामन मंगेश दुभाषी" उर्फ़ "ऋग्वेदी"...!! भाषा जिथे जिवंत पिंडातून उमटत असेल तिथेच जाऊन,तिची नाना स्वरूप अनुभवून व भोगून शिकायची असते अशी त्यांची धारणा होती.शांतिनिकेतनात गेले तेव्हा "जिबोने आज कि प्रथम एलो बशंतो" ?(जीवनात आज प्रथमच वसंत आला का?)असा प्रश्न पडला होता.पुढे रविंद्रानी सगळ्या ऋतूतील सौंदर्य पाहण्याची दृष्टी दिली.ग्रीष्मालाही ते "अग्नी स्नाने शुचि होक धरा"(अग्नी स्नानाने पृथ्वी शुचिर्भूत होवो)असे म्हणत असत.वयाची पन्नाशी उलटून गेल्यावर बंगाली शिकण्याची जिद्द बाळगणारे पुल खरच धन्य होत.

पु.लं.चे आकाशवाणी, दूरदर्शन, नाट्य व चित्रपट क्षेत्रातील कार्य लक्षणीय आहे.१९५८ मध्ये पुलंना आकाशवाणीने युनेस्कोच्या शिष्यवृत्तीवर "मीडिया ऑफ मास कम्युनिकेशन" या अभ्यासक्रमासाठी लंडनला बीबीसीकडे पाठवले. १९५९मध्ये पु.ल. देशपांडे भारतातील "पहिले दूरचित्रवाणी कार्यक्रम निर्माते "झाले. दिल्ली दूरदर्शनवर वरील पहिला कार्यक्रम पुलंनी निर्मिला होता. दूरदर्शनवरील बिरजू महाराजांच्या नृत्याचा कार्यक्रम होता. संथ गतीत सुरू झालेल्या नृत्याची लय वाढत वाढत चौपट झाली. अश्या वेळी त्या द्रुतगतीतही तबला वाजवून पुलंनी आपले तबला प्रावीण्य दाखवून दिले.दूरदर्शनच्या पहिल्यावाहिल्या प्रसारणासाठी "पंडित नेहरूंची" दूरदर्शनसाठी मुलाखत घेणारे पुल हे भारतीय दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार होते.

जीवनाचा आनंद लुटण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे.हे जीवन सुंदर आहे,पण शारीरिक दौर्बल्यामुळे समाजातील काही जण तो घेऊ शकत नाहीत .अशा वेळी त्यांच्या मदतीसाठी "पु ल देशपांडे फाउंडेशन" ही संस्था जाते."हसविण्याचा माझा धंदा" या कार्यक्रमाचे अनेक प्रयोग करून पुलंनी रक्तदान शिबिरासाठी ४०,०००रुपये दिले.समाजातील दुर्बल घटकांसाठी कार्यरत असणाऱयांबाबत त्यांना नितांत आदरभाव होता.त्यांनी कुष्ठरोग्यांच्या लग्नात उभे राहून मंगलाष्टके म्हटली. कुष्ठरोग्यांविषयीची समाजाची मानसिकता बदलण्यात पुलंनी सिंहाचा वाटा उचलला.
पुलंच्या देणगीतूनच ‘मुक्तांगण’सारखी सेवाभावी संस्था २९ऑगस्ट १९८६ रोजी उभी राहिली. पुण्यात "बालगंधर्व नाट्यगृह "उभे राहिले पाहिजे असा आग्रह धरणाऱ्यात पुल अग्रस्थानी होते.देशात आणीबाणी आली तेव्हा जयप्रकाशजींच्या प्रिझन डायरीचे त्यांनी "स्वगत" या नावाने मराठीत भाषांतर केले.

जीवनातील असंख्य प्रकारचे अनुभव शोषून,त्यांना विविध आकार देऊन ,त्यातील आशयघनता शब्दात मांडून सामान्य माणसाच्या जीवनात आनंद फुलविणारा हा आनंद यात्री...द्वेष,मत्सर हे शब्द त्यांच्या कोशातच नव्हते...सुरांच्या पंखांवर बसून नादब्रह्मात रमणारा ,कैवल्याच्या चांदण्याचा आस्वाद घेणारा हा अवलिया...रंगभूमीवर सादरीकरण करताना "शब्दात" प्राण ओतणारा हा हाडाचा कलावंत...बालगंधर्व,केशवराव दाते,भास्करबुवा बखले,बाबा आमटे,बा भ बोरकर,कुमार गंधर्व,वसंतराव देशपांडे ,ग दि माडगूळकर यांची साथ त्यांना लाभली आणि त्यांच्या जीवनाचे आनंदवनभुवन झाले आणि इतरांच्याही जीवनी ही आनंदाची फुलबाग फुलविण्यासाठी ते आयुष्यभर झटले.."पद्मश्री","पद्मविभूषण" या उपाधी मिळाल्या,सरकार दरबारी मन मरातब मिळाला...साहित्याच्या विश्वात आत्मतेजाने चमकणारा हा दिव्य रवी होता.."पुरुषोत्तम" हे नाव त्यांनी सार्थ केले.आपल्या संपन्न अनुभूतीतून त्यांनी अखिल विश्व श्रीमंत केले.त्यांची साहित्याची भूक "चतकोराने' भागणारी नव्हती...आजन्म शब्दावर प्रेम करणारा हा सरस्वतीचा वरदहस्त लाभलेला तिचा सच्चा उपासक होता.

त्यांच्या दिवाळी अंकात आलेल्या "माझे खाद्यजीवन" या लेखाचे पारायण केल्याने "सतीश मनोहर सोहोनी" (चिनी आक्रमणाच्या वेळी संरक्षक खात्यातील वायरलेस ऑपरेटर)यांची कडाक्याच्या थंडीतही जिवेषणा बळावली.१४०००फुटांवरील बर्फाळ पहाडी प्रदेशात त्यांना पुलंच्या साहित्याने साथ दिली.तसेच एक २०वर्षांचा तरुण "उदय फाटक" कुलू मनाली येथे ट्रेकिंग ला गेला असता त्याला "व्हायरल इन्फेक्शस पोलिन्यूरोसिस" झाला,मज्जा यंत्रणा कोलमडली.कोणत्याच वैद्यकीय उपायांना तो प्रतिसाद देईना. मात्र "असा मी असामी","अंतू बरवा","नारायण","म्हैस" या पुलंच्या व्यक्तिरेखांनी त्याच्या चेहऱ्यावर आनंदाची पहाट झाली.क्रमाक्रमाने सर्व ताणातून तो मुक्त झाला आणि पूर्ववत जीवन जगू लागला. याचे श्रेय त्याची आई "सुनीती फाटक" पुलंच्या साहित्याला देते. नामवंत बुद्धिबळपटू खाडिलकर भगिनी आपला ताण सुसह्य करण्यासाठी पुलंचे साहित्य नेतात...(अमृतसिद्धी गौरव ग्रंथातून याचा संदर्भ घेतला आहे..)

पुलंचे साहित्य म्हणजे "विविधरंगी फुलांनी नटलेली फुलबाग"...त्यांचे जीवनाचे तत्वज्ञान निर्भय,नितळ आहे.त्यांचे माणसावरील प्रेम अफाट आहे."एका ठिकाणी थांबणे" हे त्यांच्या रक्तातच नाही.त्यांचे उज्ज्वल भविष्य वडिलांनी ओळखले होते आणि "तू याचे मोठमोठे मान सन्मान बघशील" असे आईला सांगितले होते.वडिलांचे आशीर्वाद फळाला आले...उत्तम कलाकृतीने पुल जसे भारून जात ,तसेच आज आपण त्यांच्या दर्जेदार साहित्याने भारावून जातो..."शब्दांची पालखी करावी आणि त्यात मानाने त्यांना बसवून आपण पालखीचे भोई व्हावे" ...याने सुद्धा त्यांचे ऋण फिटणे नाही...!!!"दिव्यत्वाची जेष्ठ प्रचिती तेथे कर माझे जुळती..."!!!

मंगेश पाडगावकर म्हणतात...

पुलस्पर्श होताच दु:खे पळाली
नवा सूर आनंदयात्रा मिळाली
निराशेतुनी माणसे मुक्त झाली
जगू लागली हास्य गंगेत न्हाली...
हेच खरे...!!


मानसी पटवर्धन.
(स्वर प्रतिभा दिवाळी अंक २०१८च्या सौजन्याने )

Saturday, April 11, 2020

तेजस्वी सुनीताबाईंविषयी...

सुनीताबाई.. काही मोजके साहित्यप्रेमी वगळता त्या आता जणू सर्वांच्या विस्मरणातच गेल्याहेत. मंगला गोडबोले यांच्या " सुनीताबाई" या पुस्तकानं त्यांच्याबाबतच्या विचारांना चालना दिली. त्यानिमित्ताने हे लेखन....

पु.ल. देशपांडे या खेळिया ची ही अर्धांगिनी. त्यांच्याइतकीच कर्तृत्ववान, त्यांच्यारखीच प्रतिभावान अन् त्यांच्यापेक्षा सामर्थ्यवानही!
सुनीताबाईंचं सामर्थ्य अनेक बाबतीत लख्ख जाणवणारं आहे. एका चांगल्या घरची ही मुलगी पुढे बेचाळीसच्या चळवळीत भूमिगत क्रांतिकारक/ कार्यकर्तीचं काम धडाक्यात अन् जबाबदारीने पार पाडते. नंतरच्या आयुष्यात जेव्हा स्वातंत्र्यसैनिकांच्या पेन्शनचा मुद्दा येतो तेव्हा नया पैसा घ्यायलाही नाकारत म्हणते, " देशसेवा हे माझं कर्तव्य होतं. मी केलं. ती काय नोकरी नव्हती पेन्शन घ्यायला." खोटे दाखले जोडून जेव्हा काहीजणांकडून आयुष्यभर पेन्शन मिळवली जाते तेव्हा असं करणा-या सुनीताबाईंचं तेजस्वीपण अधिक तळपदारपणे समोर येतं.

त्यांचा सर्वत्र संचार असाच होता हे अनेकजण सांगतात. खरंतर आम्ही जरा कुठे वयात आलो, चार गोष्टी उमगू लागल्या तेव्हा हे दोघंही उतारवयात होते. बहुतेक सर्वच कार्यक्रम बंद झालेले. क्वचित कुठेतरी भाषणाला पु. ल. जात असायचे. आमच्या चिपळूणच्या वाचनमंदिराच्या इमारतीचा जीर्णोध्दार झाला तेव्हा पुलंनी केलेलं भाषण ऐकलेलं. तितपतच त्यांचा वावर उरलेला.


त्यामुळे माझ्या पिढीला पु.ल.- सुनीताबाई भेटले ते मुख्यत: पुस्तकांतून, आॅडियो- विडियो रेकाॅर्डिंग्ज मधूनच.

" आहे मनोहर तरी.." मधून किंवा " जीएंच्या पत्रसंवादातून" सुनीताबाई सामो-या आल्या होत्याच. तर नंतरच्या काळात सोयरे सकळ किंवा मण्यांची माळ सारख्या पुस्तकांतूनही. मात्र त्यापेक्षा जास्त ठसठशीत असं त्यांचं दर्शन जे घडलंय ते इतरांच्या लेखनातून.


***

बहुतेकांच्या लेखनात त्यांचं कठोरपण, करारीपण, बारीक बारीक तपशील पहाण्याची काटेकोर नजर व छानछोकीत न रमलेलं साधेपण जाणवतंच. त्या पलीकडे जात आपल्या नव-याला जपणारी, त्याचं कलाविश्व फुलतं रहावं म्हणून अनेक गोष्टी सांभाळणारी, प्रसंगी बदनामी स्वीकारायला तयार अशी जी खमकी स्त्री दिसते ती भन्नाट आहे.


त्यात परत गंमत अशी की त्यांनाही प्रतिभेचं वरदान आहे, त्यांच्याही अंगी उत्तम अभिनयक्षमता आहे, त्यांच्याही लेखणीवर सरस्वतीचा वरदहस्त आहे तरीही कोणतीही ईर्षा न बाळगता, त्या स्वत:चं सगळं बाजूला सारुन नव-याला फुलू देतात. तेही पुन्हा युगायुगांच्या सोशिक स्त्रीमूर्तीसारखी न बनता..! प्रसंगी नव-याला लेखनातल्या चुका परखडपणे सुनावतात. कित्येक गोष्टी पुन्हा लिहायला उद्युक्त करतात.

नव-याच्या सवयींचे लाडकोड पुरवताना त्याच्यासोबत अनेक कार्यक्रमात सक्रीय सहभाग नोंदवतात. प्रसंगी कौतुकाची अपेक्षा न करता, झालेल्या कौतुकानं शेफारुन न जाता नवनिर्मितीचा ध्यास बाळगतात.

हे सारं करताना त्यांच्यातलं गृहिणीपण कधीही सुटत नाही. म्हणूनच पैसा असो वा ओढग्रस्तीचे दिवस, त्या सगळ्या गोष्टी निगुतीनं निभावून नेतात. परत काहीही करताना तडजोड करत कसंतरी न उरकता केलेल्या प्रत्येक गोष्टीत सर्वोत्तम दर्जा जपायची अथक धडपड करतात.


मंगला गोडबोलेंच्या पुस्तकात या सर्व गोष्टी जाणवू देणारं मग बरंच काही दिसत रहातं.

उदा. हे पत्र पहा.. मोहन ठाकूर हे बंधू त्यांच्या पत्रात सुनीताबाईंविषयी लिहितात,

" माईच्या काटकसरी रहाण्याची आम्ही काहीजण खूप चेष्टा करायचो. उधळपट्टी न करण्यामागे तिचा एक उद्देशही होता. सांसारिक गरजा अधिक असल्या की मग त्या भागवण्यासाठी पैसे कमवायचे आणि ते कमवण्यासाठी काही न काही तडजोडी करायच्या. भाईंना आपल्या आयुष्यात अशा कोणतीही तडजोड करायला लागू नये यासाठी माईच्या काटकसरी वागण्याचा खूप फायदा झाला.

पुढे जेव्हा स्वकष्टार्जित पैसे मिळू लागले तेव्हासुध्दा जास्ती पैसे आले तर ते समाजकार्याला खर्च करावे पण स्वत:च्या गरजा विनाकारण वाढवू नये हा दोघांचाही स्वच्छ उद्देश राहिला.."


हे समाजकार्य करतानाही सुनीताबाईंनी कधी स्वत:चा उदोउदो केला नाही हे मला फार महत्वाचे वाटते. आजकाल पतीची ऐपत, त्याची पदं, त्याची प्रतिष्ठा इतकंच नव्हे तर मुलांची शाळा त्यांच्या अॅक्टिव्हिटीज याबाबत कित्येकजणी इतकी फुशारकी मारत असतात की ऐकायचा वीटच येतो. त्याचवेळी सुनीताबाईंचं हे निस्पृह वागणं मनाला भिडतं. त्या बहुतांश कार्यक्रमात कधीही स्टेजवर पुलंसोबत बसल्या नाहीत. इतकंच नव्हे तर निमंत्रण पत्रिकेतदेखील आपलं नाव येणार नाही याची दक्षता अनेकदा घेत राहिल्या. ज्या अनेक संस्थांना लाखो रुपये ' पु ल देशपांडे प्रतिष्ठान' मार्फत दिले गेले तिथे कुठेही आपलं नाव येऊ नये यासाठी सजग राहिल्या.

अपवाद काही 2, 3 संस्थांच्या वेगळ्या कार्यक्रमांचा.


एक वेगळा प्रसंग मंगलाबाईंनी नोंदवलाय तो खरंच कौतुकास्पद.


"रत्नागिरीच्या पटवर्धन हायस्कूलला 100 वर्षं झाल्याबद्दल त्यांनी एक वैयक्तिक धनादेश दिला. मात्र ते पैसे कोणताही वर्ग किंवा अन्य काही बांधायला नव्हे तर शाळेच्या परिसरातील मुलींच्या प्रसाधनकक्षाच्या बांधकामाला दिले. आज अनेक शहरातील बहुतेक सर्व शाळांमधली प्रसाधनगृहं ही अस्वच्छ, गलिच्छ असतातच. मात्र त्यासाठी कुणीच मदत करत नाही. सुनीताबाईंचं मोठेपण यासारख्या कृतीतून ठळकपणे नजरेत भरतं. इतकंच नव्हे तर त्यांनी मुद्दाम आपल्या देणगीचा फलक त्या प्रसाधनगृहावर लावायला सांगितला व हे पाहून आता इतरही लोक याचे अनुकरण करतील हे सूचित केले."

आपण एकट्यानं दान देऊन फार मोठा फरक पडणार नाही पण त्यामुळे इतरांच्या मनात दानाची जाणीव निर्माण व्हावी यासाठी त्यांची धडपड असायची.


***

सुनीताबाईंचे विचार व आचार यात कधी तफावत नसायची. त्यांचे तिखट विचार त्या स्वत: आधी आचरणात आणून दाखवायच्या. अगदी देवपूजा, कर्मकांडांचंच उदाहरण घ्या ना.

त्यांना स्वत: ला कधीच दैववाद मंजूर नव्हता. आयुष्यात कधीही त्यांनी देवपूजा केली नाही. मात्र याबाबत इतरांचे स्वातंत्र्य कधी नाकारले नाही. ' वा-यावरची वरात' च्या काळात त्यांच्याकडे गफूर नावाचा एक मदतनीस होता. प्रयोगापूर्वी नारळ फोडणे, धूपदीप करणे हे त्याला गरजेचं वाटे. त्याला सुनीताबाईंनी कधीच हरकत घेतली नाही. तसंच सहवासात आलेल्या पं. मल्लिकार्जुन मन्सूर, साधनाताई आमटे, विजया राजाध्यक्ष आदि स्नेह्यांची पूजापाठाची वेळ, त्याची साधनं हे सांभाळत राहिल्या.

पुलंचे आजारपण असो किंवा तत्पूर्वीच्या आयुष्यातील अनेक अडचणीचे दिवस असोत त्या नेहमीच प्रयत्नवादी राहिल्या. कधीही नवसायास, पूजापाठ करत राहिल्या नाहीत.


आपल्या कर्तव्यात कधीही कुचराई करत राहिल्या नाहीत.

पुलंच्या मातुश्री लक्ष्मीबाई एका पत्रात म्हणतात की, " सुनीता खंबीर आहे म्हणून भाई आहे. नाहीतर त्याची परवड झाली असती. सिनेमाच्या दिवसात भाई रात्रीचं शूटिंग करुन पहाटे चारला घरी यायचा. तेव्हा सुनीता तोवर उपाशी असायची. रात्री दोन नंतर स्वैपाक सुरु करायची, चारला नव-याला जेवायला गरमगरम वाढून मगच स्वत: जेवायला बसायची."

हे करणा-याही सुनीताबाईच असतात !


गृहिणीपण त्यांना मनापासून आवडत असे. साधी भाजी चिरतानाही त्यात नीटनेटकेपणा असे. त्यांनी वाटण केल्यानंतर पाटा वरवंटा किंवा जेवल्यानंतरचं ताट ही पहात रहावं असं असे. किचनमधली प्रत्येक वस्तू जागच्या जागीच असायच्या. अगदी तसंच प्रत्येक पदार्थाची चवदेखील. कोणत्या पदार्थात काय घालायचे याबाबत त्या नेहमीच दक्ष असायच्या. तो पदार्थ चविष्ट बनवतानाच त्या पदार्थाचं रुपही देखणं असावं यासाठी बारीक सरीक काही करत रहायच्या.


सुनीताबाई स्वत: स्वतंत्र प्रतिभेच्या व्यक्ती होत्या. मात्र बिजवर अशा पुलंच्यासोबत प्रेमाचा संसार सुरु केल्यावर त्यांनी पुलंमधला खेळिया फुलवत ठेवायला जणू स्वत:च्या आवडीनिवडींना बाजूला ठेवलं.

डोळ्यात तेल घालून पुलंवर लक्ष ठेवलं.


पुलंचे एकपात्री प्रयोग हे तसे दमछ्क करणारेच. सुनीताबाई तेव्हा पटकन् घेता येईल इतकं घोटभर पाणी घेऊन विंगेत उभ्या रहात. रंगमंचावरच्या एखाद्या गिरकीत पटकन् पुलं तिथं येऊन ते घोटभर पाणी पिऊन पुढचा खेळ रंगवत, समोर प्रेक्षकांना याचा पत्ताही लागत नसे!


पुलंच्यात असामान्य प्रतिभा नक्कीच होती मात्र त्याचे थक्क करणारे प्रकट आविष्कार तसंच पुलंचं अष्टपैलू असं जे व्यक्तित्व आपल्यासमोर उभं राहिलं त्यामागे सुनीताबाईंच्या अथक परिश्रमांचा, पूर्वतयारीचा मोठा भाग आहे. ज्याकडे कधीच दुर्लक्ष करता येणार नाही.


हे सांभाळताना त्यांनी त्यांच्यातली लेखिका जरुर जागवत ठेवली मात्र स्वत: ला कधी लेखिका म्हणवून घेतलं नाही. त्या नेहमीच स्वत:च्या जाणिवांविषयी लिहीत राहिल्या. निसर्ग, माणूस, पशु पक्षी, झाडं- पानं फुलं अन् अनेक अनुभवांविषयी लिहीत राहिल्या. त्या नेहमीच स्वत: ला वाचक, एक रसिक मानत राहिल्या.

आयुष्यभर अनेक मानसन्मान, गौरव, कौतुकसोहळे करवून घेणं त्यांना सहज शक्य होतं. मात्र त्यांनी सदैव एकटेपण स्वीकारलं. पुलंच्या निधनानंतर मोजक्या व्यक्ती सोडल्या तर बहुतेकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. मात्र त्याचा त्यांना कधीच विषाद नव्हता. किंबहुना हे असंच घडणार यासाठी जणू त्यांची मानसिक तयारीच होती.


आयुष्याच्या अखेरच्या दिवसातही त्यांनी शांतपणे सगळ्याची तयारी ठेवत स्वत: ला चार भिंतीतच ठेवलं. अखेरच्या क्षणांपर्यत त्यांच्या सोबतीला राहिली त्यांची लाडकी कविता.


कवितेवर त्यांचं इतकं प्रेम की शेवटच्या काही दिवसात माणसांशी बोलणं, ओळखणं कमी झालं तरी कवितेविषयीची जाणीव लख्ख जागी राहिली. पडल्यापडल्या त्या कित्येक कविता पुटपुटत राहिल्या. कधी आरती प्रभूंची, कधी बोरकरांची, कधी मर्ढेकरांची....त्या कवितेनं त्यांची खरंच अखेरपर्यंत सोबत केली.

एक तेजस्वी, कणखर, बाणेदार अशी स्त्री चंदनासारखी आयुष्यभर झिजत राहिली अन् शांतपणे अनंतात विलीन झाली.

आज अनेक वर्षांनी त्यांच्याविषयी वाचताना ही किती थोर बाई होती या जाणिवेनं ऊर भरुन येतो. त्यांच्या आयुष्यातील कळालंल्या, न कळालेल्या अनेक जागा मग मनात आठवत राहतात...


कधी सुखावतात... कधी अस्वस्थ करतात.

- सुधांशु नाईक(९८३३२९९७९१) , कोल्हापूर. 🌿

( टीप :-
१) मंगला गोडबोले यांच्या पुस्तकाअखेरीस असलेला अरुणा ढेरे यांचा दीर्घ लेख खास जपावा असाच. पुस्तक विकत घेऊन अवश्य वाचा.
२) घरात बसून राहिल्यामुळेच हे असं लेखन शक्य होत आहे. त्यामुळे कोरोना संकटाचा मी तरी ऋणी आहे. )

Thursday, May 13, 2010

पं. सी. आर. व्यास यांच्या षष्ठ्यब्दपूर्ती समारंभात पुलंनी केलेलं भाषण

 नोंद- (भाऊ मराठे यांनी प्रचंड मेहेनत घेऊन पुलंची काही भाषणे आणि पुलंच्या घेतल्या गेलेल्या काही मुलाखती ज्या ऑडिओ / व्हिडिओ स्वरुपात उपलब्ध होत्या त्यांचं संकलन करुन स्वत:च्या मोत्यासारख्या अक्षरात लिहून काढल्या. त्यांनी अशी अनेक संकलनं केली आहेत आणि हा असा ठेवा लिखित स्वरुपात त्याच्या स्वत:पुरता उपलब्ध असला तरी तो कायम स्वरुपी जतन व्हावा या उद्देशाने विवेक काजरेकर यांनी त्याला विचारणा केली की 'हे हस्तलिखित स्वरुपातलं संकलन टंकलिखित करुन संकेतस्थळावर उपलब्ध करुन देऊ शकतो का ?' तेंव्हा भाऊंनी एका क्षणाचाही विचार न करता त्यांची पोतडी काजरेकरांच्या स्वाधीन केली. टंकलेखनाचं काम विवेक काजरेकरांनी केले आहे.)

मुळ स्त्रोत- http://www.kajarekar.com/node/546
विवेक काजरेकर आणि भाऊ मराठे यांचे शतश: आभार.

पंडित सी. आर. व्यास ह्यांच्या षष्ठ्यब्दपूर्तीचा समारंभ २ नोव्हेंबर १९८४ रोजी मुंबईच्या पोदार कॉलेजमधे साजरा झाला होता.त्या समारंभात पु. ल. देशपांडे यांनी केलेलं अध्यक्षीय भाषण..

मित्रहो,
आजवर मी व्यासपीठावर असंख्य वेळा बसलो आहे, पण आजच्या सारखं व्यासपीठ यापूर्वी मी कधीही अनलंकृत केलेलं नव्हतं. अनलंकृत अशासाठी म्हणतो की इथे माझ्या दोन्ही बाजूला संगीतातले इतके थोर लोक बसले आहेत की त्यांच्या मधे बसताना मी कुठल्या अधिकाराने बसतोय या प्रश्नाचं माझं मलाच उत्तर सापडत नाही. त्यात आमच्या विद्याधर गोखल्यांनी माझ्याबद्दल इतके गौरवाचे उदगार काढलेले आहेत की आणखी काही वेळ ते तसेच बोलले असते तर सत्कार माझा आहे की व्यासांचा आहे हा प्रश्न पडला असता. आणि त्याच्यावर कडी म्हणून त्यांनी मला शालजोडीही दिली. पत्रकाराकडून नुसती शालजोडी मला पहिल्यांदाच मिळाली आहे.

आजचा हा समुदाय पाहिल्यानंतर मला अतिशय आनंद एका गोष्टीसाठी झाला की माझ्या जीवनातलं एक अतोनात सुंदर दृश्य मी पहातोय असं मला वाटतं. भारतीय संगीताच्या संदर्भात बोलायचं झालं तर भारतीय संगीताचं भूत, वर्तमान आणि भविष्य आज इथे बसलेलं आहे. ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य संगीतात घातलं असे बुजुर्ग कलावंत आहेत, जे धडपडताहेत आणि संगीतात येऊ पहाताहेत असे आहेत आणि ज्यांच्याकडे उद्याची आशा केंद्रित झाली आहे असेही कलावंत मला दिसताहेत. मघाशी मी इथे पाहिलं आणि आताही पहातोय. यात मला अनोळखी कोणीही वाटत नाही. गेल्या चाळीस पन्नास वर्षांमधे मी ज्या मैफली ऐकल्या आहेत त्याच्यात केंव्हा ना केंव्हा तरी आलेले असेच सगळे चेहेरे मला दिसताहेत. मी व्यासांना सांगू इच्छितो की हे जे सगळे चेहेरे इथे आलेले आहेत ते तुमचा गौरव करायला आलेले नसून आपल्या मनातली कृतज्ञता व्यक्त करायला आलेले आहेत. " मनुष्य सगळ्यात सुंदर केंव्हा दिसतो?" असं जर मला विचारलं तर मी सांगेन की "त्याचा चेहेरा ज्या वेळेला कृतज्ञतेच्या भावनेने दाटून आलेला असतो त्या वेळेला !" कृतज्ञता हा फक्त मनुष्य प्राण्यालाच दिलेला गुण आहे आणि कृतघ्नता हाही. कारण इतरांच्या चेहेर्‍यावर ही कृतज्ञता फारच क्वचित दिसते. आणि ही कृतज्ञता कशासाठी ? जे कुणालाही वर्णन करता येत नाही असं एक कलेचं स्वरुप दिलं की ज्याचं वर्णन फक्त परमेश्वराच्याच बाबतीत शक्य आहे - निर्गुण आणि निराकार असं स्वरुप असलेला एक आनंद दिला.

भारतीय संगीताचे अनेक प्रकार आहेत. इथे जे गायलं गेलं ते भारतीय संगीतच आहे. त्याला निराळं "भारत" नाव देण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही. कारण त्याचं पुष्कळ वेळेला "भरीत"ही होण्याचा संभव आहे. आणि एखाद्या गोष्टीचं वांगं होणं म्हणजे काय हे तुम्हाला महित आहेच. अर्थात व्यासांच्या हातून ते होणं शक्य नाही हे मला माहित आहे. परंतु ते जे गात होते किंवा पूर्वीचे लोक जे गात होते ते हजारो वर्षांपासून भारतीयांच्या मनामधे खदखदताहेत तेच सूर होते. दुसरं काय होतं ? मला भारतीय संगीताची गंमत वाटते की इथे वार्धक्यच नाही, जराच नाही. कल्पना करा की कसं वय लावायचं ? व्यासांना साठ वर्ष झाली म्हणून इथे आज आपण सत्काराला जमलेलो आहोत. त्यांना कुठली साठ वर्ष झाली ? त्यांना माहिती आहे का विचारा ? होणंच शक्य नाही. साठ वर्ष ही म्युनिसिपालिटीत किंवा सरकारात नोकरीला असलेल्या माणसाला होत असतात. कारण पुढे त्याला पेन्शनीचा वगैरे विचार करायचा असतो. इथे ज्यांच्या मनामधे गानसरस्वतीनेच मुक्काम ठोकलेला आहे ती त्यांना वार्धक्य जाणवूच कशी देईल ? जोपर्यंत व्यासांना गावंसं वाटतंय तोपर्यंत ते सोळाच वर्षांचे आहेत, साठ वर्षाचे नाहीत. माणूस थकतो केंव्हा ? "मला काही करावंसं वाटत नाही - कोणाशी बोलावंसं वाटत नाही" असं ज्या वेळी म्हणतो, त्यावेळी वीस वर्षाचा तरूण सुध्दा ऐंशी वर्शाचा झालेला असतो. आणि ज्या वेळेला वयाचा हिशेब विसरुन माझा आता शुध्द कल्याणाशी मुकाबला आहे, आता तो तुमच्या पुढे असा उभा करतो ... ही जिद्द ज्यावेळी राहते - ही गायनविद्येची जिद्द ही साठ वर्षाच्या कधीही म्हातार्‍या न होणार्‍या तपश्चर्येची जिद्द आहे - आणि तपश्चर्येला वय नसतं. आज लावलेला त्यांचा जो एकेक स्वर होता, तो त्यांच्या तपश्वर्येचा होता.

हे गायक लोक बैठकीमधे भूप वगैरे गायला लागले म्हणजे मला नेहेमी असं वाटतं की आज आपण आधुनिक जगात जगतो आहोत, आपल्याकडे रेडिओ आलेला आहे, टेलिव्हिजन आलेला आहे. अशा काळामधे एक भूप नावाचा राग दिड एक हजार वर्षांपूर्वी अशाच एका मैफिलीने ऐकला असेल आणि दाद दिली असेल आणि १९८४ साली सुध्दा त्याला दाद दिली जाते. ह्याच्यापेक्षा अजरामर असं दुसरं काय असणार ? चांदण्याला जसं मरण नाही तसं आमच्या रागांना मरण नाही. त्या निर्मितीचा कोणी अधिकारी नाही. भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्यच असं आहे की ज्यांनी भव्य दिव्य असं काही निर्माण केलं त्यांनी आपलं नाव तिथे कधीही ठेवलेलं नाही. ही निर्मिती "झाली" आहे अशीच त्यांची भूमिका आहे. एके काळी कुठेतरी मनामधे प्रकाश पडला तो प्रकाश मी लोकांना दाखवू शकलो हीच त्यांची भूमिका होती. म्हणून तुम्ही बघा, आपली जी लेणी आहेत ती कोणी खोदली, स्कल्प्टर अमूक अमूक किंवा पेंटर तमूक तमूक असं काहीही नसतं. ती पहायला गेलेले लोक तिथे आपली नावं लिहितात. संगीतातला कोणीही कितीही चमत्कार करो, काहीही करो - एक ऋण मानावंच लागतं. शिवकुमारांनी कितीही चांगलं वाजवलं, कुमार गंधर्व कितीही चांगले गायले तरी त्यांच्या मनात असतं की तो जो कोणी अज्ञात आहे, ज्यांनी हा राग तयार केला त्याचं मी तुमच्यासमोर मांडतो आहे, आमचे संत नेहेमी काय म्हणत आले ? "फोडिले भांडार धन्याचे मी तो हमाल भार वाही". "मी तो हमाल भार वाही" ह्या भूमिकेतून त्या भांडाराची किंमत ओळखून ज्यांनी तो डोक्यावर बाळगला त्यांनाच व्यासांसारखं कृतार्थ जीवन जगल्याचा आनंद मिळतो. ज्यांनी तो बाळगला नाही आणि माझं कर्तव्य आहे आणि मी केलं वगैरे म्हणायला लागले तेंव्हा त्यांच्यातला "मी" काही काळ लोकांच्या पुढे दिसतो - राग दिसतंच नाही. कोणाचं गाणं झालं असं कळल्याबरोबर आपण लगेच विचारतो -"काय गायले?". याचं चांगलं उत्तर मिळेपर्यंत कोणाचं गाणं झालं याला भारतीय संगीतामधे काहीही स्थान नसतं. सदारंग - अनरंगांची चीज गायले, अशी गायले की सदारंग आणि अनरंग दोघेही त्यांच्या कबरीमधे फिरायला लागले, असंही होतं. त्यात त्या नावाला काही अर्थ नाही. हे असं आहे की त्यांनी जो राग गायला घेतला तो निभावला कसा ?

भारतीय संगीताचं एकाने मला वैशिष्ट्य विचारलं होतं. पाश्चात्य संगीतातले लोक येतात आणि मग आम्हाला काही प्रश्न विचारतात. त्यांनी आपल्या संगीतात खूप रस घेतला आहे, त्यात तज्ञही झालेले आहेत यात शंका नाही. पण त्यातलाच एक उमेदवार होता. तो मला म्हणाला की "तुमचे गवई इतके हातवारे कशाला करतात ?". मी म्हणालो "तुमचा कंडक्टरसुध्दा हातात बॅटन घेऊन हातवारे कशाला करतो?" आमच्या गाण्यामधे कंडक्टर, कंपोज करणारा आणि गाणारा हा एकच मनुष्य असतो. त्याला तिन्ही भूमिका एकदम वठवाव्या लागतात. या तिन्ही भूमिका एकत्र करायच्या म्हणजे आमचं प्रत्येक गाणं हा त्रिवेणी संगमच असतो. निर्मिती करणारा, ती लोकांपुढे मांडणारा आणि स्वतःचं गाणं स्वतःच ऐकणारा श्रोता अशा तिन्ही भूमिका निभावून न्यायला लागतात. आणि हे कधी ऐकवू शकतात ? ज्या वेळी मनामध्ये संगीताचं गुंजन सारखं चालू असतं तेंव्हा. आणि तेच तुम्हाला तरुण ठेवतं. थिरकवा खांसाहेब वयाच्या ८०-८५ व्या वर्षी मला एकदा भेटले होते. त्यांची किती वर्ष झाली हे त्यांचं त्यांनाही माहित नसायचं. मी विचारलं "खांसाहेब, आपकी उमर क्या होगी?" "होगी सत्तर - अस्सी - नब्बे!" असंच सांगायचे. त्यांनी आयुष्यात हिशेब केला तो वयाचा नाही, पैशाचा नाही. त्यांनी हिशेब केला तो सोळा का दहा का सात मात्रांचा. एकदा तबला वाजवायला चालले होते. तर हाताला धरुन बसवताना मी म्हटलं "कुछ थकान नहीं मालूम होती ?" ते म्हणाले "बेटे, क्या बोल रहे हो ? थकान ? जब बजा लेता हूं घंटे -देढ घंटे, तो जवान हो जाता हूं!". जवानीसाठी मला वाजवायचं असतं. ह्यांच्याकडे इथे जवानीचं औषधच परमेश्वराने लिहून ठेवलं आहे. ज्याच्या गळ्यामधे सूर आहे तो म्हातारा होईलच कसा ? आणि गळ्यातला सूर जरी थकला तरी अंतःकरणात जी अक्षय्य वीणा वाजत असते तिचं काय करणार? आमचे मोठे मोठे गवई इथे बसलेले असतात. खूप वार्धक्यात मी मोठे गवई पाहिले आहेत. असे कानाला हात लावून बसलेले असताना एकदम "क्या बात है!". म्हटलं बुवा काय झालं ? "काय बागेश्रीतली जागा गेली बघ रे!". जागा एकदम आत गेलेली असते आणि अशी आत जागा जाण्याची ज्यांना सवय झालेली आहे तोच गवई होऊ शकतो.

क्लासात जाऊन क्लासिकल गाणं येतं ही समजूत चुकीची आहे. तुमच्या आतच ती तार लागलेली असावी लागते. त्याला काय करणार ? कलेच्या क्षेत्रामधे ट्यूशनला महत्व आहे तितकंच इंट्यूशनलाही महत्व आहे. दोन्ही पाहिजे. नुसती ट्यूशन असून चालत नाही. नुसती ट्यूशन असली तर प्रमाणपत्र मिळतात - "संगीतालंकार" अमूक अमूक वगैरे ! दोन तंबोरे जुळवता येत नाहीत. आधी एकच येत नाही तर दोन कसले जुळवता येणार ? त्याला काही अर्थ नसतो. इथे काय आहे की तुम्हाला काय येतं ते गाऊन दाखवा. "सुरसंगत रागविद्या जो कंठ करबत है". जो गाऊन दाखवतो, जो वाजवून दाखवतो - "वाकौ मानो" - त्यालाच माना ! बाकी आमच्यासारखे चर्चा करणारे लोक काय कामाचे ? भारतीय संगीताचं भवितव्य काय ? अरे कोणी सांगितलं वाईट आहे म्हणून? तुम्ही वर्तमान बघता का किती तेजस्वी आहे ते ? माझा जर इथे बसण्याचा एक कुठला अधिकार असेल तर ह्यांनी जितक्या निष्ठेने गाणं करण्याची मेहेनत केली तितकी आयुष्याची पंचावन्न वर्ष (आयुष्याच्या सातव्या आठव्या वर्षापासून म्हणा हवं तर ... मला जास्त वय झालेलं आठवलं तर झोप कमी येते बरं का!) मी गाणं ऐकण्याची तितकीच मेहेनत केलेली आहे. आम्ही ऐकणारे नसतो तर या गवयांना कुणी विचारलं असतं ? भगवंताचं महत्त्व भक्तांमुळे सिद्ध झालेलं आहे. उद्या विठ्ठलाच्या वारीला कोणी जायचं नाही असं ठरवलं तर भगवंताचे कटीवरचे हात कपाळाला जातील. त्याचं जे सगळं महत्व आहे ते भक्तांमुळे आहे, तुमच्यासारख्या रसिकांच्यामुळे आहे, आम्ही ऐकल्यामुळे आहे. आम्ही मिजासीने सांगतो की तुमची काय गाणं ऐकवायची तयारी आहे ? आम्ही म्हणतो "आम्ही फैयाझ खांसाहेबांना ऐकलं आहे, आम्ही वझेबुवांना ऐकलं आहे, आम्ही निवृत्तीबुवांना ऐकलं आहे, आम्ही मल्लिकार्जुन मन्सूरांना ऐकलं आहे, आज कुमारांना आणि व्यासांना ऐकतोच आहोत. इतकं साठवलंय आमच्या मनामध्ये .... त्यातलं कुठलं दार कधी उघडेल आणि आमची अंतर्वीणा सुरू होईल हे तुम्हाला कोणालाच सांगता येणार नाही.

असं टिकून राहिलेलं संगीत ह्या लोकांनी आम्हाला दिलं. या लोकांनी आम्हाला काय दिलं ? एक आनंद यात्रा घडवली. आपल्या भारतीय संगीताला सुंदर नाव दिलं आहे - "सुर संगत राग विद्या". ही रागविद्या आहे आणि म्हणूनच ती अशरीरी अशी आहे. तिला देह वगैरे आपण कल्पना द्यावी. तो आहे. तुम्ही कल्पना करा की शब्दातून सुध्दा त्याचे जे अर्थ प्रतीत होत असतात त्यांचं नातं आपण हळूहळू सोडत जातो. अगोदर बंदिशीसाठी आपण शब्द घेतो, व्यंजनं घेतो (काही वेळेस झनन झनन पायल बाजे वगैरे. मग कोणातरी तरुण माणसापुढे पायल वाजवणारी मुलगी - तो जितका नॉर्मल असेल - ते सारं असतं) पण होता होता आपण हळूच तो नाद सोडतो आणि त्या माणसाला कळण्यापूर्वीच - जसा टेक ऑफ कधी झाला ते कळत नाही - तसं एकदम टेक ऑफ होतो आणि एकदम रागाच्या दुनियमध्ये हिंडायला आपली सुरुवात होते. त्यावेळेस पायलही नसतात - झननही नसतं - असते फक्त एक लय आणि एक सूर ! ह्या दोन गोष्टींत आपला विहार सुरु होतो. हा विहार ज्याला साधला त्याला गाणं साधलं. ही क्षणाक्षणाला गाण्याची उत्कंठा वाढवायची कुठे तर या रागांच्या दुनियेत हिंडताना. आमचे हे सगळे गवई आम्हाला रागाच्या एका दुनियेमध्ये प्रवासाला घेऊन जातात ती एक आनंदयात्रा आहे. भीमपलासाच्या, यमनाच्या, बागेश्रीच्या दुनियेत घेऊन जातात आणि मग सांगतात - "हे पहा इथे कसा झरा वाहतो आहे, हे फूल कसं आलं आहे पहा .. आणि हे सगळे त्या प्रांतातलेच असतात. बागेश्रीत नवीन काय करायचं म्हणजे भीमपलासात शिरायचं नाही. बागेश्रीमधेच प्रवास करायचा आणि त्या अनोख्या जागा दाखवायच्या. तसल्या अनोख्या जागा कुमारांसारख्या लोकांना दिसतात तिथेच त्यांचं मोठेपण सिध्द होतं. आपण म्हणतो "अरे पन्नास वेळा मी या प्रदेशात आलो आहे, पण मला हे दृश्य दिसलंच नव्हतं ?" असं म्हणतो म्हणून तो बागेश्री आपल्याला नवा आणि चांगला वाटतो.

कलेच्या क्षेत्रामधे काही पाठांतर करणारे लोक असतात आणि काही निर्माण करणारे असतात. पाठांतरालाही किंमत आहे. उत्तम पाठांतर हे सुध्दा आवश्यक आहे. आपण सुरुवातीला जो वेदघोष ऐकला ते एका उत्तम पाठांतराचं लक्षण होतं. त्याच्या मधे आज दोन तीन हजार वर्षपूर्वींच्या लोकांचं विस्डम, ज्ञान, नादाची जी काय ताकद आहे ती सगळी साठवलेली होती. त्यालाही महत्त्व आहे. परंतु कलावंत त्याला म्हणावं जो निर्माता आहे. बा. भ. बोरकरांनी एका ठिकाणी फार सुंदर म्हटलं आहे "देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे" हात सुंदर कुठले ? ज्यांना निर्मितीचे डोहाळे आहेत ते हात सुंदर. तो कलावंत सुंदरच दिसायला लागतो. असे कित्येक कलावंत मी पाहिले आहेत - पुरुष आणि स्त्रिया- की जे गाण्याच्या पूर्वी नुसते येऊन बसलेले असतात (याला आता तीन तास बघावं लागणार का किंवा हिला ! विशेषतः "हिला" च्या वेळेला मनाला जास्त त्रास होतो). पण तुम्हाला सांगतो, सूर जर तिथे बरोबर लागला आणि त्या रागाचं स्वरुप दिसायला लागल्यानंतर तीच व्यक्ती मोहक - सुंदर सगळं काही दिसायला लागते. सूरच ही दाद देत असतात. त्याच्यातली एकाग्रता नेहेमीच सुंदर दिसत असते आणि भारतीय संगीताला या एकाग्रतेची सगळ्यात अधिक गरज आहे. कारण प्रत्येक क्षण हा नवा असतो. आणि प्रत्येक क्षण हा तितक्याच उत्कटतेने लोकांच्यापुढे द्यायचा असतो. सहज आपलं जाता जाता काहीतरी केलं असं चालतच नाही. याचं कारण असं आहे की प्रत्येक क्षणाला तुम्ही नवीन टेन्शन मानता. प्रत्येक क्षणाला नवीन निर्मिती करत असता. ही तुमची नवी निर्मिती पाठांतरीत आहे अशी लोकांना शंका आल्याबरोबर ते उदास व्हायला लागतात. ते मैफिलीत असून सुध्दा कान बाहेर हिंडायला लागतात, आणि म्हणून ती निर्मिती नवीन आहे म्हणूनच उत्कंठा वाढवणारी असते.

अहो हे गवई काय करतात ? काही करत नाहीत. अगोदर षड्ज लावतात, मग गंधार लावतात. गंधारावर गेला रे गेला की सर्वांना उत्कंठा की आता हा कुठे चालला ? आपल्याला वाटत असतं की हा अमका एक राग आहे तेंव्हा हा षड्जावर येणार ही आपली अपेक्षा असते. पण तो चटकन पंचमावर जातो, म्हणजे अपेक्षाभंगाचाही आनंद आणि अपेक्षापूर्तीचाही आनंद. हा आनंद इतका सुंदर आहे की शृंगारामधे जसं "प्रेम करते" म्हटलं तरी आनंद आणि "चला" असं म्हटलं तरी आनंदच आहे. आता तिथे जर एखाद्या क्लासात शिकलेल्या मुलाने "चला" याचा अर्थ "उठून चालते व्हा" असा घेतला तर काय करणार ? त्यावेळेला "चला" याचा अर्थ "या" असा असतो. "बसा" असा असतो (हे विद्याधर गोखले जवळ बसले आहेत म्हणून मी असं बोलायला लागलो. म्हणजे व्यासांचा आणि कुमारांचा परिणाम होण्याऐवजी त्यांचा परिणाम माझ्यावर जास्त झाला आहे. आम्ही दोघे नाटकवाले आहोत, दुसरं काय?) पण आज मात्र मी नाटकातलं काहीही करत नाहिये. कारण तिकिट लावल्याशिवाय मी काहीही करत नाही. त्यामुळे व्यासांच्याबद्दल जे काही मनापासून सांगायचं तर व्यासांनी ही साधना केली (आणि साधना केली हा सुध्दा चुकीचा शब्द आहे. साधना - तपश्चर्या म्हटलं की मला भयंकर राग येतो) ही साधना - तपश्चर्या नाहीच. आईला कधी वाटतं का की मी मुलाची सेवा केली म्हणून ? मुळीच नाही. ते मूल काही घेत नाही म्हटल्यानंतर ते पहिल्यांदा ज्यावेळेस खुदकन हसून घेतं, त्याच्यासाठी तिचा जो तास-दीड तास गेलेला असतो त्याचं सार्थक झालं हाच तिला आनंद असतो. गाताना ज्या माणसाला कंटाळा आला त्याने गाणं सोडून राजकारणात शिरावं. तिथे बेसूर लोकांची फार आवश्यकता आहे. कारण तिथे सुराला सूर न जमणं यालाच महत्व आहे. सूर जमणं याला महत्वच नाहिये. मग स्थान जातं. तेंव्हा अशा ठिकाणी ठिकाणी, ज्या वेळेला एका सुरामधे, एका रसामधे मनुष्य राहतो तेंव्हा त्याला कष्ट कुठले ?

मला तुम्ही सांगा, व्यासांचा आपण काय गौरव करणार ? त्यांना तो राग गाताना मिळालेला जो आनंद आहे त्याच्या एक शतांश तरी गौरवाचे शब्द आम्ही त्यांना देऊ शकू का ? तेवढी आमची ताकद कुठे आहे ? त्यांचा तो स्वर - वरचा षड्ज लागला आणि वरची मैफल जमली की त्या आनंदात त्यांना अंतर्स्नान घडतं. अशा प्रकारचं स्नान घडून जे शुध्द होतात त्यांना तुम्ही आणखी काय देणार ? कुठला अलंकार घालणार? आपल्याला फक्त एकच वाटतं की आपण काहीतरी करुन आपली कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. म्हणून आपण अशा प्रकारचे समारंभ करतो. दुसरी त्यांची कृतज्ञता अशाबद्दल की ही विद्या त्यांनी जशी ठिकठिकाणाहून घेतली तस तशी ही विद्या देण्याचं कार्य त्यांनी चालू केलेलं आहे. हे फार महत्त्वाचं आहे. भारतीय संगीतावर जुन्या काळातल्या लोकांचे जसे उपकार आहेत तसेच त्यांनी त्यांच्या काही अडाणी समजुतींमुळे अपकारही करुन ठेवले आहेत. चिजा चोरुन ठेवायच्या, रागाचं नाव सांगायचं नाही ... असल्या प्रकारचा मूर्खपणा केला. ते एक अडाणीपणाचं लक्षणही आहे आणि काही प्रकारचे व्हेस्टेड इंटरेस्टही होते. कारण त्यांची मुलं त्यांना गवई म्हणून तयार करायची होती. म्हणून तीच चिज जर तिसर्‍या मुलाला आली तर ह्याला एक काँपिटिटर उभा राहतो अशा प्रकारची ही भावना होती. गुरुच्या सेवेबद्दल वगैरे सांगतात. पण प्रत्येक गुरु सेवा करण्याच्या लायकीचा असतोच असे नाही. गुरु विद्या शिकवतो याचा अर्थ जो विद्या शिकवतो तो गुरु असतो असा नाही. कॉन्व्हर्स इज नॉट ट्रु. त्यालाही एक अधिकार लागतो. तो अधिकार एकमेव अधिकार असतो की गुरु हा आयुष्यभर जर शिष्याच्या भावनेने जगत असला तरच तो उत्तम गुरु होतो आणि व्यासांचं मला सगळ्यात कौतुक वाटतं की आजही त्यांचा नवा शोध चालू आहे. नवीन कार्यक्रम बसवायचा आहे, नवीन राग तयार करायचे आहेत, नवीन शिष्य तयार करायचे आहेत. व्यास - गिंडे वगैरे मंडळींनी आपलं जे रागचक्र फिरत असतं त्यावर "रागमाला" नावाचा कार्यक्रम केला आणि रागांचं एक अप्रतिम दर्शन लोकांना घडवलं. असं काही घडवलं पाहिजे, अजून काही तरी दिलं पाहिजे ही जी आंच आहे ती आंचच त्यांना तगवून ठेवणार आहे. आणि ही आंच आहे म्हणूनच आपल्या सगळ्या लोकांना वाटतं की साठ वर्ष म्हणजे काय काहीच झालेलं नाहिये, अजून पुष्कळ व्हायचं आहे.

वय हे मनाला असतं. शरीराला वय असतं असं मला वाटत नाही. मी आपल्याला एक उदाहरण सांगतो. पंडित सातवळेकर होते - ज्यांनी वेदांचं भाषांतर केलं. त्यांना जेंव्हा शंभरावं वर्ष लागलं तेंव्हा मला असंच वाटलं की ह्यांनी फार मोठं कार्य केलेलं आहे तर आपण त्यांच्या पायावर नमस्कार करुन यावं. म्हणून मी पारडीला गेलो. शंभरावं वर्ष लागलेल्या माणसाला भेटायला जायचं आहे म्हणून मनाची तयारी करुन गेलो. आजारी असतील, आपण दोन मिनिटात नमस्कार करावा,बरं वाटतंय ना, काळजी घ्या वगैरे सांगावं आणि परतावं अशा विचाराने गेलो होतो. पण मी ज्यावेळेला गेलो त्या वेळेला बघतो तर ते तिथे त्यांच्या छापखान्यामध्ये वेदांच्या शेवटल्या खंडाच्या पुस्तकाची प्रुफं तपासत बसले होते. तुमच्यापैकी जे कोणी लेखक असतील त्यांना प्रुफं तपासणं म्हणजे काय आणि तीसुध्दा संस्कृतची म्हणजे काय ते कळेल. ते काळजीपूर्वक तपासत बसले होते. मी नमस्कार वगैरे केला. मला म्हणाले "मी वाचलं आहे तुमचं". मी घाबरलोच एकदम. "असलं काही लिहिण्यापेक्षा बरं लिहा" असा शाप देतात की काय असं मला वाटलं. पं. सातवळेकर हे माझं साहित्य वाचत असतील असं मला कधीही वाटलं नव्हतं. ते वाचत असल्यामुळे त्यांना विनोदबुध्दी आहे - म्हणजे तारुण्य आहे हेही माझ्या ध्यानात आलं. ते म्हणाले "आता काय आहे, ही प्रुफं करेक्ट करत आहे. हे काम एकदा झालं (हे शंभराव्या वर्षी) की वेदातले सुंदर वेचे आपल्या तरुण पोरांना माहित नाहीत ते मी निवडून काढणार आहे आणि या निवडक वेच्यांचा एक ग्रंथ तयार करणार आहे. त्यात पुढली आठ-दहा वर्ष जातील". शंभराव्या वर्षी पुढल्या आठ-दहा वर्षांचा कार्यक्रम त्यांच्या हातात होता. पुष्कळ वेळेला आपण म्हातारे अशासाठी होतो की तुम्ही जगताय कशासाठी या एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येत नाही. फक्त आर्थिक उत्पादनासाठी, महिना पगारासाठी हे उत्तर काही आपलं आपल्यालाच समाधान देत नाही. कशासाठी जगतो त्याला एक उदात्त अशा प्रकारचं काहीतरी प्रयोजन जीवनाला लागतं. व्यासांना - कुमारांना हा प्रश्नच पडत नाही. तुम्ही जगताय कशासाठी ? माझ्या दोन तंबोर्‍यांना विचारा - मला कशाला विचारताय असंच ते म्हणतील. असं प्रयोजन ज्यांना सापडलं अशी माणसं फार थोडी असतात. बाकी आपण गतानुगतिक नेहेमीच्या चाकोरीतून जाणारे. त्यांना संजीवन त्यांची विद्याच देत असते. दुसरी काही गरज त्यांना लागत नाही.

आपण बघतो की आज संगीताचे इतके प्रकार चालू असतात. आपल्याला असं वाटतं की काल आलेलं गाणं आयुष्यभर सगळा भारत येवढंच गाणं गाणार आहे. परंतु एक महिन्यात त्या गाण्याचं आयुष्य संपलेलं असतं. आणि "फुलवन सेज सवारो" मी माझ्या लहानपणापासून ऐकतो आहे आणि मला खात्री आहे की माझा खापरपणतू सुध्दा त्याच्या लहानपणी ते ऐकणार आहे. ही जी एक भारतीय संगीतातली चिरंजीविता आहे ही चिरंजीविता ज्यांनी ओळखली त्या माणसांना आपल्याला हे किती उंच चढायचं आहे हे लक्षात येतं. आणि ते का चढायचं ? आपल्याला चढायला - तिथे जायला आवडतं म्हणून चढायचं. दुसरं काही नाही. ह्याचा फायदा काहीही नाही. फायद्याच्या तत्वज्ञानाचं आजचं जे जग आहे त्याच्यात यातला कोणीही माणूस बसत नाही. भूप गाऊन फायदा काय ? काहीही नाही. मी एक गोष्ट नेहेमी सांगतो. आपल्यापैकी कोणी ऐकली असेल. पुण्याला बालगंधर्व थिएटर बांधत होते. (पुण्यातच ते थिएटर असल्याने विरोध वगैरे होताच. आणि मीही पुण्यातलाच असल्याने तो तसा होणार याचीही मला खात्री होती. त्यामुळे तशी काही भीती नव्हती. पण त्याचप्रमाणे आमच्या बाजूनेही पुष्कळ लोक होते). तर एके दिवशी सकाळी एक म्हातारे गृहस्थ आमच्या घरी आले आणि मला म्हणाले "अहो, म्हणे एवढे काहीतरी पंधरा वीस लाख रुपये खर्च करुन थिएटर बांधणं चाललं आहे, काय फायदा त्याचा?" मी म्हटलं "अहो, चार नाटकं होतील. चांगले कार्यक्रम होतील". परत ते म्हणाले "पण त्याचा काय फायदा?". मी म्हटलं "अहो, असं बघा. त्या थिएटरच्या समोरच झांशीच्या राणीचा पुतळा आहे. तो घोडा टांग्याला सुध्दा लावता येत नाही. काय फायदा त्याचा ? त्यानंतर त्या सारस बागेत गेलात तर त्या गणपतीच्या सभोवती लाखो फुलं फुललेली असतात. काय फायदा त्याचा ?" मग मी विचारलं "आपलं वय काय?". ते म्हणाले "शहात्तरावं चालू आहे". मी म्हटलं "काय फायदा?". म्हणून गाणं हाच गाण्याचा फायदा. तो आनंद हाच फायदा. दुसरा इथे हिशेब नाही. आणि आजच्या फायद्याच्या जगाला हे तत्वज्ञान कळत नाही. नव्या जगाचा जर सगळा प्रयत्न चालला असेल तर तुम्हाला गिर्‍हाईक तरी करायचा किंवा मतदार तरी करायचा. हा प्रयत्न चाललेल्या काळात मला नवी चिज पाहिजे म्हणून धावणारे हे वेडे पीर गुरुची सेवा करता करता स्वतः साठ वर्षाचे होऊनही त्यांना विचारलं तर हेच कळेल की "नाही रे बाबा, अजून काही लक्षात आलेलं नाही, अजून अंत लागत नाही" हेच आहे. अजून पुष्कळ पुढे जायचं आहे. हे राग क्षितिजा सारखे आहेत. इथे आहेत असं वाटतं तर पुढे जावं लागतं. संपतच नाही. तिरखवां खांसाहेबांनी वयाच्या ऐंशीव्या वर्षी एका रात्री अप्रतिम तबला वाजवला. मला राहवेना म्हणून मी त्यांचे हात असे हातात घेतले आणि बघतो तर अगदी मुलायम हात. मी म्हटलं "खांसाहेब, आपके हाथ कितने मुलायम है?" ते म्हणाले "तो क्या हो गया ?". मी म्हणालो "नही, आपने जिंदगीभर इतना तबला बजाया !" त्यावर खांसाहेब म्हणाले "अरे बेवकूफ, मैने तबलेसे झगडा थोडेही किया ? मैने तबलेसे प्यार किया. बेटे, किसी सुंदर लडकी के गालोंपर हाथ फिराते हो तो हाथ थोडेही खराब होते है?". एवढं सगळं सांगितलं पण पुढचं फार महत्वाचं आहे. मला म्हणाले "मगर एक बात सुनो, अभी अभी त्रितालेका अंदाजा आ रहा है". वयाच्या ऐंशीव्या वर्षी तो मनुष्य सांगतो की मला त्रितालाचा आत्ता कुठे अंदाज यायला लागला आहे. या रागांचा वाह्यातपणा हाच आहे. सगळा राग आला असं वाटत असतानाच तो लांबा जाऊन उभा रहातो. "स्थिरचर व्यापुनी अवघा तो जगदात्मा दशांगुळे उरला" असं म्हटलंय ना, त्याप्रमाणे हा राग कुठेतरी दशांगुळे उरलेला असतो. तो पुन्हा तुम्हाला खुणावायला लागतो आणि परत त्याच्याकडे धावावं लागतं. "विठो पालवीत आहे" असं म्हटलंय तसे हे राग "पालवीत" आहे याचा साक्षात्कार ज्यांना झाला तेच गवई व्यासांसारखे मोठे होतात आणि अशा गवयांचे आपण कृतज्ञतेने सत्कार करत असतो.

साठाव्या वर्षी मी यांना काय आशीर्वाद देऊ ? मी ह्यांच्यापेक्षा पाच सहा वर्षांनी मोठा आहे आणि माझ्याप्रमाणेच त्यांचाही जन्म नोव्हेंबर महिन्यातच झालेला आहे (फार मोठी माणसं या महिन्यात जन्माला येतात !!) तर मी एवढंच म्हणतो की व्यासांच्या यापुढच्या आयुष्यामधे त्यांचा तंबोरा अखंड वाजत राहो, ते वातावरण त्यांच्या घरामध्ये राहो आणि आपण सतत गात राहिलं पाहिजे अशा प्रकारे वाटण्याची मनाची स्थिती आणि त्या मनाच्या अवस्थेला शरीराची साथ ही दोन्ही लाभावीत अशा प्रकारची इच्छा प्रदर्शित करतो. मला आपण फार मोठा मान दिलात. आमच्या विद्याधर गोखल्यांनी मला "व्हाईसरॉय" वगैरे करुन टाकलं (म्हणजे जी स्थानं आता उरलीच नाहीत त्यातलं एक स्थान देऊन टाकलं !) तर त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो आणि मला आपण हा फार मोठा मान दिल्याबद्दल मी खास माझीही कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो.
-- पु. ल. देशपांडे
a