चिं. त्र्यं. खानोलकर उर्फ आरती प्रभू यांनी लिहिलेली ही कविता. याच कवितेचं नंतर अत्यंत प्रसिद्ध असं गाणंही झालं. ह्रदयनाथ मंगेशकरांनी संगीत दिलेलं हे गीत, आशा भोसले यांनी खरोखरच असं गायलं आहे की ते
स्वरांचे घन येऊन आपल्या मनाला न्हाऊ घालतात प्रत्येक वेळी ऐकताना.
पण मुळात ही कविता आणि ती लिहिण्यामागची पार्श्वभूमी दोन्ही अतिशय उदात्त अशी आहे. एकूणच काव्य, कवी आणि कलाकार या सर्वांसाठीच या कवितेचं स्थान हे पसायदानासारखं आहे. सुनीताबाई देशपांडे यांनीच त्यांच्या 'कवितांजली' ह्या कविता वाचनाच्या कार्यक्रमात ही हकिकत सांगितली होती.
आरती प्रभू यांच्या कविता सुरुवातीला 'सत्यकथा' या मासिकातून प्रसिद्ध होऊ लागल्या आणि साहजिकच ते काव्य अत्यंत लोकप्रिय होऊ लागलं. त्यामुळे 'आरती प्रभू' या नावाला खूप प्रसिद्धी आणि वलय प्राप्त झालं. नेमक्या याच
कारणाने चिं. त्र्य खानोलकरांमधला अत्यंत संवेदनशील असा 'आरती प्रभू' हा कवी खूप अस्वस्थ झाला. त्याच मानसिक घालमेलीतून त्यांनी ही कविता लिहिली. प्रत्येक कवीने, कलाकाराने ज्या कवितेशी प्रामाणिक राहण्याची शपथ घेऊन मगच स्वतःला कलेच्या स्वाधीन करावं.
"ये रे घना, ये रे घना, न्हाऊ घाल माझ्या मना" ... प्रसिद्धी, लोकप्रियता यामुळे कदाचित माझ्या मनात अहंकार निर्माण होईल. आणि त्या अहंकाराने माझं मन मलीन होऊन जाईल, काळवंडून जाईल. अशी भीती, अशी अस्वस्थ करणारी शंका 'आरती प्रभूंच्या' मनात डोकावत होती. म्हणून त्यांनी थेट त्या दयाघनालाच साकडं घातलं की हे दयाघना; तू घनांच्या स्वरूपातून ये आणि माझ्या मनावर बरसून जा.
पण हे बरसणं फक्त भिजण्यासाठी नको... तर तू मला, माझ्या अहंकाराने मलीन झालेल्या मनाला 'न्हाऊ' घाल. आई आपल्या बाळाला न्हाऊमाखू घालते; अंगणात खेळताना, बागडताना, धडपडताना त्या बालकाचे मळलेले अंग धुवून पुसून स्वच्छ करते आणि त्याला त्याचं गोंडस, गोजिरं, निरागस रुप पुन्हा मिळवून देते. तसंच तू घनांमधून , जलधारांमधून थेट माझ्या मनात ये; आणि माझ्या मनावरची ही प्रसिद्धी, वलयामुळे साठलेली अहंकाराची पुटं धुवून टाक. मला पुन्हा एकदा शुद्ध, निर्मळ, निरागस रुप हवं आहे.... म्हणून... "ये रे घना, ये रे घना".
"फुले माझी अळुमाळू, वारा बघे चुरगळू. नको नको म्हणताना, गंध गेला रानावना" ... 'माझ्या कविता', त्यातून व्यक्त होणाऱ्या माझ्या भावना; या अगदी तरल आहेत, नाजूक आहेत. खरंतर त्या भावना इतक्या हळूवार आहेत की
त्यांना फक्त 'अळुमाळू' याच शब्दात व्यक्त करता येईल. हा अळुमाळू शब्द; ज्ञानेश्वरांनी त्यांच्या ओवीमध्ये वापरला आहे. कारण तो नाजूकपणा फक्त स्पर्शाचा भाव नाही; तर ते शुद्धतेचं, पावित्र्याचंही विशेषण आहे.
म्हणून 'आरती प्रभू' म्हणतात की; माझ्या ह्रदयस्थ भावनांमधून उमललेली ही काव्यपुष्पं; ह्या लोकप्रियता, प्रसिद्धी आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या अहंकार आदी ऐहिक वाऱ्याने चुरगळून जातील, विस्कटून जातील. आणि मी त्या
काव्यसुमनांना 'नको नको' म्हणतच होतो. मी स्वतःहून कधीच प्रसिद्धीच्या, लोकप्रियतेच्या वाऱ्यालाही उभा राहिलो नाही. पण ... त्या कवितेतील भावफुलांचा गंध ! तो गंध कसा लपवून ठेवू... ! मी माझी ह्रदयस्थ कविता
कुणाच्याही दृष्टीस पडणार नाही याची काळजी घेतली तरीही तो 'गंध' , तो भावगंध सर्वदूर पसरलाच आहे ! मग आता मी काय करू... म्हणूनच ... "ये रे घना, ये रे घना".
"टाकुनिया घरदार, नाचणार नाचणार; नको नको म्हणताना मनमोर भर राना" ... कविता, काव्यउर्मी, काव्योन्मेष, या गोष्टी अशा आहेत की त्यांना कसलंच भान नाही, कसलीच बंधनं नाहीत. स्वयंभू, स्वच्छंदी अशा भावना आहेत या. "नभ मेघांनी आक्रमिले" या अवस्थेत मोर जसे धुंद, मुग्ध होऊन, पिसारा फुलवून नृत्य करणारच. अगदी तसंच एखादी प्रतिभेची श्रावणसर आल्यावर माझ्या मनातले भावमयुर त्यांचा काव्यपिसारा फुलारून नवनिर्मितीच्या रानावनात मुक्त संचार करणारच !
तेव्हा ते माझं काही एक ऐकत नाहीत. आणि मग त्यांच्या या भावमुग्ध अविष्काराने रसिकजनांचं लक्ष आपोआपच वेधून घेतलं जातं. दयाघना... मला भीती वाटते रे... माझ्या या मुक्तमयुरांना कोणी कैदेत तर नाही ठेवणार ना,
काहीतरी व्यावहारिक आमिष दाखवून त्यांचं स्वातंत्र्य हिरावून तर नाही घेणार ना ! म्हणूनच... तू...
"ये रे घना, ये रे घना".
"नको नको किती म्हणू, वाजणार दूर वेणू; बोलावितो सोसाट्याचा वारा मला रसपाना" ... हा कसा पेच निर्माण झाला आहे ! कितीही नको नको म्हटलं तरी तो काव्यगंध रानवाटांनी पसरणारच आहे. शब्दमाधुर्यातून गुंजारव करणारे आर्त सूर एखाद्या वेणूच्या नादलहरींसारखे विहरत, लहरत कानोकानी पोहचणारच आहेत. आणि मग या साऱ्या शब्दलाघवाचा, भावोन्मेषाचा उगम शोधत शोधत तो प्रचंड लोकप्रियतेचा, प्रसिद्धीचा, लोकाभिमुखतेचा वारा ; अनिवार होऊन माझ्या दिशेने येणारच आहे.
त्या सोसाट्याचा वाऱ्यावादळात मी माझी ही काव्यवेल कशी सांभाळू ! त्या सोसाट्याचा वाऱ्याबरोबर जी प्रतिष्ठेची अहंकारमिश्रीत धुळ उडून येईल; ती या डोळ्यांवाटे माझ्या मनापर्यंत पोहचली तर ... काय करू ! माझी फुलं
कोमेजून जातील ना; चुरगळून जातील ना !म्हणूनच... "ये रे घना, ये रे घना; न्हाऊ घाल माझ्या मना"...
मनामध्ये अशी भावकोवळीक असलेला हा 'आर्ततेचा प्रभू' अवघ्या सेहेचाळीस वर्षात स्वतःच त्या दयाघनाला भेटायला निघून गेला. कदाचित स्वतःच्या 'अळुमाळू' भावसुमनांनी त्या प्रतिभेच्या दात्यालाच न्हाऊ घालण्यासाठी
गेला असावा हा 'प्रभू' ... आवाज चांदण्यांचे ... अजूनही ऐकू येतात मात्र इथेच ठेवून गेला... आपल्यासाठी.
रसग्रहण : रोहित कुलकर्णी
पुलंची पुस्तके खरेदी करण्यासाठी खाली काही ऑनलाईन दुवे
Showing posts with label sunitabai. Show all posts
Showing posts with label sunitabai. Show all posts
Tuesday, March 12, 2024
Tuesday, June 28, 2022
संवेदनशील आणि कर्तबगार सुनीताबाई - गोविंद तळवलकर
सुनीताबाई देशपांडे यांचे व्यक्तिमत्त्व करारी आणि संवेदनशीलही. आथिर्क व्यवहार असोत, मुदिते तपासणे असो वा कुणासाठी मदतीचा हात पुढे करणे असो, त्यात त्यांचा काटेकोरपणा दिसून येई आणि संवेदनशीलताही..
प्रथम पु. ल. आणि आता सुनीताबाई. दोघांच्या निधनामुळे जवळपास ४० वर्षांचा संबंध संपुष्टात आला आणि त्याचबरोबर या काळातील अनेक आठवणी जाग्या झाल्या. तसे पाहिले तर दोघांचीही व्यक्तित्व स्वतंत्र होती, पण दोघेही परस्परांवर किती अवलंबून होते, हे सतत जाणवत होते.
काही वेळा कृतक रागाने सुनीताबाई म्हणत, भाईमुळे आपल्याला आपले काही करता वा लिहिता-वाचता येत नाही; पण त्या पु.लं.शी इतक्या समरस झालेल्या होत्या की, त्यांच्या नंतरच्या काळात त्यांच्या पुस्तकांच्या आवृत्त्या, त्यांच्या संबंधीचा आथिर्क व्यवहार इत्यादी कामात सुनीताबाई बराच काळ व्यग्र राहिल्या. नाहीतरी पु. ल. असतानाही लिखाण तयार झाल्यावर त्याच्या शुद्धलेखनाची तपासणी, प्रती तयार करणे आणि प्रकाशकाकडे हस्तलिखित देऊन मुदिते आली की, ती अनेकवार तपासणे ही जबाबदारी सुनीताबाईच आवडीने पार पाडीत असत.
मुदितांबाबत त्या नेहमीच कटाक्ष बाळगीत. यामुळेच कुसुमाग्रजांच्या 'विशाखा' या संग्रहाच्या आवृत्तीत चुका आढळल्यावर त्यांनी दुरुस्त्या करून तात्यासाहेबांकडे पाठवल्या. इतके करूनही नव्या आवृत्तीत चुका राहिल्याच.
वेळ मिळाल्यावर त्यांनी पु.लं.च्या नंतर काही लिखाण केले, पण त्यातलेही काही दोघांच्या सहजीवनासंबंधी बरेच होते. पु.ल. व सुनीताबाई यांच्या स्वभावातही अंतर होते. पु.लं.ना सहसा कोणाला दुखवायचे नसे. यामुळे काही वेळा गोंधळ होई आणि तो निस्तरण्याचे काम सुनीताबाईंवर पडे आणि वाईटपणाच्या त्या धनी होत. पु.ल. यांच्या लिखाणावर सर्व संस्कार करण्याप्रमाणेच नाटकांच्या व एकपात्री प्रयोगांची सर्व व्यवस्था सुनीताबाई सांभाळत होत्या. काटेकोरपणा आणि व्यवस्थितपणा हा त्यांच्यापाशी जन्मजातच होता. यामुळे भाषणाचा कार्यक्रम ठरवण्यास कोणी आल्यास त्याची पूर्वपरीक्षा होत असे. पण यामुळे कार्यक्रमात कसलाही व्यत्यय येत नसे. याच त्यांच्या वृत्तीमुळे पु. ल. देशपांडे फौंडेशनतफेर् देणग्या देण्यासाठी निवड करण्यात त्यांचा बराच वेळ जाई.
आता तो काळ संपला...
'पु.ल.' फौंडेशनच्या संबंधातील प्राप्तिकराच्या संबंधात सुनीताबाईंना काही प्रश्न होते. कोणत्या रीतीने कायदा मोडला जाता कामा नये, पण नोकरशहांमुळे नियमांचा भलताच अर्थ लावला जाऊ नये, असे त्यांना वाटू लागले. मग पालखीवालांचा सल्ला घेण्याचे ठरले. पु.ल. व सुनीताबाईंनी हा विषय माझ्याकडे काढला, तेव्हा पालखीवालांशी माझे स्नेहाचे संबंध असल्यामुळे मी भेट ठरवली. आम्ही तिघे गेलो. प्रश्न काय आहे, हे सुनीताबाईंनी स्पष्ट केले व शंका सांगितल्या. पालखीवाला जेव्हा कोणतीही गोष्ट कमालीच्या एकाग्रतेने ऐकत व विचार करत तेव्हा वातानुकूलित दालनातही त्यांच्या कपाळावर घाम जमत असे. तसे झाले आणि सात-आठ मिनिटांत त्यांनी सुनीताबाईंचा विचार पूर्णत: बरोबर ठरवला. ते त्यांना म्हणाले की, तुम्ही चांगल्या वकील झाल्या असता.

पु. ल. व सुनीताबाई काही ध्येयवादामुळे भाऊसाहेब हिरे यांच्या मालेगावमधील महात्मा गांधी विद्यालयात शिक्षक म्हणून काम करत होते आणि त्या आश्रमाचे व्यवस्थापन सुनीताबाई सांभाळत. एकदा महाराष्ट्रातील काही प्रमुख गांधीवादी तिथे राहायला आले असता, आयत्या वेळी त्यापैकी काहींनी गाईचे दूध व त्या दुधाचेच दही हवे, अशी मागणी केली. आयत्या वेळी हे जमणे शक्य नव्हते. तेव्हा सुनीताबाईंनी त्यांना नुसते गाईचे दूध नाही, असे सांगितले नाही, तर तुमचा जर इतका कडक नियम आहे तर गाईचे दूध मिळू शकते की नाही, याची आधी चौकशी करायची होती. तुमचे नियम इतरांना त्रासदायक होऊ शकतात, याचा विचार करायला हवा होता, असे खडसावले.
याच सुनीताबाई मल्लिकार्जुन मन्सूर, वसंतराव देशपांडे, कवी बोरकर, कुमार गंधर्व इत्यादींचा अतिशय आपुलकीने पाहुणचार करताना मी पाहिले आहे. मन्सूर यांचे सोवळेओवळे असे. तेही त्या कटाक्षाने सांभाळत. काव्यात रमणाऱ्या सुनीताबाई सुग्रण होत्या. त्याचा अनुभव मी अनेकदा घेतला आणि ते दोघेही आमच्या घरी येत तेव्हा सौ. शकुंतलाच्या पदार्थांचे कौतुक करून आस्वाद घेत. मित्रपरिवारातील कोणी आजारी पडल्यास नुसती चौकशी करून न थांबता शक्य ती मदत करण्यास सुनीताबाई चुकत नसत. भाषाशास्त्रज्ञ डॉ. कालेलकर यांच्या अखेरच्या आजारात सुनीताबाईच सर्व पाहत होत्या.
अरुण लिमये हे कॅन्सरने आजारी झाले तेव्हा प्रथम अमेरिकेतून औषध आणण्याची कल्पना सुनीताबाईंची व कुमुद मेहता यांची. त्या काळात परकी चलनावर बरीच नियंत्रणे होती आणि सरकारी परवाना लागत असे. त्या दोघी माझ्याकडे आल्या आणि आम्ही तिघांनी बरीच खटपट करून औषध आणण्यात यश मिळवले. नंतर लिमये यांना उपचारासाठी परदेशी पाठवण्याच्या कामी सुनीताबाई व कुमुद मेहता यांचा पुढाकार होता.
पु. ल. यांचे एकपात्री प्रयोग व पुस्तकांची विक्रमी विक्री हे पर्व सुरू होण्यापूवीर् पु.ल. दिल्लीत आकाशवाणी खात्यातफेर् नुकत्याच सुरू झालेल्या टीव्ही विभागात काम करत होते. त्या काळात राजधानीत मराठी साहित्य संमेलन भरवण्याचा संकल्प सुटला; पण संकल्प व सिद्धी यात पैसा या परमेश्वराची इच्छा उभी असते. संकल्प करणाऱ्यांनी याचा विचार केला नव्हता. हे पाहून पु. ल. व सुनीताबाई यांनी एक कार्यक्रम केला आणि प्राथमिक खर्चाची सोय करून दिली.
काव्य, ललित साहित्य यांची उत्तम जाण असलेल्या सुनीताबाईंना खगोलशास्त्राचे आकर्षण होते. यासंबंधी त्यांनी काही वाचन केले होते. या आवडीमुळे त्यांनी नारळीकरांच्या संस्थेला मदत केली. कवितेच्या आवडीतूनच पु. ल. व सुनीताबाई यांनी काव्यवाचनाचे कार्यक्रम केले. प्रवासातही कवितांची उजळणी होत असे. यामुळे त्यांच्याबरोबरचा प्रवास आनंददायक होत असे.
चाळीसएक वर्षांच्या सहवासात आमचे अनेक सुखसंवाद झाले आणि काही वेळा वादही झाले; पण वाद मित्रत्वाचे व निकोप वृत्तीचे होते. तो काळ आता संपला.
गोविंद तळवलकर
अमेरिका
महाराष्ट्र टाईम्स
१०-११-२००९
प्रथम पु. ल. आणि आता सुनीताबाई. दोघांच्या निधनामुळे जवळपास ४० वर्षांचा संबंध संपुष्टात आला आणि त्याचबरोबर या काळातील अनेक आठवणी जाग्या झाल्या. तसे पाहिले तर दोघांचीही व्यक्तित्व स्वतंत्र होती, पण दोघेही परस्परांवर किती अवलंबून होते, हे सतत जाणवत होते.
काही वेळा कृतक रागाने सुनीताबाई म्हणत, भाईमुळे आपल्याला आपले काही करता वा लिहिता-वाचता येत नाही; पण त्या पु.लं.शी इतक्या समरस झालेल्या होत्या की, त्यांच्या नंतरच्या काळात त्यांच्या पुस्तकांच्या आवृत्त्या, त्यांच्या संबंधीचा आथिर्क व्यवहार इत्यादी कामात सुनीताबाई बराच काळ व्यग्र राहिल्या. नाहीतरी पु. ल. असतानाही लिखाण तयार झाल्यावर त्याच्या शुद्धलेखनाची तपासणी, प्रती तयार करणे आणि प्रकाशकाकडे हस्तलिखित देऊन मुदिते आली की, ती अनेकवार तपासणे ही जबाबदारी सुनीताबाईच आवडीने पार पाडीत असत.
मुदितांबाबत त्या नेहमीच कटाक्ष बाळगीत. यामुळेच कुसुमाग्रजांच्या 'विशाखा' या संग्रहाच्या आवृत्तीत चुका आढळल्यावर त्यांनी दुरुस्त्या करून तात्यासाहेबांकडे पाठवल्या. इतके करूनही नव्या आवृत्तीत चुका राहिल्याच.
वेळ मिळाल्यावर त्यांनी पु.लं.च्या नंतर काही लिखाण केले, पण त्यातलेही काही दोघांच्या सहजीवनासंबंधी बरेच होते. पु.ल. व सुनीताबाई यांच्या स्वभावातही अंतर होते. पु.लं.ना सहसा कोणाला दुखवायचे नसे. यामुळे काही वेळा गोंधळ होई आणि तो निस्तरण्याचे काम सुनीताबाईंवर पडे आणि वाईटपणाच्या त्या धनी होत. पु.ल. यांच्या लिखाणावर सर्व संस्कार करण्याप्रमाणेच नाटकांच्या व एकपात्री प्रयोगांची सर्व व्यवस्था सुनीताबाई सांभाळत होत्या. काटेकोरपणा आणि व्यवस्थितपणा हा त्यांच्यापाशी जन्मजातच होता. यामुळे भाषणाचा कार्यक्रम ठरवण्यास कोणी आल्यास त्याची पूर्वपरीक्षा होत असे. पण यामुळे कार्यक्रमात कसलाही व्यत्यय येत नसे. याच त्यांच्या वृत्तीमुळे पु. ल. देशपांडे फौंडेशनतफेर् देणग्या देण्यासाठी निवड करण्यात त्यांचा बराच वेळ जाई.
आता तो काळ संपला...
'पु.ल.' फौंडेशनच्या संबंधातील प्राप्तिकराच्या संबंधात सुनीताबाईंना काही प्रश्न होते. कोणत्या रीतीने कायदा मोडला जाता कामा नये, पण नोकरशहांमुळे नियमांचा भलताच अर्थ लावला जाऊ नये, असे त्यांना वाटू लागले. मग पालखीवालांचा सल्ला घेण्याचे ठरले. पु.ल. व सुनीताबाईंनी हा विषय माझ्याकडे काढला, तेव्हा पालखीवालांशी माझे स्नेहाचे संबंध असल्यामुळे मी भेट ठरवली. आम्ही तिघे गेलो. प्रश्न काय आहे, हे सुनीताबाईंनी स्पष्ट केले व शंका सांगितल्या. पालखीवाला जेव्हा कोणतीही गोष्ट कमालीच्या एकाग्रतेने ऐकत व विचार करत तेव्हा वातानुकूलित दालनातही त्यांच्या कपाळावर घाम जमत असे. तसे झाले आणि सात-आठ मिनिटांत त्यांनी सुनीताबाईंचा विचार पूर्णत: बरोबर ठरवला. ते त्यांना म्हणाले की, तुम्ही चांगल्या वकील झाल्या असता.

पु. ल. व सुनीताबाई काही ध्येयवादामुळे भाऊसाहेब हिरे यांच्या मालेगावमधील महात्मा गांधी विद्यालयात शिक्षक म्हणून काम करत होते आणि त्या आश्रमाचे व्यवस्थापन सुनीताबाई सांभाळत. एकदा महाराष्ट्रातील काही प्रमुख गांधीवादी तिथे राहायला आले असता, आयत्या वेळी त्यापैकी काहींनी गाईचे दूध व त्या दुधाचेच दही हवे, अशी मागणी केली. आयत्या वेळी हे जमणे शक्य नव्हते. तेव्हा सुनीताबाईंनी त्यांना नुसते गाईचे दूध नाही, असे सांगितले नाही, तर तुमचा जर इतका कडक नियम आहे तर गाईचे दूध मिळू शकते की नाही, याची आधी चौकशी करायची होती. तुमचे नियम इतरांना त्रासदायक होऊ शकतात, याचा विचार करायला हवा होता, असे खडसावले.
याच सुनीताबाई मल्लिकार्जुन मन्सूर, वसंतराव देशपांडे, कवी बोरकर, कुमार गंधर्व इत्यादींचा अतिशय आपुलकीने पाहुणचार करताना मी पाहिले आहे. मन्सूर यांचे सोवळेओवळे असे. तेही त्या कटाक्षाने सांभाळत. काव्यात रमणाऱ्या सुनीताबाई सुग्रण होत्या. त्याचा अनुभव मी अनेकदा घेतला आणि ते दोघेही आमच्या घरी येत तेव्हा सौ. शकुंतलाच्या पदार्थांचे कौतुक करून आस्वाद घेत. मित्रपरिवारातील कोणी आजारी पडल्यास नुसती चौकशी करून न थांबता शक्य ती मदत करण्यास सुनीताबाई चुकत नसत. भाषाशास्त्रज्ञ डॉ. कालेलकर यांच्या अखेरच्या आजारात सुनीताबाईच सर्व पाहत होत्या.
अरुण लिमये हे कॅन्सरने आजारी झाले तेव्हा प्रथम अमेरिकेतून औषध आणण्याची कल्पना सुनीताबाईंची व कुमुद मेहता यांची. त्या काळात परकी चलनावर बरीच नियंत्रणे होती आणि सरकारी परवाना लागत असे. त्या दोघी माझ्याकडे आल्या आणि आम्ही तिघांनी बरीच खटपट करून औषध आणण्यात यश मिळवले. नंतर लिमये यांना उपचारासाठी परदेशी पाठवण्याच्या कामी सुनीताबाई व कुमुद मेहता यांचा पुढाकार होता.
पु. ल. यांचे एकपात्री प्रयोग व पुस्तकांची विक्रमी विक्री हे पर्व सुरू होण्यापूवीर् पु.ल. दिल्लीत आकाशवाणी खात्यातफेर् नुकत्याच सुरू झालेल्या टीव्ही विभागात काम करत होते. त्या काळात राजधानीत मराठी साहित्य संमेलन भरवण्याचा संकल्प सुटला; पण संकल्प व सिद्धी यात पैसा या परमेश्वराची इच्छा उभी असते. संकल्प करणाऱ्यांनी याचा विचार केला नव्हता. हे पाहून पु. ल. व सुनीताबाई यांनी एक कार्यक्रम केला आणि प्राथमिक खर्चाची सोय करून दिली.
काव्य, ललित साहित्य यांची उत्तम जाण असलेल्या सुनीताबाईंना खगोलशास्त्राचे आकर्षण होते. यासंबंधी त्यांनी काही वाचन केले होते. या आवडीमुळे त्यांनी नारळीकरांच्या संस्थेला मदत केली. कवितेच्या आवडीतूनच पु. ल. व सुनीताबाई यांनी काव्यवाचनाचे कार्यक्रम केले. प्रवासातही कवितांची उजळणी होत असे. यामुळे त्यांच्याबरोबरचा प्रवास आनंददायक होत असे.
चाळीसएक वर्षांच्या सहवासात आमचे अनेक सुखसंवाद झाले आणि काही वेळा वादही झाले; पण वाद मित्रत्वाचे व निकोप वृत्तीचे होते. तो काळ आता संपला.
गोविंद तळवलकर
अमेरिका
महाराष्ट्र टाईम्स
१०-११-२००९
Labels:
PL Deshpande,
Pula,
Pula Deshpande,
pulaprem,
sunita deshpande,
sunitabai,
गोविंदराव तळवलकर,
पु.ल.,
पु.लं.,
पुलं,
सुनीताबाई
Wednesday, April 20, 2022
आहे मनोहर तरी गमते उदास -- (मुकुंद कुलकर्णी)

सुनिताबाई देशपांडे
3 जुलै 1926 - 7 नोव्हेंबर 2009
पुलं मध्ये एक खेळिया दडला होता . त्यांचा स्टेज परफॉर्मन्स अप्रतिम असे . त्यांना सुनिताबाईंची तेवढीच तोलामोलाची साथ लाभत असे . उभयतांनी सादर केलेला बा. भ. बोरकरांच्या कविता वाचनाचा कार्यक्रम रसिकांना मंत्रमुग्ध करत असे . पुलंच्या पेटीवादनासोबत सुनिताबाईंच्या गप्पांचा कार्यक्रमही रंगतदार होत असे . स्वतः सुनिताबाई तरल कवीमनाच्या होत्या . पुलंच्या स्मरणार्थ झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी पद्मा गोळे यांच्या दोन कविता सादर केल्या होत्या , त्या ऐकणे हा अवर्णनीय आनंदानुभव होता . कविता वाचन कसे असावे याचा तो आदर्श वस्तुपाठ होता . त्या स्वतः उत्तम परफॉर्मर होत्या . महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व पुल यांच्या अर्धांगिनी सुनिताबाई या स्वतः उत्तम साहित्यिक होत्या . इ.स.1945 मध्ये त्यांची भाईंशी भेट झाली . दि.12 जून 1946 रोजी भाई व सुनिताबाई विवाहबंधनात बांधले गेले . पूर्वाश्रमीच्या सुनिता ठाकूर या मराठी लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या भाईंशी विवाहबद्ध झाल्या . पुल आणि सुनिताबाई यांनी ओरिएंटल हायस्कूल येथे शिक्षक म्हणून काम केले होते . सुनिताबाईंनी पुलंबरोबर अनेक नाटकात काम केले होते . रत्नागिरी येथे सुनिताबाईंचे पुलं बरोबर लग्न झालं होतं . सुनिता ठाकूर ही देखणी , बुद्धीवान मनस्वी तरुणी रत्नागिरीच्या समृद्ध निसर्गाच्या साक्षीने पुलंची अर्धांगिनी झाली .
सुनिताबाईंनी लिखाणाला सुरूवात फार उशीरा केली . इ.स.1990 मध्ये त्यांचे ' आहे मनोहर तरी ' हे पारितोषिकपात्र पुस्तक प्रसिद्ध झाले . आहे मनोहर तरी हा आंबटगोड आठवणींचा गुलदस्ता आहे . ही मराठी साहित्यातील एक सर्वोत्तम कलाकृती आहे . आहे मनोहर तरी .... सर्वांनाच खूप आवडले . अनेक भाषांत त्याची भाषांतरे झाली . ' मनोहर छे पन ' गुजराथी अनुवाद सुरेश दलाल , ' है सबसे मधुर फिर भी ' हिंदी अनुवाद रेखा देशपांडे , ' अँड पाईन फॉर व्हॉट इज नॉट 'इंग्रजी अनुवाद गौरी देशपांडे तसेच उमा कुलकर्णी यांनी आहे मनोहरचा कन्नड अनुवाद केला आहे . भारतभरातल्या वाचकांपर्यंत हे पुस्तक पोहोचले आहे.
पु.ल. जसे रसिकांचे भाई तशा सुनिता देशपांडे सुनीताबाई . सुनिताबाईंनी वंदे मातरम आणि नवरा बायको या मराठी चित्रपटात तसेच सुंदर मी होणार राजेमास्तर या नाटकातून भूमिकाही साकारल्या आहेत . तसेच त्यांचा एकपात्री प्रयोग राजमाता जिजाऊ ही खूप गाजला होता . ' प्रिय जी ए ' या त्यांच्या जी ए कुलकर्णी यांच्या बरोबरच्या पत्रव्यवहाराचे पुस्तक हा तर मराठी साहित्यातील एक अमूल्य ठेवाच आहे . आहे मनोहर तरी , प्रिय जी ए , मण्यांची माळ , मनातलं अवकाश , सोयरे सकळ , समांतर जीवन या आपल्या साहित्यकृतींनी सुनिताबाईंनी मराठी वाङमय समृद्ध केले आहे . जी ए कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पहिला ' प्रिय जी ए पुरस्कार ' सुनिताबाईंना इ.स. 2008 साली मिळाला होता .
सुनिताबाईंच्या प्रतिभेला जी हिरो प्रतिमा अभिप्रेत होती ती श्रीकृष्णासारखी सर्वगुणसंपन्न होती . राकट कणखर तरीही अति मृदू , तरल . फ्रेंच पायलट , लेखक सेंट एक्झुपेरी हा सुनिताबाई आणि जी ए यांना भावणारा समान दुवा होता .' दि लिटिल प्रिन्स ' या पुस्तकात तो लिहितो , " what is most impossible is invisible . " असं काहीसं झाल होतं . पुलंनी या विषयावर नाटक करावं अशी सुनिताबाईंची इच्छा होती , पण पुलनी ते फारसं मनावर घेतलं नाही . पिग्मॕलियनच ती फुलराणी हे रुपांतर पुलंनी केलं . बर्नार्ड शॉ आणि पुल हे एकाच जातकुळीचे , सहज सुंदर आणि निर्मळ . तसेच जी ए , सुनिताबाई , खानोलकर ग्रेस हे समविचारी . जी ए आणि सुनिताबाई यांच्या पत्रव्यवहारात हे पदोपदी जाणवतं . ' सन विंड अँड स्टार्स ' हे एक्झुपेरीच पुस्तक त्यांच्या पत्रसंवादात येतं . जी ए आणि सुनिताबाई यांच्या पत्रसंवादात जगभरातील साहित्याचे संदर्भ तर येतातच , पण एकमेकांविषयीचा आदर , आस्था ही व्यक्त होते ." विपरीत अनुभवांची वेदनाच बरोबर घेऊन चालणारा एक हळवा , मनस्वी कलावंत जी एं च्या रुपाने भेटला आणि सुनिताबाईंनी त्याच्यावर स्नेहाचा वर्षाव केला . " अरुणा ढेरेंची ही प्रस्तावना यथार्थच आहे .
कार्लाईल या सुप्रसिद्ध इंग्रजी लेखकाच्या आणि त्याच्या पत्नीवरच्या लेखावरून पुल आणि सुनिताबाई यांच्यात वाद होतात आणि सुनिताबाईंची लेखणी धारदार होते . तोच संघर्ष पुढे आहे मनोहर मध्ये सुनिताबाई आणि भाई यांच्या माध्यमातून अवतरला आहे . काही असलं तरी गाणारा , अभिनय करणारा , विनोदांनी लोकांना तणावमुक्त करणारा , स्नेह्यांचा प्रचंड गोतावळा बांधून असणारा , सर्व लोकांचा हिरो हाच त्यांचा हिरो होता . तसाच तो सर्वगुण संपन्न लिटिल प्रिन्सही होता . भाई आणि सुनीताबाईंच हे मैत्र खरोखरच अलौकिक होतं
अत्यंत समृद्ध , परिपक्व सहजीवन जगलेल्या या महाराष्ट्राच्या लाडक्या दंपतीचे आदरपूर्वक स्मरण . सुनिताबाईंना सादर प्रणाम !
मुकुंद कुलकर्णी ©
Labels:
PL Deshpande,
Pula,
Pula Deshpande,
pulaprem,
sunita deshpande,
sunitabai,
पु.ल.,
पु.लं.,
पुलं,
सुनीताबाई
Subscribe to:
Posts (Atom)